(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • संत आडकोजी महाराज

    महाराष्ट्रात तुकडोजी महाराज जेवढे सर्वपरिचित होते तसेच त्यांचे गुरु आडकोजी महाराज.

  • प्रज्ञा दया पवार

    ख्यातनाम साहित्यिक पद्मश्री दया पवार यांची कन्या असल्याने लिहिण्याचा वारसा त्यांना घरातून मिळाला. आई हिरा पवार प्राथमिक शाळेमध्ये शिक्षिका आणि मुख्याध्यापिका.

  • शाहरुख खान

    चाहत्यांतर्फे किंग खान ही उपाधी मिळालेला शाहरूख खान दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीचा विशिष्ट काळ गाजवणारा अभिनेता म्हणूनही ओळखला जातो. त्याचा जन्म २ नोव्हेंबर १९६५ रोजी झाला. वीसेक वर्षांपूर्वी "फौजी' नावाची मालिका दूरदर्शनवरून प्रसारित व्हायची. अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या या मालिकेतील नायकाने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळविले. रुपेरी पडद्याच्या दिशेने टाकलेले शाहरुख खानचे ते पहिले पाऊल होते. त्यानंतर "दिल दरिया', "दूसरा केवल', "सर्कस' अशा काही मालिकांमध्ये त्याने काम केले. "दीवाना' या चित्रपटानंतर त्याने टीव्हीसाठी काम थांबवले. चित्रपटांतच त्याला भरभरून यश मिळाले.

    आमीर खानने सोडलेला रोल शाहरुख खानने पटकावला आणि इथूनच यश चोप्रा-शाहरुख खान हे नवे कॉम्बिनेशन जन्मले. आमीर खानची चूक त्याच्यासाठी एक नवा प्रतिस्पर्धी निर्माण करून गेली. प्रत्येक सीनचा किस पाडणारा आमीर खान आणि कथा काय आहे, हेही न विचारणा शाहरुख खान या दोघांच्यात यश चोप्राने शाहरुख खानची निवड केली. शाहरुख खान सुपरस्टार झाला १९९२ मध्ये प्रदर्शित दीवाना या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. बाजीगर, डर या चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका त्याने साकारल्या.

    १९९५ सालच्या आदित्य चोप्रा दिग्दर्शित दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे ह्या चित्रपटामध्ये प्रणय नायकाची भूमिका करून आपली पडद्यावरील प्रतिमा बदलली. त्यानंतर करण जोहर याच्या दिग्दर्शनाखाली कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम या चित्रपटांत त्याने भूमिका केल्या. पडद्यावरची त्याची व काजोलची गाजलेली लोकप्रिय जोडी आहे. शाहरूख खानने ५० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. त्याला १४ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले असून फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार आठ वेळा मिळवणारा तो दिलीप कुमारसह दुसराच अभिनेता आहे.

    २००५ साली त्याला भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. रेड चिलीज एंटरटेन्मेन्ट ह्या कंपनीचा तो सह-मालक आहे. भारतीय प्रिमीयर लीगमधील कोलकाता नाईट रायडर्स ह्या संघाचा देखील तो सह-मालक आहे. मात्र, सुपरस्टार झाला तरीही शाहरुखने टीव्हीबरोबर आपले नाते तोडले नाही. "कौन बनेगा करोडपती?', "क्या, आप पॉंचवी पास से तेज है?', "जोर का झटका- टोटल वाइप आउट' यासारखे "रिऍलिटी शो' तो आतापर्यंत करत आला. २००८ मध्ये न्यूजवीक साप्ताहिकाने शाहरूखला जगातील ५० सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये स्थान दिले तर २०११ मध्ये लॉस एंजेल्स टाइम्स वृत्तपत्राने त्याचा जगातील सर्वात यशस्वी चित्रपट अभिनेता ह्या शब्दांत गौरव केला. आज त्याची जी ‘रोमँटिक हिरो’ म्हणून ओळख आहे, त्यामागे त्याची अफाट मेहनत आहे ‘बादशहा‘ चित्रपटानंतर बॉलिवडूचा बादशहा म्हणून, तर कधी किंग खानला संबोधले जाते. भारताबरोबरच विदेशातही शाहरुखच्या चाहत्यांची संख्या प्रचंड आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • मुकुंदराज देव

    युवकांमध्ये शास्त्रीय संगीताची गोडी वाढविण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे, तबलावादक श्री. मुकुंदराज देव म्हणजे भारतीय संगीताची झेप सात समुद्रपार नेणार्‍या अनेक रत्नांपैकी एक रत्न.

  • किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका सरस्वतीबाई राणे

    सरस्वतीबाई राणे ऊर्फ सकीना यांचा जन्म किराणा घराण्याचे उस्ताद अब्दुल करीम खाँ साहेब व ताराबाई माने या दांपत्याच्या पोटी ४ ऑक्टोबर १९१३ रोजी झाला.

    ताराबाई ह्या सरदार मारुतीराव माने यांच्या सुकन्या होत. मारुतीराव माने हे बडोदा संस्थानाच्या राजमातांचे बंधू होते. अब्दुल करीम खाँ हे त्या राजदरबारात गायक होते व ताराबाईंना गाणे शिकवत होते. दोघांचे प्रेम जुळले व त्यांनी विवाहाचा निर्णय घेतला. परंतु ताराबाईंच्या मातापित्यांचा ह्या विवाहास विरोध असल्यामुळे अब्दुल करीम खाँ व ताराबाईंना संस्थान सोडावे लागले.

    त्यांनी मुंबईत संसार थाटला व यथावकाश पाच अपत्यांना जन्म दिला. त्यांच्या दोन पुत्रांची नावे सुरेश उर्फ अब्दुल रहमान व कृष्ण ही होती; तर मुलींची नावे चंपाकली, गुलाब आणि सकीना उर्फ छोटूताई अशी होती. पुढे ही भावंडे अनुक्रमे सुरेशबाबू माने, कृष्णराव माने, हिराबाई बडोदेकर, कमलाबाई बडोदेकर आणि सरस्वतीबाई राणे या नावांनी प्रसिद्धीस पावली.

    उस्ताद अब्दुल करीम खाँसाहेब यांच्याकडून सुरू झालेली किराणा घराण्याची परंपरा पुढे सुरेशबाबू माने, हिराबाई बडोदेकर, सरस्वतीबाई राणे, कमलाबाई बडोदेकर या भावंडांनी समर्थपणे सुरू ठेवली. त्यांनी किराणा घराण्याला अनेक दिग्गज गायक दिले. संगीत एकच प्याला..संशय कल्लोळ..संगीत सौभद्र या मराठी संगीत नाटकात सरस्वतीबाई राणे यांनी कामे केली होती. ख्याल गायिकेतील जुगलबंदीची सुरवात सरस्वतीबाई राणे यांनीच केली होती.

    मराठी चित्रपट ''पायाची दासी'' मध्ये महिला पार्श्वगायिका म्हणून सरस्वतीबाई राणे यांनी गाणी गायली होती. १९४३ मध्ये प्रदर्शित झालेल्या निर्देशक विजय भट्ट यांच्या ''रामराज्य'' या चित्रपटातील सरस्वतीबाई राणे यांनी गायलेली गाणी खूपच लोकांना आवडली होती. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताप्रमाणेच मराठी-हिंदी चित्रपटांसाठी पार्श्व९गायन, भावगीत गायन, संगीत रंगभूमीवर अभिनय असे त्यांचे विविधांगी कर्तृत्व होते. गायिका मीना फातर्पेकर यांच्या त्या आजी होत. सरस्वतीबाई राणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दर वर्षी पुरस्कार देण्यात येतो.

    सरस्वतीबाई राणे यांचे निधन १० ऑक्टोबर २००६ रोजी झाले.

    -- संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • लेखक व्ही. एस. नायपॉल

    २००१ मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला तर त्यांना ‘ सर ‘ हा किताब देखील मिळाला आहे. नायपॉल यांचे लिखाण नेहमीच वादग्रस्त ठरले त्यांनी अनेक पुस्तके लिहिली परंतु त्यांचे खाजगी आयुष्य देखील वादग्रस्तच राहिले.

  • सुभाष स नाईक

    सुभाष नाईक हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. ते विविध विषयांवर विपुल लेखन करतात. ते मराठीसृष्टीचे एक मुख्य लेखक असून मराठीसृष्टीविषयी प्रचंड आत्मियता असलेले आधारस्तंभ आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत.

  • मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे

    मराठवाडी बोलीच्या ढंगातील संवादफेकीसाठी व विनोदी अभिनयासाठी ते प्रसिद्ध आहेत. मकरंद अनासपुरे यांचा जन्म २२ जून १९७३ रोजी औरंगाबाद येथे झाला.

    मकरंद अनासपुरे यांनी ''सरकारनामा'' या चित्रपटातुन आपली मराठी चित्रपट सृष्टीतील कारकीर्द सुरु केली. २००५ मध्ये आलेल्या चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ''कायद्याच बोला'' या चित्रपटाच्या यशाने त्यांना मराठी चित्रपटांमध्ये एक नवीन ओळख मिळाली. त्या नंतर अनेक विनोदी चित्रपटात त्यांनी अभिनय केला. पण विनोदी अभिनेता असा ठसा पुसण्यासाठी त्यांनी ''सुम्भराण'', ''पारध'', ''अनवट'' अशा चित्रपटांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी ''डँबीस'' या चित्रपटाचे दिग्दर्शन हि केले आहे. सोबतच त्यांनी ''गोष्ट छोटी डोंगराएवढी'' आणि ''गल्लीत गोंधळ'' दिल्लीत मुजरा या चित्रपटांची निर्मिती केली आहे.

    राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना आधार देण्यासाठी पुढे आलेल्या अभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांचे कार्य कौतूकास्पद ठरत आहे. कारण त्यांनी सुरू केलेल्या नाम फाऊंडेशनला राज्यातील जनतेने भरभरून प्रतिसाद दिला आहे. या संस्थे अंतर्गत ते महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील शेतकर्यांना मदत करतात.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • ज्येष्ठ संगीतकार रोशन

    हिंदी चित्रपट सृष्टीचा सन १९५० ते १९७०  हा चित्रपट संगीताच्या दृष्टीने सुवर्ण काळ मानला जातो. या काळात अनेक प्रथितयश संगीतकारांनी अनमोल अशा गाण्यांची रसिकांवर अगदी बरसात केली. नुसते गाण्यांवर चित्रपट चालण्याचे ते दिवस होते. ज्येष्ठ संगीतकार रोशन यांनी याच काळात आपल्या सुमधुर गीतांची देणगी चित्रपट सृष्टीला  दिली.

  • देबू देवधर

    देवधर, देबू

    मराठी चित्रपटांनी अलीकडे तांत्रिकदृष्टय़ा आणि आशयदृष्टय़ा कात टाकली असली तरी गेली अनेक वर्षे मराठी चित्रपटांची प्रतिमा, तंत्राच्या दृष्टीने दरिद्री, अशीच होती. ‘कॅमेरा एकाच ठिकाणी ठेवून चित्रीत करण्यात आलेल्या नाटकांचे स्वरूप,’ बहुतांश मराठी चित्रपटांचे असे, हे नाकारता येत नाही.या आरोपातून मराठी चित्रपटांना ‘मुक्ती’ देण्यासाठी धडपडणारी जी मूठभर माणसे मराठी, चित्रपटसृष्टीत होती त्यात छायाचित्रकार देबू देवधर यांचे नाव महत्त्वाचे होते. चित्रपटांच्या चौकटी देखण्या असाव्यात,

    त्यांची मांडणी, प्रकाशयोजना यामागे काहीतरी विचार असावा, केवळ प्रसंग चित्रीत करण्याऐवजी, त्या प्रसंगांला, अर्थाला त्या दृश्यांतून उठाव मिळावा आणि एकूण चित्रपटाच्या परिणामात त्याने भर घालावी, यासाठी या सगळ्यांची जाण असलेले छायाचित्रकार आणि दिग्दर्शक असावे लागतात. त्यामुळेच देबू देवधरांना ‘छायालेखक’ हा शब्द फार आवडत असे. ‘छाया-प्रकाशा’च्या मदतीने पडद्यावर चित्र काढणारा अथवा चित्रचौकटींच्या भाषेत आपले लिखाण करणारा तो छायाचित्रकार, अशी व्याख्या देबूदा करीत. त्यांच्या या वैचारिक स्पष्टपणामुळे आणि कलात्मक भूमिकेमुळेच, ‘पाटय़ा टाकू इच्छिणारे’ निर्माते-दिग्दर्शक त्यांच्याकडे येण्याचे टाळत असत आणि मोजक्या परंतु मनाजोगत्या कामावर स्वत: देबूदाही खूश होते, त्यामुळेच तीन दशकांच्या वाटचाली त्यांच्या चित्रपटांची संख्या मोजकी राहिली. देबूदांचे वडील फोटोग्राफर होते व त्यांच्या स्टुडिओतच देबूदांनी ‘स्थिरचित्रणाचे’ पहिले धडे घेतले. त्यातूनच त्यांना ‘हलत्या चित्रणा’चे अर्थात मुव्ही कॅमेऱ्याचे आकर्षण निर्माण झाले व पुढे त्यांनी फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूटमध्ये छायाचित्रणाच्या प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतला. या संस्थेतून तांत्रिक पदवी मिळविणाऱ्या बहुसंख्य तंत्रज्ञांचा व्यावसायिक चित्रपटांमधील तंत्रज्ञांकडे, प्रशिक्षण न घेता केवळ अनुभवाच्या शिदोरीवर या क्षेत्रात येणाऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुच्छतेचा असतो, देबूदा हे त्याला अपवाद होते. प्रशिक्षण हा केवळ पाया असतो, अनुभवातून येणारे शहाणपण कलेच्या क्षेत्रात फार महत्त्वाचे असते, याची जाण त्यांच्या वागण्या-बोलण्यात सतत असे. चित्रपटांसोबत दूरचित्रवाणी क्षेत्रातही ‘कॅमेरामन’ म्हणून काम करताना त्यांनी त्या क्षेत्राची गरज ओळखून आपल्या तंत्रात सहज बदल केला. अर्थात तिथेही त्या माध्यमाकडे गंभीरपणे पाहणाऱ्या जाणत्या लोकांसोबतच काम करण्याचे व्रत त्यांनी कसोशीने पाळले आणि त्या माध्यमाला कमी लेखण्याची वृत्तीही कधी दाखवली नाही. १९७८ च्या सुमारास ते छायालेखक ए. के. बीर यांच्याकडे साहाय्यक म्हणून रुजू झाले, चित्रपट होता ‘दूरियाँ’ (दिग्दर्शक भीमसेन यांचा हा सुंदर चित्रपट, संगीतकार जयदेव यांनी स्वरबद्ध केलेल्या ‘मेरे घर आना जिंदगी’, ‘जिंदगी में जब तुम्हारे गम नही थे’ अशा गाण्यांमुळे अविस्मरणीय ठरला.) त्यानंतर स्वतंत्रपणे छायाचित्रकार म्हणून त्यांनी केलेला पहिला चित्रपट होता ‘नागीण’ (मराठी) परंतु देबूदांच्या वेगळेपणाची पहिली मुद्रा उमटली ती अमोल पालेकर दिग्दर्शित, विजय तेंडुलकर यांनी लिहिलेल्या ‘आक्रित’ या चित्रपटामुळे. त्या काळी गाजलेल्या मानवत खून खटल्यावर आधारित असलेल्या या चित्रपटाच्या एकूण ‘डार्क मूड’ला अधिक उठाव देणारे, त्यातील व्यक्तिरेखांच्या मनोव्यापारांना, कृतींना अधिक गहिरे करणारे छायाचित्रण देबूदांनी केले होते. ‘आक्रित’ने एक चित्रपट म्हणून मराठी चित्रपटसृष्टीला अर्थपूर्ण कलात्मकतेचा, नव्या सिनेमाचा स्पर्श दिला आणि छायाचित्रणाचा नवा विचारही दिला. देबू देवधर त्याच्या केंद्रस्थानी होते. जानेमाने, ज्येष्ठ छायाचित्रकार गिरीश कर्वे यांनी देबूदांच्या चित्रणाचे मर्म त्यांच्या ‘डाक्युमेण्ट्री स्टाइल’मध्ये आहे, असे म्हटले आहे. म्हणजे वास्तवाचा वेध घेणारे छायाचित्रण ही त्यांची खासियत होती, असे त्यांना म्हणावयाचे आहे. त्यांची पत्नी श्रावणी देवधर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘सरकारनामा’ या चित्रपटाची, त्याच्या बजेटची खूप चर्चा झाली. देबूदांनी या चित्रपटाद्वारे ‘डिजिटली शूट’ केलेल्या दृश्यांचा, अर्थात आधुनिकतेच्या आणखी एका अंगाचा मराठीला परिचय करून दिला. त्यांनी मुख्य धारेतील हिंदी चित्रपटही केले, उदाहरणार्थ सचिन यांनी सुभाष घईंसाठी दिग्दर्शित केलेला ‘प्रेम दिवाने,’ श्रावणी देवधरांचा ‘सिलसिला है प्यार का’ परंतु जिथं नृत्यदिग्दर्शक, फाइट मास्टर पन्नास टक्के चित्रपट करतात तिथं छायाचित्रणाला कितीसा ‘स्कोप’ असेल, असे ते म्हणत. त्या त्या प्रसंगांची प्रकाशयोजना अर्थात ‘लाइटिंग’ करण्यात छायाचित्रकाराचे कसब असते. अनेकदा नुसत्या डोळ्यांनी दिसणारा एखादा ‘स्पॉट’ कॅमेऱ्यातून पडद्यावर येतो तेव्हा खूपच वेगळा, अपरिचित वाटतो. ती किमया छायाचित्रकाराची असते. ‘लाइटिंग’ हे देबूदांचे एक खास वैशिष्टय़ होते. चित्रपट जेव्हा एका दृश्याकडून दुसऱ्या दृष्याकडे सरकतो तेव्हा ‘जर्क’ जाणवू नये, ‘जोडकाम’ दिसू नये यालाच चित्रपटाच्या भाषेत ‘स्मूथ मुव्हमेण्ट’ म्हणतात, त्यात देबूदा ‘दादा’ होते. प्रेक्षकांनी कॅमेऱ्याने चित्रपट पाहू नये तर त्यांचे डोळेच ‘कॅमेरा’ व्हायला हवेत. त्यांना कॅमेऱ्याचे अस्तित्वच जाणवू नये हे छायाचित्रकाराचे खरे कसब असते याचा वस्तुपाठ देबू देवधरांच्या चित्रपटांमधून अनेकदा येतो. त्यामुळेच त्यांचे अनेक चित्रपट हे, तो चित्रपट आवडो न आवडो देबूदांच्या कामगिरीमुळे डोळ्यांना ते मेजवानी देत. अर्थात पटकथा, दिग्दर्शक, विषय, निर्मिती संस्था, माणसे हे सगळे पारखूनच देबूदांनी बहुतेक चित्रपट केले. त्यांनी अखेरचे चित्रीकरण केले ते ‘किर्लोस्कर ब्रदर्स’ची वाटचाल सांगणाऱ्या माहितीपटाचे. सुधीर मोघे यांनी लिहिलेल्या व रघुवीर कूल यांनी दिग्दर्शित केलेल्या या माहितीपटाचे चित्रीकरण संपले त्याच दिवशी देबूदांना प्रथम पाठीचे दुखणे जाणवले. त्यानंतरच्या १० महिन्यांत दुखणे विकोपाला गेले आणि देबूदांची ‘छाया’ ‘प्रकाशात’ विलीन झाली!