जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
वर्षा उसगांवकर ही मराठी आणि हिंदी चित्रपटांतील ग्लॅमरस अभिनेत्री आहे. लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेल्या वर्षाने केवळ त्यासाठी गोवा सोडून मुंबईत बस्तान बसवले.
तिची दखल मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीने घेतली ती आचार्य अत्रे लिखित 'ब्रम्हचारी' या नाटकातील बोल्ड नायिकेमुळे.
नाट्य, दूरचित्रवाणी इत्यादी माध्यमांमध्येही तिने काम केले आहे.
वर्षा उसगावकरचे काही चित्रपट :
तुझ्यावाचून करमेना
गंमत जंमत
खट्याळ सासू नाठाळ सून
सगळीकडे बोंबाबोंब
मज्जाच मज्जा
रेशीमगाठी
आत्मविश्वास
हमाल दे धमाल
कुठं कुठं शोधू मी तुला
नवरा बायको
अफलातून
भुताचा भाऊ
पसंत आहे मुलगी
आमच्या सारखे आम्हीच
मालमसाला
उपकार दुधाचे शेजारी शेजारी
पटली रे पटली
घनचक्कर
बाप रे बाप
डोक्याला ताप नाही
मुंबई ते मॉरिशस
ऐकावं ते नवलच
एक होता विदूषक
शुभमंगल सावधान
विकिपिडियावरील माहितीचे पान (इंग्रजी)
## Varsha Usgaonkar
अपनालय. मुंबई शहरातील गलिच्छ वस्त्यांमध्ये, झोपडपट्टय़ांमध्ये सुमारे ४० वर्षांपासून काम करीत असलेली सेवाभावी संस्था. उद्दिष्ट अगदी साधं. कुपोषण दूर करणं. डॉ. अभय बंग समितीचा अहवाल येईपर्यंत मुंबई-पुण्यासारख्या महानगरांमध्ये कुपोषणाची समस्या असू शकते, यावर कुणी विश्वासच ठेवायला तयार नव्हतं. पण बंग समितीनं हा आकडा ५६ हजारांच्या घरात जाऊ शकतो असं मत अधिकृतपणानं नोंदवलं आणि सरकार खाडकन जागं झालं.
सुदूर ग्रामीण भागामध्ये जशी प्राथमिक आरोग्य केंद्रं असतात, तशी आरोग्य केंद्रं महानगरांमधल्या उपेक्षित वस्त्यांमध्ये नाहीत याविषयीची चिंता बंग समितीनं त्या अहवालात व्यक्त केली होती. मुंबईत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स आहेत, महापालिकांचे दवाखाने आहेत, मॅटर्निटी होम्स आहेत, लसीकरण केंद्रं आहेत पण तळागाळातील गोरगरीबांना परवडतील अशी प्राथमिक आरोग्य सुविधा केंद्र नाहीत, ही गोष्ट महाराष्ट्रासारख्या प्रगतशील राज्याला शोभणारी नाही, यावर बंग समितीनं तीव्र नाराजीही व्यक्त केली होती. २००५ साली एका झोपडपट्टीत कुपोषणानं झालेल्या मृत्युची दखल प्रसिद्धी माध्यमांनी गंभीरतेनं घेतल्यानंतर शासनानं मुंबईमध्ये ११०० आंगणवाडय़ा स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. पण या आंगणवाडय़ांना सरकार ना जागा देऊ शकलं होतं, ना शिक्षक. अशीच स्थिती प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रांची असल्याबद्दल बंग समितीनं नाराजी व्यक्त केलेली होतीच. सरकारी नियुक्ती स्वीकारायला एकही डॉक्टर तयार होत नसल्याबद्दल खंत व्यक्त करताना शासनानं यावर ठोस उपाययोजना करायला हवी असं मत समितीनं मांडलं होतं. बंग समितीनं कुपोषणाच्या गंभीरतेकडे लक्ष वेधण्या आधीपासूनच खरं तर अपनालयानं या विषयात काम सुरू केलं होतं. १९७२ साली अपनालयाची स्थापना झाली. आज मुंबई महानगरातील दहा प्रमुख झोपडपट्टय़ांमध्ये अपनालयाची केंद्रं आहेत. त्यांचं काम चालतं ते प्रामुख्यानं कचरा गोळा करणाऱ्यांच्या वस्त्यांमध्ये. दिवसभर कचरा गोळा करायचा, संध्याकाळी तो आणून कचरा गोळा आणि खरेदी करणाऱ्या भंगारवाल्यांकडे जमा करायचा, आणि हातावर पडतील तेवढे पैसे घेऊन पोटाची खळगी भरायची, हेच या कामगारांचं जीवन. पैसे मिळाले तर मिळाले, नाहीतर एखादा दिवस पाणी पिऊनच उपाशीपोटी काढायचा ही स्थिती. पण हे पाणी पिऊन पोटाची खळगी भरणं कोवळ्या मुलांना कसं चालायचं. त्यांचं पोट जाळण्यासाठी मग त्यांना अंगावर पाजायचं एवढंच त्यांच्या हातात उरणारं. आईच जिथे उपाशी, कुपोषित तिथे त्या मुलांचं पोषण व्हायचं कसं. गेल्या सहा महिन्यात मुंबई शहरातल्याच एका उपेक्षित वस्तीत १७ बालकांचे मृत्यु झाल्याची दुर्घटना घडली ती याच परिस्थितीतून. नॅशनल इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम या केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत अपनालयाचे ज्ञानेश्वर तरवडे आणि त्यांची ऐंशी सहकाऱ्यांची टीम या मुलांच्या देखभालीची, त्यांना स्वच्छ पाणी, सकस आहार मिळेल याची, कचरावेचक महिलांचे बचतगट चालवून त्यांना पुरेसा रोजगार मिळेल याची काळजी घेतच आहेत. पण त्याचबरोबर हजार-बाराशे कुटुंबांचं नियमित आरोग्य सर्वेक्षण, एडसग्रस्तांची देखभाल, क्षयरूग्णांसाठी औषधोपचार आदींचा अंतर्भाव त्यात आहेच. जो मुंबईत पैसा कमावतो त्याचेसाठीच सोयीसुविधा ही स्थिती योग्य नाही, जीवनदायी सुविधा सर्वाना सारख्याच हव्यात, हेच तर अपनालयाचं ध्येय आहे.
---------------------------------
From Aniket
ज्ञानेश्वर तरवडे हे मुंबईमधील झोपडपट्टयांमध्ये अत्यंत हालाखीच्या परिस्थितींमध्ये गुजराण करणार्या हजारो कचरावेचक मजूरांच्या कल्याणाकरिता अपनालय नावाची सेवाभावी संस्था चालवित आहेत. १९७२ मध्ये अपनालयाची सुरूवात अगदी मोजक्या प्रमाणात व घरगुती स्वरूपात झालेली होती. आज तरवडे व त्यांच्या ८० सहकार्यांच्या निरपेक्ष व सेवाभावी मेहेनतीमुळे अपनालयाचा वृक्ष भलताच बहरला आहे व मुंबईतल्या दहा प्रमुख झोपडपट्टयांमध्ये तो असंख्य निराधार कुटुबांना मायेची सावली देत आहे. मुंबईतल्या झोपडपट्टीवासीयांच्या सानिध्यात राहून त्यांचा संघटित आवाज सरकारपर्यंत पोहोचविणे, त्यांच्या वस्त्यांचे आरोग्य सर्वेक्षण करून रोग्यांना योग्य ते औषधोपचार पुरविणे, लहान मुलांना सकस आहार, आरोग्यदायी वातावरण, निर्मळ पाणी व पोषणद्रव्यांचा पुरवठा करणे व त्यासाठी वेगवेगळ्या सरकारी योजनांचा अधिकतम लाभ घेणे असे त्रिवेणी लक्ष्य डोळ्यांशी ठेवून तरवडेंची ही संस्था गरिबांच्या विकासकार्यांमध्ये अव्वल बनली आहे. याशिवाय क्षयरोग, व एड्स अशा महाभयंकर रोगांनी पिडीत रूग्णांना मानसिक, वैद्यकिय, व आर्थिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा महत्वाकांक्षी उपक्रमदेखील सध्या यशस्वीपणे सुरू करण्यात आलेला आहे. या सर्व उपक्रमांची मांडणी, अंमलबजावणी, व त्याकरिता लागणारे भांडवल उभी करण्याची कसरत, व ही कसरत प्रभावीपणे वठविण्यासाठी आवश्यक असलेली कला त्यांना चांगलीच अवगत झालेली आहे.
ह.मो. मराठे हे किर्लोस्कर मासिकाच्या संपादक मंडळात होते; त्यानंतर ते लोकप्रभा, घरदार, पुढारी, मार्मिक आणि नवशक्ती अशा अन्य नियतकालिकांकडे गेले. रडतखडत चाललेल्या लोकप्रभा साप्ताहिकाला त्यांनी ऊर्जितावस्था आणून दिली.
काच वाटेवर न रमणारे अन् नवनव्या वाटा सतत शोधत राहणारे मनस्वी कलाकार अशी त्यांची ओळख होती.
विविध वाद्यांचा उपयोग कोणत्या क्षणी, कसा करावा, त्यांच्या मर्यादा काय, याची पूर्ण जाण असलेले आणि शिवाय वेगवेगळे प्रयोग करून बघण्याची कल्पकता बाळगणारे आणखीन एक पडद्यामागील कलाकार..... अरविंद मयेकर. त्यांचा जन्म १८ जानेवारी १९३७ रोजी झाला. श्रावणात घननिळा बरसला रिमझिम रेशीमधारा उलगडला झाडातून अवचित हिरवा मोरपिसारा। या गाण्याच्या सुरुवातीची सतार ही मयेकरांनी वाजवलेली आहे.
अरविंद मयेकर हे दत्ता डावजेकर यांची कन्या असलेल्या ज्येष्ठ गायिका डॉ.अपर्णा मयेकर यांचे पती. त्यांनी सतारीचे शिक्षण अब्दुल हलीम जाफर खाँ, पंडित रविशंकर आणि हेब्बार मास्तर यांच्याकडे दिग्गजांकडे घेतले. अरविंदजींनी सतारीवर नवनवीन प्रयोग केले आहेत.
एस डी बर्मन, पंचम, खय्याम, कल्याणजी-आनंदजी, एन दत्ता, जतिन-ललित, अनु मलिक, राम कदम, बाबूजी, पंडित हृदयनाथ मंगेशकर, दत्ता डावजेकर, बाळ पळसूळे अशा अनेक दिग्गज संगीतकारांसोबत अरविंद मयेकर यांनी काम केले आहे. त्रिदेव चित्रपटातील ओये ओये, तिरछी टोपीवाले या गाण्यातील इलेक्ट्रिक गिटार असो वा १९४२ अ लवस्टोरी चित्रपटातील एक लड़की को देखा तो ऐसा लगा मधील एकतारा, शालिमारचे रबाब या अफ़ग़ानी वाद्यामध्ये इंग्लिश बॅकग्राउंड असो वा ओ हंसीनि या गाण्यात संतूरच्या पद्धतीने वाजविलेले हार्प हे वाद्य असो, अरविंदजींनी केलेली कमाल अतुलनीयच आहे. सुरेल बाल कला केंद्र या मंगेशकरांच्या ऑर्केस्ट्रात लक्ष्मीकांत-प्यारेलाल, बाळ पार्टे यांसारख्या दिग्गजांसोबत वाद्यें वाजविली आहेत. अरविंद मयेकर यांनी नटसम्राट, लेकुरे उदंड झाली, मत्स्यगंधा, कट्यार काळजात घुसली, गुंतता हृदय हे अशा सुप्रसिद्ध नाटकांचे बॅकग्राउंड संगीत दिले होते.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ प्रफुल्ल गायकवाड
दुर्गा खोटे यांचा जन्म १४ जानेवारी १९०५ रोजी मुंबई झाला. पूर्वाश्रमीचे त्यांचे आडनाव लाड होते. महाविद्यालयात शिकत असतानाच बॅ. विश्वनाथ खोटे यांच्याशी विवाह झाला. मोहन भवनानींच्या “फरेबी जाल“ या मूक चित्रपटात त्यांना पहिल्यांदा भूमिका देण्यात आली. या चित्रपटातील काही भाग बोलका होता. प्रभात फिल्म कंपनीच्या अयोध्येचा राजा या पहिल्या हिंदी व मराठी बोलपटातून दुर्गाबाईंनी तारामतीची भूमिका साकारली. “अयोध्येचा राजा“ या पहिल्या मराठी बोलपटात मध्ये दुर्गा खोटेंनी गायिलेली 'बाळा का झोप येईना', 'आनंद दे अजि सुमन लीला', 'बाळ रवि गेला' ही गाणी त्यावेळी अतिशय लोकप्रिय झाली होती. त्यानंतर “सीता“, “पृथ्वीवल्लभ“, “अमरज्योति“, “लाखाराणी“, “हम एक हैं“ ,“मुगले आझम“, “नरसीभगत“, “बावर्ची“, “खिलौना“, “बॉबी“ “अश्या विविध हिंदी चित्रपटांमधून दुर्दाबाई खोटेंनी दर्जेदार व्यक्तीरेखा साकारल्या. त्याचप्रमाणे “गीता“, “विदुर“, “जशास तसे“, “पायाची दासी“, “मोरूची मावशी“, “सीता स्वयंवर“, “मायाबाजार“ यांसारख्या मराठी चित्रपटांतूनही त्यांनी भूमिका केल्या.
पॉल झिलच्या “अवर इंडिया“ आणि इस्माईल मर्चंट यांच्या“हाऊस-होल्डर“ या दोन इंग्रजी चित्रपटांतही त्यांनी भूमिका केल्या होत्या.
१९४८ साला पासून दुर्गाबाईंचा मराठी रंगभूमीशी संबंध आला होता. “बेचाळीसचे आंदोलन“, “कीचकवध“, “भाऊबंदकी“, “शोभेचा पंखा“, “वैजयंती“, “खडाष्टक“, “पतंगाची दोरी“, “कौंतेय“, संशयकल्लोळ या नाटकांमधुन त्यांनी भूमिका केल्या आहेत. १९६१ रोजी दिल्लीमध्ये आयोजित झालेल्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.
१९८० रोजी दुर्गाबाईंनी आपल्या “ दुर्गा खोटे प्रॉडक्शन ” द्वारे दूरदर्शन मालिका, माहितीपूर्ण ध्वनी-चित्रफित, मराठी-हिंदी चित्रपटांसोबतच शॉर्ट फिल्म्सची निर्मिती या संस्थेतून करण्यात आली.
“धरतीची लेकरं” या दुर्गा खोटे प्रॉडक्शनचा चित्रपट राज्य मराठी चित्रपट महोत्सवातही गौरयाण्यात आले व दुर्गा खोटेंना या चित्रपटातल्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार देऊन गेला.
२०० पेक्षा ही अधिक चित्रपटातून विविधांगी भूमिका साकारत तसंच वैशिट्यपूर्ण दिग्दर्शन कौशल्यामुळे दुर्गाबाईंनी कलाविश्वात सुवर्णक्षरांनी नाव कोरले.
वेळोवेळी दुर्गाबाईंचा सन्मान देखील करण्यात आला. १९४२ च्या“चरणो की दासी” आणि १९४३ सालच्या “भारत मिलाप” या चित्रपटातल्या त्यांच्या भुमिकांना "बेंगॉल फिल्म जर्नलिस्ट असोसिएशन"च्या पुरस्कारने सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर १९७४ च्या “बिदाई“ चित्रपटातील भूमिकेबद्दल सर्वोत्तम साहाय्यक अभिनेत्री म्हणून त्यांना फिल्म फेअर पुरस्काराने गौरविण्यात आले; त्यासोबतच संगीतनाटक अकादमीने १९५८ साली त्यांचा उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरव केला तर मराठी नाट्यपरिषदेतर्फे विष्णुदास भावे सन्मानपदक, १९६८ साली भारत सरकारच्या “पद्मश्री” आणि १९८४ साली भारतीय सिनेसृष्टीतल्या सर्वोच्च असलेल्या “दादासाहेब फाळके पुरस्काराने“ गौरविण्यात आले आहे.
आपला जीवन व रुपेरी पडद्यावरचा प्रवास दुर्गाबाई खोटेंनी “मी दुर्गा खोटे” या पुस्तकातून शब्दबध्द केले असून या पुस्तकाचं इंग्रजी भाषेत “आय दुर्गा खोटे” नावाने प्रकाशन झाले आहे.
उतारवयात दुर्गाबाई अलिबागच्या एका बंगल्यात स्थलांतरीत झाल्या. २२ सप्टेंबर १९९१ या दिवशी म्हणजेच वयाच्या ८६व्या वर्षी दुर्गा खोटे यांचे निधन झाले.
२०१३ साली भारतीय चित्रपटांच्या शतकमहोत्सवी वर्षात भारत सरकारने दुर्गा खोटेंच छायाचित्र असलेलं टपाल तिकिट प्रकाशित करुन त्यांच्या प्रतिभेचा सन्मान केला.
( लेखन व संशोधन - सागर मालाडकर )
दुर्गा खोटे यांचे मराठीसृष्टीवरील लेख.
स्मरणीय भूमिका करणार्या दुर्गा खोटे (22-Sep-2016)
स्मरणीय भूमिका करणार्या दुर्गा खोटे (14-Jan-2019)
स्मरणीय भूमिका करणार्या दुर्गा खोटे (7-Oct-2017)
स्मरणीय भूमिका करणार्या दुर्गा खोटे (15-Jan-2018)
## Durga Khote
दत्तात्रय केशव केळकर यांनी सामाजिक, वाङमयीन, शैक्षणिक असे विविधांगी लिखाण केले.
'काव्यालोचन', 'साहित्यविहार', 'विचारतरंग', 'उद्याची संस्कृती', 'वादळी वारे', 'संस्कृतिसंगम', 'संस्कृति आणि विज्ञान' या पुस्तकांतून त्यांनी दैववादाकडून विज्ञानवादी भारतीयत्वाकडे जाण्याचा शोध सुरु ठेवला होता.
दत्तात्रय केशव केळकर यांचे ८ ऑगस्ट १९६९ रोजी निधन झाले.
## Dattatray Keshav Kelkar
पेठे, अतुल
नाटक ही केवळ करमणूक आणि मनोरंजन करणारी कला नसून ती प्रत्येकाला आत्मभान देणारी, विचारप्रवृत्त करणारी एक गंभीर कला आहे, हे लक्षात येत असतानाच अतुल पेठे रंगभूमीवर अवतीर्ण झाले आणि त्यांनी आपले सारे आयुष्य याच कलेसाठी वेचायचे ठरवले. कोलकात्याच्या ‘ब्रात्तोजान’ नाटय़संस्थेचा ‘विष्णु बासू स्मृती पुरस्कार’ अतुल पेठे यांना मिळणे, म्हणजे त्यांच्या आजवरच्या कारकीर्दीवर कौतुकाची मोहोरच. वेगळ्या वाटेने जाणारी नाटके सादर करणे, हे पेठे यांचे वैशिष्टय़. महाविद्यालयीन जीवनात पुण्यातील पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत यशाचा पहिला जरीपटका मिळवल्यानंतर पेठे यांनी विविध प्रकारच्या अनुभवांना सामोरे जाण्याचे ठरवले.
‘शीतयुद्ध सदानंद’, ‘सूर्य पाहिलेला माणूस’, ‘गोळायुग’, ‘दलपतसिंग येती गावा’ यांसारख्या नाटकांनंतर त्यांनी नुकतेच सादर केलेले ‘सत्यशोधक’ हे गो. पु. देशपांडे यांचे महात्मा फुले यांच्यावरील नाटक रंगमचीय क्षेत्रात चर्चेत राहिले आहे. ते अभिनय करतात, तरी दिग्दर्शन हे त्यांचे खरे क्षेत्र. नव्या पिढीशी सतत संपर्कात राहून त्यांच्यात रंगभूमीची जाण निर्माण करण्यासाठी पेठे राज्यभर नाटय़कार्यशाळा घेत असतात. वैचारिक रंगभूमीवर सतत काही घडत राहिले पाहिजे, या जाणिवेतून त्यांनी अशा उपक्रमांना नेहमीच प्राधान्य दिले. एकांकिका लेखन हा त्यांचा जसा प्रांत आहे, तसेच नाटय़रूपांतराच्या मार्गानेही त्यांनी नाटय़लेखनात रस घेतला आहे. विजय तेंडुलकर यांच्यावर त्यांनी तयार केलेला ‘तेंडुलकर आणि हिंसा - काल आणि आज’ हा माहितीपट विशेष गाजला. ‘नाटककार सतीश आळेकर’, ‘बहिणाई’, ‘अशोक केळकर’ यांसारख्या माहितीपटांमध्ये त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले. मात्र ‘कचरा कोंडी’ या कचऱ्याच्या समस्येवर आणि त्यामध्ये काम करणाऱ्यांच्या जगण्याबद्दल समाजाचे डोळे उघडणाऱ्या माहितीपटाने पेठे यांनी आपले वेगळेपण सिद्ध केले. आकाशवाणीवर ‘कोसला’ कादंबरीचे वाचन असो, की अरुण कोलटकरांच्या कवितांचे वाचन; पेठे ‘तयार’ असतात. महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार आणि विविध नाटकांसाठी अनेक पुरस्कार मिळालेल्या पेठे यांना प्रयोगशील रंगभूमीवरील कामाबद्दल कोलकात्यात मिळालेला हा पुरस्कार त्यांच्या कलाजीवनातील एक महत्त्वाचा पुरस्कार म्हटला पाहिजे.
ब्रजेश मिश्रा यांच्याविषयीच्या ‘’मध्ये (१ ऑक्टो.) पोखरण-२ अणुचाचणी १९९९ मध्ये झाल्याचा चुकीचा उल्लेख आहे. तो १९९८ असा हवा होता.
डॉ. नारळीकर एक जगद्विख्यात शास्त्रज्ञ तर आहेतच पण ते उत्तम साहित्यिकही आहेत.
Copyright © 2025 | Marathisrushti