जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
लोकसेवा व विकास संस्थेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा कस्तुरबा गांधी पुरस्कार यंदा गंगूबाई वर्धने यांना जाहीर झाला आहे. अत्यंत विपरीत परिस्थितीतून मार्ग काढणारी तेजस्वी प्रकाश शलाका म्हणजे गंगूबाई वर्धने, अशी त्यांची ओळख आहे. वर्धा जिल्ह्यातील देवळी हे त्यांचे जन्मगाव. वयाच्या तिसर्या वर्षी वडिलांचे व नवव्या वर्षी आईचे निधन झाल्यावर अंगावर गरिबीची कुर्हाड कोसळुनसुध्दा गंगूबाईंनी अतिशय धैर्याने व स्वत:च्या पायावर उभे राहून बहीण-भावांचा सांभाळ केला.
लहानपणापासूनच अभिनेता व्हायचे हे राज कपूर यांचे स्वप्न होते. राज कपूर यांनी रुपेरी पडद्यावरील आपल्या अभिनयाची सुरुवात बाल कलाकार म्हणून केली होती. त्यांचा जन्म १४ डिसेंबर १९२४ रोजी झाला. १९३५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इन्कलाब’ चित्रपटात त्यांनी बाल कलाकार म्हणून काम केले होते. अभिनेता होण्यासाठी त्यांनी क्लॅपरबॉय म्हणूनही काम केले आणि केदार शर्मा यांची थप्पडही खाल्ली. दहावीत राज कपूर एका विषयात नापास झाले तेव्हा त्यांनी वडिलांना, ‘मला आता पुढे शिकायचे नाही, मला चित्रपटात काम करायचे आहे’असे सांगितले होते. राज कपूर यांचे वडील मा.पृथ्वीराज कपूर यांनी राज कपूर यांना निर्माता-दिग्दर्शक केदार शर्मा यांच्या युनिटमध्ये क्लॅपर बॉय म्हणून काम करण्यास सुचविले होते. शर्मा यांच्या एका चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना राज कपूर एकसारखे आरशाजवळ जायचे आणि केसातून कंगवा फिरवायचे. तसेच क्लॅप देताना आपला चेहरा कॅमेरात दिसेल, याचीही ते काळजी घेत असत. ‘विषकन्या’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना राज कपूर यांचा चेहरा कॅमेऱ्याच्या समोर आला आणि चरित्र अभिनेत्याची दाढी क्लॅपच्या बोर्डावर अडकून निघाली. यामुळे चिडलेल्या केदार शर्मा यांनी राज कपूर यांचा गाल रंगविला. आपल्या केलेल्या कृत्याचा शर्मा यांना पश्चात्ताप झाला आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी आपल्या ‘नीलकमल’ या चित्रपटासाठी राज कपूर यांना साईन केले.
अभिनेता म्हणून १९४७ मध्ये प्रदर्शित झालेला ‘नीलकमल’हा त्यांचा पहिला चित्रपट. १९४८ मध्ये त्यांनी ‘आर. के. फिल्म’ची स्थापना केली आणि ‘आग’हा चित्रपट तयार केला. १९५२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आवारा’या चित्रपटाने राज कपूर यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रसिद्धी मिळाली. चित्रपटातील ‘आवारा हू’ हे गाणे परदेशातही खूप लोकप्रिय झाले. बॉलीवूडचा रुपेरी पडदा पुढे ज्या अनेक अभिनेत्रींनी ‘नायिका’म्हणून गाजविला त्यांना राज कपूर यांनी ‘आर.के’तर्फे रुपेरी पडद्यावर येण्याची पहिली संधी दिली होती. ‘मेरा नाम जोकर’नंतर राज कपूर यांनी ‘बॉबी’ चित्रपटाची निर्मिती केली ज्यात ऋषी कपूर बरोबर नायिका म्हणून डिम्पलला संधी दिली. हा चित्रपट खूप गाजला. या चित्रपटाने बॉलीवूडमध्ये ‘कोवळ्या वया’तील (टीन एजर) प्रेमकथांच्या चित्रपटाचा पाया घातला. राज कपूर यांनी आपला मुलगा राजीव कपूर याला घेऊन ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटात मंदाकिनीला संधी दिली. तर ‘हिना’ चित्रपटात पाकिस्तानी कलाकार झेबा बख्तीयार व मराठी अभिनेत्री अश्विनी भावे हिला संधी दिली. अभिनेत्री निम्मी हिला ‘बरसात’मध्ये भूमिका दिली. बॉलीवूडची ‘स्वप्नसुंदरी’ हेमामालिनी हिला ‘सपनों का सौदागर’ मधून संधी मिळाली.
दाक्षिणात्य अभिनेत्री पद्मिनी हिला ‘जिस देश में गंगा बहेती है’ या चित्रपटात राज कपूर यांनी पहिली संधी दिली. या चित्रपटाने पद्मिनीला हिंदी चित्रपटात ओळख मिळाली. राज कपूर यांच्या ‘मेरा नाम जोकर’मध्येही तिची भूमिका होती. बॉलीवूडच्या रुपेरी पडद्यावर राज कपूर आणि नर्गिस ही जोडी लोकप्रिय ठरली. १९४८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बरसात’ या चित्रपटानंतर पुढे ‘अंदाज’, ‘जान पहचान’, ‘आवारा’, ‘अनहोनी’, ‘आशियाना’, ‘अंबर’, ‘श्री ४२०’, ‘जागते रहो’, ‘चोरी चोरी’ असे चित्रपट एकत्र केले. यातील अनेक चित्रपट व त्यातील गाणी गाजली. ‘श्री ४२०’ चित्रपटातील ‘प्यार हुआ इकरार हुआ’ हे गाणे आजही लोकप्रिय आहे. राज कपूर आणि पाश्र्वगायक मुकेश यांचे अतूट नाते तयार झाले होते. राज कपूर यांचा ‘आवाज’ अशीच मुकेश यांची ओळख होती. राज कपूर यांच्या जवळपास प्रत्येक चित्रपटात पडद्यावर गाणे म्हणतानाचा राज कपूर यांचा आवाज मुकेश यांचाच होता. मुकेश यांच्या निधनानंतर राज कपूर यांनी व्यक्त केलेली ‘लगता है मेरी आवाज ही चली गई’ ही प्रतिक्रिया खूप बोलकी आहे. ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटानंतर राज कपूर यांनी ‘हिना’ चित्रपटाच्या निर्मितीला सुरुवात केली. पण हा चित्रपट त्यांच्या हयातीत पूर्ण होऊ शकला नाही. भारत सरकारने १९८८ साली राज कपूर यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ देऊन गौरवले होते. त्यांना पद्मभूषण पुरस्कार, फिल्म फेअर या पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले होते.
राज कपूर यांचे २ जून १९८८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
इंद्रायणी सावकार यांनी लिहिलेली The White Dove ही कथा, इंग्रजी आणि जर्मन भाषेतील ’एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रियांसाठी लिहिलेल्या कथा’ या प्रकारच्या कथासंग्रहांत समाविष्ट झाली आहे. Our Inheritance of Spirituality (आपला संस्कृतिक वारसा) या त्यांच्या पुस्तकाला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
श्री. दिलीप सोमण हे ठाणे येथील प्रसिध्द उद्योजक आहेत. ते बी. इ. (मेकॅनिकल) असून त्यांना इंजिनियरिंग उद्योगातील सुमारे ३७ वर्षांचा अनुभव आहे.
डॉ.सरोजिनी कृष्णराव बाबर यांनी मुंबई विद्यापीठातून बी.ए. पदवी मिळवली. पुढे त्यांनी एम.ए. व पीएच्.डी. पदव्याही मिळवल्या. त्यांचा जन्म ७ जानेवारी १९२० रोजी झाला. "Contribuiton of Women writers in Marathi Literature" या प्रबंधावर त्यांनी पीएच्.डी. ही पदवी संपादन केली. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा प्रगाढ अभ्यास त्यांनी त्यांच्या आयुष्यभर केला. सरोजिनी बाबर या महाराष्ट्र विधानसभा (१९५२-५७), महाराष्ट्र विधानपरिषद (१९६४-६६) व भारतीय राज्यसभा (१९६८-१९७४) या सभागृहांच्या सदस्या होत्या. महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीच्या त्या अध्यक्षा होत्या. त्यांनी दुर्मीळ आणि अप्रकाशित लोकसाहित्य संकलित केले आणि ’लोकसाहित्य शब्दकोश’ आणि ’भाषा व संस्कृती’ या पुस्तकांमधून प्रकाशित केले.
"समाज-शिक्षण माला" हे मासिक त्यांनी अनेक वर्षे चालवले. महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीवर सरोजिनी बाबर यांनी सभासद म्हणून काम केले. नंतर डॉ.सरोजिनी बाबर यांची या समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली. हे काम त्यांच्या अतिशय आवडीचे आणि जबाबदारीचे होते. लोकसाहित्य, लोककला आणि एकूणच लोकजीवनाच्या अभ्यासाचे क्षितिज आणखी विस्तारले. समितीने महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागातल्या लोक वाङ्मयाचा खूप मोठा संग्रह केला. यात ओव्या, गीते, कथा, कहाण्या, म्हणी, खेळगाणी, उखाणे मोठ्या प्रमाणात समाविष्ट आहेत. महाराष्ट्रातील देवधर्माची, सण-उत्सवांची, रीतीरिवाजांची, अनेक कलांची माहिती आहे. डॉ.सरोजिनी बाबर यांचे १९ एप्रिल २००८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
डॉ.सरोजिनी कृष्णराव बाबर यांची कविता.
अडगूळं मडगूळं, सोन्याचं कडबुळं ..
खेळायला आलं ग, लाडाचं डबुलं..
गालात हासून, ओठात बोलून...
हातानं खेळीत, काय ग म्हणालं...
जावळात भुरभुरलं, नजरेत खुदखुदलं ...
सोन्याच्या ढीगाव, बाळ ग बैसलं...
रांगत रांगत, हअम डौलात...
गुडघ्याव रेलून, काय ग पाहिलं ...
फुरफुरी मारून, दिलं ते थुंकून...
कारंजं उडवीत, कसं ग रागावलं...
झेप झेपावून, तोल सावरून...
नाचून नाचून, पाय खुळखुळलं...
काजळ तितीट, बाळाच्या मुठीत...
माझ्या जीवाचं, सुख दाटलं...
कर्करोगामुळे स्वरयंत्र गमावलेतरी केवळ नाटकाच्या प्रेमापोटी 'मी मूकनायक' या नाटकाच्या माध्यमातून नागपूरचे किशोर आयलवार यांनी रंगमंचावर रिएन्ट्री घेतली. नागपुरातील नाट्यक्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून ते सक्रिय आहेत. रसिकांकडून वाहवा मिळवणारे किशोर आयलवार हे रंगस्वानंदीच...
रंगस्वानंदी रंगकर्मी
फक्त दूरदर्शन होते, चॅनल्सचा सुळसुळाट नव्हता तेव्हा टीव्हीवर चमकणाऱ्या प्रत्येक चेहर्याला ग्लॅमर होते. यात चारूशीला पटवर्धन हे नाव ‘बेस्ट थ्री’मध्ये होते.
भरत जाधव यांनी शाहिर साबळे यांच्या मार्गदर्शना खाली "लोकधारा" मधून आपली अभिनय यात्रा सुरु केली. नंतर त्यांना "सही रे सही" नाटकातून ओळख मिळाली. त्यांच्या इतर नाटकांमध्ये "श्रीमंत दामोदर पंत", "ऑल द बेस्ट", "आमच्या सारखे आम्हीच" आणि "ढॅण्ट ढॅण" या नाटकांचा समावेश आहे. नाटकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये दिग्दर्शक केदार शिंदे यांच्यासोबत त्यांची जोडी जमली. या जोडीनी अनेक यशस्वी नाटके व चित्रपट दिले आहेत. भरत जाधव हे त्यांच्या कॉमिक टाइमिंग साठी ओळखले जातात. भरत जाधव यांनी ८५ चित्रपट, ८ दूरचित्रवाणी मालिका आणि ८५०० हून अधिक नाटकाचे प्रयोग केले आहेत. मराठी चित्रपट व्यवसायात व्हॅनिटी व्हॅन असणारा तो पहिला अभिनेता आहे. सही रे सही या नाटकात भरत जाधवने गलगले, कुरियर घेण्यासाठी आलेला माणूस, श्रीमंत म्हातारा व वेडसर मुलगा अशा चार भूमिका केल्या आहेत. या नाटकाचे एका वर्षात ५६५ प्रयोग झाले होते व त्यासाठी त्याची नोंद गिनीज बुकमध्ये झाली होती. ‘सही रे सही’ या नाटकाचे 'अमे लई गया, तमे रही गया' या नावाने गुजराथीत भाषांतर झाले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
गोष्ट छोटी डोंगराएवढी’, ‘गुलमोहर’, ‘मानिनी’, आणि ‘अडगुळे मडगुळे’ या चित्रपटांत तिने काम केले आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti