फडके १९४० सालातल्या रत्नागिरीस भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
December 15, 2010
चित्रकलेवर ‘दिनानाथ शैली’चा ठसा उमटविणारे दिनानाथ दामोदर दलाल. राजकीय, सामाजिक व्यंगचित्रे अतिशय मार्मिकपणे रेखाटता रेखाटता बोजडपणा आणि रसहीनता यापासून आपला कुंचला दूर ठेवून त्यांनी मराठी पुस्तकांच्या मुखपृष्ठात अमूलाग्र बदल घडवून आणला.
February 2, 2010
मराठी चित्रपटातील खाष्ट सासू आणि करारी स्त्री, थोडी आधुनिक तर कधी हेखेखोर अशा भूमिकांची आठवण होताच डोळ्यासमोर नाव उभं रहातं अभिनेत्री “दया डोंगरे” यांचं. कोणतीही व्यक्तिरेखा समर्थपणे साकारणा-याची हातोटी दया डोंगरे यांना चांगलीच अवगत होती.
November 8, 2013
श्रीरंग मनोहर दिवाण हे नागपुरमधील प्रसिध्द ज्योतिषी, प्रवचनकार, व वास्तुदोषनिवारण तज्ञ आहे. वास्तुशास्त्राच्या काही निकषांवर तसेच सिध्दांतांवर आज आधुनिक विज्ञानही विश्वास ठेवित असल्यामुळे आज अगदी सर्वच व्यवसायांमधील नवीन वास्तु बांधणारे लोकं, वास्तुशास्त्राप्रमाणे निर्दोष मानल्या गेलेलं घर बांधण्याकडे आपला कल ठेवतात.
August 22, 2011
मुंबईच्या बांधकाम इतिहासामध्ये विठ्ठल सायन्ना यांचे नाव अत्यंत आदराने व गर्वाने घेतले जाते.
ठाणे व मुंबईत विस्तीर्ण पसरलेल्या व वेगवेगळ्या आकारांनी, तसेच बांधकामाच्या शैलींनी नटलेल्या गगनचुंबी इमारतींचे, विस्तीर्ण जाळे विणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. मुंबई व ठाण्याची वास्तू घडण करणारे प्रसिध्द बांधकाम ठेकेदार अशी त्यांची संपुर्ण भारतामध्ये किर्ती पसरलेली होती. याला कारणेही तशीच आहेत. मुंबईच्या जन्मापासून तिच्या गळ्यामधील दुर्मिळ अलंकाराचे काम करणारे, गॉथिक वास्तुशास्त्राचा अद्वितीय नमुना असलेले, व संयुक्त राष्ट्र संघटनेकडून प्रसिध्द होणार्या वर्ल्ड हेरिटेज साईट्सच्या यादीमध्ये नोंद झालेले पूर्वीचे व्हिक्टोरिया टर्मिनस व आताचे छत्रपती शिवाजी टर्मिनस या रेल्वे स्थानकाचा काही भाग त्यांनी बांधला होता.
याशिवाय मुंबईतील अनेक इमारती व पायाभूत सुविधांची बांधणी त्यांच्या हस्ते झाली. मुंबईतील जनरल पोस्ट ऑफिस, प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ( हल्लीचे राजा छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय) , स्मॉल कॉसेस कोर्ट, व इन्स्टीटयूट ऑफ सायन्स या इमारतींच्या निर्मीतीची जबाबदारी अतिशय समर्थतेने त्यांनी पेलली होती. त्यांचे सुपुत्र नारायण सायना यांची गणतीदेखील मुंबईतल्या दर्जेदार व नामांकित इमारत कंत्राटदारांपैकी होते. त्यांनी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून याच व्यवसायामध्ये उंच भरारी मारली.
त्यांच्याच नावाने ठाणे येथे विठ्ठल सायन्ना मंदीर उभे आहे.
January 12, 2015
December 15, 2010
हिरवे तळकोकण’ लिहिणारे निसर्गकवी माधव केशव काटदरे हे अर्थातच कोकणातील होते. पण त्यांचे बरेचसे आयुष्य नोकरीनिमित्त मुंबईत गेले. माधव काटदरे यांनी केवळ निसर्गकविताच लिहिली, असे नाही. ऐतिहासिक कविताही त्यांनी विपुल लिहिली. छत्रपती शिवाजीमहाराज, शाहूमहाराज, सवाई माधवराव, मस्तानी अशा विविध व्यक्तिरेखा त्यांनी काव्यबद्ध केल्या. याशिवाय शिशुगीते, विनोदी कविताही त्यांच्या लेखणीतून झरल्या.
July 15, 2022
पळसुले, बाळ
बाळ पळसुले यांच्या ठसकेबाज चाली ऐकल्या की अचंबित व्हावे लागायचे. मराठी चित्रपट संगीतात त्यांनी केलेल्या कामगिरीचा त्यांच्या हयातीत तसा सन्मान झाला नसला, तरीही रुपेरी पडद्याच्या इतिहासात त्यांच्या नावे एक पान राखीव राहील, यात शंका नाही. अनेकदा कानावरून गेलेली गाणी त्यांच्या नावावर आहेत हे जेव्हा लक्षात येते, तेव्हा कौतुकमिश्रित आदर वाटू लागतो. कोल्हापूर, सांगली परिसरातील वातावरणात रमलेल्या पळसुले यांच्या रोमारोमात तमाशातला ठसका याच परिसरात भिनला.
१९६५ पासून सुमारे तीन दशके मराठी चित्रपटांमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावलेल्या या संगीतकाराला चिमुरडय़ा पोरीने बसस्थानकाबाहेर त्यांचेच गाणे ऐकवले, तेव्हा खिशातली दहा रुपयांची नोट तिच्या पदरात टाकणाऱ्या पळसुले यांना तेव्हा झालेला आनंद अवर्णनीय वाटत होता. सहज गुणगुणता येणारी आणि कानात राहणारी चाल बांधणे हे पळसुले यांचे वैशिष्टय़. ‘कुठं कुठं जायाचं हनिमूनला’ सारखं उडत्या चालीचे गाणे असो, की ‘विठ्ठलनामाची शाळा भरली’ हे सर्वतोपरी झालेले भक्तिगीत असो; पळसुले यांचे वेगळेपण त्या रचनेमध्ये सहजपणे लक्षात यायचे. लावणीतला ठसकादेखील सुंदरपणे व्यक्त करण्याचे त्यांचे कसब होते. चित्रपटासारख्या दुनियेत त्यांच्या बालपणीचा कलापथकातील अनुभव त्यांना उपयोगी पडला, कारण सर्वाच्या ओठात सहज राहतील, अशा रचना करण्याचे शिक्षण त्यांना त्या संस्कारातून मिळाले होते. ‘फटाकडी’, ‘भन्नाट भानू’, ‘भिंगरी’, ‘तेवढं सोडून बोला’,‘रणरागिणी’,‘पंढरीची वारी’ , ‘राजा पंढरीचा’ यासारख्या चित्रपटातील गीते तेव्हा महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि शहरी रसिकांची अतिशय आवडती झाली होती. त्यांच्या संगीतामुळे चित्रपटांनाही एक वेगळा नखरेल रंग प्राप्त झाला. यशाने हुरळून जाण्याची पळसुले यांची वृत्ती नव्हती. अंगठय़ांनी भरलेली त्यांची बोटे पेटीवर फिरायला लागली की समोर बसलेले सारे जण एका वेगळ्या विश्वात पोहोचत असत. साधेपणाने संगीताला भिडण्याची त्यांची वृत्ती त्यांच्या स्वभावातून आली होती. चित्रपट मिळावेत, यासाठी कधी कुणाच्या दारापुढे तोंड वेंगाडण्याची त्यांच्यावर वेळच आली नाही, कारण त्यांचे नाणे बावनकशी होते. त्यांच्या निधनाने मराठीतील एक उत्तम संगीतकार काळाच्या पडद्याआड गेला आहे.
August 5, 2017
विदर्भाच्या सामाजिक, राजकीय, वाङ्मयीन आणि सांस्कृतिक जीवनातील एक प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे ते लोकनायक माधव श्रीहरी तथा बापूजी अणे. ह्यांचा जन्म २९ ऑगस्ट १८८० साली झाला. त्यांच्या घराण्याचे मूळ नाव वणी. त्यांचे आजोबा हे वैदिकी होते. त्याचे लहानपणापासूनच संस्कार अणे यांच्यावर झाले.
January 30, 2010
यशवंत जोशी हे भारतीय अभिजात संगीताच्या दुनियेत आद्य घराणे म्हणून ओळखल्या जाणार्या ग्वाल्हेर गायकीतील एक नामवंत कलावंत आहेत. ग्वाल्हेरबरोबरच आग्रा या घराण्याचीही त्यांना तालिम मिळालेली असल्यामुळे त्यांच्या भात्यात या दोन्ही घराण्यांच्या सांगितीक चीजांचा भरणा आहे. आग्रा घराण्याची तालीम त्यांनी जगन्नथबुवा पुरोहित यांच्याकडून घेतली.
यशवंत जोशी यांचा जन्म १९२७ साली झाला. त्यांचे बालपण पुण्यात गेले. लहानपणापासून संगीत व गायनाची प्रचंड आवड असल्याने संगीतविषयाशी निगडीत गोष्टींकडे त्यांचे मन सहज वेधले जात. त्याकाळी अनेक दिग्गज गायकांच्या कर्यक्रमांना हजेरी लावल्याने गायक बनण्याच्या त्यांच्या स्वप्नाला नियमीत सराव व आपल्या सुरांना वळण लावण्याची जोड मिळाली. अशा तर्हेने त्यांच्यामधील गायक घडत गेला. त्या काळी केवळ गायक होण्याला, आजच्यासारखी सामाजिक प्रतिष्ठा वगैरे अजिबात नव्हती, तर गायक अधिक नट असणार्या कलाकारांनाच प्रसिध्दीचे वलय चाखण्याची संधी मिळत असे. पण यशवंतबुवांची साधना व गायननिष्ठा या सर्व भौतिक सुखांच्या पलीकडची असल्याने, त्यांनी आपल्या शास्त्रीय गायनाने व सुरांवरील हुकुमतीने श्रोत्यांना तृप्त करण्याचा निर्णय घेतला, व त्यांच्या गायनप्रवासाची झोकात सुरूवात झाली. यशवंतबुवा मिराशी हे त्यांचे पहिले गुरू होते.
आयुष्यभर विद्यादानात रमलेल्या यशवंतबुवांना लौकिक अर्थाने प्रसिध्दीचे वलय फार उशीराने प्राप्त झाले. यशवंतबुवांची गायनशैली हीदेखील त्यांच्या व्यक्तित्वाप्रमाणेच वेगळी, उठावदार, व बहारदार आहे. इतर नवोदित गायक ज्याप्रमाणे आपल्या गायनशैलीत इतर घराण्यांच्या शैलींचा प्रभाव मिसळून नेहमी एका नव्या व तजेलदार गायनशैलीचा वेध घेण्यास उत्सुक असतात, त्याप्रमाणे यशवंतबुवा हे प्रत्येक शैलीचे वेगळेपण व स्वतंत्र असं अस्तित्व अबाधित ठेवणाचा सचोटीने प्रयत्न करतात. गायला सुरूवात करताच स्वरांवर घट्ट पकड बसविण्याची त्यांची क्षमता असो, किंवा बंदिशीतल्या सौंदर्यपूर्ण जागांना त्यांच्या खास शैलीत सादर करण्याचे त्यांचे कसब असो, या सर्व गोष्टी त्यांच्या सर्जनशील गायकीचा प्रत्यय देत असतात.
आपले गाणे सतत ताजेतवाने ठेवणार्या या हाडाच्या कलावंताला हृदयेश आर्ट्स या संस्थेकडून देण्यात येणारा पहिला “हृदयेश संगीत सेवा पुरस्कार” प्राप्त झाला आहे.
January 12, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti