श्री गजानन महाराज पट्टेकर ह्यांचे मूळ आडनाव गुप्ते. त्यांच्या पूर्वजांकडे श्री शिवरायाच्या काळात महाराष्ट्रांतील नाशिक, नगर, ठाणे ह्या सरहद्दीवरील किल्ला “पट्टा”, त्याच्या आसपासचा औंढा पट्टा या परिसराचे अधिपत्य होते. तेव्हांपासून पट्टेकर हे आडनाव प्रचलित झाले.
(2 सप्टेंबर 1886 ते 25 डिसेंबर 1957)
बहुविविध प्रकारचे ललित व वैचारीक लेखन करणारे लेखक. स्वंतत्र प्रज्ञाचे शैलिकार साहितिक, नामवंत प्राध्यापक , अस्पृश्यासाठी कार्य करणारे समाजसेवक, जन्म विदर्भातील शिरपुर हया गावी. शिक्षण सातारा व पुणे येथे. न्यु इग्लिश स्कुल सातारा आणि न्यु इंग्लिश स्कुल पुणे या शाळेतुन अध्ययन केल्यानंतर 1935 ते 1946 हया कालखंडात सर परशुरामभाऊ महाविद्ययालयात ते इंग्रजीचे व मराठीचे प्राध्यापक होते. प्राध्यापक म्हणून त्यांची कारकीर्द अत्यंत यशस्वी व फलदायी ठरली. माटे यांच्या वाड्गमय आंरभीच्या काळी त्यांनी `केसरी प्रबोध` हया ग्रंथाचे संपादक म्हणून परीश्रम पुर्वक काम केले. माटे यांनी या ग्रंथासाठी लेखनही केले. महाराष्ट्र सावत्सरिक हा माटे यांनी संपादलेला आणखी एक महत्त्वपुर्ण ग्रंथ होय. विविध संवत्सरीचा माटे यांनी आभ्यास केला. आणि महाराष्ट्रासाठी स्वंतत्र संवत्सरीचा आभ्यास केला. रोहीणी या मासिकाचे माटे हे पहिले संपादक. शास्त्रीय ज्ञानाचे आणि विज्ञान प्रसाराचे महत्त्व जाणुन त्यांनी `विज्ञानबोध` संपादिला.
उजव्या कोप-यात गंगाखेड, परभणी असे लिहिलेले भरगच्च मजकुराचे पोस्टकार्ड उभ्याआडव्या महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणच्या कोणत्याही क्षेत्रात चळवळ्या असलेल्या कोणाहीकडे आले की ते श्रीनिवास कुलकर्णी यांचेच आहे हे क्षणात उमगायचे. वास्तविक श्रीनिवासचे मूळ गाव लातूर. तरुण वयातच आईवडिलांचे छत्र हरपले. पण व्यक्तिगत दु:खात ते कधीच हरवले नाहीत.
वेठबिगार प्रथेविरोधात देशव्यापी आंदोलन छेडलेल्या स्वामी अग्नीवेश यांचे नाव सत्तरच्या दशकात गाजत होते. १९७३ साली औराद शहाजनी येथे झालेल्या आर्य युवक परिषदेच्या शिबिराच्या निमित्ताने श्रीनिवासांना स्वामीजींशी संपर्क साधता आला. त्यानंतर आपले पुढील आयुष्य दलित कष्टकरी वर्गातील अन्यायाविरोधात पणाला लावायचे हे त्यांनी पक्के ठरवून टाकले.
मधुमेहतज्ज्ञ, संशोधक आणि विज्ञान प्रसारक.
ठाणे येथील ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक. ठाणे रेल्वे पॅसेंजर्स असोसिएशनचे सदस्य, ६१ व्या मराठी साहित्य संमेलनात सहभाग. व्यास क्रिएशन्स संस्थेचे मार्गदर्शक.
डॉ. श्रीराम अभ्यंकर हे प्रख्यात गणितज्ञ होते. ते उत्तम शिक्षक, मराठी भाषाप्रेमी आणि भास्कराचार्य प्रतिष्ठानचे संस्थापक होते.
देशपांडे, स. पां.
शिक्षक चांगला असेल तर गणितही रंजक करता येते. प्राध्यापक स. पां. देशपांडे हे अशी किमया साधलेले हाडाचे गणित शिक्षक होते. त्यांच्या निधनाने आंतरराष्ट्रीय गणित वर्षांत गणितावर प्रेम करणारे एक उमदे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांचा जन्म शिरवळ (जि. सातारा) इथला, शालेय शिक्षणानंतर ते पुण्यात आले. गणित विषयात एमएस्सी केल्यावर त्यांनी दोन वर्षे स. प. महाविद्यालयात फिजिक्स डेमोनस्ट्रेटर म्हणून काम केले.
नंतर ते गरवारे महाविद्यालयात दोन वर्षे गणित शिकवत. मुंबईत व्हीजेटीआय संस्थेत १९५७ ते १९६२ या काळात गणिताचे अध्यापन केल्यावर १९६२ मध्ये ते मफतलाल पॉलिटेक्निक या संस्थेत गणित विभागप्रमुख झाले. १९९० पर्यंत म्हणजे २८ वर्षे त्यांनी तेथे गणिताचे अध्यापन केले. ‘मॅथेमेटिक्स फॉर पॉलिटेक्निक स्टुडंट्स’ हे पहिले पुस्तक त्यांनी लिहिले, ते पन्नास वर्षे वापरात आहे, त्याच्या ३५ आवृत्त्या निघाल्या आहेत. १९६४ मध्ये त्यांनी अभियांत्रिकी पदविकेच्या दुसऱ्या वर्गासाठी पुस्तक लिहिले ते ४७ वर्षे वापरात आहे. आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी ‘वर्कशॉप कॅलक्युलेशन’ हे पुस्तक त्यांनी इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांतून लिहिले. गणित विषय खरेतर अनेकांना आवडत नाही; पण तो सोपा करून शिकवण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. गणित लोकप्रिय करण्यासाठी त्यांनी ‘रँग्लरचे ग्लॅमर’, ‘संख्यादर्शन’, ‘संख्याशास्त्राचे किमयागार’, ‘गणितानंदी कापरेकर’ अशी वेगळ्या धाटणीची पुस्तकेही सामान्यांसाठी लिहिली. अलीकडेच त्यांनी नॅशनल बुक ट्रस्टसाठी ‘कन्सेप्ट ऑफ झीरो’ हे पुस्तक लिहिले असून ते प्रकाशनाच्या मार्गावर आहे. गेली साठ वर्षे त्यांनी एखाद्या व्रतस्थ ऋषीप्रमाणे गणितविद्या विद्यार्थ्यांना दिली.त्यांनी गणितावर २५० लेख लिहिले. पन्नासच्या वर भाषणे दिली. रेडिओवरही त्यांनी गणितातील गमतीजमती उलगडून दाखवल्या. त्यामुळेच २००९ मध्ये मुंबई मराठी पत्रकार संघाने त्यांना मानद सदस्यत्व दिले होते. एक प्रकारे त्यांनी गणित पत्रकारिता हा एक नवीन विषय त्यांच्या खास शैलीत हाताळला. महाराष्ट्र भाषा संचालनालयाच्या गणित परिभाषाकोशात त्यांनी लेखन केले होते. इतरही कोश वाङ्मयासाठी त्यांनी योगदान दिले.
निबंधकार व अर्थशास्त्रविषयक नियतकालिकांचे संपादक अशी ओळख असलेल्या श्रीपाद वामन काळे यांचा जन्म ५ मार्च १९१० रोजी झाला. पुढे पाऊल, “तुमचे स्थान कोणते”, “कौटुंबिक हितगुज”, “दाणे आणि खडे”, “नवी घडी नवे जीवन”, “नव्या जीवनाची छानदार घडी”, यांसारख्या अनेक पुस्तकांचे लेखन श्रीपाद काळे यांनी अत्यंत स्वयंस्फुर्तीने केले. समाजाचे सूक्ष्म निरीक्षण, व्यापकरितीने विचार करणे, ओघवती भाषा आणि नाजूक मार्मिक विनोदांची पखरण त्यांच्या लिखाणात दिसून येते.
श्रीधर फडके हे ख्यातनाम मराठी संगीतकार आणि गायक आहेत. ख्यातनाम गायक व संगीतकार स्व. सुधीर फडके आणि ख्यातनाम गायिका स्व. ललिता फडके यांचे ते सुपुत्र. श्रीधर फडके यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांना संगीत दिले आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti