अतुल कुलकर्णी यांनी १९८६ साली लातूर शहरातून पत्रकारितेची सुरुवात केली.सध्या मुंबईत दैनिक लोकमतचे ब्युरो चीफ, विशेष प्रतिनिधी म्हणून लोकमतमध्ये कार्यरत. सामाजिक विषयांना स्पर्श करीत, व्यवस्थेतील चुकांवर प्रहार करीत केलेले लिखाण ही जमेची बाजू. विविध वृत्तमालिका लिहीताना सामान्य माणूस केंद्रस्थानी कसा राहील याचा सातत्याने केलेला प्रयत्न कायम दिसून येतो.
डॉ.वि.भा.देशपांडे यांनी मॉडर्न महाविद्यालय तसेच पुणे विद्यापीठात मराठी आणि नाट्यशास्त्र या विषयाचे प्राध्यापक म्हणून काम केले. त्यांचा जन्म ३१ मे १९३८ रोजी झाला. नाट्यसमीक्षक विश्वनाथ भालचंद्र देशपांडे उर्फ डॉ.वि.भा. देशपांडे हे पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अनेक वर्षे पदाधिकारी होते.
डॉ. वि. भा. देशपांडे यांचे मराठीसृष्टीवरील लेख
नाटय़समीक्षक डॉ.वि.भा. देशपांडे (12-Mar-2017)
नाटय़समीक्षक डॉ.वि.भा. देशपांडे (1-Jun-2017)
Link Removed from MS Articles
#Deshpande, (Dr.) Vi. Bha.
Check #mss0481 for additional info
मराठी रंगभूमी, चित्रपट, तसंच हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा अविष्कार दाखविणार्यांपैकी एक नाव म्हणजे जनार्दन परब.अनेक हिंदी-मराठी चित्रपटात लहान मोठ्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत यामध्ये “माझा पती करोडपती”, “नवरी मिळे नवर्याला”, “गम्मत जम्मत”, “कुलस्वामिनी तुळजाभवानी” चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून, हिंदीत “कसम”, “शिकारी”, “ऐलान”, “जिद्दी”, “क्रांतीवीर”, “बाजीगर”, “नायक”, “गुलाम”, “उडान”, “चाय ना गेट” सारख्या असंख्य चित्रपटांचा उल्लेख करता येईल.
विश्वाच्या निर्मितीचे गूढ उकलण्याचा प्रयोग जिनिव्हाच्या सर्न प्रयोगशाळेत सुरु झाला, या घटनेचे डॉ. अमोल दिघे साक्षीदार ठरले. मूलकणांवरील संशोधन हा या प्रयोगाचा पाया आणि अमोल यांनी त्यांचे संशोधनाचे करिअर याच विषयातले. देशोदेशीच्या नामवंत विद्यापीठांमध्ये मूलकणांवरील संशोधन केल्यानंतर ते पुन्हा भारतात टीआयएफआर या मूलभूत संशोधनाच्या पंढरीत परतले आहेत...
विश्वाचे आर्त ...
भारतीय बाजारपेठांमध्ये “मेड इन चायना” लेबलने घुसखोरी केली असतानाच जयप्रकाश जोशी यांच्या उत्पादनाने मात्र मेड इन इंडिया लेबलवर चीनसह १२ देशांमध्ये ओळख निर्माण केली आहे. नाशिकजवळ सय्यद-पिंप्री गावातून शहराकडे नोकरीच्या शोधात आलेल्या जयप्रकाश जोशी यांनी मोठी डिग्री नसताना गायडिंग व्हिल्सच्या उत्पादनात जोरदार मुसंडी मारली...
उद्योगाचे धावते चक्र
भूगर्भातील घडामोडींचा मानवी शरीरावर नेमका काय परिणाम होतो, याचा अभ्यास मेडिकल जिऑलॉजी या आगळ्यावेगळ्या शास्त्रात केला जातो. जगभरात नव्याने अभ्यासल्या जाणार्या या विषयावरील पहिले पुस्तक लिहिण्याचा मान नागपुरातील तरुण प्राध्यापक डॉ. कीर्तिकुमार रणदिवे यांच्याकडे जातो. मेडिकल जिऑलॉजी, जीओकेमेस्ट्री (भूगर्भरसायनशास्त्र) आणि जिओएक्सप्लोरेशन (भूगर्भसंशोधन) या विषयांवरील एकत्रित पुस्तक लिहिण्याची कामगिरीही त्यांच्याच नावावर आहे.
डॉ. कीर्तिकुमार रणदिवे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला 'मेडिकल जिऑलॉजी' चा 'गुरु' हा लेख पुढील पानावर वाचा.
डॉ. कीर्तिकुमार रणदिवे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला 'मेडिकल जिऑलॉजी' चा 'गुरु' हा लेख वाचा.
ऑल इंडिया रेडिओमध्ये प्रोड्यूसर म्हणून काम करताना गजेंदगडकर यांना गंगूबाई हनगल, कुमार गंधर्व, मल्लिकार्जुन मन्सूर यांच्यासारख्या अनेक श्रेष्ठ गायकांचा सहवास लाभला.
‘लाखाची गोष्ट’ प्रदर्शित झाला त्या वेळी मा.राजा गोसावी ‘भानुविलास टॉकीज’मध्ये बुकिंग क्लार्क होते. स्वत:च्या सिनेमाची तिकिटे स्वत:च विकत असत आणि काही वेळा त्यांनी ब्लॅकमध्ये विकली. जागतिक सिनेमा इतिहासातला हा अचाट प्रकार.
एखाद्या व्यक्तिचं कर्तुत्व आणि त्यांची आपल्या ध्येयाप्रती असलेली निष्ठा ही त्याला एका अशा पदावर नेऊन ठेवते जिथे तो माणूस यशाच्या मागे लागत नाही तर यश त्याच्या मागे लागतं. पण त्यावेळी देखील यशापशाची पर्वा न करता आपल्या कामात, त्या कामाच्या धुंदीतच जगायला त्याला आवडतं.
रघुवेल लुक्स उर्फ र. ल्यु. जोशी यांनी काव्यलेखनाला तुलनेने खुप उशीरा सुरूवात केली. ताप येण्याचे निमित्त झाले आणि त्या काहिलीत काव्यलेखनाची स्फूर्ती होऊन त्यांनी खंडकाव्यच लिहून पूर्ण केले! त्यांच्या लेखनाची सुरूवात बायबलच्या विषयातून झाली. दांभिकपणा, पारतंत्र्य, राष्ट्रप्रेम, मायबोलीचे प्रेम ह्या विषयांवर त्यांनी सहजस्फूर्तीने, आवेशपूर्ण आणि भावपूर्ण लेखन केले आहे. वामन टिळकांना ते गुरूस्थानी मानत होते.
Copyright © 2025 | Marathisrushti