२० वर्ष ज्ञानसाधना महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले कवी अशोक बागवे यांनी कवी म्हणून आपली एक वेगळी छाप साहित्यवर्तुळात उमटवली आहे.
पाटोळे यांनी लिहिलेली २० नाटके व्यावसायिक रंगभूमीवर गाजली. ‘झोपा आता गुपचूप’ हे त्यांचे पहिले नाटक. ‘मुंबई पोर्ट ट्र्स्ट’च्या ‘एकटा जीव सदाशिव’ या नाटकात त्यांनी विनोदी नायकाची भूमिका केली होती. चित्रकला, वक्तृत्व, गीतगायन व अभिनय यांचीही पाटोळ्यांना आवड होती.
हिंदी तसंच इंग्रजी अश्या दोन्ही भाषांवर असल्यामुळे दंडवतेंनी लोकसभेच्या कामकाजावर आपला ठसा उमटवला होता.आपल्या अगदी साध्या राहणीबद्दल ते ख्यातनाम होते.मधू दंडवतेच्या पत्नी प्रमिला दंडवते भारतातील समाजवादी चळवळीतील प्रमुख नेत्या होत्या.
ठाणे महापालिकेचे नगरसेवक असलेले पांडुरंग पाटील.
सामान्य करदात्यांना दैनंदिन आयुष्यात वाहतूकींच्या व पायाभूत सुविधांच्या निर्मीतीबाबत भेडसावणार्या समस्यांच्या बाबतीत पांडुरंग पाटील यांनी अनेक ठोस पाऊले उचलून यासंबंधी अनेक योजना व कार्यक्रम अंमलात आणले आहेत. आपल्या प्रभागाला आधुनिकीकरण व नवविकासाचा मार्ग दाखवणारे सभागृह नेते अशी त्यांची ख्याती आहे.
पाणी, रस्तेविकास, उद्यानविकास, मलःनिस्सारण योजना, व बी.एस.यू.पी. योजनेची अंमलबजावणी अशा पंचस्तरीय कामांना प्राधान्य देवून त्यांनी ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक ८७ मध्ये मुलभूत सुधारणांचे पर्व सुरू केले आहे.
मध्यप्रदेशातील बांधवगड संस्थानातील ईरची या गावी महाराजांचा जंन्म झाला. सेना महाराजांचे वडील देविदास बांधवगडच्या राजाकडे नाभिकाचे काम करीत असत. आई प्रेमकुंवरबाई सात्विक स्वभावाची गृहिणी होती. वडील देविदासानंतर परंपरेनुसार राजाकडील नाभिकाचे काम सेना महाराजांकडे आले. सेना महाराजांचा लहानपणापासूनच भक्तीमार्गाकडे ओढा होता. त्यांच्या हिंदी मातृभाषेतून ते भक्तीरचना सुध्दा करु लागले. कालांतराने महाराष्ट्रातील त्या काळच्या संतांची माहिती सेना महाराजांना मिळाली. त्या संतांच्या व पंढरपूरच्या विठ्ठल भेटीसाठी ते आतूर झाले. तिर्थयात्रा करित करीत ते इकडे आले संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव व इतर त्यांचे समकालीन संत होते. या महान संतांच्या सान्निध्यात येऊन ते महाराष्ट्राच्या पावनभूमीत रममाण झाले.
त्यांनी मराठी भाषा आत्मसात करुन मराठी भाषेवर इतके प्रभूत्व मिळविले की मराठी भाषेत त्यांनी अनेक उत्कृष्ट अभंगांची निर्मिती केली. भागवंत संप्रदायातील वारकरी भक्तीरसात त्यांनी स्वतःला झोकून दिले.
एका हिंदी भाषिक संतांची मराठी भक्तिरचना वाचताना महाराष्ट्रातील भक्तांना जरासुध्दा वेगळेपण जाणवत नाही. ज्ञानेश्वर, तुकारामाइतकेच संत सेना महाराजांना श्रेष्ठ मानले जाते. संत सेना महाराजांचे अभंग मोठया आवडीने आजतागायत गायले जात आहेत. संतांना प्रदेश, भाषा, जातपात यांच्या मर्यादा नसतात हेच यावरुन सिध्द होते.
चमत्कारांनी साधुसंतांचे मोठेपण दर्शविणार्या लोकांना खोडच जडलेली आहे. ज्ञानेश्वरांनी भिंत चालविली, रेडयाच्या तोंडून वेद म्हणवून घेतले. अशा प्रकारच्या अनेक दंतकथा ज्याप्रमाणे अनेक संतांच्या बाबतीत सांगितल्या जातात तशीच दंतकथा सेना महाराजांच्या बाबतीतही सांगितली जाते. राजाची हजामत करण्यासाठी राजाचा माणूस सेना न्हाव्याकडे निरोप सांगावयास जातो. परंतु भगवंताच्या नामस्मरणात दंग असलेल्या सेना न्हाव्याला निरोप ऐकू जात नाही. उशीर झाल्यामुळे राजा क्रोधीत होऊन सेना न्हाव्याला शिक्षा होईल म्हणून स्वतः भगवंतच धोपटी घेऊन राजाची हजामत करुन जातात.
नामदेव, तुकाराम, सेना न्हावी, गोरा कुंभार, चोखामेळा अशा अनेक संतांनी त्यांच्या अभंगवाणीतून समाज प्रबोधन केले. संसारात राहून सुध्दा ईश्वर भक्ती करुन परमार्थ साधला जाऊ शकतो हे लोकांना सांगितले. कर्मठ उच्चवर्णियांनी निर्माण केलेली उच्चनीच, जातीभेद ही परंपरा मोडीत काढण्यासाठी उपदेश केला. स्वतःही तसे वागले. त्यांनी निर्माण केलेले काव्य, अभंग, यांचाच जनतेवर इतका प्रचंड प्रभाव पडला की इतर काही चमत्कारांनी त्यांचे मोठेपण सिध्द करण्याची काहीच गरज नसावी.
नंतर महाराष्ट्रातील वास्तव्य संपवून सेना महाराज पुन्हा त्यांच्या जन्मभूमीस तीर्थाटन करीत निघून गेले. त्यांच्या हिंदी भक्तीरचना उत्तरेकडील सर्व हिंदी प्रदेशातून म्हटल्या जातात. महाराजांनी काही रचना पंजाबी भाषेत सुध्दा केल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे एक सेनापती. शिवाजीराजांचा राज्याभिषेक झाला असता, हंबीरराव मोहित्यांना हिंदवी स्वराज्याचा सेनापती घोषित करण्यात आले. महाराजांच्या द्वितीय पत्नी सोयराबाई या हंबीरराव मोहित्यांच्या भगिनी होत्या.
मंगळवेढे येथील शामा नायकिणीचे पोटी हिचा जन्म झाला, सौंदर्य व गोड गळा यामुळे आपला व्यवसाय मुलगी आणखी पुढे नेईल असे तिच्या आईला वाटे. पण कान्होपात्राचा ओढा ईश्वरभक्तीकडे होता. विठ्ठल भजनात ती रंगून जात असे. तिने रचलेले अभंग प्रसिद्ध आहेत. कान्होपात्राच्या सौंदर्यामुळे तिच्यावर संकटे आली पण दरवेळी विठ्ठलकृपेने ती बचावली.
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या भूमीला कलेची दीर्घ संस्कृती आहे. या संस्कृतीचे वारसदार म्हणजे पळशीकर, बहुळकर, हुसे, गायतोंडे, भास्कर कुलकर्णी यांसारखे सरस चित्रकार होय.
डॉ. मेधा मेहेंदळे हे आयुर्वेदिक औषध क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव. तन्वी या ब्रॅन्डनेम खाली त्यांनी बनविलेली औषधे आज महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचली आहेत.
मराठी साहित्यविश्वामधील सर्वात प्रसिध्द व प्रथितयश असलेल्या मनोरमा प्रकाशन या संस्थेचे अनिल फडके हे संस्थापक आहेत.
पुस्तकातील आकर्षक व रेखीव मांडणी, लक्षवेधक मुख व मलपृष्ठे, व सुबक अंतरंग या ठळक वैशिष्ठयांनी नटलेली त्यांची पुस्तके ही नेत्रसुखदपणाबातीत निश्चितच वेगळ्या स्वरुपाची सगतात. उत्तम उठाव होणारी पुस्तके प्रसिध्द करणे हा अनिल फडके यांचा केवळ व्यवसाय नसून, त्यांचे निश्चल साहित्यप्रेम तसंच निष्ठा या गोष्टी आहेत. जहिराती व मोठ-मोठे प्रकाशन समारंभ या नव्या विक्रीकौशल्यांवर त्यांचा विश्वास नसल्याने अत्यंत साधेपणाने त्यांची पुस्तके प्रकाशित होतात.
लेखकांना पृष्ठसंख्येच्या हिशोबाने तात्काळ मानधन देणे, आणि स्वतःच्या टेम्पोमधून खेड्यापर्यंत मोठया प्रमाणावर पुस्तकांचे वितरण करणे ही त्यांच्या कार्यपध्दतीमधील विलोभनीय पैलू आहेत.
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
Copyright © 2025 | Marathisrushti