(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • संत चांगदेव महाराज

    चांगदेव महाराज हे योगमार्गातील अधिकारी पुरुष होत. योगसामर्थ्याने ते चौदाशे वर्षे जगले. यांच्या गरुचे नाव वटेश्वर म्हणून यांना चांगावटेश्वर असेही म्हणतात.

    एकदा यांच्या कानावर संत ज्ञानेश्वराची किर्ती आली तेव्हा त्यांना भेटीची उत्कंठा लागली, भेटण्यापूर्वी पत्र पाठवावे असा विचार करुन त्यांनी पत्र लिहिण्यास घेतले पण मायना काय लिहावा या संभ्रमातून त्यांनी कोरेच पत्र पाठविले. निवृत्तीनाथांनी ओळखले की योगी असूनही आत्मज्ञानाची कमतरता आहे म्हणून त्यांनी ज्ञानेश्वरांना उत्तर लिहिण्यास सांगितले. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी उत्तर लिहिले ते चांगदेव पासष्टी या नावाने प्रसिद्ध झाले.

    त्यानंतर चांगदेव व निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, मुक्ताबाई व सोपान यांची भेट झाली. त्यानंतर मुक्ताबाई चांगदेवांची गुरु बनली सन १३०५ (शके १२२७) मध्ये यांनी समाधी घेतली.

    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

  • संत नामदेव

    सामाजिक समतेचा व ऐक्याचा विचार प्रत्यक्षात आणणारे, त्या काळचे तीव्र जातिभेद न मानता भक्तिमार्ग सर्वाना खुला असतो हे जाणणारे व स्वत: या मार्गाचा प्रसार करण्या साठी दक्षिणेत रामेश्वरपर्यत तर उत्तरेकडे हिमाचल प्रदेशापर्यत पदयात्रा करणारे संतशिरोमणी नामदेव यांचा जन्म २६ ऑक्टोबर १२७० रोजी झाला. (तिथीने कार्तिक शुध्द एकादशी, शके ११९२)

    पंजाब व उत्तर प्रदेशात नामदेवाची मंदिरे आहेत.शिखांच्या गुरु ग्रंथसाहेब मध्ये नामदेवाच्या ६१ पदांना स्थान मिळाले आहे.

    वारकरी संप्रदायाच्या ज्ञानदेवादी श्रेष्ठ संतकवीपैकी ते एक. पित्याचे नाव दामाशेट, आईचे गोणाई. नसरी बामणी हे त्यांच्या घराण्याचे मूळ गाव म्हणून सांगितले जाते. तथापी हे गाव नेमके कोठले हयाबद्दल अभ्यासकांत ऐकमत नाही. कराडजवळील नरसिंगपूर हेच ते गाव असावे, असे एक मत आहे. नरसी-ब्राम्हणी‘ असा उल्लेख करुन महाराष्ट्र-सारस्वतकार वि. ल. भावे हयांनी ते सोलापूरकडचे गाव असल्याचे म्हटले आहे, तथापि असे गाव सोलापूर जिल्हयात नाही. मराठवाडयात नरसी आणि बामणी अशी दोन गावे आहेत. त्यांतील अंतरही फारसे नाही. नरसी हया गावाजवळच नामदेवांची समाधी व देऊळ आहे. हया गावी त्यांच्या घराची जागा दाखविली जाते. त्यांचे आजोळ कल्याणी किंवा काणणी हेही हयाच परिसरातले. नरसी आणि बामणी ही दोन स्वतंत्र गावे असली, तरी त्यांचा उल्लेख एकत्रच केला जातो. हे लक्षात घेऊन नामदेवांची नरसी बामणी ही हया दोन गावांत सामावलेली असावी, असे सामान्यतः मानले जाते. नामदेव कृत म्हणून समजले जाणारे एक ‘आत्मचरित्र‘ नामदेवांच्या संकलित गाथ्यात अंंतर्भूत आहे. त्यात ‘गोणाई दामाशेटी झाले पाणिग्रहण संसारी असोन नरसी गावी असा निर्देश सापडतो.

    नामदेवांचा जन्म नरसी बामणीचा, की पंढरपूरचा हयासंबंधीही वाद आहे. वि.ल.भावे व महाराष्ट्र कविचरित्रकार ज. र. आजगावकर हयांच्या मते नामदेव नरसी-बामणी येथेच जन्मले, तथापि नामदवे पंढरपूरी जन्मल्याचा निर्वाळा बहूतेक प्राचीन संतचरित्रकारांनी दिलेला आहे. एकनाथांनी लिहिलेल्या नामदेव-चरित्रावरुन नामदेवांच्या आईने पुत्रप्रांप्तीसाठी पंढरीच्या विठोबास नवस केला होता आणि त्यापूर्वीच नामदेवांचे आईवडील पंढरपुरात येऊन राहू लागल्याचे दिसते. नामदेवांचे बालपण पंढरपुरात गेल्याचेही हया चरित्रात नमूद आहे.

    परभणी जिल्हात नरसी येथे जन्म. ते पांडुरंगाचे मोठे भक्त होते. त्यांनी खुप अभंग लिहिले, ज्ञानेश्वरांचे समकालीन, ज्ञानेश्वर, चोखामेळा, सावता माळी यांच्याबरोबर तीर्थयात्रा, उत्तर भारतात बरीच वर्षे वास्तव्य, भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार केला.

    श्रीविठुरायाने आपल्या भक्ताचे गार्हाणे ऐकले विठुमाऊली प्रसन्न झाली. कार्तिका एकादशीला गोणईने एका सुदर बाळाला जन्म दिला. दामाजीशेठना खूप आनंद झाला. मोठया थाटाने त्यांनी बाळाचे बारसे केले. त्यांनी मुलाचे नाव ‘नामदेव‘ ठेवले.

    पाळण्यात खेळतांना नामदेव आता सहा-सात वर्षाचा झाला. कधी कधी तो वडीलांबरोबर देवळात जाऊ लागला. देवापुढे हात जोडून डोळे मिटून उभा राहू लागला. एक दिवस दामाजीराव बाहेरगावी गेले हेते. गोणाईने नैवेद्याचे ताट तयार केले. नामदेवाला आईने हाक मारली. ‘नामदेव, जा राजा! आज देवाला नैवेद्य घेऊन जा!‘ ‘हो!‘ नामदेवाने मान डोलावली. आईने त्याला पितांबर नेसवला. कुणाची दृष्ट लागेल म्हणून गालबोट लावले अन् नैवेद्याचे ताट त्याच्या हाती दिले. नामदेव देवळाकडे निघाला. नामदेवाला आनंद झाला. ‘रोज बाबा नैवेद्य दाखवतात. आज आपण नैवेद्य दाखवू देवाला वा!‘

    नामदेव देवळात आला. देवापूढे नैवेद्य ठेवला. डोळे मिटले. देवाची प्रार्थना केली आन हात जोडून तो उभ राहिला. काही वेळाने नामदेवाने डोळे उघडले. अन् बघतो तर काय? नैवेद्य आपला जशाच तसाच! नामदेवाला वाटले देव आपल्यावर रागवला. त्याने पुन्हा देवाला हात जोडले अन् म्हणाला, ‘बाबा आले नाहीत. मी नैवेद्य आणलास म्हणून तू रागवलास काय ? देवा, रोज बाबा नैवेद्य आणतात तेव्हा तू नैवेद्य खातोस अन् आज असं रे काय करतोस? देवा, तू नैवेद्य खाल्ला नाहीस तर मी मुळीच येथून हलणार नाही.‘
    निश्चयपूर्वक नामदेवाने देवाला हाक मारली. ती लहानगी मूर्ती ही हात जोडून बसूनच राहिली. केविलवाण्या नजरेने मान कलती करून ती बाल नामदेवाची मूर्ती देवाकडे पाहू लागली. हळूहळू पाय दुखू लागले. कंटाळा आला, पण नामदेवाने मान हलविली नाही. देवाने नैवेद्य खाल्ला नाही तर येथून हालायचे नाही असा दृढ निश्चय केला. दीनांचा दयाळू कळवळला. तो देव श्यामसुंदर प्रकट झाला. नैवेद्याच्या ताटातील अन्नपदार्थ त्याने खावयास सूरूवात केली. देवदर्शनाने नामदेव आनदंला! मोठया भक्तीभावाने त्याने देवाला नमस्कार केला. देव भावाचा भूकेला! नामदेवाची भक्ती पाहून प्रत्यक्ष विटेवरील परब्रह्य विरघळले. नामदेवाने देवाजवळ हट्ट धरला. देवाने नैवेद्य खाल्ला!

    नामदेवाचे संसारात लक्ष लागेना. सदोदित ‘विल विल‘ चालू असायचे त्यांचे गोणाई-राजाई रागावल्या. एक दिवस त्यांनी खूप बोलून घेतले त्यांना. म्हणल्या, देव करतो. देव करतो! म्हणून देवाला कष्ट पाडा. स्वतः तुम्ही काही करू नका अन देवाला झोजी वाहायला सांगा.‘

    नामदेवाला फार लागले ते बोलणे. त्यांनी ठरविले काही तरी उद्योधंदा करायचा. त्यांनी तसे आईला सांगितले. दामाजी-गोमाईला आनंद झाला. दामाजीशेठची बाजारात पत चांगली होती. ते बाजारात गेले. त्यांनी निरनिराळया लोकांच्या गाठी घेतल्या. खुपसे कापड घरी घेऊन आले अन् नामदेवाला म्हणाले,
    ‘नामदेवा, चांगलं कापड मिळाल आहे. खूप फायदा होईल या व्यापारात. पण हे बघ, शक्य तो रोखीचाच व्यावहार कर. अन तारण घेतल्याशिवाय कुणलाही उधार माल देऊ नको.‘

    ‘बरं आहे!‘ नामदेव म्हणाले. त्यानी गाडी जोडली. गाडीत कापड भरले. विलाचे नाव घेतले अन निघाले बाजाराला. बाजाराच्या वाटेवर एक माळ होता. गाडी माळावरून जाऊ लागली. त्या माळावर उघडीनागडी माणसे वावरत होती. नागडी मुले-मुली हिंडत होती.

    नामदेवाच्या ती नागडी मुलेबाळी दृष्टीस पडली. त्यांना गहिवरून आले. त्यांना वाटले ‘ही माण्से इथेच राहतात. रात्री खूप थंडी पडते. तेव्हा ती काय अंथरणार अन काय पांघरणार.‘

    आपल्याजवळ आता कापड आहे. ते सर्व आपण यांना वाटून टाकू. त्यायोगे ते सुखावतील. नाहीतरी आपण सारी त्या एकाच देवाचीच लेकरं. त्यांचं सुख तेच आपलं सुख नामदेवाच्या मनातं! नामदेवाने गाडी थांबवली. ते खाली उतरले, त्यांनी त्या मुलांना जवळ बोलावले. त्यांच्याजवळ चौकशी केली. मुले कुणाशी बोलतात म्हणून त्यांचे आईवडील आले आणि थोडयाच वेळात नामदेवाभोवती कडेच केले तिथल्या माणसांनी! नामदेव त्यांच्या पुढार्‍याला म्हणला ‘गणोबा मी तुम्हाला सर्व कापड देणार आहे.‘‘देवा, आम्हाला काय करायचं कापड-चोपड? आम्ही आहोत तशी बरी आहोत.‘

    ‘का? तुम्हीला थंडी लागत नाही रात्रीची?‘
    ‘देवा, थंडी लागते, पण कपडा घायचा म्हणजे काय पैसे पडतात ना?‘
    ‘पण तुम्ही आता पैसे देऊ नका. मग तर झालं ना! हो, पण तारण द्यावं लागेल तुम्हाला‘
    ‘तारण? कसलं तारण देणार आम्ही? माळावरचे दगड देऊ फार झालं तर.‘
    ‘चालेल, दगडदेखील चालेल मला.‘

    झालं! नामदेवांनी सर्वाना कापड वाटलं. त्यांचे सर्वांचे चेहरे आनंदाने फुलले. त्यांनी नामदेवांना दुवा दिला. एक भलामोठा दगड नामदेवाच्या गाडीत ठेवून दिला. तो दगड घेऊन नामदेव घरी आले. मुखाने नास्मरण चालूच होते. घरी आल्यावर त्यांनी तो दगड नेऊन तिजोरीत ठेवला.

    माजीशेठ(नामदेवाचे वडील) बाहेर गेले होते. घरी येताच त्यांनी विचारले,
    ‘काय, नामदेवा! कसा काय झाला व्यापार?‘ ‘फार, छान! सर्व कापड संपलं.
    ‘उत्तम, मग पैसे आणले असतील तेवढे ते दे! म्हणजे व्यापारांची देणी देऊ टाकतो.‘ दामाशेठ म्हणाले. ‘पैसे नाही आणले. सर्व माल तारण घेऊन दिले. गणोबा नाईकांना! त्यांना तारण धोंडोबांना दिलं आहे.‘ ‘अन् त्यांनी तारण काय दिलं? धोंडा ना? वा छान, फारच चांगलं तारण आहे ना काय? व्यापारांना काय मी दगड देऊ?‘ नामदेव कहीच बोलले नाहीत. ते मुकाटयाने खोलीत गेले. कुलूप उघडून त्यांनी तो धोंडा बाहेर काढला.

    दामाजींच्या आपल्या डोळयावर विश्वास बसेना. तो सोन्याचा दगड पाहून त्यांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. एवढे सोने कधी पाहिलेदेखील नव्हते त्यांनी. राजाई-गोणाई आ वासून पाहत राहिल्या. थोडा वेळ गेला आणि मग त्याचे भांडण सूरू झाले. नामदेव म्हणत, आपण फक्त आपल्या मालाचे पैसे घ्यायचे बाकींचं सोनं गणोबा नाईकांना परत द्यायचं.‘ छे, तसं कसं करायचं? त्याने आपल्या मालाबद्दल तर हे दिलं. आता सगळं आपलं!‘ त्यांच भांडण चालू असतांना लोक गोळा झाले. त्यांनी हे पाहिले. त्यांना आश्चर्य वाटले. काही लबाड आणि लोभी लोक गणोबा नाईकांकडे गेले. त्याला त्यांनी सर्व हकीकत सांगितली. अन् म्हाणाले, ‘गणोबा तू आता नामदेवाकडे जा. त्याला सांग की, तुझा मालाचे तेवढे पैसे काढून घे आणि उरलेल सोने दे ‘गणेबाला पुढे करूण लबाड लोक नामदेवाकडे गेले अन् नामदेवाला म्हणाले, ‘नामदेवा, हे गणोबा नाईक. त्याचं उरलेल सोनं ते परत मागत होते.

    ‘नामदेवांनी आपल्या मालाच्या किंमतीचे सोने काढून घेतले, ‘हे गणोबा, जा घेऊन तुमचं सोनं.‘ गणोबांनी सोने उचलले. माळावर येताच त्यांनी डोक्यावरचे सोने खाली उतरविले.पण...सोने कुठे ते? काळकुळकुळीत दगड होऊन पडला होता त्यांच्यासमोरं. देवाने न्याय दिला होता. संत नामदेवांच्या घराशेजारी एक ब्रा्रण राहत होता. तो पूर्वी दारिद्री होता. पण नतंर त्याने देवी लक्ष्मीची उपासना केली. देवी प्रसन्न झाली. तिने त्याला एक परिस दिला. अन् म्हणाली, ‘हा परिस तू लोखंडाला लावलास की त्याचे सोने होईल. तुझी इच्छा पूर्ण होईल!‘ ब्राणाचे दारिद्र पळाले. लोक त्यांच्या श्रीमंतीचा हेवा करू लागले. पण परिसाची प्राप्ती झाल्याने त्याने काही कुणाला कळू दिले नाही. एक दिवस राजाई (नामदेवाची आई) त्या ब्राणाच्या घरी गेली.

    त्यावेळी ब्राणाची बायको कमळजा ही घरी होती. तिला फार लोभ वाटे या कुटूंबाविषयी. तिने राजाईची हकीकत विचारली. आपली दारिद्रयाची कहाणी राजाईने तिला सांगितली. कमळजाला राजाईची दया आली. आपल्या खोलीत जाऊन तिने परिस आणला अन् तो परिस राजाईला देऊन म्हणाली. ‘बाई, हा परिस मी तुम्हाला देते आहे. लोखंडाचे या परिसाने खूप सोने करून घ्या अन् माझा परिस लवकर परत आणून द्या.‘

    राजाई घरी गेली. तिने घरातील भांडयांना, लोखंडाला परिस स्पर्श करून सोने केले. ते सगळे सोने घरात लपवून ठेवले. मग थोडे सोने घेऊन ती बाजारात गेली. धान्य, किराणा वगैरे घेऊन परत आली. नंतर ती परिस परत करण्यासाठी निघली. तेवढयात नामदेव आले. नामदेवांना पाहून राजाई कमळजाडके न जाता माघारी वळली. राजाईची घागरलेली मुद्रा व अन् घरातला थाटमाट पाहून नामदेवाला संशय आला, ‘काय गडबड आहे आज घरात?‘ राजाई दादपत्ता लागू देईना. नामदेवांनी तिचा पिच्छा सोडला नाही. त्यांनी तिला खोदूनखोदून विचारल. शेवटी नाईलाजाने राजाईने नामदेवांना सर्व काही सांगितले.

    नामदेवांनी राजाईजवळून तो परिस मागून घेतला. अन् श्रीविलाचे नास्मरण करीत ते चंद्रभागा नदीवर आंघोळीसाठी गेले.

    नामदेवाला जाऊन थोडा वेळ झाला. तोच ब्राण स्वतःच्या घरी आला. त्याने आंघोळ केली अन् तो पूजेसाठी बसला. परिसाचादेखील तो देवाबरोबर पूजा करीत असे. त्याने आपल्या पत्नीस पूजेसाठी परिस आणण्यास सांगितले. तिला ब्रम्हांड आठवले. आता परिस कोठून आणून देणार? ती अळमटळम करू लागली. ब्राणाने तर निकड लावली. शेवटी तिला सर्व सांगणे भाग पडले. ब्राण खूपच रागावला.

    कमळजा राजाईकडे आली. तिने राजाईकडे परिस मागितला. तीही मोठया संकटात सापडली. मोठया विश्वासाने ब्राण पत्नी कमळाजाबाईनी आपल्याला परिस दिला. होता. आपले दारिद्र दूर व्हावे असे तिला वाटत होते. पण आपण योग्य वेळी परिस परत केली नाही. आता तर आपल्याजवळ परिस नाही. नामदेव परिस घेऊन, नदीवर गेल्याचे राजाईने कमळजाबाईला सांगितले. बिचारी ब्राणपत्नी! तिने तो निरोप नवर्‍याला सांगितला. ब्राण खूपच रागावला. त्याने बायकोला खूप बोलून घेतले अन् तो नदीकडे धावत सुटला. तो काय धावतो? म्हणून आणखी काही लोक त्याच्या मागून धावू लागले. नदीत नामदेव आंघोळ करीत होते. मुखाने विठ्ठलाचे नामस्मरण करीत होते. ब्राण तेथे पोहोचला आणि म्हणाला, ‘नामदेवा माझा परिस मला परत द्या पूजेला खोळंबा होतो आहे.

    ‘नामदेव म्हणले, ‘कसला परिस? मी तर तो दगड नदीत टाकून दिला.‘ आजूबाजूचे लोक गंमत पाहत होते. कुणी म्हणाले ‘हा नाम्या लबाड बरं का!‘ त्याने परिस लपवून ठेवला असेल! परिस काय कोणी नदीत टाकून देते काय?‘ ‘हे पहा नामदेवा! उगीच ढोंग करू नकोस. खोटे बोलू नकोस. परिस कोणता शहाणा माणूस नदीत टाकीलं बरं!‘ ‘तुम्हाला वाटत असेल खोटे आहे तर नदीत उतरून पाहा!‘ नामदेंवाचे वरील बोलणे एकूण सगळे लोक हसू लागले. बुडी मारून नदीच्या तळाशी जाणार कोण? अन् तळ गाठला तरी पाण्याच्या तळाशी किती दगडं. त्यातून परिस कसा शोधून काढणार? तोच नामदेवांनी पाण्यात बुडी मारली. ओंजळभर दगडं घेऊंन ते वर आले आणि ब्राणाला म्हणाले, ‘हे घ्या तुमचे परिस!

    ‘लोकांना हे ऐकून चेष्टा वाटली. इतक्यात एकाने आपल्या जवळच्या लोखंडी टाचण्या काढल्या. त्या त्याने सर्व दगडांना लावून पाहिले. सर्व टाचण्या सोन्याच्या झाल्या. सारेच दगड परिस होते. ब्राण ओशाळला. त्याने संत नामदेवांचे पाय धरले. सगळया लोकांनी एकच गजर केला.‘संत नामदेव महाराज की जय! पुंडलिक वरदा हरी विठ्ठल महाराज की जय.

    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

    ## Sant Namdeo ; Sant Namdev

  • संजय सोनवणी

    संजय सोनवणी (जन्म १४ ऑगस्ट १९६४): मराठीतील आधुनिक काळातील महत्वाचे साहित्यिक तत्वज्ञ, कवी आणि संशोधक. त्यांनी मानवी जीवनाच्या असंख्य पैलूंना विविध साहित्यप्रकारांद्वारे हात घालत जी साहित्य रचना केली आहे तिला भारतीय साहित्यात तोड नाही.

  • सचिन पिळगांवकर

    मराठी चित्रपट रसिकांच्या मनावर मागील पांच दशकांपासून राज्य करणार नाव म्हणजे अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता सचिन पिळगावकर.

    सचिन पिळगावकर यांचा जन्म १७ ऑगस्ट १९५७ रोजी झाला. १९६२ सालच्या हा माझा मार्ग एकला या मराठी चित्रपटातील बाल कलाकाराच्या भूमिकेद्वारे वयाच्या चौथ्या वर्षी त्याचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते बाल कलाकारासाठीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.

    त्यानंतर बालकलाकार म्हणून त्याने ज्वेलथीफ, ब्रह्मचारी, मेला आणि अन्य १५ चित्रपटांतून भूमिका केल्या. त्यानंतर राजश्री प्रॉडक्शन-निर्मित गीत गाता चल या चित्रपटात प्रमुख भूमिका केल्यानंतर एकामागून एक बालिकावधू, कॉलेज गर्ल, अंखियोंके झरोकोंसे आणि नदिया के पार अशा चित्रपटांतल्या प्रमुख भूमिका त्याच्या वाट्यास आल्या. त्रिशूल चित्रपटाच्या यशानंतर त्याने शोले, सत्ते पे सत्ता या चित्रपटांत साहाय्यक व्यक्तिरेखा साकारल्या.

    त्यानंतर ते मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात निर्मिती आणि दिग्दर्शनाकडे वळले.

    मराठीसृष्टीवरील सचिन पिळगांवकर यांच्यावर लिहिलेला संपूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

    ## Sachin Pilgaonkar
  • संजय केळकर

    श्री संजय केळकर हे ठाणे शहराचे आमदार आहेत. ते २०१४ च्या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले. १९८५ पासून सतत शिवसेनेच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ केळकर यांनी २०१४ मध्ये काबिज करुन शिवसेनेला धक्का दिला.

    ते राजकारणासोबतच विविध सामाजिक संस्थांशी संबंधित आहेत.

    # Sanjay Mukund Kelkar
    BJP MLA - Thane Constituency

  • संगीतकार दत्ताराम (दत्ताराम शिरोडकर)

    हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये 'संगीतकार दत्ताराम' हे नाव एके काळी खूपच गाजले होते. दत्ताराम हे डिचोली तालुक्यातील. त्यांचे मुळ नाव दत्ताराम शिरोडकर, मुळगावी त्यांच्या वडिलांचे किराणा दुकान होते. पुढे आई ९ वर्षाच्या दत्तारामला घेऊन सांवतवाडीला गेली, तिथे शाळेत घालताना शेजारच्या मुलाने त्यांचे नाव 'दत्ताराम वाडकर' सांगितले आणि तेच नाव कायमचे लागले. शिक्षणात त्यांचे फार लक्ष नव्हते. त्यामुळे आई त्यांना घेऊन मुंबईत गेली. तिथे तबला शिकले, ढोलक शिकले, त्यातूनच पुढे पृथ्वी थिएटर हुस्नलाल - भगतराम, संगीतकार शंकर आदीशी त्यांचा संबंध आला. राजकपूर तेव्हा 'आग' चित्रपटाद्वारे निर्माते झाले, पण 'आग' आपटला. पुढे 'बरसात' जोरदार चालला. दत्ताराम त्यावेळच्या दर्दभ-या गाण्यात ढोलकचा ठेका धरायचे. 'चोरी चोरी' चित्रपटात 'ये रात भिगी भिगी' या गाण्यात ढोलकचा अप्रतिम ठेका दत्ताराम यांनी दिला आणि तोच हिंदी चित्रपटसृष्टीत 'दत्ताराम ठेका' म्हणून गाजू लागला. त्यातूनच पुढे राजकपूरने दत्ताराम यांना 'अब दिल्ली दूर नही' या चित्रपटासाठी स्वतंत्रपणे संगीत दिग्दर्शनाची संधी दिली. या चित्रपटातील ''चुन चुन करती आयी चिडिया, मोरभी आया चूहाभी आया, बंदरभी आया'' हे गाणे हिट झाले.

    दत्ताराम यांचा सुवर्णकाळ म्हणजे 'परवरिश' चित्रपटातील एकापेक्षा एक हिट गाणी होय. यमन रागातील चाल दत्ताराम यांनी बांधली आणि हसरत जयपुरीने त्याचे शब्द लिहिले. "ऑसू भरी है ये जीवन की राहें, कोई उनसे कहदे, हमे भूल जायें " या गाण्याने लोकप्रितेचा कळस गाठला. राज कपूर भलताच खुश झाला. राजकपूर हा ग्रेट शोमन होता. तसाच संगीताचा जाणकार होता. १९५९ साली 'कैदी ने ९११' मधील लताच्या आवाजातील ''मिठी मिठी बातोंसे बचना जरा'' हे गाणेही खूप लोकप्रिय झाले. ''आसू भरी है ये जीवन की राहे'' हे मुकेश यांचे गीत आजही रसिकांच्या लक्षात आहे. ही गीते संगीतबध्द करणारा माणूस होता मा.'दत्ताराम'. १९५० नंतरची ही गाणी आहेत, पण त्यामध्ये आधी चाल बांधण्यात आली आणि हसरत जयपुरींनी त्या चालीवर शब्द गुंफले. दत्ताराम त्यावेळी संगीतकार जय-किशन आणि राजकपूर यांच्याएवढेच लोकप्रिय होते. ढोलक या लोकवाद्याचा वापर प्रतिष्ठित हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी खुबीने केला. असे हे दत्ताराम काळ बदलल्यानंतर अज्ञातवासात गेले. १५ - १६ चित्रपटांना दत्ताराम यांनी संगीत दिले. तो जमाना वेगळा होता. आजच्या लाखाच्या, कोटीच्या आकडयांत मानधन कधी मिळाले नाही, 'परवरिश' साठी जेमतेम पाच हजाराचे मानधन मिळाले होते असे दत्ताराम सांगत. पुढे जमाना बदलला, शंकर-जयकिशन यांना साथ देत दत्ताराम यांनी मुबंईत बरीच वर्षे काढली.

    मा.दत्ताराम यांचे ८ जून २००७ रोजी निधन झाले.

    अधिक माहितीसाठी हा लेख वाचा.

    #Dattaram #DattaramShirodkar

  • संत चोखामेळा

    चोखामेळा (चोखोबा) हे यादव काळातील नामदेवांच्या संतमेळ्यातील वारकरी संतकवी होते.

  • संत ब्रम्हानंद

    महाराष्ट्राच्या सन्त परंपरेला महाराष्ट्रेतर प्रदेशचं वावडं नव्हतं, हे आपल्याला संत नामदेवांच्या काळापासून माहित आहे. विश्वात्मकता हे सन्तांच्या विचारसरणीचं अधिष्ठान होतं व त्यांच्या तत्त्वज्ञानानून व साहित्यातून तीच प्रतिबिम्बित झाली आहे.

    महाराष्ट्रातील नागेश सम्प्रदायाची सन्त परंपरा केवळ महाराष्ट्रात आढळत नाही तर ती कर्नाटकातही आढळते. बेळगावच्या वाटेवरील हत्तरगी हे गाव कर्नाटकात आहे. तेथील आधुनिक संत हरिकाका गोसावी ह्यांची परंपरा संत एकनाथांपासून आहे. रामदास स्वामींच्या संप्रदायाची व शिष्यांची परंपरा केवळ महाराष्ट्रा आढळत नाही तर मध्य भारतात व दक्षिण भारतातही आढळते. संतांना नि त्यांच्या परंपरेला भूगोलाच्या सीमा रेषांचं कसं असेल ?

    गोंदवलेकरांच्या शिष्यपरंपरेचा फारसा विचार महाराष्ट्राच्या वाड्मयेतिहासात झाला नाही. तो करुन देणं अगत्याचं असल्यानं त्यांच्या शिष्यपरंपरेचा साहित्याचं स्वरुप दर्शन या लेखात हेतुत: घडवून दिलं आहे.

    ब्रम्हानंद महाराजांचा जन्म भारताच्या १८५७ च्या स्वातंत्र्यसमराच्या आगेमागे झाला त्याचा मास व तिथी माघ वद्य दशमी अशी नोंदविली असून इसवी सनानुसार त्यांचं जन्मवर्ष १८५९ हे आहे.

    त्याचं घराणं कर्नाटकातील जालीहाळ गावाचं. भक्तीची परंपरा त्यांच्या घराण्यात असून हे गाडगोळी घराणं त्या भागात वेदविद्या पारंगत म्हणून प्रसिद्ध होतं. त्यांचे वडील वाळंभट्ट हे वेदशास्त्र संपन्न पंडित होते. असं असलं तरी त्यांचे पुत्र अनंत (हे ब्रम्हानंदमहाराजांचं सन्यासग्रहणापूर्वीचं नाव) मात्र तसे नव्हते त्यांचे बालपण वेदोध्ययानात न जाता खेळण्याबागडण्यात उनाडकीत जाऊ लागलं. तु कुलर्दपक नसून कुळाला काळिमा फासणारा आहेस, असं बाळंभट्टांनी कंटाळून नि अत्यंत त्रस्त होऊन म्हटल्या वर अनंताला पश्चाताप झाला व परतीही झाली. मुळगुंदच्या पंडित रघुनाथ शास्त्रींकडे त्यांनी वेदाध्ययन केलं. शास्त्री बुवांच्या सत्संगाचा योग्य तो परिणाम झाला व अनंतानं वेदाध्ययन पूर्ण केलं एवढंच नव्हे तर ते भागवत ही सांगू लागले अनंताच्या जीवनातील हा कायापालटच होता. ब्रम्हचैतन्य हेच आपले गुरु आहेत असा दृष्टान्त झाल्यावर ते गोंदवल्यास आले नि त्यांनी ब्रम्हचैतन्यांचा अनुग्रह घेतला.

    ब्रम्हानंदमहाराजांनी आपल्या गुरुचा महिमा आपल्या अनेक अभंगातून अत्यंत श्रद्धेने व्यक्त केला आहे.गुरुर्ब्रह्मा या सूत्राची प्रचीती त्यांच्या या अभंगातून येते, त्यातील गुरुराव माझे ब्रम्हची साकार या मध्यवर्ती संकल्पनेवरुन त्यांच्या गुरुभक्तीची सहज कल्पना येईल.

    साष्टांग वंदूनी सदगुरुरायासी । चिंतावी मानसीं गुरुमूर्ति ।।
    गुरुराव माझे ब्रम्हचि साकार । केला उपकार धरुनी देह ।।
    नाहीं निराकार नाही हो साकार । ऐसा गुरुवर माझा आहे ।।
    निर्वाच्य ब्रम्ह चैनत्यसि आलें । दुष्टहि तरले दर्शनयोगें ।।४।।
    सकल निगमागम नेणती महिमा । नाहीं दुजी उपमा सदगुरुसी ।।५।।
    दीन ब्रम्हानंद प्रार्थीतसे भावें । मन लय व्हावें रामरुपीं ।।६।।

    कधी ते आपल्या गुरुला रामस्वरुप मानतात तर कधी तो मारुतीचा अवतार आहे, असंही मानतात.

    गुरुच्या वात्सल्याची ते मातेच्या वात्सल्याची तुलना करतात म्हणूनच ते आपल्या गुरुला 'सद्गुरुआई' असंही म्हणतात. या संदर्भातील त्यांचा अभंग असा आहे.

    ऐसे करीं सद्गुरुआई । आपुलें स्मरण वसो ह्दयी ।।१।।
    नावडो हे विषयध्यान । रामनामी लागो मन ।।२।।
    देहबुद्धि उकरुन । लावीं रोप समाधान ।।३।।
    पळवी माझी दुजी भ्रांति । वासना जाळुनि देई शांति ।।४।।
    बहु बळकट चिज्जडग्रंथी । सोडुनि दावा दाशरथि ।।५।।
    ब्रम्हानंदी अशा फार । करीं दीनाचा उद्धार ।।६।।

    आपण परमार्थमार्गाला लागन शक्यच नव्हतं कारण ते आपल्या प्रारब्धात नव्हतं तरीही गुरुकृपेमुळं आपल भाग्य उजळलं आणि आपण परमार्थमार्गाला लागलो यामूळं आपला गुरु हेच आपलं वैकुंठ आहे आणि तोच आपला कैलास आहे. तेच आपलं ब्रम्हज्ञान आहे. आणि तोच आपला मोक्ष आहे, असं ब्रम्हानंदमहाराज म्हणतात. अशा गुरुची अखंड सेवा करण्याचं भाग्य आपल्याला लाभो अशा विनवणीही ते परमेश्वराजवळ करतात.

    परमार्थाची रेषा नाही कपाळांत । करवी सदगुरुनाथ अपुले सत्ते ।।१।।
    आपले सत्तेने तोडी कर्मफांसा । माझा सदगुरु ऐसा कृपानिधी ।।२।।
    कृपानिधी एक धरिला असे भावें । काय तें करावें वैकुंठासी ।।३।।
    वैकुंठ कैलास आम्हां सदगुरुप्राय । चुकती अपाय तेणें सर्व ।।४।।
    हाचि माझा मोक्ष, हेंचि ब्रम्हज्ञान । नाम मुखीं चरणसेवा करुं ।।५।।
    सेवा अखंडित राहो माझे चित्ती । हरीची विनंती पायापाशीं ।।६।।

    आणि केवळ असं सांगूनच ब्रम्हानंदमहाराज थांबत नाहीत तर ते आयुष्यभर आपल्या गुरुची अत्यंत निष्ठेनं सेवाही करतात.

    संदर्भ - डॉ.यू.म.पठाण यांचा 'महान्यूज'मधील लेख.

  • संजीव वेलणकर

    श्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात. ते मराठीसृष्टीचे प्रमुख लेखक आहेत.

  • सखाराम विनायक आपटे

    सखाराम विनायक आपटे यांनी यंत्रशास्त्राच्या मूलतत्वांवरील पुस्तक, तसेच “वाहती वीज़” हे पुस्तक लिहून शास्त्रीय परिभाषेचा पाया रुंदावण्याचे काम केले.

    १८ जुलै १९७४ रोजी त्यांचे निधन झाले.

    Sakharam Vinayak Apte