भागवत धर्माचा पाया ज्ञानेश्वरांनी घातला आणि त्यावर कळस चढविण्याचे कार्य संत तुकारामांनी केले. मराठी काव्यात ‘अभंग‘ प्रकार निर्माण केला. त्यांच्या अभंगाची संख्या ५ हजार आहे. अभंगात सुभाषितवजा पंक्ती आढळतात शुध्द परमार्थाची शिकवण. भक्तीची कास. नामस्मरण व सतसंग यावर अभंगरचना. सगुण-निर्गुण हे आध्यामिक साक्षात्काराचे पैलू.
तुकारामांचा जन्म, पुण्याजवळील देहू गावी, इ.स. १६०८ मध्ये झाला. प्रारंभी ते सुखी संसारी गृहस्थ होते. ते व्यवसायाने वैश्य होते. त्यांची दुकानदारी उत्तम चालली होती. पण दुष्काळ पडला, पत्नी वारली, मुगला गेला. इकडे दिवाळे निघाले. तुकाराम विठ्ठलभक्तीकडे वळले. अभंगरचना करु लागले. महान विठ्ठलभक्त झाले. श्रीविठ्ठलाचा त्यांना साक्षात्कार झाला. भक्तिमार्गाचा जयजयकार करीत त्यांनी जगाचा निरोप घेतला. फाल्गुन वद्य द्वितीयेला ‘तुकाराम बीज‘ म्हणतात. तुकारामांनी आपले लौकिक आणि अध्यात्मिक जीवनातले अनुभव आपल्या अभंगांतून व्यक्त केले आहेत. उत्स्फूर्त आणि उत्कट भावोद्रेकाची ही अभंग -कविता म्हणजे मराठी भाषेचे अक्षर -लेणे आहे.
संत तुकाराम हे महाराष्ट्राचे सर्वात लाडके संत आहेत. ज्या काळात संत तुकाराम महाराष्ट्रात पुण्याजवळच्या देहू गावी जन्माला आले त्याच काळात अनेक संत होऊन गेले. म्हणून त्या काळाला भक्तियुग म्हणतात. त्यांच्या जन्मवर्षाबद्दल इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत, त्यातल्या चार लोकप्रिय तारखा १५६८, इ.स. १५७७, इ.स. १६०८ आणि इ.स. १५९८ या आहेत. इ.स. १६५० मधे एका सार्वजनिक समारंभात, श्री विठ्ठल त्यांना सदेह वैकुंठी घेऊन गेले अशी मान्यता आहे. विष्णूचे दुसरे रूप असलेला पंढरपूरचा श्री विठ्ठल वा विठोबा हा तुकारामांचा लाडका देव होता.
नादमधुर रिमिक्समुळे अवधूत गुप्ते हे नाव घराघरांत पोचलं. त्यानंतर सारेगपम या कार्यक्रमाचा परीक्षक म्हणूनही ते गाजले.
पूर्वी एक जिंगल तयार व्हायला चार ते पाच तास लागत. माझ्या बाबतीत सांगायचं तर दोन तासांत दोन जिंगल्स तयार करून मी पुन्हा तिसऱ्या कामासाठी दुसऱ्या स्टुडिओत जायचो. एक काळ असा होता की, सकाळी रेडिओवाणीला (वरळी) ८ ते १० मध्ये दोन जिंगल्स, मग १० ते ६ वेस्टर्न आऊटडोअर (फाऊंटन), पुन्हा संध्याकाळी ६ ते १० दोन जिंगल्स (रेडिओवाणी किंवा रेडिओ जेम्स- वरळी) आणि रात्री १० ते २ बॉम्बे लॅब किंवा फिल्म सेंटरला फिल्मची जिंगल्स मी करत असे आणि पहाटे तीन वाजता घरी जात असे. आणि पुन्हा सकाळी साडेसहाला उठून आठ वाजता रेडिओवाणीला हजर!
अशोक पत्की यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
http://www.marathisrushti.com/articles/ashok-patki-jingles-king/
# Patki, Ashok
प्रसिद्ध नवनाथांपैकी एक असलेले संत निवृत्तिनाथ हे संत ज्ञानेश्वरांचे मोठे भाऊ आणि गुरु होते. नाथ संप्रदायातील गहिनीनाथांनी निवृत्तिनाथांना दीक्षा दिली.
ज्ञानेश्वर, सोपानदेव, मुक्ताई, निवृत्तिनाथ ह्या चार भावंडांमधे निवृत्तिनाथ हे थोरले होते. निवृत्तीनाथांनी ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताबाई यांचा माता-पित्याच्या वात्सल्याने सांभाळ केला. निवृत्तिनाथांनीच ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असणारी गीता सामान्य लोकांना उमजेल अशा शब्दांत लिहिण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका(ज्ञानेश्वरी) लिहून काढली.
सुमारे चारशे योगपर, अद्वैतपर आणि कृष्णभक्तिपर असे अभंग आणि एक हरिपाठ एवढी रचना निवृत्तिनाथांनी केली आहे. निवृत्तिदेवी, निवृत्तिसार आणि उत्तरगीताटीका असे तीन ग्रंथही निवृत्तिनाथांनी लिहिल्याचे म्हटले जाते; तथापि ते अनुपलब्ध आहेत. धुळ्याच्या श्रीसमर्थवाग्देवतामंदिरात ‘सटीक भगवद्गीता’ आणि ‘समाधि बोध’ अशी दोन हस्तलिखिते निवृत्तिनाथांची म्हणून ठेवली आहेत.
ज्ञानेश्वर आणि सोपानदेव समाधिस्त झाल्यानंतर मुक्ताई अन्नपाणी त्यागून परलोकवासी झाली व पुढे लवकरच निवृत्तिनाथांनीही त्र्यंबकेश्वरला देह ठेवला. त्यांची समाधी तेथेच बांधण्यात आलेली आहे.
रासायनिक खतांच्या वापराविना म्हणजे म्हणजे सेंद्रीय शेतीमध्ये चांदवडच्या संजय पवार या तरुणाने केलेले प्रयोग म्हणजे शेतीचे विद्यापीठच ठरले आहे. आशियातून युरोपात ऑरगॅनिक द्राक्षांचा पहिला कंटेनर निर्यात करण्याचे श्रेय त्याने मिळवले. त्याचबरोबर दशपर्णांक या सेंद्रीय कीटकनाशकाचा शोधही लावला. सेंद्रीय शेती करणार्यांसाठी त्याने मुंबईत सुरु केलेल्या फार्मर्स मार्केटला आता बॉलिवुडची पसंती मिळाली आहे...
सूखशेतीचा मळा ...
अभिनय दिग्दर्शन, लेखन, डबींग, नेपथ्य व प्रकाश योजना ह्या आणि अशा विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटविणारे संजय बोरकर ह्यांच्या कारकिर्दीची सुरुवात ठाण्यातील शिवसमर्थ विद्यालयातून एकांकिका स्पर्धांमधून झाली.
पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी पाकिस्तान दौऱ्यावर असताना ठरलेल्या कार्यक्रमानुसार लाहोर किल्ल्याला भेट देणार होते. मात्र त्याचवेळी पंतप्रधानांच्या विशेष सुरक्षा गटातील एका अधिकाऱ्याने त्यास आक्षेप घेतला. रस्त्याची सुरक्षा तपासणी होत नाही तोपर्यंत पंतप्रधानांचा ताफा निघणार नाही, असे या अधिकाऱ्याने ठामपणे सांगितले. या पवित्र्यामुळे राजनैतिक अधिकाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली. त्यातही एका पोलीस अधिकाऱ्याने पंतप्रधानांचा ताफा रोखून धरल्याचे वास्तव त्यांना सहनच झाले नव्हते.
परंतु आक्षेप डावलणेही शक्य नव्हते. त्या रस्त्यावर पोलीस पथक पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आणि लपून बसलेल्या स्थानिक दहशतवाद्यांनी या पथकावर हल्लाबोल केला. या घटनेनंतर मात्र ‘त्या’ पोलीस अधिकाऱ्याची चांगलीच वाहवा झाली. तो अधिकारी म्हणजे दुसरे-तिसरे कोणी नसून, ते आहेत मुंबईचे नवे पोलीस आयुक्त संजीव दयाळ!
मितभाषी, प्रामाणिक, कर्तव्यदक्ष दयाळ प्रसारमाध्यमांपासून नेहमीच दूर राहिले. १९७७ च्या तुकडीतील दयाळ यांचा आयपीएस वर्तुळातही चांगलाच दबदबा आहे. व्यवस्थापनातील त्यांच्या वादातीत कौशल्यामुळे त्यांना सहकाऱ्यांनी ‘चाणक्य’ ही पदवी दिल्याचे बोलले जाते. ‘आपले काम बरे’ अशा भावनेतून ३३ वर्षांत ते ज्या ठिकाणी नियुक्तीत होते तेथे त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला. दिल्लीजवळच्या गुरगावात त्यांचे बालपण गेले.
एमएस्सीपर्यंत शिक्षण घेतलेल्या दयाळ यांची, महाराष्ट्राचे केडर मिळाल्यानंतर पहिली नियुक्ती नाशिकचे अतिरिक्त अधीक्षक म्हणून झाली. त्यानंतर १९८२ मध्ये मुंबईत येण्याआधी नांदेड, अमरावती येथे ते अधीक्षक होते. ज्युलिओ रिबेरो हे तेव्हा मुंबईचे पोलीस आयुक्त होते. धारावीत वरदराजन मुदलियार ऊर्फ वरदाभाईची प्रचंड दहशत होती. यादवराव पवार यांनी उपायुक्त म्हणून वरदाभाईची चांगलीच कोंडी केली होती. रिबेरो यांनी पवार यांच्या जागी दयाळ यांना नेमले.
दयाळ यांनी कसलाही गाजावाजा न करता वरदाभाईला सळो की पळो करून सोडलेच पण धारावीतले मटक्याचे, दारूचे अड्डे साफ उध्वस्त करून टाकले. त्यानंतर त्यांनी इंटेलिजन्स ब्युरोत उपसंचालक म्हणून जाणे पसंत केले. १९८८ ते ९२ पर्यंतचा काळ प्रतिनियुक्तीवर काढल्यानंतर १९९३ मध्ये पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून शासनाने त्यांची नियुक्ती केली. त्यावेळी पश्चिम प्रादेशिक विभाग हा वांद्रे ते दहिसपर्यंत पसरलेला होता. त्यावेळीही त्यांनी मटक्याच्या व दारूच्या अड्डय़ांवर लक्ष केंद्रित केले होते. दोन वर्षांचा कालावधी अर्थातच कुठलीही प्रसिद्धी न मिळविता त्यांनी गाजविला. त्यानंतर इतर पोलीस अधिकाऱ्यांप्रमाणे मुंबईतच ठाण मांडून न राहता ते केंद्रात प्रतिनियुक्तीवर पंतप्रधानांच्या विशेष सुरक्षा गटात सामील झाले.
तब्बल सात वर्षे ते एसपीजीत होते. तेथून त्यांची नियुक्ती मुंबई पोलीस दलाच्या प्रशासन विभागाचे सहआयुक्त म्हणून झाली. येथेही त्यांनी आपल्या वेगळ्या कार्यपद्धतीने ठसा उमटविला. पोलीस शिपायांच्या भरतीत मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार होत होता आणि तो रोखण्याची कोणाचीच तयारी नव्हती. राजकारणी मंडळी या भरतीत हस्तक्षेप करीत होते. दयाळ यांनी राजकारण्यांची मक्तेदारी संपविण्यासाठी भरतीची प्रक्रियाच बदलून टाकली. उमेदवारांच्या नावापेक्षा त्याला विशेष ओळख क्रमांक देण्याची पद्धत दयाळ यांनी रूढ केली ती आजतागायत. तेव्हापासून खरेतर दयाळ यांच्या मि. क्लीन प्रतिमेचा गवगवा झाला. मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती व्हावी यासाठी प्रयत्न करणाऱ्यांपैकी ते कधीच नव्हते.
नियम आणि कायद्यावर बोट ठेवून प्रसंगी राजकारण्यांनाही सुनावणारे दयाळ सत्ताधारी पक्षाला तसे भारीच पडले असते. त्यामुळे दयाळ हे मुंबईचे पोलीस आयुक्त होतील, असे कुणीही ठामपणे सांगत नव्हते. तरीही आयत्यावेळी दयाळ यांचे नाव घोषित करून सत्ताधारी पक्षाने धक्का दिल्याची चर्चा सुरू आहे. आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांनी त्यांना राजकारण्यांच्या हस्तक्षेपाबद्दल छेडले असता ते शांतपणे उद्गारले की, ‘कायदा आणि घटनेत स्पष्ट तरतुदी आहेत. त्यापेक्षा मोठे कुणीही नाही. आपण नेहमी त्याचाच आदर करतो.’ केंद्रातील गृहमंत्रालयाने २६/११ संबंधातील राम प्रधान समितीने केलेला अहवाल विचारात घेऊन दयाळ यांची नियुक्ती सुचविली, हे उघड आहे. महाराष्ट्र सरकारचा २६/११च्या वेळचा कारभार आणि व्यवहार फारसा आश्वासक नव्हता हेच या नेमणुकीने अप्रत्यक्षपणे अधोरेखित केले आहे.
पूर्वी हिंदी चित्रपटसृष्टीत पंजाबी, बंगाली व हिंदी भाषिक संगीतकारांची मांदियाळी असताना वसंत देसाईंचा सन्माननीय अपवाद वगळता बहुसंख्य मराठी संगीतकारांनी इंग्रजी आद्याक्षरांचा आसरा घेत मराठीपण लपविण्याचा प्रयत्न केला. के. दत्ता (कोरगावकर) सी. रामचंद्र (चितळकर) दत्ताराम(वाडकर), सुधीर (फडके) यांसारख्या मराठमोळ्या संगीतकारांनी आपली आडनावे खुबीने लपवीत या क्षेत्रात मुसंडी मारली. संगीतकार श्रीनिवास खळे यांनी के. दत्ता यांच्याकडे सहाय्यक संगीत दिग्दर्शकाचे काम केले होते. १९५४ साली के.दत्ता यांनी संगीत दिलेल्या 'रिश्ता' या चित्रपटातही लता मंगेशकर यांचे साजन से पहली बार, व तलत मेहमूद यांनी गायलेले 'वोही चांदनी है' ही गाणी त्या काळी गाजलेली होती. मा.के.दत्ता यांनी अनेक हिन्दी व मराठी चित्रपटाना संगीत दिले. काही चित्रपट, याद, बडी माँ, दामन, नादान, रिश्ता, चंद्रराव मोरे, सुखाचा शोध, गीता, गोरखनाथ, गोरा कुंभार, सूनबाई, महात्मा विदूर, हरिहर भक्ती, रायगडचा बंदी मा.के.दत्ता यांचे २३ डिसेंबर १९७९ रोजी निधन झाले.
संगीतकार दत्ता कोरगावकर उर्फ के.दत्ता यांचे मराठीसृष्टीवरील लेख.
संगीतकार दत्ता कोरगावकर उर्फ के.दत्ता (7-Jan-2017)
संगीतकार दत्ता कोरगावकर उर्फ के.दत्ता (26-Dec-2017)
मूळचे नागपूरचे असलेले संजय सुरकर यांचा जन्म १९ ऑगस्ट १९५९ रोजी झाला. राज्य नाट्य स्पर्धेत त्यांच्या अनेक एकांकिका गाजल्या. संजय सुरकर यांना अभिनेता व्हायचं होत कारण स्पर्धांमधील अनेक एकांकिकांमध्ये दिग्दर्शनाबरोबरच त्यांनी अभिनयही केला होता. ‘वंश’ ही सुरकर आणि मंगेश कदम यांनी एकत्रित दिग्दर्शित केलेली एकांकिका राज्य नाट्य स्पर्धेत पहिली आली होती.
Copyright © 2025 | Marathisrushti