(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • सयाजी शिंदे

    दाक्षिणात्य चित्रपटात त्याने अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करून अभिनयाची हुकूमत गाजवली.त्यांनी जोडी नंबर १ आणि सरकार राज सारख्या अनेक बॉलिवूड सिनेमांत काम केले आहे. त्यांनी बिग ब्रदर, जॅकपॉट,देवधर गांधी, दिशा, वास्तुशास्त्र, परवाना,दानव, लाल सलाम अशे अनेक हिट सिनेमे आपल्या अभिनयाने गाजवले.

  • संपदा जोगळेकर-कुलकर्णी

    मुंबई विद्यापीठातून एम.ए. ही पदवी संपादित केलेल्या संपदा जोगळेकर ह्या सध्या पुणे विद्यापीठात पी.एच.डी. करत आहेत. त्यांनी आपले शिक्षण मो.ह. विद्यालय व जोशी बेडेकर महाविद्यालय येथून पूर्ण केले. संपदा जोगळेकर यांनी आजपर्यंत १५ दूरदर्शन मालिका, पाच दैनंदिन मालिकातसेच “शर्यत”व “उदय” या दोन चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.

  • सदाशिव अंबादास डांगे

    डांगे, सदाशिव अंबादास (mss-0248)

    २५ ऑक्टोबर १९९८
    १९९८> वेद, वैदिक विधी, पुराणे, आर्षकाव्ये यांचे विवेचक सदाशिव अंबादास डांगे यांचे निधन. “पुराणकथांचा अर्थ : वाद आणि विवेचन”, “हिंदू धर्म व तत्वज्ञान”, “अश्वत्थाची पाने” या मराठी पुस्तकांशिवाय काही इंग्रजी पुस्तके त्यांच्या नावावर आहेत.

    ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

    डांगे, सदाशिव अंबादास (mss-0351)

    २३ ऑगस्ट १९२२
    १९२२> वैदिक विधी, धर्मशास्त्र आदी विषयांवर इंग्रजी/मराठीत लिहिणारे सदाशिव अंबादास डांगे यांचा जन्म. “पुराणकथांचा अर्थ : वाद आणि विवेचन”, “हिंदू धर्म आणि तत्वज्ञान” ही त्यांची मराठी पुस्तके.

    mss

  • सिम्बायोसिसचे डॉ. शांताराम बळवंत मुजूमदार

    सिम्बायोसिस संस्थेच्या माध्यमातून ज्यांनी देशातच नव्हे तर जगभरात त्यांचे शैक्षणिक कार्य पोहोचवले अशा डॉ. शांताराम बळवंत मुजूमदार यांचा जन्म ३१ जुलै १९३५ रोजी गडहिंग्लज येथे झाला.

    पुण्यात भारतीय आणि विदेशी विद्यार्थ्यांना एकत्र आणून शिक्षणाच्या माध्यमातून सांकृतिक मिलाफ घडवून आणण्याचे काम केले ते डॉ. शांताराम बळवंत मुजूमदार यांनी. सिम्बायोसिस संस्थेच्या माध्यमातून त्यांनी देशातच नव्हे तर जगभरात त्यांचे शैक्षणिक कार्य पोहोचले.

    पुण्यात शिक्षण पूर्ण करत त्यांनी बॉटनीमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यानंतर मायक्रोबायोलॉजीमध्ये त्यांनी पुणे विद्यापीठातून पी.एचडी मिळवली.

    डॉ.एस.बी.मुजूमदार यांना त्यांच्या कार्यासाठी भारत सरकारने २००५ मध्ये पद्मश्री तर २०१२ मध्ये पद्मभूषण या नागरी पुरस्कारांनी गौरवले. महाराष्ट्र सरकारनेही त्यांचा पुण्यभूषण आणि महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावाने देण्यात येणारा पहिला पुरस्कारही त्यांना देण्यात आला.

    अधिक माहितीसाठी हा लेख वाचा.

    #DrShantaramBalwantMujumdar

  • सरसेनापती प्रतापराव गुजर

    छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वसामान्य मावळ्यांना बरोबर घेऊन स्वराज्याचे धोरण बांधले आणि हिदवी स्वराज्य स्थापन केल्यावर जी नवरत्ने घडवली त्या प्रत्येकाच्या कर्तृत्वाला इतिहासात तोड नाही.

  • समीरा गुजर-जोशी

    मराठी मालिका आणि सन्मान सोहळ्यात दिसणारा एक चेहरा आपणा सर्वांच्याच ओळखीचा आहे. आपल्या निवेदनाने आणि अभिनयाने तसंच सर्वात महत्वाचं म्हणजे संस्कृत भाषेतील प्रभुत्वामुळे सर्व श्रोत्यांना भुरळ घालणारी समीरा गुजर-जोशी ही देखील ठाण्यातलं एक रत्नच!

  • सुधीर ठाकरे

    गरिबांच्या मुळावर उठलेला चर्मोद्योग घोटाळा उघड करणे असेल, गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान असेल, कापूस विक्रीतून सरकारला नफा मिळवून देणे असेल..अशी विविध सरकारी कामं कर्तबगारीने पार पाडणारे अधिकारी ही सुधीर ठाकरे यांची ओळख.

    नागपूर येथील इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसमधून एम.एससी. (इलेक्ट्रॉनिक्स) केल्यानंतर त्यांनी प्राध्यापकाची नोकरी स्वीकारली. यानंतर त्यांनी प्रशासनात एम.ए. पदवी मिळवली. एलएलबीही पूर्ण केले. अभ्यास सुरू असतानाच त्यांनी भरती परीक्षा देऊन १९७५मध्ये विक्रीकर अधिकारी म्हणून पहिले प्रशासकीय पद स्वीकारले.

    १९७८ मध्ये त्यांची सहकार खात्यात नियुक्ती झाली. याच खात्यात ते जॉईंट रजिस्टार झाले. यावेळी त्यांनी चमोर्द्योग घोटाळा उघड केला. राज्यातील अनेक बड्या घोटाळ्यांपैकी हा एक घोटाळा मानला जातो. यामध्ये मुंबईचे तत्कालीन नगरपालांपासून ते अनेक राजकीय नेत्यांना कोर्टाच्या पायर्‍या चढाव्या लागल्या. त्यांच्या या कामात तत्कालीन आयपीएस अधिकारी संजय पांडे यांनी त्यांना खूप मदत केली.

    यानंतर ते कापूस महामंडळात जॉईंट एम.डी. म्हणून रूजू झाले. त्यावेळेस सरकार शेतकर्‍यांचा कापूस विकत घ्यायचे आणि तो चढ्या भावाने विकायचे. मात्र यामध्ये म्हणावी तितकी सुसूत्रता नव्हती. सरकारला नफा मिळवणंही अवघड होत होतं. पण त्यांनी विभागीय कामात सुसूत्रता आणून सरकारला नफा मिळवून दिला. ठाकरे यांनी त्यांच्या कारकीदीर्त एका वर्षी सरकारला ७०, तर दुसर्‍या वर्षी ५० कोटींचा नफा मिळवून दिला. त्यांच्यानंतर हा नफा मिळवणे अद्याप कोणाला शक्य झाले नाही. यानंतर ते ग्राहक हित विभागात जॉईंट एम.डी. झाले.

    १९९१ मध्ये ते आयएएस झाले. यानंतर त्यांनी सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या सीईओपदाची सूत्रे स्वीकारली. लगेच त्यांना जिल्हाधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. तेथेही त्यांनी विविध प्रयोग केले.

    यानंतर मंत्रालयात विविध विभागांत काम करताना त्यांनी गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, तंटामुक्त गाव अभियान अशा योजनांना चालना दिली. ग्राम विकास विभागात सचिव असताना त्यांनी राज्यातील सर्व गावे कम्प्युटरने जोडण्याचा 'संग्राम' हा अभिनव उपक्रम यशस्वीपणे राबविला.

    त्यांची ग्रामविकास खात्याच्या सचिवपदावरून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. दोन वर्षांच्या या काळात एमपीएससीचा दर्जा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या दर्जापर्यंत नेण्याचा त्यांचा मानस आहे. आता नव्या विभागातील आव्हानांना सामोरे जाताना या विभागाचा कायापालट करण्याचे त्यांचे ध्येय आहे. आम्ही समाजाचे सेवक आहोत राजे नाही, अशी भावना जपणारा हा अधिकारी याही कामात यशस्वी होईल, यात शंका नाही.

    (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)


  • सा. रे. पाटील

    पाटील, सा. रे.

    ब्रिटिश राज्य असताना म्हणजे १९३४ मध्ये त्यांनी शेतीत घाम गाळण्यास सुरूवात केली ती त्या वेळच्या पारंपरिक साधनांनिशी आणि त्यानंतर तब्बल शहात्तर वर्षे उलटल्यानंतरही अत्याधुनिकता जोपासत, नव्या जमान्याचे सूर आळवत ते उमेदीने शेती करीत आहेत. शेतीच्या मशागतीपासून त्यांनी आयुष्याला सुरूवात केली. त्यानंतर आतापर्यंतच्या प्रदीर्घ प्रवासात त्यांनी राजकीय, सामाजिक क्षेत्राच्या केलेल्या मशागतीमुळे महाराष्ट्रातील ग्रामीण जीवनाला आकार येऊ लागला.

    म्हणूनच वयाच्या तब्बल ८९ वर्षीही तरूणाच्या उत्साहाने कार्यरत असणाऱ्या सा. रे. ऊर्फ अप्पासाहेब पाटील यांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा कृषी-औद्योगिक समाजरचना पुरस्कार मिळणे यथोचितच ठरते. कोल्हापूर जिल्ह्य़ातील शिरोळ तालुक्यात असलेल्या जांभळी या गावी ११ डिसेंबर १९२१ ला जन्मलेल्या अप्पासाहेबांना लहानपणापासूनच शेतीची आवड होती. वडील रेवगोंडा पाटील यांच्याबरोबरच वयाच्या १३-१४ वर्षांपासून ते शेतीची सर्व कामे करू लागले. त्याचवेळी कुस्ती आणि मलखांब खेळू लागल्याने शरीरयष्टी उत्कृष्ट झाली. अफाट वाचन, कष्ट करण्याची तयारी, जिद्द या जोरावर त्यांनी आयुष्याचा प्रवास सुरू केला. मित्रपरिवार मोठा असल्याने त्यातून त्यांना समाजवादाचे धडे मिळाले. सहकाराचा प्रसार आणि बोलबाला पुढे महाराष्ट्रात झाला, पण १९४६ मध्ये जांभळी गावातील शेतक ऱ्यांना एकत्र आणून सेवा सोसायटीची स्थापना त्यांनी केली. गांधीजींच्या विचाराने प्रभावित झाल्याने ग्रामस्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्नही त्यातून झाला. शिरोळ तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या व्यवस्थापकपदी १९५१ मध्ये त्यांची निवड झाल्याने गावातील काम तालुका पातळीवर आले. या दरम्यानच संयुक्त महाराष्ट्राच्या सुरू झालेल्या चळवळीत त्यांनी भाग घेण्यास सुरुवात केली. त्यातूनच साने गुरुजी, मधु दंडवते, अच्युतराव पटवर्धन, एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, ग. प्र. प्रधान आदींच्या सान्निध्यात ते आले आणि या नेत्यांची साधी राहणीही त्यांच्यात उतरली. राष्ट्र सेवा दल, साने गुरुजींचे साधना साप्ताहिक या चळवळीत ते रमू लागले. १९५७ च्या विधानसभेच्या निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र समितीने त्यांना शिरोळमधून उमेदवारी दिली. या चळवळीच्या निमित्ताने त्यांनी ‘इंद्रधनुष्य’ हे दैनिक कोल्हापुरातून सुरू केले होते. १९९९ मध्ये आणि २००९ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीतही जनतेने त्यांना निवडून दिले. सहकार क्षेत्रातील त्यांचे कामही सुरूच होते. शिरोळला श्री दत्त सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीत त्यांनी मोलाचा वाटा उचलला. या कारखान्याचे ते संस्थापक संचालक असून आजपर्यंत अध्यक्ष-उपाध्यक्ष-संचालक अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत. या कारखान्याच्या स्थापनेपूर्वी कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील नद्यांना उपलब्ध असलेले पाणी विचारात घेऊन सहकारी तत्त्वावर २० पाणीपुरवठा योजनांची स्थापना त्यांनी केली. राजकारणातील कामगिरीसाठी एस. एम. जोशी-दंडवते-पटवर्धन आदींपासून स्फूर्ती त्यांनी घेतली, तशीच सहकार क्षेत्रातील कामासाठीची स्फूर्ती त्यांना मिळाली ती धनंजयराव गाडगीळ, वैकुंठभाई मेहता आदींकडून. सहकार क्षेत्रातील राज्य भूविकास बँक, राज्य सहकारी संघ यांचे संचालक, जयसिंगपूर उदगाव सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. उदगाव टेक्निकल हायस्कूल, जांभळी हायस्कूलची स्थापना त्यांनी करून शिक्षण क्षेत्रावरही ठसा उमटवला. शेती हा त्यांचा पहिल्यापासूनच आवडीचा विषय असल्याने शेतीमधील नव्या तंत्रज्ञानाबाबत ते कायम आग्रही असतात. नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या त्यांच्या कळकळीमुळेच ते ताजेपणाने विचार करू शकतात. कोणतेही नवे तंत्र ते स्वीकारण्यास अप्पासाहेब कायम तयार असल्याने सर्वात वयोवृद्ध आमदार अशी त्यांची ओळख न राहता उत्साहाने सळसळणारे तरूण आमदार-नेते अशी त्यांची ओळख करून द्यावी लागते. त्यांच्या या सततच्या धडपडीला चव्हाण प्रतिष्ठानकडून मिळालेला हा मुजरा सार्थच ठरतो.

  • संदीप कुलकर्णी

    ते उत्तम चित्रकार ही आहेत. बेधुंद, ‘मी बाप’, ‘मेड इन चायना ‘ आणि ‘साने गुरुजी’ या चित्रपटात त्यांचा उत्कृष्ठ अभिनय बघायला मिळाला.

  • सुधा वर्दे

    स्वातंत्र्याचा लढा, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि राष्ट्रीय सेवादलाशी जोडले गेलेले प्रमुख महिलांपैकी एक नाव आणि राष्ट्रीय सेवादलाच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणजे सुधा वर्दे. माहेरचं अनुताई कोतवाल हे नाव असलेल्या सुधाताईंचा जन्म १९३२ सालचा;लहानपणापासूनच सुधाताईंना विविध कलांची आवड होती.