(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

  • सचिन पिळगांवकर

    मराठी चित्रपट रसिकांच्या मनावर मागील पांच दशकांपासून राज्य करणार नाव म्हणजे अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता सचिन पिळगावकर.

    सचिन पिळगावकर यांचा जन्म १७ ऑगस्ट १९५७ रोजी झाला. १९६२ सालच्या हा माझा मार्ग एकला या मराठी चित्रपटातील बाल कलाकाराच्या भूमिकेद्वारे वयाच्या चौथ्या वर्षी त्याचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते बाल कलाकारासाठीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.

    त्यानंतर बालकलाकार म्हणून त्याने ज्वेलथीफ, ब्रह्मचारी, मेला आणि अन्य १५ चित्रपटांतून भूमिका केल्या. त्यानंतर राजश्री प्रॉडक्शन-निर्मित गीत गाता चल या चित्रपटात प्रमुख भूमिका केल्यानंतर एकामागून एक बालिकावधू, कॉलेज गर्ल, अंखियोंके झरोकोंसे आणि नदिया के पार अशा चित्रपटांतल्या प्रमुख भूमिका त्याच्या वाट्यास आल्या. त्रिशूल चित्रपटाच्या यशानंतर त्याने शोले, सत्ते पे सत्ता या चित्रपटांत साहाय्यक व्यक्तिरेखा साकारल्या.

    त्यानंतर ते मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात निर्मिती आणि दिग्दर्शनाकडे वळले.

    मराठीसृष्टीवरील सचिन पिळगांवकर यांच्यावर लिहिलेला संपूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

    ## Sachin Pilgaonkar
  • नवनीतभाई बार्शीकर

    बार्शीकर, नवनीतभाई

    नवनीतभाई बार्शीकर यांच्या निधनाने नगर शहराच्या जडणघडणीचे वैभवशाली पर्वच काळाच्या पडद्याआड गेले. सार्वजनिक जीवनातून निवृत्त होऊन पंचवीस-तीस वर्षे झाल्यानंतरही शहराच्या दैनंदिन व्यवहारात पदोपदी होणारा नामोल्लेख हीच त्यांच्यातील अस्सल नगरकराची खरी ओळख होती. राजकारण, अर्थकारण आणि समाजकारण अशा सर्वच आघाडय़ांवर आपल्या कामाची पक्की मोहोर त्यांनी उमटवली. भाईंना नगर शहराची आणि नगर शहराला भाईंची ओळख चिकटली ती त्यामुळेच!

    राज्याच्या राजकारणात वैशिष्टय़पूर्ण स्थान असलेल्या नगर जिल्हय़ाच्या लौकिकात मुळातच नगर शहराचे स्थान तसे दुय्यम आहे. सहकार, शेती, पाटपाण्याच्या अनुषंगाने ग्रामीण भागाचा जिल्हय़ात व राज्यातही वरचष्मा आहे. राज्याच्या पातळीवर त्याला धक्का देण्याचे काम नवनीतभाई बार्शीकर यांनी केले. नगर विकासाच्या जोरावर त्यांनी जिल्हा व राज्यातही नगर शहराची स्वतंत्र ओळख निर्माण केली. सधन घरात १३ जानेवारी १९२० ला नवनीतभाईंचा जन्म झाला. स्वातंत्र्यपूर्व काळात चळवळीत सहभागी झालेल्या भाईंनी त्या धकाधकीच्या काळातही शिक्षणाची आस सोडली नाही. पुण्यात फग्र्युसन कॉलेजमधून एम.ए. पूर्ण करून त्यांनी पुढे कायद्याचीही पदवी घेतली. भाईंना कुठल्याही स्वरूपाची राजकीय पाश्र्वभूमी नव्हती. वडिलांचा देशसेवेचा वारसा मात्र त्यांना लाभला. याच प्रेरणेतून सन ४२ च्या चलेजाव आंदोलनात ते सहभागी झाले, त्यात त्यांना सहा महिन्यांचा कारावासही भोगावा लागला. उण्यापुऱ्या ४०-५० वर्षांच्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात त्यांना एकदाच आमदारकीची संधी मिळाली. त्याचेही त्यांनी सोने केले. १९७२ ते ७८ या काळात विविध कारणांनी विधानसभेत नगर शहराचे नाव कायम चर्चेत राहिले. विधिमंडळाच्या लोकलेखा समितीचे अध्यक्ष म्हणून काम करताना भाईंनी राज्यात ठसा उमटवला. नगर शहरात त्यांनी उभ्या केलेल्या मूलभूत सोयीसुविधांचे पुढे राज्यात अनुकरण झाले. अगदी स्मशानभूमीचे उदाहरण घेतले तरी नगरचे अमरधाम पाहून त्या धर्तीवर पुण्यात वैकुंठ स्मशानभूमीची उभारणी झाली! तब्बल ५० वर्षे शहराच्या सार्वजनिक जीवनात नवनीतभाई बार्शीकर सर्वार्थाने केंद्रस्थानी राहिले. ४० वर्षे नगरचे नगरसेवक व त्यातील १८ वर्षे नगराध्यक्ष, वीस वर्षे अर्बन बँकेचे अध्यक्ष ही त्यांची कारकीर्द. विशेष म्हणजे पक्षीय राजकारणाच्या नादी न लागता अपक्ष म्हणूनच भाईंनी प्रदीर्घ काळ नगर शहरावर शब्दश: राज्य केले. त्यांचे हे स्थान हीच नगर शहराची स्वातंत्र्योत्तर काळातील खऱ्या अर्थाने जडणघडण आहे. त्यातूनच त्यांनी स्वत:ची ‘अस्सल नगरकर’ अशी ओळख निर्माण केली आणि नगर शहरालाही आधुनिकतेची नवी ओळख दिली. त्याच्या खुणा आजही शहरात जागोजागी शाबूत आहेत. त्यांची पदोपदी आठवण काढली जाते ती याच कारणामुळे! लोकनियुक्त नगराध्यक्ष, त्या काळात एकमेव अर्थसत्ता असलेल्या नगर अर्बन बँकेचे अध्यक्ष आणि आमदार अशा तीनही संस्थांचा कारभार एकाच वेळी ताब्यात ठेवूनही भाई ‘लार्जर दॅन लाईफ’ झाले नाही. महत्त्वाच्या तिन्ही संस्थांचे सर्वेसर्वा होते तरी त्यांच्या दृष्टीने संस्था मोठय़ा होत्या. सार्वजनिक जीवनातील त्यांच्या निवृत्तीने नगर शहराच्या विकासाची परंपरा खंडित झाली, निधनाने या पर्वाचाच अस्त झाला!

  • प्रा. सदाशिव शिवराम भावे

    समीक्षक प्रा. सदाशिव शिवराम भावे यांचा जन्म १८ डिसेंबर १९३१ रोजी झाला..

    त्यांचे मराठी व इंग्रजी नियतकालिकांतून सुमारे ३०० हून अधिक लेख असंग्रहित राहिले, परंतु “अमेरिका नावाचे प्रकरण” हे प्रवासवर्णन प्रकाशित झाले.

    ## Prof Sadashiv Shivram Bhave

  • (पं.) शरद गोखले

    गोखले, शरद

    सरळ नाकाचा, डोक्यावरचे छप्पर जवळजवळ उडालेले, बोलताना जरासा अनुनासिक उच्चार, लाघवी वागणे अशी व्यक्ती बाजारात सहज भेटली तरीही तुमच्या लक्षात येणार नाही, की आदल्या रात्री रंगमंचावर आपल्या गायनाने मंत्रमुग्ध करणारे ते हेच शरद गोखले. वयाच्या पस्तिशीत संगीत रंगभूमीवर पदार्पण करणाऱ्या शरद गोखले यांना आयुष्यभर संगीताने स्वरमय साथ दिली.

    जयराम आणि जयमाला शिलेदारांच्या संगीत रंगभूमीवर मनापासून सेवा करणारा हा व्रतस्थ कलावंत आयुष्यभर सहजपणे जगू शकला, याचे कारण त्याचे आयुष्य केवळ संगीतावरच अवलंबून होते. संगीत सौभद्र, शाकुंतल, संशयकल्लोळ, स्वरसम्राज्ञी अशा अनेक नाटकांमधून विविधरंगी भूमिका करताना शरदरावांनी आपल्या गायनावर नेहमी लक्ष केंद्रित केले. पंडित विनायकबुवा पटवर्धन यांच्याकडे ग्वाल्हेर गायकीची पक्की तामील मिळाल्यामुळे अभिजात संगीताची उत्तम जाण होतीच. ग्वाल्हेर गायकावर लालित्याचे संस्कार करण्याचे कसबही विनायकबुवांनीच शिकवले असणे शक्य होते. कारण स्वत: विनायकबुवा हेही संगीत रंगभूमीचे पाईक होते. त्यांच्या काळात ही रंगभूमी ऐन भरात होती. शरद गोखले यांच्या बाबतीत मात्र तसे घडले नाही. संगीत रंगभूमी जवळजवळ अस्तंगत होण्याच्या मार्गावर असताना छोटा गंधर्व आणि शिलेदार कुटुंबाने केलेल्या प्रयत्नांमुळे ही संगीत रंगभूमी पुन्हा कात टाकू लागली होती. विनायकबुवांकडे गाणे शिकत असतानाच त्यांचे पुत्र रामचंद्र पटवर्धन यांच्याकडून तबला वादनाचे शास्त्रोक्त ज्ञान मिळवण्यासाठीही गोखले यांनी कष्ट घेतले. लयतालावरील हुकमत आणि रागज्ञानाची शिदोरी यांच्या जोरावर संगीत रंगभूमीवरील पदार्पण करणे त्यांना शक्य झाले. ग. श्री. खैर यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात सुरू झालेल्या ‘अनाथ विद्यार्थीगृह’ या एका अनोख्या सामाजिक चळवळीचा भाग होण्यासाठी शरद गोखले या संस्थेत अध्यापक म्हणून काम करू लागले. पण अध्यापनाबरोबरच संगीत स्वस्थ बसू देत नव्हते. त्यामुळे बऱ्याच विचाराअंती त्यांनी रंगभूमीवर जाण्याचा निर्णय घेतला आणि तो त्यांच्या जगण्यात खरा आनंद निर्माण करणारा ठरला. उत्तम मैफली गवई होण्याची क्षमता असतानाही गोखले यांनी रंगभूमीला आपलेसे केले. रंग लावून रंगमंचावर जाताना त्यांच्या अभिनयाबरोबरच त्यांच्या गळ्यातील गाणे त्यांना सतत साद घालत होते. त्यामुळे शिलेदार कुटुंबातील जयराम, जयमाला, कीर्ती, दीप्ती यांच्यासारख्या तालेवार कलावंतांबरोबर काम करताना आपली गायन साधनाच आपल्याला मदत करू शकणार आहे, याची पुरेपूर जाणीव शरद गोखले यांना होती. या सगळ्या कलावंतांबरोबर देशभर दौरे करताना त्यांनी आपली अभिजात संगीताची तालीम बंद होऊ दिली नाही. ज्या काळात संगीत हा प्राधान्याचा विषय असणाऱ्या आकाशवाणीचे शरद गोखले हे नेहमीचे यशस्वी कलावंत ठरले. संगीत रंगभूमीवरील दीर्घ कारकीर्दीबद्दल मिळणारे पुरस्कार हा अविभाज्य भाग होता. परंतु गोखले यांनी संगीतावरील आपले चिंतन सतत सुरू ठेवले. त्यांच्या निधनाने संगीत रंगभूमीवरील एक हुन्नर संपला आहे.
    ------------------------------------------------------------------------------

    पंडित शरद गोखले यांचे निधन

    जयराम शिलेदार यांच्या मराठी रंगभूमी संस्थेतील ज्येष्ठ गायक व अभिनेते पं. शरद घनश्याम गोखले (७१).

    संगीत सौभद्र, स्वयंवर, शाकुंतल, संशयकल्लोळ, स्वरसम्राज्ञी, विद्याहरण, शारदा, कान्होपात्रा, एकच प्याला ही त्यांची नाटके गाजली.

    गोखले ह्यांचा जन्म दि. २६ मे १९४० ला झाला. पंडित विनायकबुवा पटवर्धन यांच्याकडे त्यांनी संगीत अलंकारापर्यंतचे धडे गिरवले.

  • (पं.) मनोहर चिमोटे

    चिमोटे, (पं.) मनोहर
    भारतीय संगीतात वाद्यसंगीताचे एक स्वतंत्र आणि समृद्ध असे दालन आहे. वाद्यांमधून अभिजात संगीताचा संपन्न अनुभव देऊ शकणाऱ्या प्रतिभासंपन्न कलावंतांची खाणच भारतात गेल्या काही शतकांमध्ये निर्माण होत आलेली आहे. भारतीय संगीताच्या अभिव्यक्तीसाठीच्या वाद्यांबरोबरच परदेशातून आलेल्या रीड ऑर्गन (पायपेटी) किंवा हार्मोनिअम या वाद्यांनी भारतीय संगीतात गेल्या दोन शतकांच्या काळात भरीव कामगिरी केली आहे.
    ब्रिटिश राजवटीत आलेल्या या वाद्यांचे भारतीयीकरण करून त्यांना आपल्या संगीतात इतक्या सहजपणे मिसळवून टाकण्याची किमया येथील कलावंतांनी अशी काही करून दाखवली, की परदेशीयांना हे वाद्य आपलेच आहे काय, अशी शंका यावी. पंडित मनोहर चिमोटे हे असे एक अव्वल दर्जाचे हार्मोनियम वादक होते. हार्मोनियम या मूळ वाद्याची जवळीक अ‍ॅकॉर्डियन, ऑर्गन या वाद्यांशी असली, तरीही तिची निर्मिती भारतीय संगीतासाठी नव्हती. चिमोटे यांनी पन्नास वर्षांपूर्वी तिला भारतीय रुपडे चढवले आणि तिला येथील संगीताच्या दरबारात मानाचे स्थान मिळवून दिले. हार्मोनियमचे आगमन होण्यापूर्वीच्या काळात गायनाची संगत करण्यासाठी सारंगी हे तंतुवाद्य उपयोगात येत असे. वादकांच्या कर्तृत्वाने हार्मोनियमने गायनाच्या साथीचे वाद्य म्हणून प्रवेश केला आणि आता ते वाद्य भारतीय संगीताच्या मैफलीतील एक अविभाज्य घटक बनले आहे. पंडित चिमोटे यांनी परदेशी बनावटीच्या स्वर निर्माण करणाऱ्या स्वरपट्टय़ांवर भारतीय स्वरांचे केलेले आरोपण फारच यशस्वी झाले. गंधार हा स्वर भारतीय संगीतातील एक स्वयंभू स्वर समजला जातो. गंधाराच्या स्वरावर आधारित त्यांनी तयार केलेल्या हार्मोनियमचे नावही आपोआप ‘संवादिनी’ असे झाले आणि मग ती भारतीयच होऊन गेली. चिमोटे यांचा जन्म नागपूरचा आणि कर्मभूमी मुंबई. लहानपणी पंडित भीष्मदेव वेदी या प्रख्यात वादकाकडून त्यांनी हार्मोनियम वादनाचे धडे घेतले आणि मग त्यावर स्वप्रतिभेने नवनवीन प्रयोग केले. भारतातील अनेक दिग्गज कलावंतांबरोबर त्यांनी मैफलींमध्ये साथ केली होती. जेव्हा हे वाद्य स्वतंत्रपणे संगीत निर्माण करू शकते असा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण झाला, तेव्हा त्यांनी साथ करणे बंद केले आणि त्यानंतर केवळ स्वतंत्रपणे संवादिनीचे एकलवादन करण्यासाठीच आपले आयुष्य व्यतीत केले. मैफलीत गायकाच्या बाजूला असणारे हे वाद्य तिच्या मध्यभागी आणण्याचे श्रेय पंडित चिमोटे यांना द्यायला हवे. भारतातल्या सगळ्या संगीत महोत्सवात त्यांच्या संवादिनी वादनाने रसिकांची वाहवा मिळवली. ‘सूरमणी’, राज्य शासनाचा पुरस्कार, आदर्श संगीत शिक्षक पुरस्काराने त्यांना सन्मानित केले गेले. त्यांनी विद्यादानाचे जे मोठे कार्य केले, त्यामुळे अनेक युवक संवादिनी वादनाकडे वळू लागले. व्हायोलिन, सतार, बासरी या वाद्यांबरोबर संवादिनीची जुगलबंदी घडवणारे चिमोटे हे एकमेव कलाकार होते. त्यांच्या निधनाने संगीताच्या क्षेत्रात स्वकर्तृत्वाने झळाळणाऱ्या एका विद्वान कलावंताचा अस्त झाला आहे.

    पंडित मनोहर चिमोटे
    भारतीय संगीतात वाद्यसंगीताचे एक स्वतंत्र आणि समृद्ध असे दालन आहे. वाद्यांमधून अभिजात संगीताचा संपन्न अनुभव देऊ शकणाऱ्या प्रतिभासंपन्न कलावंतांची खाणच भारतात गेल्या काही शतकांमध्ये निर्माण होत आलेली आहे. भारतीय संगीताच्या अभिव्यक्तीसाठीच्या वाद्यांबरोबरच परदेशातून आलेल्या रीड ऑर्गन (पायपेटी) किंवा हार्मोनिअम या वाद्यांनी भारतीय संगीतात गेल्या दोन शतकांच्या काळात भरीव कामगिरी केली आहे.
    ब्रिटिश राजवटीत आलेल्या या वाद्यांचे भारतीयीकरण करून त्यांना आपल्या संगीतात इतक्या सहजपणे मिसळवून टाकण्याची किमया येथील कलावंतांनी अशी काही करून दाखवली, की परदेशीयांना हे वाद्य आपलेच आहे काय, अशी शंका यावी. पंडित मनोहर चिमोटे हे असे एक अव्वल दर्जाचे हार्मोनियम वादक होते. हार्मोनियम या मूळ वाद्याची जवळीक अ‍ॅकॉर्डियन, ऑर्गन या वाद्यांशी असली, तरीही तिची निर्मिती भारतीय संगीतासाठी नव्हती. चिमोटे यांनी पन्नास वर्षांपूर्वी तिला भारतीय रुपडे चढवले आणि तिला येथील संगीताच्या दरबारात मानाचे स्थान मिळवून दिले. हार्मोनियमचे आगमन होण्यापूर्वीच्या काळात गायनाची संगत करण्यासाठी सारंगी हे तंतुवाद्य उपयोगात येत असे. वादकांच्या कर्तृत्वाने हार्मोनियमने गायनाच्या साथीचे वाद्य म्हणून प्रवेश केला आणि आता ते वाद्य भारतीय संगीताच्या मैफलीतील एक अविभाज्य घटक बनले आहे. पंडित चिमोटे यांनी परदेशी बनावटीच्या स्वर निर्माण करणाऱ्या स्वरपट्टय़ांवर भारतीय स्वरांचे केलेले आरोपण फारच यशस्वी झाले. गंधार हा स्वर भारतीय संगीतातील एक स्वयंभू स्वर समजला जातो. गंधाराच्या स्वरावर आधारित त्यांनी तयार केलेल्या हार्मोनियमचे नावही आपोआप ‘संवादिनी’ असे झाले आणि मग ती भारतीयच होऊन गेली. चिमोटे यांचा जन्म नागपूरचा आणि कर्मभूमी मुंबई. लहानपणी पंडित भीष्मदेव वेदी या प्रख्यात वादकाकडून त्यांनी हार्मोनियम वादनाचे धडे घेतले आणि मग त्यावर स्वप्रतिभेने नवनवीन प्रयोग केले. भारतातील अनेक दिग्गज कलावंतांबरोबर त्यांनी मैफलींमध्ये साथ केली होती. जेव्हा हे वाद्य स्वतंत्रपणे संगीत निर्माण करू शकते असा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण झाला, तेव्हा त्यांनी साथ करणे बंद केले आणि त्यानंतर केवळ स्वतंत्रपणे संवादिनीचे एकलवादन करण्यासाठीच आपले आयुष्य व्यतीत केले. मैफलीत गायकाच्या बाजूला असणारे हे वाद्य तिच्या मध्यभागी आणण्याचे श्रेय पंडित चिमोटे यांना द्यायला हवे. भारतातल्या सगळ्या संगीत महोत्सवात त्यांच्या संवादिनी वादनाने रसिकांची वाहवा मिळवली. ‘सूरमणी’, राज्य शासनाचा पुरस्कार, आदर्श संगीत शिक्षक पुरस्काराने त्यांना सन्मानित केले गेले. त्यांनी विद्यादानाचे जे मोठे कार्य केले, त्यामुळे अनेक युवक संवादिनी वादनाकडे वळू लागले. व्हायोलिन, सतार, बासरी या वाद्यांबरोबर संवादिनीची जुगलबंदी घडवणारे चिमोटे हे एकमेव कलाकार होते. त्यांच्या निधनाने संगीताच्या क्षेत्रात स्वकर्तृत्वाने झळाळणाऱ्या एका विद्वान कलावंताचा अस्त झाला आहे.

  • पिराजी रामजी सरनाईक

    पोलीस कचेरीतील कारकुनाची नोकरी १९५० मध्ये सोडून देऊन पिराजीरावांनी पूर्ण वेळ शाहिरीला वाहून घेतले. छ. शहाजी महाराजांनी त्यांना ‘शाहीर विशारद’ हा किताब व तहहयात मानधन दिले.

  • पं. शैलेश भागवत

    शैलेश भागवत यांचे आकाशवाणी वरून अनेक वेळा सनई वादनाचे कार्यक्रम झाले आहे. त्यांनी भारताबरोबरच दुबई,अमेरिका, युरोप आणि श्रीलंका येथे ही अनेक कार्यकम केले आहेत. शैलेश भागवत यांनी अनेक मोठ्या कलाकारांच्या बरोबर सनईच्या जुगलबंदीचे कार्यक्रम केले आहेत.तसेच परीक्षक म्हणून शैलेश भागवत यांनी अनेक स्पर्धेसाठी काम केले आहे.

  • बापू वाटवे

    ‘कथालक्ष्मी’ नावाचे मासिकही ते चालवत असत. त्या मासिकाचे तब्बल वीस वर्षे त्यांनी संपादन केले. या मासिकाच्या निमित्ताने त्यांनी मराठी कथाविश्वाला अनेक नव्या लेखकांचा परिचय करून दिला. त्या मासिकासाठी त्यांनी भालबा केळकर, केशवराव भोळे यांनाही लिहिते केले.वाटवे हे मुलाखतकार म्हणूनही प्रसिद्ध होते. त्यांनी घेतलेल्या शरद तळवलकर, प्रभाकर पणशीकर, राजा गोसावी, विवेक, लालन सारंग यांच्या मुलाखती विशेष गाजल्या. त्यांची अनेकांशी मैत्री होती. चित्रपट क्षेत्राबाबतच्या गप्पांमध्ये ते रंग भरत, जुने किस्से सांगत.

  • गोविंद सदाशिव आपटे

    ज्योतिर्गणितज्ज्ञ गोविंद सदाशिव आपटे यांचा जन्म २६ जुलै १८७० रोजी झाला.

    त्यांच्या “पंचांग-चिंतामणी” या सूक्ष्म-सारणी ग्रंथामुळे पुढील अनेक वर्षांचे पंचांग तयार करता येते. “सर्वानंद लाघव” हाही त्यांचाच गणित-ग्रंथ.

    Govind Sadashiv Apte

  • मुरलीधर गजानन पानसे

    पानसे, मुरलीधर गजानन - 0354

    २२ ऑगस्ट १९७०
    १९७०> लेखक व मराठी भाषा अणि संस्कृतीचे अभ्यासक मुरलीधर गजानन पानसे यांचे निधन. “यादवकालीन महाराष्ट्र” हा ग्रंथ त्यांनी लिहिला, तर “भाषा : अंत:सूत्र आणि व्यवहार” तसेच “ज्योतिष रत्नमाला (मूळ संस्कृत, मराठी टीकांसह)” या ग्रंथांचे संपादन त्यांनी केले.
    ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

    पानसे, मुरलीधर गजानन - 0469

    ९ सप्टेंबर १९१८
    १९१८> मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचे अभ्यासक मुरलीधर गजानन पानसे यांचा जन्म. ज्ञानेश्वरीच्या भाषावैशिष्ट्यांवरील प्रबंध, “यादवकालीन महाराष्ट्र” हे पुस्तक, तसेच “भाषा : अंत:सूत्रे आणि व्यवहार” आणि श्रीपतीभट्टाची “ज्योतिषरत्नमाला” व त्यावरील मराठी टीकांचे संपादन, ही त्यांची कामगिरी.

    mss