ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांचा संगीत प्रवास अलौकिक असाच आहे. उषाताई मंगेशकर यांना खरी प्रसिद्धी मिळाली ते जय संतोषी माँ या चित्रपटातील काही गाण्यांनंतर मे तो आरती उतारु रे या गाण्यांसाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट स्त्री गायिका पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आले. नंतर त्यांचे मुंगळा हे गाणे व पिंजरा या चित्रपटातील गाणी तर लोकांच्या मनात अजून ही घर करून आहेत.
शरद रणदिवे हे सुप्रसिद्ध आर्किटेक्ट होते. मुंबई तसेच भारतातील प्रमुख शहरांतील इमारतीची वास्तुरचना करणाऱ्या प्रसिध्द बेंटले अँड किंग, मुंबई या कंपनीचे शरद रणदिवे भागीदार-मालक होते.
बाबुराव गोखले, राजा गोसावी, शरद तळवलकर यांनी गाजवलेलं एव्हरग्रीन अस्सल दर्जेदार विनोदी म्हणजे नाटक ‘करायला गेलो एक’ त्यांचं गाजलेलं नाटक ‘करायला गेलो एक’ म्हणजे मनोरंजनाचा खच्चून भरलेला मसालाच!
महामहोपाध्याय काशिनाथ वासुदेव अभ्यंकर हे मराठीसह अर्धमागधी, प्राकृत आणि संस्कृतचे जाणकार होते. त्यांचा जन्म ७ ऑगस्ट १८९० रोजी झाला.
“पातंजलीकृत व्याकरणमहाभाष्य” या ग्रंथाच्या सात खंडांचे संपादन त्यांनी केले होते.
Kashinath Vasudeo Abhyankar
दूध-खवा-चक्का या गोष्टींना पुणेकरांनी दिलेला प्रतिसाद पाहता मोठी मागणी पूर्ण करायची असेल तर स्वतंत्र दुकान हवे हे ओळखून भाऊसाहेबांनी १९५० मध्ये शनिपार येथे आणि चारच वर्षांनी डेक्कन जिमखान्यावर ‘चितळे बंधू मिठाईवाले’ची स्थापना केली.
शैलजा राजाराम चिटणीस या कवयित्री होत्या आणि स्वत: मंगलाष्टके रचत असत.
रोहिणी भाटे यांचा शिष्यपरिवार जगभर विखुरला आहे. १९४७ मध्ये त्यांनी नृत्यभारती कथक नृत्य अकादमी स्थान केली. तब्बल सहा दशकांहून अधिक काळ त्यांच्या अनेक शिष्यांना गुरु रोहिणीताईंच्या अखंड मार्गदर्शनाचा प्रत्यक्ष लाभ मिळाला.
“हृदयशारदा”, “आकाशगंगा हे संग्रह. “झोपडपट्टीतील झिपर्या” व “सारेच खोटे” ही पुस्तके त्यांनी कुमारांसाठी लिहिली. “स्त्रीजीवनाची नवी क्षितिजे”, “स्त्रीजीवनविषयक प्रश्न” अशी पुस्तके, अनेक कथासंग्रह त्यांनी लिहिले.
अभिनयातलं कर्तृत्व आणि सार्वजनिक जीवनातलं दातृत्व अशा दोन्ही आघाड्यांवर श्रेष्ठ ठरलेले अभिनेते म्हणजे चंद्रकांत गोखले. त्यांचा जन्म ७ जानेवारी १९२१ रोजी मिरज येथे झाला. त्यांचे बालपण मिरज इथेच गेले. अभिनयाचं बाळकडू त्यांना मिळालं ते आपली आजी दुर्गाबाई आणि आई कमलाबाई यांच्याकडून. "चित्ताकर्ष' ही त्यांची घरची नाटक मंडळी होती. वडिलांच्या अकाली निधनामुळे कमलाबाई आपल्या मुलांना बरोबर घेऊन विविध नाटक कंपन्यांमधून भूमिका साकारीत संसार चालवीत होत्या. घरची आर्थिक परिस्थिती साधारण असल्यामुळे छोट्या चंद्रकांतला शालेय शिक्षण काही घेता आलं नाही, परंतु त्यानं त्याचा विपरीत परिणाम आपल्या जडणघडणीवर होऊ दिला नाही. कमलाबाईंनीच त्याला घरी राहूनच लिहायला-वाचायला शिकविलं. विशेष म्हणजे कधीही शाळेत न गेलेल्या चंद्रकांतनी कालांतरानं मिरजेच्या ब्राह्मणपुरीतील प्राथमिक शाळा क्रमांक एकचे मुख्याध्यापकपद भूषविलं.
वयाच्या सातव्या वर्षीपासून चंद्रकांतनी नाटकात काम करण्यास सुरवात केली.त्यांनी वयाच्या नवव्या वर्षी ’पुन्हा हिंदू’ या नावाच्या मराठी नाटकाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. ७ दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत यांनी साठाहून अधिक मराठी नाटकांतून व साठाहून अधिक मराठी चित्रपटांतून अभिनय केला आहे. चंद्रकांत यांच्या कारकिर्दीला वळण मिळण्याचा योग आला तो दीनानाथ मंगेशकर यांच्यामुळे. १९३७-३८च्या सुमारास चंद्रकांतना खुद्द दीनानाथांकडून तब्बल ७० ते ८० बंदिशी शिकण्याची संधी मिळाली. मा. दीनानाथांना गोखले पितृस्थानी मानत. या वेळी त्यांनी काही संगीत नाटकांमधूनही भूमिका केल्या. इथून पुढं त्यांनी रंगभूमी गाजवली. सुरवातीच्या काळात "बेबंदशाही' आणि "पद्मिनी' यांसारख्या नाटकांमधून स्त्री-भूमिकाही त्यांनी केल्या. "नटसम्राट', "पुण्यप्रभाव', "भावबंधन', "राजसंन्यास', "बॅरिस्टर', "पुरुष', "पर्याय' ही त्यांची काही गाजलेली नाटकं. "बॅरिस्टर' हे त्यांचं आवडतं नाटक होतं. "पुरुष' या नाटकावर नाना पाटेकर, रीमा लागू यांच्याएवढाच चंद्रकांत गोखले यांचाही प्रभाव होता. "रायगडचा राजबंदी' या चित्रपटात चंद्रकांत गोखले यांनी शिवाजी महाराजांची, तर चित्तरंजन कोल्हटकर यांनी संभाजी महाराजांची व्यक्तिरेखा साकारली होती. याच नाटकात दुर्गा खोटे सोयराबाईंच्या भूमिकेत झळकल्या होत्या. या तिघांची रुपेरी पडद्यावरील जुगलबंदी प्रेक्षकांसाठी अक्षरशः पर्वणी ठरली होती. त्यांनी भूमिका केलेल्या नाटकांपैकी भावबंधन, राजसंन्यास, पुण्यप्रभाव, बेबंदशाही, राजे मास्तर, बॅरिस्टर, पुरुष ही प्रमुख नाटके होत. मराठीशिवाय त्यांनी काही हिंदी चित्रपटांमधूनदेखील भूमिका रंगवल्या.
कृश शरीरयष्टी, उत्कृष्ट वक्तृत्वशैली आणि भावनेला भेदणारी संवादफेक हे चंद्रकांत गोखले यांच्या अभिनयाचं वैशिष्ट्य. सच्चेपणा आणि साधेपणा हे त्यांचे मोठे गुणवैशिष्ट्य होते. सात दशकांची आपली कारकीर्द चंद्रकांत रघुनाथ गोखले यांनी विविधांगी भूमिकांनी गाजवली. प्रत्येक भूमिकेवर ते आपला ठसा उमटविण्यात यशस्वी ठरले.मा. चंद्रकांत गोखले हे गायकही होते. त्यानी ख्याल गायकीचे शिक्षण घेतले होते. गदिमा लिखीत, सुधीर फडके यांनी संगीत दिलेल्या गीतरामायण या गीत काव्यातील १० व्या गीताचे (चला राघवा चला'चे) गायन चंद्रकांत गोखले यांनी केले होते. मा. चंद्रकांत गोखले यांना विष्णुदास भावे पुरस्कार, बालगंधर्व पुरस्कार, व्ही. शांताराम पुरस्कार यांसारखे मानसन्मानही मिळाले. चंद्रकांत रघुनाथ गोखले यांचे २० जुन २००८ रोजी निधन झाले.
अधिक माहितीसाठी हा लेख वाचा. (22-Jun-2018)
चंद्रकांत रघुनाथ गोखले (7-Jan-2017)
चंद्रकांत रघुनाथ गोखले (7-Jan-2018)
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
गो. आ. भट हे जातिवंत पत्रकार होते. शिकाऱ्याला आपल्या सावजाचा 'वास' लागल्यावर तो जिद्दीने, चिकाटीने माग काढतो आणि शेवटी आपली शिकार साधतो. त्यासाठी त्या शिकाऱ्याला प्रचंड कष्ट करावे लागतात. 'योग्य' वेळ येईपर्यंत वाट पाहावी लागते. अनेकवेळा भोवतालची परिस्थिती प्रतिकूल असते. परंतु कसलेला शिकारी प्राप्त परिस्थितीला अनुकूल करून घेतो आणि यशस्वी होतो. प्रदीर्घ काळ महाराष्ट्र टाइम्समध्ये काम केलेल्या गो. आ. भटांकडे या साऱ्याच गोष्टी उदंड होत्या.
एखाद्या बातमीचा 'वास' लागला की भट ते वृत्त मिळविण्यासाठी अक्षरश: जिवाचं रान करायचे. त्यासाठी अनेकांना भेटायचे. फोन करायचे. अनेकवेळा संबंधित व्यक्ती विविध कारणांनी फोनवर भेटायची नाही. पण भट चिकाटीने अनेक ठिकाणी फोन करायचे आणि शेवटी त्या व्यक्तीला हुडकून काढायचे. त्याच्याकडून माहिती घ्यायचे. ती माहिती आपल्या माहितीशी ताडून बघायचे. मिळालेल्या माहितीची पुन:पुन्हा खातरजमा करून घ्यायचे. आणि मग ती बातमी महाराष्ट्र टाइम्समध्ये द्यायचे.
कधी ती बातमी दुधाच्या भेसळीची असे, कधी कलानगरचा परिसर खचत असल्याची असे. पण त्यांची बातमी प्रसिद्ध झाली की सरकारलाही त्याची दखल घ्यावीच लागे. याचे मुख्य कारण म्हणजे भटांनी त्या बातमीवर प्रचंड मेहनत घेतलेली असे आणि त्यातील माहिती अचूक असे. राष्ट्रपती गिरी मुंबईत आल्यावर आपले एकेकाळचे सहकारी कॉम्रेड काळे यांना भेटायला त्यांच्या किंग्ज सर्कलच्या घरी गेले होते. भेट खाजगी होती; परंतु भटांना त्याबाबत कळताच त्यांनी ती बातमी मिळवलीच. दीर्घकाळ त्यांनी मंत्रालय हा 'बीट' सांभाळला होता. अनेक राजकारणी आणि ज्येष्ठ सनदी अधिकारी यांच्याकडे त्यांची उठबस होती. 'ए जर्नालिस्ट शूड बी टाइट लिप्ड' असा एक संकेत आहे. पत्रकाराने कान-डोळे उघडे ठेवावेत; तोंड मात्र जरुरीपुरतेच उघडावे, असा त्याचा मथितार्थ. भटांच्या स्वभावात हा संकेत जणू पूर्र्ण मुरलेला होता.
एरवी अघळपघळ गप्पा मारणारे भट कामाच्यावेळी अगदीच वेगळे असत. कष्टाला पर्याय नाही, हा त्यांच्या पत्रकारितेचा जणू मूलमंत्र होता. तो त्यांनी शेवटपर्यंत पाळला. वांद्याच्या साहित्य सहवासात राहणाऱ्या भटांनी त्या सोसायटीसाठीही बरेच काम केले होते आणि 'अजब सहवास' हे पुस्तकही लिहिलेे. त्यांचा स्वभाव अतिशय साधा. मनाने ते निष्कपट होते. टिंगलटवाळी करणे, उणेदुणे काढणे, एखाद्याच्या मर्मावर बोट ठेवून त्याला जाणीवपूर्वक घायाळ करणे यापासून चार हात लांब राहणारे भट आपल्या सिध्यासाध्या, मदतशील स्वभावामुळे सहकाऱ्यांतच नाही, तर सर्वत्रच प्रिय होते. त्यांच्या निधनाने एक कष्टाळू आणि जातिवंत पत्रकार काळाच्या पडद्याआड गेला आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti