असं म्हणतात माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हाच त्याने आयुष्यात काय करायचे आहे हे निश्चित झालेले असतं ! त्यामुळेच की काय पुढे जाऊन त्याच्या आयुष्याला एक वळण मिळतं आणि तिथुन त्याचा, त्याच्या नशिबात लिहिलेल्या मार्गाने प्रवास सुरु होतो. असंच काहीसं इतिहास लेखक सदाशिव टेटविलकरांच्या बाबतीत झालं असावं.
वनस्पती जीवतंत्रज्ञान आणि सुगंधी आणि औषधी वनस्पतींवर संशोधन
कॉलेजमध्ये शिकता शिकता करिअरच्या दृष्टीने काही कोर्सेस करणं, किंवा समर जॉब्ज किंवा पार्टटाइम जॉब्ज तर अनेकजणं करतात. नोकरीऐवजी पुढे जाऊन स्वतःचा व्यवसाय करण्याचा विचार करणारेही फार कमी असतात. पण समृद्धी बडेने याहीपुढे जाऊन स्वतःचा ब्रँड डेव्हलप करण्याचा विचार केलाय.
झेवियर्स कॉलेजमध्ये थर्ड इयर आर्ट्सला शिकणार्या समृद्धीला वेगवेगळ्या कलाकृती करण्यात कायमच रस होता. ज्यूट, कागद, कापड, पातळ लाकूड अशा अनेक गोष्टींपासून विविध कलाकृती तिने साकारल्या आहेत. ज्यूटच्या बॅग्ज, झोळ्या, पेंटिंग केलेले टीशर्टस, वेताचे ट्रे, चिनीमातीच्या किंवा काचेच्या मग्जवरील पेंटिंग, भित्तीचित्रे अशा अनेक क्रिएटिव्ह वस्तू ती तयार करत असते. इतकंच नव्हे तर या वस्तूंच्या विक्रीसाठी तिने फेसबुकवर ' वरुणी कलेक्शन्स ' या नावाने एक पेजही तयार केलंय. त्याला लोकांचा चांगला रिस्पॉन्स मिळतोय. या सगळ्या वस्तू ती स्वतःच बनवते. पण त्यांची विक्री करणं, किंमत ठरवणं हे सगळं समृद्धी आईच्या मदतीने ठरवते.
तिच्या या पेजवर तिच्या वस्तूंसाठी मागणी नोंदवता येते. ग्राहकाच्या आवडीनुसार आणि गरजेनुसार वस्तू तयार केली जाते. त्यांची घरपोच डिलीव्हरीही दिली जाते. शिवाय आपल्या प्रॉडक्टच्या प्रसिद्धीचं कामही समृद्धी मनापासून एन्जॉय करतेय. तिच्या वरुणी कलेक्शनसाठी या सगळ्या गोष्टी करणं हा तिच्या अनुभवाचाच एक भाग आहे.
बीए झाल्यानंतर एमबीए करुन पुढे स्वतःचा हस्तव्यवसायाचा ब्रँड तयार करण्याचं समृद्धीने आत्तापासूनच मनाशी पक्कं केलंय.
समृद्धीची घोडदौड इथेच थांबत नाही. हस्तकलेच्या जोडीला तिला फ्रेंच भाषेचीही अत्यंत आवड आहे. एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फ्रेंच इन्स्टिट्यूटमधून ती सध्या फ्रेंचच्या परीक्षा देतेय. त्याअंतर्गत चार महिन्यांसाठी ती फ्रान्समध्ये कल्चरल एक्स्चेंजची विद्यार्थिनी म्हणून शिक्षणही घ्यायला गेली होती.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
संदीप लोखंडे हे “स्टॅण्ड अप कॉमेडियन”, “मिमीक्री आर्टिस्ट”, व आर.जे. (रेडिओ जॉकी) म्हणून आपणा सर्वांना परिचयाचे असून, आवाज (व्हॉईस) क्षेत्रासाठी त्यांनी भरीव कार्य केलं असून “डबिंग व्हॉईस ओव्हर” अशा विविध प्रांगणात त्यांनी स्वत:च्या आवाजाच्या खुबीनं वापर करत, विदेशात सुद्धा विनोदी कार्यक्रम सादर केले आहेत.
निवृत्त प्राध्यापक, भगुभाई मफतलाल पॉलिटेक्निक, विलेपार्ले
कधी ते कविता लिहितात. कधी एखाद्या शॉर्टफिल्मची कथा, तर कधी स्वत:च चित्रपटाचे दिग्दर्शन...हे सगळे त्यांचे छंद असले तरी, या कलाकृतींना आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये अव्वल स्थान मिळते. औरंगाबादचे सत्यजित खारकर शिकागोत इंजिनीअरिंग शिक्षणाशी निगडीत नोकरी करीत असले, तरी त्यांचे रुपेरी पडद्याशी घट्ट नाते आहे.
शिकागोत उलगडला रुपेरीपट
बुजुर्ग रंगकर्मी पं. सत्यदेव दुबे यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कुठल्याही पुरस्कारासाठी किंवा मानसन्मानासाठी त्यांनी कधीच काही केलेले नाही. नाटक या एकमेव वेडाने झपाटलेले हे झाड मध्य प्रदेशातील बिलासपूरहून मुंबईत प्रथम आले ते चक्क क्रिकेटमध्ये करीअर करण्यासाठी! परंतु हिंदी चित्रपट दिग्दर्शक विजय आनंद यांनी त्यांना मुंबईतल्या नाटय़सृष्टीशी परिचय करून दिला आणि दुबे क्रिकेट सोडून रंगभूमीकडे वळले.
इब्राहिम अल्काझी या नाटय़क्षेत्रातील भीष्माचार्याकडे त्यांनी नाटकाचे पहिले धडे गिरविले. त्यांच्या ‘थिएटर युनिट’ या संस्थेत साहाय्यक म्हणून दुबेंनी शागिर्दी पत्करली आणि पुढे अल्काझी ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मध्ये गेल्यावर त्यांच्या थिएटर युनिटची सूत्रे दुबेंच्या हाती आली. विजया मेहता आणि दुबे हे दोघेही अल्काझींचे शिष्योत्तम असले आणि दोघांनीही प्रायोगिक-समांतर रंगभूमी हीच आपली कर्मभूमी मानली होती तरी त्यांच्या दिशा मात्र वेगवेगळ्या राहिल्या. पाच दशकांत दुबेंनी आपली समांतर रंगभूमीशी असलेली नाळ कधीच तोडली नाही. दिल्लीच्या ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’शी (NSD) समांतर असे ‘नॅशनल स्कूल ऑफ दुबे’ (NSD) देशभरात अस्तित्वात आहे. त्यांची शिष्यमंडळी केवळ मराठी, हिंदी आणि इंग्रजी नाटय़सृष्टीतच नाहीत, तर बॉलिवूडमध्येही आहेत. तरूण रंगकर्मीचा घोळका त्यांच्याभोवती कायम असतो. दुबे हिंदीभाषिक असले तरी त्यांनी अनेक मराठी नाटके दिग्दर्शित केली आहेत. कणकवली नाटय़संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करावी, असा आग्रह संमेलनाच्या संयोजकांनी धरला होता. परंतु नाटय़ परिषदेच्या त्यावेळच्या धुरिणांनी कोत्या वृत्तीचे दर्शन घडवत हा आग्रह अव्हेरला होता. दुबेंचे मराठी रंगभूमीवरील मौलिक योगदान त्यांना ज्ञात नव्हते, ही वस्तुस्थिती होती. विजय तेंडुलकर, गो. पु. देशपांडे, महेश एलकुंचवार, श्याम मनोहर, चं. प्र. देशपांडे, चेतन दातार आदींची मराठी नाटके त्यांनी केली. कुसुमाग्रजांच्या कवितांवर आधारीत ‘आयुष्यात पहिल्यांदाच’ हा आगळा रंगाविष्कारही त्यांनी सादर केला. ‘आधेअधुरे’, ‘अबे बेवकूफ’, ‘संभोग से समाधी तक’, ‘अंधायुग’, ‘एज्युकेटिंग रिटा’, ‘हयवदन’, ‘डॉन जॉन इन हेल’ अशी अनेक नाटके त्यांनी केली. नाटककाराच्या संहितेवर दिग्दर्शकीय कुऱ्हाड चालवून तिचे आपल्या पद्धतीने अर्थनिर्णयन करण्याचा पायंडा त्यांनी पाडला. त्यामुळे अनेक लेखक त्यांच्यावर नाराज झाले. पण त्यांनी लेखकांच्या नाराजीची कधीच पर्वा केली नाही. दुबे हे भणंग, कलंदर, अवलिया रंगकर्मी आहेत. त्यांच्या व्यवहाराची काळजी नेहमी त्यांच्या शिष्य व हितचिंतकांनीच वाहिली. त्यांच्या कार्यशाळांतून अनेक लेखक घडले. सत्यदेव दुबे हे मूळचे रा. स्व. संघाचे. पण ही विचारधारा त्यांनी कलेच्या क्षेत्रात आणली नाही. गो. पु. देशपांडेंसारख्या डाव्या नाटककाराची नाटकेही त्यांनी तितक्याच आत्मीयतेने सादर केली. हिंदुत्वाचा पुरस्कार ते त्यांच्या वक्तव्यांतून करीत असले तरी त्यात कडवेपणा आढळत नाही. हिंदुत्ववादी भाजपच्या कथनी व करणीत अंतर दिसल्यावर त्यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवायलाही त्यांनी कमी केले नाही. त्यांनी काही नाटकेही लिहिली. त्यातून त्यांचे आयुष्य तुकडय़ा-तुकडय़ांत समजून घेण्यास मदत होते. त्यांच्या मतांवर नेहमीच जोरदार चर्चा, वादविवाद होत असतात. ‘थिएटर मर रहा है’ असे म्हणणारे दुबे दुसरीकडे सातत्याने नाटके करतच असतात. कारण ते त्याशिवाय जगूच शकणार नाहीत.
कडेठाणकर, सुचेता
सुचेता कडेठाणकर या पुणेकर युवतीच्या नावापुढे आता ‘पहिली भारतीय व्यक्ती’ असे विशेषण लागले आहे. जे भल्याभल्यांना जमणार नाही असे आव्हान तिने यशस्वीरीत्या पेलले- ते म्हणजे जगातील सर्वात मोठे थंड वाळवंट असलेले मंगोलियातील गोबी वाळवंट पार करण्याचे!
इनमीन पाच फूट उंचीची मूर्ती, पण आपल्या कामगिरीद्वारे तिने स्वत:ची खरी उंची दाखवून दिली. एखाद्या गोष्टीसाठी झोकून देऊन, तिचा सातत्याने पाठपुरावा केल्यावर सर्वकाही साध्य आहे, हे तिने या कामगिरीतून सिद्ध केले. गोबीच कशाला? कोणत्याही वाळवंटातून चालण्यासाठी शरीराचा तर कस लागतोच आणि मनाच्या कणखरपणाचीही कसोटी लागते. अथांग पसरलेल्या गोबी वाळवंटात- जिथे चुकूनच कधीतरी माणसाचे दर्शन होते- सलग ५२ दिवस चालून सुचेताने या दोन्ही कसोटय़ा लिलया पार केल्या. सुचेता तशी मध्यमवर्गीय संस्कृतीत वाढलेली. पुण्यात कसबा पेठेतील वाडय़ात आई, वडील आणि लहान बहीण अशा कुटुंबात वाढली. इतिहास, संस्कृत, मराठी व पत्रकारिता या विषयांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. सुरुवातीला दोन वर्षे ‘लोकसत्ता’ साठी काम केले, नंतर मुक्त पत्रकार म्हणून लिहू लागली. पुढे चांगले पैसे मिळवून देणाऱ्या ‘टेक्निकल रायटिंग’ मध्ये प्रवेश केला. विविध आयटी कंपन्यांसाठी ती असे लेखन करू लागली. त्यातून चांगले अर्थार्जन होत असल्याने अशा प्रकारचे छंद पूर्ण करणे सोपे गेले. शाळेत असल्यापासूनच भटकंती, डोंगरवाटा पालथ्या घालणे आणि शरीराचा कस लागणाऱ्या साहसी क्रीडाप्रकारांची आवड! त्यातूनच सह्य़ाद्रीचे कडे-कपारी, हिमालयाच्या रांगा व एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपर्यंत तिने अशी भटकंती केली. लांब अंतराच्या सायकल स्पर्धा तसेच, पुणे, दिल्ली, मुंबई येथे भरल्यिा जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या मॅरेथॉन्समध्ये तिने अनेकदा भाग घेतला आहे. पुण्यातील खडतर अशा ‘एन्डय़ुरो अॅडव्हेंचर रेस’ चे एकदा विजेतेपदही मिळविले. लेखन व वाचनाच्या छंदाबरोबरच साहसी क्रीडाप्रकारांची आवड जोपासणेही सुरू होते. तिचे करिअर स्थिर होत असतानाच वडिलांचे निधन झाले. त्यांच्याशी तिची खूप मानसिक जवळीक असल्याने तिला हा मोठा आघात होता, पण त्यातून उभी राहून सुचेताने टेक्निकल लेखनाचे करिअर वाढविले. सुरुवातीला ‘एअरटाईट नेटवर्क्स’ व नंतर ‘सिमॅन्टेक’मध्ये तिने विविध पदांवर काम केले. सध्या ती ‘प्रिन्सिपल इन्फर्मेशन डेव्हलपर’ या पदावर तिथे आहे. मधल्या काळात मागे पडलेली साहसी क्रीडाप्रकारची आवड तिने गेल्या काही वर्षांमध्ये वाढविली आणि गोबी मोहिमेची तयारी सुरू केली. त्यासाठी बरेच कष्ट घेतले आणि अखेर एक स्वप्नपूर्ती करून दाखविली. हे सर्व करून दाखविणारी सुचेता अतिशय शांत आहे. तिच्या स्वभावात बडेजाव मिरविणे नाही. त्यामुळे कितीही उंचीवर पोहोचली तरी तिचे पाय जमिनीवरच असतात, मित्र-मैत्रिणींमध्ये ती तितकीच मिळून-मिसळून, खळखळून हसणारी असते. आता आणखीही काही आव्हाने तिच्या मनत घोळत आहेत. ती निश्चितपणे त्यांचा वेध घेईलच.. त्यासाठी सुचेताला भरपूर शुभेच्छा!
नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारून सामाजिक कार्यात झोकून देणारं ठाण्यातील एक व्यक्तीमत्व म्हणजे श्रीमती संपदा वागळे.
बी.एस्.सी. पर्यंत शिक्षण घेतलेल्या संपदाजींनी स्टेट बॅंकेत २६ वर्षे नेटाने काम केले व त्याकरिता त्या अनेक पुरस्कारांच्या मानकरी ठरल्या. एव्हढेच नव्हे तर त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यातही त्यांन अनेक पुरस्कार प्राप्त झाले. ग्राहक सेवा व डिपॉझिटस् आणल्याबद्दल ढाल, पर्यावरण मंचाकडून वसुंधरा पुरस्कार तसेच २०११ च्या म.टा. सन्मान पुरस्कारासाठी जज म्हणून निवडही झाली.
व्ही.आर.एस. नंतर लेखनास सुरवात करणार्या संपदाजींनी आपली मैत्रिण विठ्ठला ठुसे हिच्यासमवेत आचार्य अत्रे कट्ट्याची स्थापना केली. आज कट्ट्याचे ५२५ च्या वर कार्यक्रम झाले आहे.
एव्हढेच नव्हे तर त्यांनी एकपात्री कार्यक्रम सादर केले.
महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता आणि सकाळ यांसारख्या दैनिकातून त्यांचे सुमारे २४० लेख प्रसिद्ध झाले.
याबरोबरच त्यांनी सर्वसामान्यांसाठी ठाण्यात मुक्त व्यासपीठ निर्माण केले. या व्यासपीठाने अनेकांना आयुष्यात पुन्हा उभं राहण्यासाठी हात दिला, तसेच सर्वसामान्यातून अनेक वक्ते घडले. आज या व्यासपीठावर कार्यक्रम करण्याची संधी मिळणे हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते. त्याचप्रमाणे त्यांनी राजीव तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली लहान मुलांसाठी गंमत शाळा चालवली.
## Sampada Wagle
मुंबई विद्यापीठातून एम.ए. ही पदवी संपादित केलेल्या संपदा जोगळेकर ह्या सध्या पुणे विद्यापीठात पी.एच.डी. करत आहेत. त्यांनी आपले शिक्षण मो.ह. विद्यालय व जोशी बेडेकर महाविद्यालय येथून पूर्ण केले. संपदा जोगळेकर यांनी आजपर्यंत १५ दूरदर्शन मालिका, पाच दैनंदिन मालिकातसेच “शर्यत”व “उदय” या दोन चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti