(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

  • अतुल पेठे

    पेठे, अतुल

    नाटक ही केवळ करमणूक आणि मनोरंजन करणारी कला नसून ती प्रत्येकाला आत्मभान देणारी, विचारप्रवृत्त करणारी एक गंभीर कला आहे, हे लक्षात येत असतानाच अतुल पेठे रंगभूमीवर अवतीर्ण झाले आणि त्यांनी आपले सारे आयुष्य याच कलेसाठी वेचायचे ठरवले. कोलकात्याच्या ‘ब्रात्तोजान’ नाटय़संस्थेचा ‘विष्णु बासू स्मृती पुरस्कार’ अतुल पेठे यांना मिळणे, म्हणजे त्यांच्या आजवरच्या कारकीर्दीवर कौतुकाची मोहोरच. वेगळ्या वाटेने जाणारी नाटके सादर करणे, हे पेठे यांचे वैशिष्टय़. महाविद्यालयीन जीवनात पुण्यातील पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत यशाचा पहिला जरीपटका मिळवल्यानंतर पेठे यांनी विविध प्रकारच्या अनुभवांना सामोरे जाण्याचे ठरवले.
    ‘शीतयुद्ध सदानंद’, ‘सूर्य पाहिलेला माणूस’, ‘गोळायुग’, ‘दलपतसिंग येती गावा’ यांसारख्या नाटकांनंतर त्यांनी नुकतेच सादर केलेले ‘सत्यशोधक’ हे गो. पु. देशपांडे यांचे महात्मा फुले यांच्यावरील नाटक रंगमचीय क्षेत्रात चर्चेत राहिले आहे. ते अभिनय करतात, तरी दिग्दर्शन हे त्यांचे खरे क्षेत्र. नव्या पिढीशी सतत संपर्कात राहून त्यांच्यात रंगभूमीची जाण निर्माण करण्यासाठी पेठे राज्यभर नाटय़कार्यशाळा घेत असतात. वैचारिक रंगभूमीवर सतत काही घडत राहिले पाहिजे, या जाणिवेतून त्यांनी अशा उपक्रमांना नेहमीच प्राधान्य दिले. एकांकिका लेखन हा त्यांचा जसा प्रांत आहे, तसेच नाटय़रूपांतराच्या मार्गानेही त्यांनी नाटय़लेखनात रस घेतला आहे. विजय तेंडुलकर यांच्यावर त्यांनी तयार केलेला ‘तेंडुलकर आणि हिंसा - काल आणि आज’ हा माहितीपट विशेष गाजला. ‘नाटककार सतीश आळेकर’, ‘बहिणाई’, ‘अशोक केळकर’ यांसारख्या माहितीपटांमध्ये त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले. मात्र ‘कचरा कोंडी’ या कचऱ्याच्या समस्येवर आणि त्यामध्ये काम करणाऱ्यांच्या जगण्याबद्दल समाजाचे डोळे उघडणाऱ्या माहितीपटाने पेठे यांनी आपले वेगळेपण सिद्ध केले. आकाशवाणीवर ‘कोसला’ कादंबरीचे वाचन असो, की अरुण कोलटकरांच्या कवितांचे वाचन; पेठे ‘तयार’ असतात. महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार आणि विविध नाटकांसाठी अनेक पुरस्कार मिळालेल्या पेठे यांना प्रयोगशील रंगभूमीवरील कामाबद्दल कोलकात्यात मिळालेला हा पुरस्कार त्यांच्या कलाजीवनातील एक महत्त्वाचा पुरस्कार म्हटला पाहिजे.

    ब्रजेश मिश्रा यांच्याविषयीच्या ‘’मध्ये (१ ऑक्टो.) पोखरण-२ अणुचाचणी १९९९ मध्ये झाल्याचा चुकीचा उल्लेख आहे. तो १९९८ असा हवा होता.

  • डॉ. भगवान गणेश कुंटे

    ऐतिहासिक ग्रंथांचे अनुवादक आणि महाराष्ट्र सरकारच्या “स्वातंत्रसैनिक चरित्रकोशा” च्या दुसर्‍या खंडाचे संपादक डॉ. भगवान गणेश कुंटे यांचा जन्म ४ जून १९२० रोजी झाला.

    “औरंगजेबाच्या कुळकथा” व “औरंगजेबाचा इतिहास” (दोन्ही यदुनाथ सरकारांच्या पुस्तकांवरुन), “पानिपताची मोहिम अथवा काशिराजाचा वृतान्त” (काशिराज पंडिताच्या मूळ फारसी बखरीचा फारसीवरुनच अनुवाद), “अहमदनगरची निजामशाही” व “बहामनी राज्याचा इतिहास” (दोन्ही बुर्‍हाने मशीरकृत मूळ फारसी) हे अनुवाद त्यांनी केले.

    Dr Bhagwan Ganesh Kunte

  • भालचंद्र श्रोत्री

    भालचंद्र श्रोत्री हे अलिबाग-उरण परिसरातील सामाजिक कार्यकर्ते होते.

  • कृष्णाजी वासुदेव पुरंदरे

    कृष्णाजी वासुदेव पुरंदरे हे इतिहास संशोधक होते.

  • पुरुषोत्तम गणेश सहस्रबुद्धे

    “विज्ञानप्रणीत समाजरचना”, “भारतीय लोकसत्ता”, “लोकसत्तेला दंडसत्तेचे आव्हान”, “राष्ट्रधर्म”, “हिंदू समाज”, “महाराष्ट्र संस्कृती”, “इहवादी शासन”, “केसरची त्रिमूर्ती” आदी वैचारिक पुस्तके लोकहितवादींच्या शतपत्रांचे संपादन, तसेच “साहित्यातील जीवनभाष्य” ही समीक्षा, दोन नाटके आणि “लपलेले खडक” हा लघुकथासंग्रह त्यांनी लिहीला.

  • काशिनाथ सखाराम (बंडोपंत देवल)

    काशिनाथ सखाराम ऊर्फ बंडोपंत देवल हे या सर्कसचे एक मालक भारतातील सर्वोत्कृष्ट विदूषक म्हणून ख्यातकीर्त होते. ‘द बेस्ट क्लाउन इन इंडियन सर्कस’ म्हणून त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो. सुमारे ४० वर्षे नवनवे चित्तथरारक खेळ व कसरती सादर करुन परदेशातही वाहवा मिळवली.

  • ऐश्वर्या साखरे

    अॅक्टिंग , डान्स , जिमनॅस्टिक , मल्लखांब अशी चौफेर आवड जपत , अभ्यासही तितक्याच कुशलतेने सांभाळणारी ' ऐश्वर्या साखरे '

    रुईया कॉलेजला बीएच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या ऐश्वर्याने लहानपणापासूनच नृत्याचे धडे गिरवायला सुरुवात केली. तिने डॉ.संध्या पुरेचांकडे भरतनाट्यमचं शिक्षण घेतले. भरतनाट्यममधील विशारद ही पदवीही तिने प्राप्त केली. याबरोबरच कथ्थकचीही डिग्री मिळवली.

    नृत्य म्हणजे तिचा जीव की प्राण. पण इतरांना ते शिकवायलाही तिला मनापासून आवडतं. म्हणूनच डान्स शिकता शिकता तिनं निरनिराळ्या शोज मध्ये परफॉर्म करायलाही सुरुवात केली. नुकताच सिमल्याच्या एका शाळेच्या शतकपूर्तीसाठी लहानग्यांचा डान्सही तिने बसवला होता.

    'डान्स ही माझी पहिली आवड असली तरी अॅक्टींगचीही मला प्रचंड ओढ आहे' असं ऐश्वर्या म्हणते. ' राहिले दूर घर माझे ', ' देवकी ', ' हिरवं कुंकू ' अशा सिनेमांत बालकलाकार म्हणून तिनं काम केलंय. त्यासोबतच अनेक जाहिराती आणि हिंदी मराठी मालिकांमधूनही ती तिची अभिनयाची आवड जोपासत असते.

    अभिनय आणि नृत्यासोबत मल्लखांब आणि जिम्नॅस्टिकचीही तिला आवड आहे. दादरच्या प्रभात पथकात मल्लखांब आणि जिम्नॅस्टिक्स दोन्हीचं शिक्षण ती सध्या घेतेय. अभिनय आणि नृत्यासोबतच या क्षेत्रातही भरीव कामगिरी करण्याचा तिचा मानस आहे.

    (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)


  • भाऊसाहेब झंवर

    क्रीडापटू या नात्याने जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर काय करायला हवे, हे तर ते सांगायचेच पण काय टाळायला हवे याविषयी त्यांच्याइतकी माहिती देणारे दुसरे कुणीही सापडले नसते. त्यांनी या गोष्टीचा जणू ध्यास घेतला होता. उत्तमोत्तम क्रीडापटू तयार करून त्यांना स्पर्धेत उतरवण्याच्या एकमेव उद्देशाने ते मैदानामध्ये उतरायचे. एखादा खेळाडू चांगला दिसतो आहे, पण मार्गदर्शनाअभावी तो वा ती मागे पडण्याची शक्यता आहे असे दिसले तर ते त्या व्यक्तीला मदतीचा हात दिल्याशिवाय राहणार नाहीत.

    पुण्याच्या स. प. महाविद्यालयामध्ये अनेक वर्षे क्रीडाप्रशिक्षक या नात्याने काम पाहणारे बाबुलाल प्रेमराज झंवर आता आपल्यात नाहीत. ९४ व्या वर्षांपर्यंत आयुष्य लाभलेले बाबुलाल झंवर हे दोन वर्षांपूर्वीपर्यंत आपल्या स्वयंचलित दुचाकीवरून हिंडायचे आणि सायंकाळच्या सुमारास मैदानावर उभे राहायचे. या वयातही ते खेळ पाहून चुका दाखवून देत असत. त्यांनी सांगितलेले शास्त्रशुद्ध व्यायाम प्रकार अनेक वर्षे अनेकांना उपयुक्त ठरले आहेत. तुम्ही शारीरिकदृष्टय़ा त्या त्या क्रीडाप्रकारांसाठी तंदुरुस्त आहात की नाही हे तपासायचे त्यांचे मार्ग निराळे होते. ते म्हणायचे की, पाच मिनिटांमध्ये शंभर जोर, तीन मिनिटांमध्ये शंभर बैठका, १४ सेकंदांमध्ये शंभर मीटर धावणे, सहा मिनिटांमध्ये सोळाशे मीटर धावणे, हे सगळे तुम्ही न दमता करू शकणार असाल तर तुम्ही राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय स्पर्धाना पात्र आहात, असे मानायला हरकत नाही. सर्व प्रकारच्या खेळात महत्त्व कशाला असेल तर ते तुमच्या पूर्ण तंदुरुस्त असण्याला.

    नृत्य असो की गायनकला, त्यासाठीही तुम्हाला शारीरिकदृष्टय़ा सक्षमच असावे लागते. त्यासाठी त्यांनी ‘प्रोग्रेसिव्ह रेझिस्टन्स प्रोग्राम’ या नावाची संकल्पना अस्तित्वात आणली. त्याला त्यांनी ‘आयसोमेट्रिक’ प्रशिक्षणाची जोड दिली. त्यांच्या या प्रशिक्षणाचा अनेक पातळ्यांवर उपयोग करून घेतला गेला. शारीरिक शिक्षण, क्रीडा आणि त्याबरोबरच स्वास्थ्य यांना त्यांच्या लेखी अधिक महत्त्व होते. स्वास्थ्य म्हणजे केवळ काहीही न करता बसून राहणे नव्हे तर त्यात त्यांना निसर्गोपचार पद्धती अपेक्षित होती. तुम्ही जो काही खेळ खेळाल तो उत्तम खेळा आणि त्यात प्रावीण्य मिळवा, एवढेच त्यांचे सांगणे असे. त्यांनी आंतरमहाविद्यालयीन स्पर्धापासून आंतरराष्ट्रीय स्पर्धापर्यंत असंख्य स्पर्धामध्ये भाग घेऊ शकतील असे खेळाडू घडवले. त्यांच्या प्रशिक्षणात शरीरशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, शिक्षणशास्त्र, क्रीडामानसशास्त्र, अशा वेगवेगळ्या शास्त्रप्रकारांचा समन्वय असे. आपले मनगट मजबूत तर सर्व काही तुम्ही त्या जोरावर करू शकता हा त्यांचा विश्वास होता. ते कडवे गांधीवादी होते. साधी राहणी आणि स्वावलंबन यांना आपल्या स्वत:च्या जीवनामध्ये स्थान दिले होते. त्यामुळेही ते विद्यार्थीप्रिय होते. भारतात एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर क्रीडाक्षेत्रावर पैसे खर्च होऊनही चांगले ‘स्टॅमिना’बाज खेळाडू तयार होत नाहीत, ही त्यांची खंत होती.

    कुस्ती, खो-खो, वेटलिफ्टिंग, फुटबॉल, बास्केटबॉल, मुष्टियुद्ध, अ‍ॅथलेटिक्स, सायकलिंग, शरीरसौष्ठव, पोहणे, क्रिकेट अशा कितीतरी क्रीडाप्रकारांमध्ये त्यांनी घडवलेले खेळाडू केवळ महाराष्ट्रभरच नव्हे तर सगळ्या जगात पसरलेले आहेत. त्यांच्या नावामधली ‘बा. प्रे.’ अशी आद्याक्षरे त्यांच्या शरीरसंपदेचे दर्शन घडवण्यासाठी उपयुक्त ठरली. त्यांच्याकडे पाहून कुणीही एकदम चकीत होऊन ‘बापरे’ असे म्हणत असे आणि तीच त्यांच्या ज्ञानाची आणि त्यांच्या कारकिर्दीची पावती म्हणावी लागेल.

    कुस्ती खेळायची असेल तर त्यासाठी मांसाहारच हवा हे थोतांड आहे, असे ते सांगायचे आणि त्यांच्या प्रचाराचाही तोच महत्त्वाचा मुद्दा ठरला. सामाजिक दृष्टय़ा अत्यंत प्रगत विचार आणि केव्हाही कुणालाही मदतीसाठी पुढे हे तर त्यांचे ब्रीद होते. ते १९३० च्या जंगल सत्याग्रहामध्ये होते आणि ते १९४२ च्या चळवळीत भूमिगत कार्यकर्त्यांना मदत करण्यात अग्रभागी होते. एका निरलस अशा क्रीडा प्रशिक्षकाला जो मानसन्मान मिळायला हवा होता तो मात्र त्यांना कधीच मिळाला नाही.

  • वासुदेव यशवंत गाडगीळ

    नाट्य-चित्र समीक्षक आणि लेखक वासुदेव यशवंत गाडगीळ यांचा जन्म १८ डिसेंबर १९१८ रोजी झाला.

    मोहिनी मासिकातील “हिरव्या चादरीवर” या त्यांच्या सदराचे चार भाग पुस्तकरुपात आले. शिवाय “नाटकांच्या नवलकथा” त्यांनी लिहिल्या. त्यांनी “स्वरराज छोटा गंधर्व” या ग्रंथाचे संपादनही केले.

    १७ जुलै २००१ रोजी त्यांचे निधन झाले.

    ## Vasudeo Yashwant Gadgil

  • राहुल नागवेकर

    नागवेकर, राहुल

    ‘नॅशनल जिऑग्राफी बी’ हीदेखील अखेर शालेय ज्ञानस्पर्धाच, पण ती साधीसुधी नव्हे.. विजेत्याला थेट ‘नॅशनल जिऑग्राफिक सोसायटी’चे आजीव सदस्यत्व मिळते, शिवाय कॉलेज शिक्षणासाठी २५ हजार डॉलरची शिष्यवृत्ती आणि ‘नॅट-जिओ’तर्फे गल्पागॉस बेटांवरील सफरीत सहभागी होण्याची संधी! हे सारे अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील शुगरलँड भागात राहणाऱ्या ऊर्मिला सबनीस-नागवेकर आणि मनोज नागवेकर यांचा सुपुत्र राहुल याने गेल्या गुरुवारी मिळवले.

    राहुलची भूगोलाची आवड लहानपणापासूनचीच. चौथीत असतानापासून मला नकाशे पाहायला आवडत, असे त्याने सांगितले आहे. मात्र, त्याच्या पालकांनीदेखील कमी मेहनत घेतलेली नाही.. त्याला आवडते, म्हणून गेली सहा वर्षे याच स्पर्धेच्या टेक्सास राज्यस्तरीय फेऱ्या त्याला दाखवण्यासाठी हे आई/वडील त्याला नेत होते. त्याची तयारी व्हावी, म्हणून वडील मुद्दाम कठीण-कठीण प्रश्न काढत आणि कधी वडील, कधी आई त्याच्याकडून ते सोडवून घेत. ‘मलाही प्रश्न कठीणच वाटत, तो सोडवे’ असे ऊर्मिला सांगतात. अखेर यंदा त्याला ‘क्वेल व्हॅली मिडल स्कूल- मिसूरी’ या त्याच्या शाळेने या स्पर्धेत सहभागाची संधी दिली. टेक्सास राज्यातील १०० विद्यार्थ्यांच्या प्राथमिक फेरीतून उपान्त्य फेरीच्या १० जणांत राहुल पोहोचला, तिथे अगदी शेवटच्या दोघांतून राहुलच जिंकल्याने अखिल अमेरिकी फेरीसाठी जाणार हे पक्के झाले. या अखिल अमेरिकी फेरीत दहापैकी सात स्पर्धक दक्षिण आशियाई (बहुश: भारतीयच) वंशाचे होते! अगदी कार्तिक कर्णिक हा मूळ महाराष्ट्रीय स्पर्धकही होता. स्पर्धेत काही कारणाने ते मागे पडले, पण प्रत्येकाच्याच पालकांनी मेहनत घेतली असेल. भारताकडे होणाऱ्या प्रवासामुळे लहानपणीच भूगोलाची गोडी या मुलांना लागली असावी, असे कुणा अमेरिकी तज्ज्ञाचे म्हणणे. अखेरच्या फेरीत वंश जैन आणि राहुल नागवेकर हे दोघे होते.. तीन प्रश्नांची उत्तरे दोघांनी अचूक दिली. अखेर बव्हेरियात, डॅन्यूब नदीकाठच्या कोणत्या शहरात पवित्र रोमन राज्याच्या कायदेमंडळाचे मुख्यालय इ. स. १६६३ ते १८०६ पर्यंत होते?’ - या प्रश्नावर ‘ रेन्गेन्सबर्ग ’ असे बिनचूक उत्तर आठवीतल्या राहुलने दिले!