(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

  • पांडुरंग महादेव बापट (सेनापती बापट)

    राजकिय स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये भाग घेत असतांना राजदोहात्मक भाषणे केल्याबदल अनेकदा अनेक वर्षे सक्तमजूरीची शिक्षा झाली. संस्थानाची प्रजांच्या हक्कांकरिता चालु असलेल्या आंदोलनात भाग घेऊन संस्थानच्या प्रवेशबंद्या त्यांनी मोडल्या त्याबदल कारागृहवासही सोसला. स्वातंत्र्योत्तरकाळातही भाववाढ विरोधी ओदोलन गोवामुक्ती आंदोलन संयुक्त महाराष्ट्र आंदोलन इ. ओदोलनांमध्ये त्यांनी पुढाकार घेतला.

  • दिलीप कुलकर्णी

    दिलीप कुलकर्णी हे मराठी अभिनेते आणि दिग्दर्शक होते. एक दिग्दर्शक म्हणून ते चिकित्सक वृत्तीचे होतेच, पण त्याहीपेक्षा अजातशत्रू, सौजन्यमय व्यक्ती होते.

  • अशोक शंकरराव चव्हाण

    राजकारणाचा वारसा वडिलांकडून लाभलेले पण स्वकर्तृत्वाच्या आधारे यशाचे शिखर गाठणारे सक्षम नेतृत्व.

  • कपिल मोरेश्वर पाटील

    २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भिवंडी-बदलापूर या मतदार संघातून कपिल मोरेश्वर पाटील खासदार म्हणुन विजयी झाले आहेत;

    सुरुवातीला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ठाणे ग्रामीण अध्यक्ष असलेल्या कपिल पाटील यांनी १८ मार्च २०१४ या दिवशी ऐन लोकसभा प्रचाराच्यावेळी गोपीनाथ मुंडे, देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. नरेंद्र मोदीं यांच्या विकासकामांच्या दुरदृष्टीचा आपल्या मतदारसंघाला फायदा व्हावा या उद्देशाने त्यांनी भा.ज.प प्रवेश केल्याचे जाहिर केले होते.

    जिल्हा मध्यवर्ती सहाकारी बँकेचे अध्यक्ष, कोकण कृषी विद्यापीठाचे संचालक, अशीही त्यांची ओळख आहे. ग्रामविकास या संकल्पनेला मध्यभागी ठेवून आरोग्य, शिक्षण प्रसार, जलसंधारण या ग्रामविकासासाठी अत्यावश्यक असणार्‍या घटकांना प्राधान्य देणार्‍या कित्येक दुरदर्शी व सर्वस्पर्शी योजनांचे ते जनक आहेत. आजपर्यंत कपिल पाटील यांनी अनेक जिल्हा अधिकारी व नगरसेवकांना बरोबर घेवून स्वयंपुर्ण प्रभावी योजना व कार्यक्रमांची अंमलबजावणी केली.

    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

  • ज्येष्ठ नाट्यकर्मी जयवंत नाडकर्णी

    शितू, दूरचे दिवे, वैजयंती, कौतेय, एकशून्य बाजीराव, करायला गेलो एक, मी जिकलो मी हरलो, वतुर्ळाचे दुसरे टोक, माता द्रौपदी, द्वंबद्विपचा मुकाबला, वेड्याचे घर उन्हात, पाषाण पालवी ह्या नाटकात जयवंत नाडकर्णी यांनी प्रमूख भूमिका केल्या होत्या.

  • रवींद्र मंकणी

    रविंद्र मंकणी यांनी अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच झाशीची राणी या ऐतिहासिक हिंदी मालिकेतही त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती.

  • राम नगरकर

    रामनगरी’ या विनोदी अंगाने समाजदर्शन घडवणार्‍या अजरामर आत्मपर पुस्तकाचे लेखक राम विठोबा नगरकर हे एक उत्कृष्ट विनोदी अभिनेते होते.

  • डॉ. आशुतोष कोतवाल

    सध्या अमेरिकेत असलेल्या डॉ. आशुतोष कोतवाल यांनी 'हिग्ज बोसॅन' या मूलकणांच्या आकारमानाबाबत संशोधन केले आहे. त्याची दखल जगभरातील भौतिकशास्त्रज्ञांनी घेतली आहे...

    विश्वाची रचना आणि त्याच्या जडणघडणीचे रहस्य उकलण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या ‘डब्ल्यू बोसॉन’ या मूलकणांचा शोध जगभरातील अनेक शास्त्रज्ञ घेत आहेत. या कणांना ‘दैवी कण’ (गॉड्ज पार्टिकल) असेही संबोधले जाते. त्यासाठी अब्जावधी डॉलर्स खर्च करून युरोपात जमिनीखाली तयार केलेल्या सर्न प्रयोगशाळेत अचाट आकाराचा ‘लार्ज ह्रेडॉन कोलायडर’ (एलएचसी) नावाचा प्रयोग हाती घेण्यात आला आहे. या कणांच्या वस्तुमानाबाबत मूळचा पुणेकर असलेल्या डॉ. आशुतोष कोतवाल या शास्त्रज्ञाने अनोखे संशोधन केले असून, त्याची जगभरातील भौतिकींमध्ये चर्चा आहे. डॉ. कोतवाल हे याबाबत अमेरिकेत संशोधन करतात.

    त्यांनी व त्यांच्या चमूने दैवी कणांचे (डब्ल्यू बोसॉन) मोजमाप करण्याचे तंत्र विकसित केले आहे. त्यांच्या तंत्रानुसार या दैवी कणांचे आतापर्यंतचे सर्वात अचूक वस्तुमान शोधण्यात यश आले आहे. त्याची अचूकता ०.०२ टक्के इतकी जवळ जाणारी आहे, असे अमेरिकेतील शिकागोजवळ असलेल्या ‘फर्मी नॅशनल अ‍ॅक्सीलरेटर लॅबोरेटरी’ या ख्यातनाम प्रयोगशाळेने जाहीर केले आहे. डॉ. कोतवाल यांच्या या यशामुळे गेली ४० वर्षे विविध शास्त्रज्ञांनी या कणांबाबत घेतलेला ध्यास एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. विशेष म्हणजे बोसॉन या मूलकणांचे अस्तित्व असल्याचा सिद्धांत प्रसिद्ध दिवंगत पदार्थशास्त्रज्ञ डॉ. सत्येंद्रनाथ बोस यांनी सर्वप्रथम मांडला होता. त्यावरून या कणांना ‘बोसॉन’ असे नाव देण्यात आले. आता याच कणांचे अचूक वस्तुमान शोधून त्यात भर टाकण्याचे कार्य कोतवाल यांच्या रूपाने एका भारतीयानेच केले आहे. डॉ. कोतवाल हे अमेरिकेतील नॉर्थ क्ररोलिना राज्यातील डय़ुक विद्यापीठात प्राध्यापक आहेत. त्यांनी अमेरिकेत अभियांत्रिकी व अर्थशास्त्र याविषयांची पदवी घेतली. त्यानंतर कोलंबिया विद्यापीठात पीएच.डी. करून त्यांनी शिकागोजवळील ‘फर्मी’ प्रयोगशाळेत संशोधनकार्य सुरू केले. ‘डब्ल्यू बोसॉन’ कणांच्या संशोधनाबरोबरच ‘टॉर क्वार्क’ या मूलकणांचे अचूक वस्तुमान शोधण्यातही त्यांनी यश मिळविले आहे. त्यांना अमेरिकेतील राष्ट्रीय स्तरावरील ‘आऊटस्टँडिंग इनव्हेस्टिगेटर अ‍ॅवॉर्ड’ व ‘स्कोन फेलोशिप’ हे प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले आहेत. पदार्थविज्ञानातील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन अमेरिकन फिजिक्स सोसायटीने त्यांना विशेष फेलोशिप प्रदान केली आहे.

    डॉ. आशुतोष कोतवाल यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला ध्यास हा कणाकणाचा ! हा लेख पुढील पानावर वाचा.

    डॉ. आशुतोष कोतवाल यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला हा लेख वाचा.
    ध्यास हा कणाकणाचा !
    kotval-dr-ashutosh-modified


    MM-050; VV-0056

    <!--डॉ. आशुतोष कोतवाल यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला हा लेख वाचा. ध्यास हा कणाकणाचा ! -->

  • कवी प्रदीप

    भारत-चीन युद्धाच्या सुमारास २६ जानेवारी १९६३ रोजी लता मंगेशकरांनी दिल्लीतील रामलीला मैदानावर गायलेल्या त्यांच्या ऐ मेरे वतन के लोगो या गीताने भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यांत पाणी आणले होते.

  • रामचंद्र शंकर वाळिंबे

    डॉ. रामचंद्र शंकर उर्फ रा. शं. वाळिंबे हे थोर समीक्षक म्हणून ओळखले जातात. ते व्यासंगी विद्वान आणि आपल्या ओघवत्या वाणीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकणारे ख्यातनाम वक्ते म्हणूनही प्रसिद्ध होते.