(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

  • रामदास पाध्ये

    रामदास पाध्ये हे भारतामध्ये तसेच परदेशामध्येही या कलेमुळे नावाजले गेलेले हाडाचे कलाकार आहेत. त्यांनी बनविलेले व जीवंत केलेले अनेक बाहुले जगभरच्या रसिकांनी आपलेसे केले आहेत. टेलिव्हीजन मालिका, जहिराती, सिनेमे यांच्यातून सुध्दा ते आपल्या मनोरंजनासाठी भेटीस आले आहेत. आपल्या बाहुल्यांच्या कार्यक्रमांमधून बालविवाह, बालशिक्षण, ड्रग्स ची समस्या, जागतिक तापमानवाढ अशा महत्वाच्या मुद्दांवर ते नेहमीच भाष्य करतात. त्यांच्या जादुई बोटांचा स्पर्श झाला की त्या निर्जिव जीवांना नवं जीवनं मिळतं, ते रसिक जनांशी संवाद साधतात, त्यांना कधी हसवतात, रिझवतात, हास्याच्या कल्लोळामध्येही त्यांच्या जाणीवांचे पडदे खुले करून जातात. त्यांना प्रेम शिकव तात, संवेदनशिलतेचा मुलामा लावतात. मग तो लिज्ज्त पापड जहिरातीमधला बनी असो किंवा ‘दिल हे तुम्हारा’ मधील सर्वांना हवाहवासा वाटणारा बाहुला असो अशा निरनिराळ्या बाहुल्यांद्वारे रामदास पाध्ये प्रत्येक प्रयोगाला एखाद्या नवीन विचारांची, व कल्पनांची कुपी प्रेक्षकांसमोर उघडत असतात.

  • संतोष नेवपूरकर

    पिंपळी रसायनात पीएचडी मिळवलेले औरंगाबादचे वैद्य संतोष नेवपूरकर हे आयुर्वेद व्यासपीठ या संस्थेच्या माध्मातून देशभरात आयुर्वेदातील संशोधनाचे प्रसारकार्य करीत आहेत. विद्यार्थ्यांचा बुध्यांक, बोन मॅरोवरील उपचार याविषयी त्यांनी विविधांगी संशोधन केले आहे. शिरोधारा उपचारासाठी तयार केलेल्या भांड्यासाठी पेटन्ट मिळवण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत.

    संतोष नेवपूरकर यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला संशोधनाची बहुगुणी मात्रा हा लेख पुढील पानावर वाचा.

    संतोष नेवपूरकर यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला संशोधनाची बहुगुणी मात्रा हा लेख वाचा.

    nevpurkar-santosh-modified

  • त्र्यंबक बापूजी ठोंबरे उर्फ बालकवी

    “बालकवी” म्हणून महाराष्ट्राला परिचित असणारे त्र्यंबक बापूजी ठोंबरे.

  • अजित प्रधान

    अजित प्रधानांकडे प्रामुख्याने १९८०पर्यंतच्या हिंदी चित्रपट संगीताचा संग्रह आहे. शंकर-जयकिशन आणि ओ. पी. नय्यर या दोन संगीतकारांचं जवळजवळ सगळं कलेक्शन त्यांच्याकडे आहे. त्याशिवाय सी. रामचंद्र, एस. डी. बर्मन आणि त्या काळातल्या बहुतेक सगळ्या संगीतकारांच्या रेकॉर्ड्स त्यांच्या खजिन्यात आहेत.

  • वसंत रांजणे

    ज्या काळात केवळ फिरकी गोलंदाजी हेच भारतीय क्रिकेटच्या यशाचे मुख्य शस्त्र मानले जात होते, त्या काळात आपल्या मध्यम द्रुतगती गोलंदाजीच्या जोरावर प्रतिस्पध्र्याचा थरकाप उडविणारे गोलंदाज म्हणून वसंत रांजणे यांची ख्याती होती. त्या काळात वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व इंग्लंड आदी संघांकडून कर्दनकाळ म्हणून ओळखले जाणारे अनेक द्रुतगती गोलंदाज क्रिकेट क्षेत्र गाजवीत होते.

    भारतीय क्रिकेट संघटकांनी मात्र रांजणे यांचे कौशल्य अपेक्षेइतके ओळखलेच नाही. त्या काळी जर आपल्या संघटकांनी फिरकीबरोबरच द्रुतगती गोलंदाजीस महत्त्व दिले असते तर विंडीजच्या तोफखान्यासारखीच कामगिरी रांजणे यांच्याद्वारे भारताला करता आली असती. कोणत्याही खेळाडूला पदार्पणाचा सामना उत्साहजनक असला तरी काहीसे दडपणही त्याच्यावर असते, मात्र रांजणे हे मुलखावेगळेच गोलंदाज होते. त्यांनी १९५६-५७ च्या मोसमात रणजीमध्ये पदार्पण करताना पहिल्याच सामन्यात सौराष्ट्राविरुद्ध एकाच डावात ३५ धावांमध्ये हॅट्ट्रिकसह नऊ बळी घेतले. रांजणे यांनी या सामन्यात केवळ ७१ धावांमध्ये १३ बळी घेतले. या कामगिरीमुळे त्यांना कसोटीचीही दारे खुली झाली. १९५८ मध्ये कानपूर येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्याद्वारे त्यांना कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. त्यांनी सात कसोटींमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. कसोटीमध्ये फलंदाजीत त्यांना कौशल्य दाखविण्याची फारशी संधी मिळाली नाही, मात्र गोलंदाजीत त्यांनी १७ बळी घेत कौतुकास्पद कामगिरी केली. १९६१-६२ मध्ये वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर त्यांना भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. या दौऱ्यातील शेवटच्या कसोटीत त्यांनी कॉनरॉड हंट, रोहन कन्हाय, गॅरी सोबर्स, फ्रँक वॉरेल या दिग्गज फलंदाजांना बाद करीत विंडीजला चकित केले होते. या डावात ७२ धावांमध्ये चार बळी ही त्यांची कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली. त्यांनी प्रथम दर्जाच्या ६४ सामन्यांमध्ये १७५ बळी मिळविले. एकाच डावात पाच किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेण्याची किमया त्यांनी सहा वेळा केली, तर एकाच सामन्यात दहा किंवा त्यापेक्षा अधिक गडी बाद करण्याचा पराक्रम त्यांनी दोन वेळा केला. अचूक टप्पा व दिशा ठेवीत गोलंदाजी करणे ही त्यांची हुकमत होती. इंग्लिश वातावरणात चमक दाखविण्याची शैली त्यांच्याकडे होती. वेस्ट इंडिज, इंग्लंडच्या फलंदाजांवर प्रभुत्व त्यांनी गाजविले होते. त्यांची भेदक शैली पाहून फलंदाजीच्या वेळी त्यांना जखमी करीत त्यांना गोलंदाजीस येऊच द्यायचे नाही हे तंत्र विंडीजने यशस्वी केले होते. तरीही रांजणे यांनी मिळेल त्या संधीचा पुरेपूर उपयोग करीत शानदार कामगिरी केली. फलंदाजीत त्यांनी ७०१ धावा केल्या. त्यामध्ये नाबाद ५६ ही त्यांची सर्वाधिक कामगिरी होती. अतिशय गरिबीतून व प्रतिकूल परिस्थितीस तोंड देत क्रिकेट कारकीर्द करणाऱ्या रांजणे यांना तत्कालीन अन्य क्रिकेटपटूंइतकी लोकप्रियता लाभली नसेल, पण प्रसिद्धिपराङ्मुख असलेल्या या खेळाडूने सतत आपल्या संघाच्याच हिताचा विचार करीत कारकीर्द केली. त्यामुळेच ‘अजातशत्रू क्रिकेटपटू’ म्हणूनच त्यांची ख्याती होती. रांजणे यांचा क्रिकेटचा वारसा त्यांचा मुलगा सुभाष यांनी पुढे ठेवताना महाराष्ट्राकडून प्रथम दर्जाच्या सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले. आता सुभाष यांचा मुलगा शुभम हा १९ वर्षांखालील मुलांच्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राकडून चमक दाखवीत आहे. आपल्या आजोबांचे स्वप्न साकार करण्यासाठी तो कसोशीने प्रयत्न करीत आहे.

  • भालचंद्र पांडुरंग कदम उर्फ भाऊ कदम

    मराठी मध्ये होणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमांत भाऊ असायलाच पाहिजे तर कॉमेडी पूर्णत्वाला गेल्यासारखी वाटतें आणि म्हणून होणाऱ्या प्रत्येक अवार्ड शो मध्ये भाऊ च्या बतावण्या ऐकुन प्रेक्षक ही पोट धरून हसताना आपल्याला दिसतात.

  • दा. कृ. सोमण

    ठाणे शहर हे ज्याप्रमाणे संस्कृती कला, परंपरा यांचा आदर करतं त्याचप्रमाणे विज्ञान, तंत्रज्ञान यांचीही कास ठाण्यानी धरली आहे. याचीच साक्ष देतात ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ म्हणून बिरुद मिळालेले श्री. दा.कृ. सोमण.

  • संत रामदासस्वामी (समर्थ रामदास)

    समर्थ श्री रामदासस्वामी

  • खंडेराव रांगणेकर

    प्रत्येक सामन्यामध्ये आपल्या झंझावाती व नैसर्गिक खेळाने विरूध्द गोलंदाजाला चकित करणार्‍या, रांगणेकरांना त्यांच्या तमाम भारतीय चाहत्यांकडून, व मुंबई आकाशवाणीचे कॉमेंटेटर होमी तल्यार खान यांजकडून क्रिकेटचा बाजीराव ही मानाची उपाधी मिळाली होती.

  • विलासराव देशमुख

    कर्तृत्व आणि परिश्रमावर विश्वास असणारा नेता. या विश्वासामुळेच बाभूळगावच्या सरपंच पदापासून सुरु झालेला प्रवास आज केंद्रिय अवजड उद्योग मंत्रालयापर्यंत येऊन ठेपला आहे. दोन वेळा त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविले.