खंडेराव रांगणेकर

प्रत्येक सामन्यामध्ये आपल्या झंझावाती व नैसर्गिक खेळाने विरूध्द गोलंदाजाला चकित करणार्‍या, रांगणेकरांना त्यांच्या तमाम भारतीय चाहत्यांकडून, व मुंबई आकाशवाणीचे कॉमेंटेटर होमी तल्यार खान यांजकडून क्रिकेटचा बाजीराव ही मानाची उपाधी मिळाली होती.



खंडेराव ऊर्फ ‘खंडू’ रांगणेकर हे ठाण्याचे आघाडीचे डावखुरे फलंदाज व क्रीडाविश्वाला लाभलेले अप्रतिम रत्नजडित कोंदण होते. क्रिकेटपटु खंडेराव रांगणेकर यांचा जन्म २७ जूनला झाला.

आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये अनेक जिगरबाज खेळी करून त्यांनी स्वत:चं पर्व गाजवून सोडले होते.

त्यानंतर १९४७ ते १९४८ या काळात भारत विरूध्द ऑस्ट्रेलिया अशा तीन कसोटी सामन्यांमध्ये ते खेळले होते. उत्कृष्ठ तसंच आक्रमक फलंदाज, व पट्टीचे कौशल्यवान क्षेत्ररक्षक अशी त्यांची आशियाई देशांमध्ये ख्याती होती.खंडेराव रांगणेकर हे १९६० साली ठाणे नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून होते.

खंडेराव रांगणेकर यांचे ११ ऑक्टोबर १९८४ रोजी निधन झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Author