नवनीतभाई बार्शीकर यांच्या निधनाने नगर शहराच्या जडणघडणीचे वैभवशाली पर्वच काळाच्या पडद्याआड गेले. सार्वजनिक जीवनातून निवृत्त होऊन पंचवीस-तीस वर्षे झाल्यानंतरही शहराच्या दैनंदिन व्यवहारात पदोपदी होणारा नामोल्लेख हीच त्यांच्यातील अस्सल नगरकराची खरी ओळख होती. राजकारण, अर्थकारण आणि समाजकारण अशा सर्वच आघाडय़ांवर आपल्या कामाची पक्की मोहोर त्यांनी उमटवली. भाईंना नगर शहराची आणि नगर शहराला भाईंची ओळख चिकटली ती त्यामुळेच!
राज्याच्या राजकारणात वैशिष्टय़पूर्ण स्थान असलेल्या नगर जिल्हय़ाच्या लौकिकात मुळातच नगर शहराचे स्थान तसे दुय्यम आहे. सहकार, शेती, पाटपाण्याच्या अनुषंगाने ग्रामीण भागाचा जिल्हय़ात व राज्यातही वरचष्मा आहे. राज्याच्या पातळीवर त्याला धक्का देण्याचे काम नवनीतभाई बार्शीकर यांनी केले. नगर विकासाच्या जोरावर त्यांनी जिल्हा व राज्यातही नगर शहराची स्वतंत्र ओळख निर्माण केली. सधन घरात १३ जानेवारी १९२० ला नवनीतभाईंचा जन्म झाला. स्वातंत्र्यपूर्व काळात चळवळीत सहभागी झालेल्या भाईंनी त्या धकाधकीच्या काळातही शिक्षणाची आस सोडली नाही. पुण्यात फग्र्युसन कॉलेजमधून एम.ए. पूर्ण करून त्यांनी पुढे कायद्याचीही पदवी घेतली. भाईंना कुठल्याही स्वरूपाची राजकीय पाश्र्वभूमी नव्हती. वडिलांचा देशसेवेचा वारसा मात्र त्यांना लाभला. याच प्रेरणेतून सन ४२ च्या चलेजाव आंदोलनात ते सहभागी झाले, त्यात त्यांना सहा महिन्यांचा कारावासही भोगावा लागला. उण्यापुऱ्या ४०-५० वर्षांच्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात त्यांना एकदाच आमदारकीची संधी मिळाली. त्याचेही त्यांनी सोने केले. १९७२ ते ७८ या काळात विविध कारणांनी विधानसभेत नगर शहराचे नाव कायम चर्चेत राहिले. विधिमंडळाच्या लोकलेखा समितीचे अध्यक्ष म्हणून काम करताना भाईंनी राज्यात ठसा उमटवला. नगर शहरात त्यांनी उभ्या केलेल्या मूलभूत सोयीसुविधांचे पुढे राज्यात अनुकरण झाले. अगदी स्मशानभूमीचे उदाहरण घेतले तरी नगरचे अमरधाम पाहून त्या धर्तीवर पुण्यात वैकुंठ स्मशानभूमीची उभारणी झाली! तब्बल ५० वर्षे शहराच्या सार्वजनिक जीवनात नवनीतभाई बार्शीकर सर्वार्थाने केंद्रस्थानी राहिले. ४० वर्षे नगरचे नगरसेवक व त्यातील १८ वर्षे नगराध्यक्ष, वीस वर्षे अर्बन बँकेचे अध्यक्ष ही त्यांची कारकीर्द. विशेष म्हणजे पक्षीय राजकारणाच्या नादी न लागता अपक्ष म्हणूनच भाईंनी प्रदीर्घ काळ नगर शहरावर शब्दश: राज्य केले. त्यांचे हे स्थान हीच नगर शहराची स्वातंत्र्योत्तर काळातील खऱ्या अर्थाने जडणघडण आहे. त्यातूनच त्यांनी स्वत:ची ‘अस्सल नगरकर’ अशी ओळख निर्माण केली आणि नगर शहरालाही आधुनिकतेची नवी ओळख दिली. त्याच्या खुणा आजही शहरात जागोजागी शाबूत आहेत. त्यांची पदोपदी आठवण काढली जाते ती याच कारणामुळे! लोकनियुक्त नगराध्यक्ष, त्या काळात एकमेव अर्थसत्ता असलेल्या नगर अर्बन बँकेचे अध्यक्ष आणि आमदार अशा तीनही संस्थांचा कारभार एकाच वेळी ताब्यात ठेवूनही भाई ‘लार्जर दॅन लाईफ’ झाले नाही. महत्त्वाच्या तिन्ही संस्थांचे सर्वेसर्वा होते तरी त्यांच्या दृष्टीने संस्था मोठय़ा होत्या. सार्वजनिक जीवनातील त्यांच्या निवृत्तीने नगर शहराच्या विकासाची परंपरा खंडित झाली, निधनाने या पर्वाचाच अस्त झाला!
बार्शीकर, नवनीतभाई
नवनीतभाई बार्शीकर यांच्या निधनाने नगर शहराच्या जडणघडणीचे वैभवशाली पर्वच काळाच्या पडद्याआड गेले. सार्वजनिक जीवनातून निवृत्त होऊन पंचवीस-तीस वर्षे झाल्यानंतरही शहराच्या दैनंदिन व्यवहारात पदोपदी होणारा नामोल्लेख हीच त्यांच्यातील अस्सल नगरकराची खरी ओळख होती. राजकारण, अर्थकारण आणि समाजकारण अशा सर्वच आघाडय़ांवर आपल्या कामाची पक्की मोहोर त्यांनी उमटवली. भाईंना नगर शहराची आणि नगर शहराला भाईंची ओळख चिकटली ती त्यामुळेच!
राज्याच्या राजकारणात वैशिष्टय़पूर्ण स्थान असलेल्या नगर जिल्हय़ाच्या लौकिकात मुळातच नगर शहराचे स्थान तसे दुय्यम आहे. सहकार, शेती, पाटपाण्याच्या अनुषंगाने ग्रामीण भागाचा जिल्हय़ात व राज्यातही वरचष्मा आहे. राज्याच्या पातळीवर त्याला धक्का देण्याचे काम नवनीतभाई बार्शीकर यांनी केले. नगर विकासाच्या जोरावर त्यांनी जिल्हा व राज्यातही नगर शहराची स्वतंत्र ओळख निर्माण केली. सधन घरात १३ जानेवारी १९२० ला नवनीतभाईंचा जन्म झाला. स्वातंत्र्यपूर्व काळात चळवळीत सहभागी झालेल्या भाईंनी त्या धकाधकीच्या काळातही शिक्षणाची आस सोडली नाही. पुण्यात फग्र्युसन कॉलेजमधून एम.ए. पूर्ण करून त्यांनी पुढे कायद्याचीही पदवी घेतली. भाईंना कुठल्याही स्वरूपाची राजकीय पाश्र्वभूमी नव्हती. वडिलांचा देशसेवेचा वारसा मात्र त्यांना लाभला. याच प्रेरणेतून सन ४२ च्या चलेजाव आंदोलनात ते सहभागी झाले, त्यात त्यांना सहा महिन्यांचा कारावासही भोगावा लागला. उण्यापुऱ्या ४०-५० वर्षांच्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात त्यांना एकदाच आमदारकीची संधी मिळाली. त्याचेही त्यांनी सोने केले. १९७२ ते ७८ या काळात विविध कारणांनी विधानसभेत नगर शहराचे नाव कायम चर्चेत राहिले. विधिमंडळाच्या लोकलेखा समितीचे अध्यक्ष म्हणून काम करताना भाईंनी राज्यात ठसा उमटवला. नगर शहरात त्यांनी उभ्या केलेल्या मूलभूत सोयीसुविधांचे पुढे राज्यात अनुकरण झाले. अगदी स्मशानभूमीचे उदाहरण घेतले तरी नगरचे अमरधाम पाहून त्या धर्तीवर पुण्यात वैकुंठ स्मशानभूमीची उभारणी झाली! तब्बल ५० वर्षे शहराच्या सार्वजनिक जीवनात नवनीतभाई बार्शीकर सर्वार्थाने केंद्रस्थानी राहिले. ४० वर्षे नगरचे नगरसेवक व त्यातील १८ वर्षे नगराध्यक्ष, वीस वर्षे अर्बन बँकेचे अध्यक्ष ही त्यांची कारकीर्द. विशेष म्हणजे पक्षीय राजकारणाच्या नादी न लागता अपक्ष म्हणूनच भाईंनी प्रदीर्घ काळ नगर शहरावर शब्दश: राज्य केले. त्यांचे हे स्थान हीच नगर शहराची स्वातंत्र्योत्तर काळातील खऱ्या अर्थाने जडणघडण आहे. त्यातूनच त्यांनी स्वत:ची ‘अस्सल नगरकर’ अशी ओळख निर्माण केली आणि नगर शहरालाही आधुनिकतेची नवी ओळख दिली. त्याच्या खुणा आजही शहरात जागोजागी शाबूत आहेत. त्यांची पदोपदी आठवण काढली जाते ती याच कारणामुळे! लोकनियुक्त नगराध्यक्ष, त्या काळात एकमेव अर्थसत्ता असलेल्या नगर अर्बन बँकेचे अध्यक्ष आणि आमदार अशा तीनही संस्थांचा कारभार एकाच वेळी ताब्यात ठेवूनही भाई ‘लार्जर दॅन लाईफ’ झाले नाही. महत्त्वाच्या तिन्ही संस्थांचे सर्वेसर्वा होते तरी त्यांच्या दृष्टीने संस्था मोठय़ा होत्या. सार्वजनिक जीवनातील त्यांच्या निवृत्तीने नगर शहराच्या विकासाची परंपरा खंडित झाली, निधनाने या पर्वाचाच अस्त झाला!