(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • सुरेश भास्कर गायतोंडे

    सुरेश भास्कर गायतोंडे

    अभियांत्रिकी क्षेत्रात नोकरी करुन गेली ५५ ते ६० वर्षे अविरत तबलावादन करुन रसिकांना मंत्रमुग्ध करणारे तबलावादकांमध्ये ज्येष्ठ म्हणून आदराने ओळखले जाणारे ठाणेकर सुरेश तथा भाई गायतोंडे हे ठाण्यातील एक कलारत्न होय.

  • सुधीर पटवर्धन

    महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या भूमीला कलेची दीर्घ संस्कृती आहे. या संस्कृतीचे वारसदार म्हणजे पळशीकर, बहुळकर, हुसे, गायतोंडे, भास्कर कुलकर्णी यांसारखे सरस चित्रकार होय.

  • सुधीर मुनगंटीवार

    मुनगंटीवार, सुधीर

    सुधीर मुनगंटीवार यांची भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी झालेली निवड म्हणजे भाजपच्या महाराष्ट्रातील महाजन-मुंडे यांच्या एकछत्री वर्चस्वाची अखेर, असाच स्पष्ट संकेत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी दिला आहे. नितीन गडकरी यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली त्याच दिवशी सुधीर मुनगंटीवार यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्याचे संकेत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून स्पष्टपणे मिळालेले होते. त्यामुळे प्रसार माध्यमात जेव्हा प्रदेशाध्यक्षपदी ‘मुनगंटीवार की, देवेंद्र फडणवीस की, विनोद तावडे’, अशा बातम्या प्रकाशित होत होत्या तेव्हा या जाणत्यांची चांगलीच करमणूक होत होती.

    आता सुधीर मुनगंटीवार आणि पुढील विधानसभा, तसेच लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होईल तेव्हा विनोद तावडे प्रदेशाध्यक्ष होतील, हे या जाणकारांना चांगले ठाऊक होते. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचे नुसतेच हाकारे काही रिकामटेकडे राजकारणी पिटत असताना महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी सुधीर मुनगंटीवार यांची निवड, हा काही केवळ राजकीय योगायोग नव्हता. या हाकाटीपासून मुनगंटीवार यांनी स्वत:ला कटाक्षाने दूर ठेवले आणि जेव्हा स्वतंत्र विदर्भाच्या संदर्भात मतप्रदर्शन करण्याची वेळ आली तेव्हा आक्रस्ताळेपणा दाखवला नाही की वचावचा वक्तव्येही केली नाहीत. हे जे राजकीय भान आणि सामंजस्य सुधीर मुनगंटीवार यांनी गेली साडेतीन-चार महिने सातत्याने दाखवले त्यामुळेच पुन्हा एखादा वैदर्भीयच प्रदेशाध्यक्षपदी आरूढ होण्याचा मार्गही आणखी सुकर झाला. केवळ याच एका कारणावरून देवेंद्र फडणवीस यांचे नाव मागे पडले आणि सुधीर मुनगंटीवार नावाच्या धडपडय़ा, कष्टाळू आणि वयाच्या पन्नाशीच्या उंबरठय़ावर असलेल्या, विलक्षण राजकीय आकलन असणाऱ्या अशा या नितीन गडकरींच्या विश्वासू कार्यकर्त्यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडली. व्यवस्थापनशास्त्रासह तीन पदव्या तसेच, तीन पदव्युत्तर पदव्या, अशी झळझळीत शैक्षणिक पाश्र्वभूमी असलेल्या आणि महाराष्ट्राच्या एका टोकावर असलेल्या चंद्रपूरसारख्या आदिवासी भागातला प्रसंगावधानी आणि राजकीय महत्त्वाकांक्षा असणारा कार्यकर्ता म्हणून सुधीर मुनगंटीवार यांची संपूर्ण विदर्भाला आणि बहुतांश महाराष्ट्राला ओळख आहे. विद्याथीदशेपासूनच चळवळीत असणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनी १९८१ मध्ये सक्रिय राजकारणात प्रवेश करून स्थानिक नेत्यांनी दिले ते काम अतिशय नेटाने सांभाळले. या निष्ठेने काम करण्याचे फळ म्हणून त्यांना १९८९ आणि ९१ अशा दोन लोकसभा निवडणुकींत उमेदवारीही मिळाली. काँग्रेसच्या ज्या शांताराम पोटदुखेंसारख्या तुल्यबळ उमेदवारांसमोर या दोन्ही निवडणुकींत मुनगंटीवार यांना पराभव स्वीकारावा लागला तेच शांताराम पोटदुखे आज सुधीर मुनगंटीवार यांच्या राजकीय कर्तृत्वाचे कौतुक मुक्तकंठाने करतात. हे जसे पोटदुखे यांचे मोठेपण आहे, तसेच राजकारणापुरते राजकारण आणि विकासाबाबत व्यापक दृष्टिकोन, वयाने आणि अनुभवाने ज्येष्ठांबद्दल आदर, या मुनगंटीवार यांच्या कामाच्या त्रिसूत्रीचे हे यश आहे. या गुणांसोबत व्यापक जनसंपर्क, त्याला प्रभावी वक्तृत्वाची जोड आणि विकासाची तळमळ, असे अनेक पदरही लाभलेले आहेत. मतदारसंघातली कामे करत असताना केवळ आर्थिकदृष्टय़ा बडय़ा किंवा मध्यमवर्गीय मतदारांवरच मुनगंटीवार यांनी लक्ष केंद्रित केले नाही. धडधाकटांसोबतच अंध, अपंग, दीनदुबळय़ांना सुधीर मुनगंटीवार हक्काचा आधार वाटतात. त्यामुळेच मुनगंटीवारांचे वाहन चंद्रपुरातून जात असले की, ‘सुधीरभाऊ’ अशी हाक गल्लीच्या कोणत्याही कोपऱ्यातून हक्काने येते आणि मुनगंटीवार रस्त्यात थांबून त्या माणसाला दिलासा देतात, असे मतदारांशी मुनगंटीवारांचे प्रामाणिक नाते आहे. १९९५ पासून सलग चार विधानसभा निवडणुकींत सुधीर मुनगंटीवार विजयी झाले. मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांशी जोडली गेलेली नाळ किती अतूट आहे, याचे उत्तम उदाहरण म्हणजे मुनगंटीवार यांचे हे सलग चार विजय आहेत. प्रदेशाध्यक्षपद म्हणजे आजवरच्या स्वच्छ आणि निष्ठापूर्वक केलेल्या कामाचे मुनगंटीवार यांना मिळालेले फळ आहे.

  • सुधीर वैद्य

    सुधीर वैद्य हे भारतामधील अत्यंत प्रथितयश व सर्वपरिचीत असे व्यावसायिक संख्यातज्ञ, संकलक, व क्रिकेटविषयक चतुरस्त्र लेखन करणारे प्रतिभावंत लेखक आहेत.

    गेली ५० वर्षे भारतामध्ये व भारताबाहेर खेळवल्या गेलेल्या प्रत्येक कसोटी व एकदिवसीय क्रिकेट सामन्याचा संपूर्ण लेखाजोगा, त्या सामन्यातील प्रत्येक रंगतदार क्षणांसह त्यानी आपल्या संग्रही जतन केला गेल्या असल्याने, साहजिकच क्रिकेटमधील जाणकारांचा व चाह्त्यांचा त्यांच्याकडे कायम राबता असतो.

    क्रिकेट डोळसपणे पाहण्याची व त्यातील सर्व बारीक घडामोडी, तांत्रिक आकडेमोड, गोलंदाजांनी टिपलेले बळी, फलंदाजांनी ठोकलेल्या धावा, पकडले गेलेले झेल, दोन्ही संघांच्या व्यूहरचना व धावसंख्या एवढेच काय, तर त्या सामन्याचे ठिकाण व ऐतिहासिक महत्व अशा 'अ पासून ते ज्ञ' पर्यंतच्या सगळ्या तांत्रिक व अतांत्रिक माहितीचे संकलन करणे, ही त्यांची, लहानपणापासून जाणीवपुर्वक वृध्दिंगत केली गेलेली आवड होती. या आवडीला व्यावसायिक साचा देण्यात ते पुर्णतः यशस्वी ठरले आहेत.

    गेली पंधरा वर्षे भारतीय क्रिकेट बोर्ड त्यांच्या अचूक विश्लेषणांचा व काळजीपुर्वक केल्या गेलेल्या सांख्यिक निरीक्षणांचा लाभ अव्याहतपणे घेत आहे. असामान्य विश्वासार्हता, ही त्यांनी आजवर या क्रीडा पटलावरती निरंतर काम व प्रामाणिक मेहेनत करून केलेली कमाई आहे.

    भारतीय क्रिकेट बोर्डाकडून दर वर्षी संपादित व प्रकाशित केल्या जाणार्‍या विविध सांख्यिक वार्षिक अंकांचे लेखन गेली अनेक वर्षे ते नियमीतपणे करत आले आहेत. क्रिकेट या खेळाचा जेव्हा व्यावसायिक दृष्टीने पुनर्जन्म झाला, तेव्हापासून आतापर्यंत झालेले जवळजवळ २००० कसोटी सामने, ३,१०० एकदिवसीय सामने, व ५००० प्रथम श्रेणी क्रिकेट सामने, या सगळ्या सामन्यांचा विस्तृतपणे घेतलेला आढावा, तसेच सांखिक व असांख्यिक माहितीचा दुर्मिळ खजिना त्यांच्याकडे, विविध आकाराच्या फाईली व रजिस्टर पुस्तकांमध्ये सुरक्षित आहे. यासाठी नुकतीच त्यांच्या नावाची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् मध्येही झाली आहे.

    गेली अनेक वर्षे सुधीर वैद्य यांचा मुक्काम ठाणे शहरात आहे. मध्यंतरी दाभोळ येथील एन्रॉन वीज प्रकल्पाचे जनसंपर्क अधिकारी म्हणुनही त्यांनी काम पाहिले होते.

  • सुरेंद्र शांताराम दिघे

    सुरेंद्र दिघे हे जिज्ञासा ट्रस्टचे संस्थापक आहेत. जिज्ञासा ट्रस्ट, ठाणे ही संस्था १९९२ साली स्थापन झाली. जिद्द-ज्ञान-साहस या चित्रसूत्रांवर आधारित गेले जवळ जवळ २० वर्ष काम करत आहे.

  • सुलोचनाबाई

    सुलोचनाबाईंनी २५० पेक्षाही अधिक मराठी चित्रपटांतून विविध व्यक्तिरेखा सादर केल्या तसंच सुमारे १५० हिंदी चित्रपटांमधुन चरित्र-अभिनेत्री सोबतच आईच्या भूमिका साकारुन त्या लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवल्या आहेत.

  • सुमती पायगावकर

    मराठी बालवाड्.मयात असंख्य लहान मुलांच्या चेहर्‍यावर हसू उमटेल अश्या असं दर्जेदार बालसाहित्य निर्माण करण्यात महत्वाचं योगदान देणार्‍या सुमती पायगावकर यांचा जन्म १९१० साली झाला. संस्कारपुर्ण लेखन व निखळ मनोरंजनाची खात्री असलेली त्यांची पुस्तके मराठी कुटुंबियांमध्ये व बच्चेकंपनीमध्ये लाडकी व आवडती ठरली आहेत.

    बालसाहित्याची लेखिका म्हणून सुमती यांनी “पतंग“, “शेंडू“, “शिंपला“, “गीतकलिका“, “फेनाली“, “जिमी“, “दर्यासारंग सिंदबाद“, “हिमाली“, “आटपाटनगर“, “स्वप्नरेखा“ , “रानगावची आगगाडी“, “फाटफूट धूम“, “कावळोबाच्या गमती“ अशा ऐकुण ८० पुस्तकांच्या प्रकाशनाद्वारे आपल्या लेखनाची मोहोर यशस्वीपणे उमटविली आहे.

    केंद्र शासनाचे १९५८, १९५९, व १९६१ या वर्षाचे बालवाड्.मयासाठीचे पुरस्कार सुमती पायगावकर यांना प्राप्त झाले. त्यांच्या “मिनीची बाहुली“, “पोपटदादाचे लग्न“ या पुस्तकांना राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. “हॅन अँडरसन“ या पुस्तकामधून त्यांनी १२ भागांमध्ये केलेले परीलेखनदेखील प्रचंड गाजले होते.

    १९७७ साली सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या सुमती पायगावकर अध्यक्षा होत्या.

  • सुनिता पुरुषोत्तम देशपांडे

    सुनिता देशपांडे ह्यांनी पु. ल. देशपांडेंच्या जीवनपटलावरती धावती नजर फिरवणारे, व त्यांच्या व्यक्तीमत्त्वातील विविध पैलूंवर प्रकाश टाकणारे “आहे मनोहर तरी” या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. या आत्मचरित्राची तमाम मराठी साहित्यप्रेमींकडून दाद मिळाली.

    १२ जुन १९४६ साली पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थात पुलं सोबत विवाहबध्द होउन पुढे संसाराची धुरा आनंदाने व यसस्वीरित्या पेलली “सोयरे सकाळ”, “प्रिय जी.ए.”, “समांतर जीवन”, “मण्यांचीमाळ”, याशिवाय “मनातलं अवकाश” हा सुनिता देशपांडे यांचा लेखसंग्रह, २००४ ते २००६ दरम्यान विविध वर्तमान पत्र तसेच दिवाळी अंकांमधुन प्रसिध्द झालेल्या लेखाचं पुस्तकही वाचकांच्या पसंतीस उतरले.

    यासोबतच अनेक विषयावरील दर्जेदार पुस्तके व कादंबर्‍या लिहून सुनिता देशपांडे यांनी चौकस व प्रतिभावंत लेखिका म्हणुन स्वत:ची ओळख मिळविली आहे .

    ७ नोव्हेंबर २००९ रोजी सुनिता देशपांडे यांचे वृध्दापकाळाने निधन झाले.

    (लेखन व संशोधन - सागर मालडकर)

    अधिक माहितीसाठी खालील लिंक्स क्लिक करा.

    सुनीता देशपांडे (7-Nov-2016)

    लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या सुनीता देशपांडे (3-Jul-2017)

    मराठी लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या सुनीता देशपांडे (3-Jul-2018)

  • सुरेश काशिनाथ टावरे

    सुरेश काशिनाथ टावरे हे भिवंडी नगरीचे प्रथम महापौर व याच लोकसभा मतदारसंघामधून २००९ मध्ये खासदार म्हणुन निवडून आले होते. सामान्य जनतेपासून ते उच्चभ्रू लोकवस्तीमध्ये राहणार्‍या मतदारांना भेडसावणार्‍या समस्या मुळापासून सोडवणे हा त्यांच्या व्यक्तित्वामधील असाधारण असा गुण आहे. २०१० ते २०११ या आर्थिक वर्षामध्ये आपल्या स्थानिक विकास निधीतून सुचविलेल्या ३२ विकास कामांना प्रशासकीय मान्यता मिळालेली असून सुमारे १ कोटी ९९ लाख रूपये खर्चाची कामे मतदारसंघात पूर्ण केली आहेत. यामध्ये शाळांचे वर्ग बांधणे, स्मशान भूमी रोड विंधन विहीर व गटारे बांधणी, पाऊल वाट, रस्ते दुरूस्ती, आणि काँक्रिटीकरण चा समावेश आहे. आपल्या मतदारसंघातील नागरिकांचे सार्वजनिक आरोग्य चिकीत्सा शिबीर मोठ्या प्रमाणावर आयोजित केले होते. यामध्ये काही रूग्णांना मोफत औषधे व काही रूग्णांना चष्मे वाटण्यात आले होते.

    त्यांच्या मतदारसंघातील ज्या ज्या गरीब लोकांना मोठया व महागडया आजारांनी ग्रासले होते, त्यांना या शिबीरानंतर निराश न होण्याचा संदेश दिला गेला, इतकेच नाही तर त्यांच्या उपचारांसाठी पंतप्रधान सहायता निधीमधून ४४ रूपयांना ३२ लाख रूपयांचे अर्थसाहाय्य त्यांनी मिळवून दिले. त्याचप्रमाणे ग्रामीण पाणी टंचाई दूर करण्यासाठी बोअरवेल अधिक खोल करण्याचे अनोखे अभियान त्यांनी सुरू केले ज्यासाठी लागणारा संपुर्ण खर्च हा शेतकर्‍यांच्या खिशातून एक पायलीही न काढता, खासदार निधीमधून भागवण्यात आला.

    भारत निर्माण अभियानाअंतर्गत शासनांच्या विविध योजनांची माहिती तमाम शेतकरी वर्गापर्यंत पोहोचविण्याचे त्यांनी केलेले प्रयत्न व त्यांना आलेले यश आजही वाखाणले जाते.

  • सुभाष दत्तात्रय फडके

    नाट्य – सिने क्षेत्रात आपल्या प्रतिभेने अजोड कामगिरी करुन दाखविणारे लेखक, दिग्दर्शक सुभाष फडके हे ही ठाण्याचेच रहिवासी आहेत. ३० ते ३५ वर्षं चित्रपट क्षेत्रात लेखक-दिग्दर्शक म्हणून त्यांनी भरीव योगदान दिले आहे.