सुरेंद्र दिघे हे जिज्ञासा ट्रस्टचे संस्थापक आहेत. जिज्ञासा ट्रस्ट, ठाणे ही संस्था १९९२ साली स्थापन झाली. जिद्द-ज्ञान-साहस या चित्रसूत्रांवर आधारित गेले जवळ जवळ २० वर्ष काम करत आहे.
प्रल्हाद केशव अत्रे, विनायक दामोदर सावरकर, पु.ल. देशपांडे, चिं.वि. जोशी, अ.वा. वर्टी यांच्यासह अनेक साहित्यिकांच्या पुस्तकांची मुखपृष्ठे मुळगावकरांच्या कुंचल्याने सजली. त्याचप्रमाणे दीपलक्ष्मी, धनुर्धारी, वसंत, अनुप्रिता, नंदा, माधुरी, माणिक, अलका, पैंजण अशा अनेक नियतकालिकांची व त्यांच्या दिवाळी अंकांची मुखपृष्ठे मुळगावकरांच्या कुंचल्याने साकारली.
पं. दीक्षित बरीच वर्षे खाँसाहेबांच्या सान्निध्यात राहिल्याने खाँसाहेबांच्या सतार वादनातील गायकी अंग व त्यामधील बरेच बारकावे ज्ञात झाल्याने ते त्यांनी बऱ्यापैकी आत्मसात केले होते. त्यामुळे दीक्षित यांच्या सतार वादनात खाँसाहेबांचा पगडा भासत असे.
खाँसाहेब कधीकधी फिरायला जाताना भाऊंना घेऊन जात. फिरता फिरता त्यांचे काही अनुभव, कधी उपदेश, कधी त्या दिवशी भाऊंचा ऐकलेला रियाज यावर टिप्पणी करून खाँसाहेब सूचना करीत. ते दिवस भाऊंनी हृदयात जपून ठेवले होते. खाँसाहेब आणि त्यांचं कुटुंब हे भाऊंनी जन्मभर पुण्य मानलं.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या मेघराज राजे भोसले यांनी १९९७ मध्ये ‘पांडव एंटरप्रायजेस’ या चित्रपट निर्मिती संस्थेची स्थापना करून ‘जाऊ तिथे खाऊ’, ‘मास्तर एके मास्तर’, ‘डंक्यावर डंका’, ‘संत वामनभाऊ’ या चार मराठी चित्रपटांची निर्मिती केली.
त्यांच्या स्वभावातच अणकुचीदारपणा होता. टीका करायची तर ती समोरच्या व्यक्तीला बोचणारीच असली पाहिजे, तरच त्या टीकेला काही अर्थ असे. आपले म्हणणे स्पष्टपणे समोरच्याला समजेल अशा भाषेत सांगताना त्यांनी कुणाचाही मुलाहिजा बाळगला नाही. चित्रे काढायची तर त्यातही कुंचल्याचा फटकारा ‘शार्प’ असे. कुशल प्रशासक, कोणत्याही राजकीय पक्षाच्या वळचणीला न जाता समाजाशी कायम आपले लागेबांधे ठेवणारा आणि तरीही राज्याचा सांस्कृतिक ठेवा जपण्यासाठी मनाचा हळवा कोपराही जपणारा असे एक वेगळे रसायन सदाशिवराव तिनईकर यांच्यात होते.
म्हणूनच शिवसेनेशी शाब्दिक दोन हात करणारे आयुक्त तिनईकर महाराष्ट्राच्या ‘मराठी’ सांस्कृतिक ठेव्याला उत्तेजन देण्यासाठीही प्रयत्नरत असत. दर महिन्याला विविध प्रांतांतील सर्वोत्तम गायक, वादकांना आमंत्रित करून त्यांची कला निमंत्रितांपुढे ते सादर करत. एका वर्षी तुकाराम बीज साजरी करण्यासाठी त्यांनी वि. स. पागे यांचे कीर्तन आयोजित केले होते. राज्य सरकारने वेदपठण करणाऱ्या मंडळींचा सत्कार केला तेव्हा त्या मंडळींना त्यांनी आयुक्तांच्या बंगल्यावर बोलवून त्यांच्या सन्मानार्थ मेजवानी आयोजित केली होती. वाङ्मय, साहित्य, कला यात रुची असणाऱ्या तिनईकरांचे इंग्रजीवर फर्डे प्रभुत्व होते. मुंबईत सिमेंट-काँक्रीटच्या रस्त्यांना सुरुवात झाली ती त्यांच्याच काळात. स्वातंत्र्योत्तर काळात देशात नवनिर्माणाच्या संकल्पनेचा पुरस्कार करणारी उच्चविद्याविभूषितांची जी एक तडफदार पिढी उदयाला आली तिची अस्सल ओळखमुद्रा म्हणजे सदाशिव तिनईकर. भारतीय प्रशासन सेवेच्या माध्यमातून सरकारच्या विविध विभागांची शक्य तितकी ‘साफसफाई’ करणाऱ्या या कर्तव्यकठोर व्यक्तिमत्त्वाच्या कारकीर्दीचा अखेरचा टप्पा म्हणजे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्तपद. तिनईकरांनी अशी काही कामगिरी बजावली की, ती एखाद्या सनदी अधिकाऱ्याने आपल्या सत्यान्वेषणाच्या भूमिकेबाबत अखेपर्यंत कसे आग्रही असायला हवे, याचा वस्तुपाठ ठरली. भारतीय प्रशासन सेवेच्या १९५६ च्या तुकडीतून जे पाच अधिकारी महाराष्ट्राच्या सेवेत आले त्यापैकी तिघे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त झाले. जमशेद कांगा, द. म. सुकथनकर आणि सदाशिव तिनईकर. या तिघांनीही आयुक्तपदाच्या कारकीर्दीवर आपला स्वतंत्र ठसा उमटवला. मात्र तिनईकर हे सर्वार्थाने ‘मुंबईकर’ ठरले. या शहरावर त्यांचे विशेष प्रेम होते आणि त्यांनी हे शहर बकाल होण्यास कारणीभूत असणाऱ्या प्रवृत्तींवर अंकुश ठेवला. तो ज्यांना रक्तबंबाळ करून गेला त्या सत्ताधारी शिवसेनेने अर्थातच तिनईकरांविरोधात आकांडतांडव केले. विशेषत: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि तिनईकर यांचे महापौर आणि आयुक्तांच्या अधिकारांबाबत तीव्र मतभेद झाले. मात्र नियम आणि कायद्यापुढे कुणीही व्यक्ती मोठी नाही, हे तत्त्व तिनईकरांनी ठामपणे पाळले. त्यांची शिवसेनाविरोधाची ही प्रतिमा एवढी मोठी झाली की, काही काळ हीच त्यांची ओळख ठरली. मात्र हे चित्र खरे नव्हते. याचे कारण तिनईकरांची तळमळ ही महानगरपालिकेतील आर्थिक बजबजपुरीविरोधात होती. तिनईकरांच्या पालिका बरखास्तीच्या शिफारशीवरून तर राजकीय पक्षांत गहजब झाला. पालिका प्रशासन, पालिकेची आर्थिक घडी यांचा तिनईकरांनी खास अभ्यास केला होता. झपाटय़ाने वाढत चाललेल्या मुंबई शहराचे विद्रूपीकरण पालिकेच्या माध्यमातूनच कसे रोखता येईल, याबाबत ते कमालीचे दक्ष होते. मुंबईबाबतची त्यांची ही कळकळ जाणूनच उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या व्यासपीठावर त्यांना बोलावून आपल्या नगरसेवकांना उपदेशाचे चार डोस पाजले आणि नियतीच्या अजब न्यायाचे एक वर्तुळ पुरे झाले. स्वच्छ चारित्र्याचा आग्रह, स्पष्टवक्तेपणा आणि उत्तम प्रशासकाची दूरदृष्टी लाभलेल्या तिनईकरांचे म्हणूनच देशपातळीवर कौतुक झाले. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनीही तिनईकरांच्या कर्तव्यकठोरतेची आणि मतांची दखल घेतली होती. विधिनिषेधशून्यता आणि भ्रष्ट आचरणाचा कळस गाठल्या जाणाऱ्या काळात तिनईकर ताठ मानेने वावरले आणि व्रतस्थ योग्याप्रमाणे ठाम राहात निर्भीडपणे जगले.
Text from News-0012-LS
----------------------------------
मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त स. शं. तिनईकर यांचे निधन
प्रशासकीय सेवेवर कर्तृत्वाचा स्वतंत्र ठसा उमटविणारे आणि कडक शिस्तीचे भोक्ते असणारे मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त सदाशिवराव तिनईकर पालिकेतील सत्तारूढ शिवसेना आणि प्रशासन यांच्यातील संघर्ष तिनईकर यांच्या काळात टिपेला पोहोचला होता. मुंबईतील सर्व राजकीय पक्षांची अनधिकृत कार्यालये तोडण्याचे आदेश त्यांनी दिले होते. मात्र बहुतांशी शिवसेनेच्या शाखांवरच त्यांचा हातोडा पडल्याने शिवसेना आणि त्यांचे विळ्या-भोपळ्याचे सख्य होते. महापालिका तोट्यात गेली असताना तिनईकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली होती. त्यांनी केलेल्या शिफारशींमुळे पालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत झाली होती. प्रशासनाचा एखादा प्रस्ताव १५ दिवसांमध्ये मंजूर करण्यात आला नाहि तर तो मंजूर झाला असे गृहीत धरण्यात येईल. असे फर्मान तिनईकर यांनी काढले होते. त्याचे तीव्र पडसाद त्यावेळी पालिकेत उमटले होते.
VV
News
पाटील, सा. रे.
ब्रिटिश राज्य असताना म्हणजे १९३४ मध्ये त्यांनी शेतीत घाम गाळण्यास सुरूवात केली ती त्या वेळच्या पारंपरिक साधनांनिशी आणि त्यानंतर तब्बल शहात्तर वर्षे उलटल्यानंतरही अत्याधुनिकता जोपासत, नव्या जमान्याचे सूर आळवत ते उमेदीने शेती करीत आहेत. शेतीच्या मशागतीपासून त्यांनी आयुष्याला सुरूवात केली. त्यानंतर आतापर्यंतच्या प्रदीर्घ प्रवासात त्यांनी राजकीय, सामाजिक क्षेत्राच्या केलेल्या मशागतीमुळे महाराष्ट्रातील ग्रामीण जीवनाला आकार येऊ लागला.
म्हणूनच वयाच्या तब्बल ८९ वर्षीही तरूणाच्या उत्साहाने कार्यरत असणाऱ्या सा. रे. ऊर्फ अप्पासाहेब पाटील यांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा कृषी-औद्योगिक समाजरचना पुरस्कार मिळणे यथोचितच ठरते. कोल्हापूर जिल्ह्य़ातील शिरोळ तालुक्यात असलेल्या जांभळी या गावी ११ डिसेंबर १९२१ ला जन्मलेल्या अप्पासाहेबांना लहानपणापासूनच शेतीची आवड होती. वडील रेवगोंडा पाटील यांच्याबरोबरच वयाच्या १३-१४ वर्षांपासून ते शेतीची सर्व कामे करू लागले. त्याचवेळी कुस्ती आणि मलखांब खेळू लागल्याने शरीरयष्टी उत्कृष्ट झाली. अफाट वाचन, कष्ट करण्याची तयारी, जिद्द या जोरावर त्यांनी आयुष्याचा प्रवास सुरू केला. मित्रपरिवार मोठा असल्याने त्यातून त्यांना समाजवादाचे धडे मिळाले. सहकाराचा प्रसार आणि बोलबाला पुढे महाराष्ट्रात झाला, पण १९४६ मध्ये जांभळी गावातील शेतक ऱ्यांना एकत्र आणून सेवा सोसायटीची स्थापना त्यांनी केली. गांधीजींच्या विचाराने प्रभावित झाल्याने ग्रामस्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्नही त्यातून झाला. शिरोळ तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या व्यवस्थापकपदी १९५१ मध्ये त्यांची निवड झाल्याने गावातील काम तालुका पातळीवर आले. या दरम्यानच संयुक्त महाराष्ट्राच्या सुरू झालेल्या चळवळीत त्यांनी भाग घेण्यास सुरुवात केली. त्यातूनच साने गुरुजी, मधु दंडवते, अच्युतराव पटवर्धन, एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, ग. प्र. प्रधान आदींच्या सान्निध्यात ते आले आणि या नेत्यांची साधी राहणीही त्यांच्यात उतरली. राष्ट्र सेवा दल, साने गुरुजींचे साधना साप्ताहिक या चळवळीत ते रमू लागले. १९५७ च्या विधानसभेच्या निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र समितीने त्यांना शिरोळमधून उमेदवारी दिली. या चळवळीच्या निमित्ताने त्यांनी ‘इंद्रधनुष्य’ हे दैनिक कोल्हापुरातून सुरू केले होते. १९९९ मध्ये आणि २००९ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीतही जनतेने त्यांना निवडून दिले. सहकार क्षेत्रातील त्यांचे कामही सुरूच होते. शिरोळला श्री दत्त सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीत त्यांनी मोलाचा वाटा उचलला. या कारखान्याचे ते संस्थापक संचालक असून आजपर्यंत अध्यक्ष-उपाध्यक्ष-संचालक अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत. या कारखान्याच्या स्थापनेपूर्वी कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील नद्यांना उपलब्ध असलेले पाणी विचारात घेऊन सहकारी तत्त्वावर २० पाणीपुरवठा योजनांची स्थापना त्यांनी केली. राजकारणातील कामगिरीसाठी एस. एम. जोशी-दंडवते-पटवर्धन आदींपासून स्फूर्ती त्यांनी घेतली, तशीच सहकार क्षेत्रातील कामासाठीची स्फूर्ती त्यांना मिळाली ती धनंजयराव गाडगीळ, वैकुंठभाई मेहता आदींकडून. सहकार क्षेत्रातील राज्य भूविकास बँक, राज्य सहकारी संघ यांचे संचालक, जयसिंगपूर उदगाव सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. उदगाव टेक्निकल हायस्कूल, जांभळी हायस्कूलची स्थापना त्यांनी करून शिक्षण क्षेत्रावरही ठसा उमटवला. शेती हा त्यांचा पहिल्यापासूनच आवडीचा विषय असल्याने शेतीमधील नव्या तंत्रज्ञानाबाबत ते कायम आग्रही असतात. नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या त्यांच्या कळकळीमुळेच ते ताजेपणाने विचार करू शकतात. कोणतेही नवे तंत्र ते स्वीकारण्यास अप्पासाहेब कायम तयार असल्याने सर्वात वयोवृद्ध आमदार अशी त्यांची ओळख न राहता उत्साहाने सळसळणारे तरूण आमदार-नेते अशी त्यांची ओळख करून द्यावी लागते. त्यांच्या या सततच्या धडपडीला चव्हाण प्रतिष्ठानकडून मिळालेला हा मुजरा सार्थच ठरतो.
भारतातील हाताच्या बोटांवर मोजता येणार्या द्विभाषिक लेखकांमध्ये व नामांकित कादंबरीकारांमध्ये किरण नगरकर ह्यांचे नाव प्राधान्याने घेण्यात येते. मुंबई या महानगरीतील कनिष्ठ वर्गीयांचे खुमासदार आणि अंतर्मुख करणारे वर्णन वाचकांसमोर उलगडणारी, नगरकरांची १९९४ साली प्रकाशित झालेली ‘रावण अँड एडी’ ही कादंबरी बहुचर्चित ठरली.
संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचे सरकार येणे काहीसे दुरापास्त झाले होते. काही आमदारांचे संख्याबळ कमी पडत असताना यशवंतराव चव्हाणांना साथ मिळाली ती विदर्भातील काँग्रेसच्या आमदारांची. त्यावेळी विदर्भात कामगार चळवळीत अग्रेसर असलेले काँग्रेसचे नेते नरेंद्र तिडके यांनी पुढाकार घेत २३ आमदारांची ताकद यशवंतरावांच्या पाठीशी उभी केली आणि राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन झाले.
कायम समन्वयाची भूमिका घेणारे आणि तीच त्यांची प्रतिमा असलेले नरेंद्र तिडके तेव्हापासून राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले असे म्हटले तर वावगे ठरू नये. यशवंतरावांच्या बाजूने म्हणजेच काँग्रेसच्या बाजूने कायम उभे राहणारे नरेंद्र तिडके संयुक्त महाराष्ट्रवादी नसले तरी ते स्वतंत्र विदर्भवादीही नव्हते. विदर्भाचा विकास झाला पाहिजे यासाठी आग्रह धरतानाच स्वतंत्र विदर्भाची मागणी कधीही न करणाऱ्या नरेंद्र तिडके यांचे व्यक्तिमत्त्व मृदूभाषी, सर्वाना सोबत घेऊन चालणारे आणि कोणालाही टोकाचा विरोध न करणारे असे होते. म्हणूनच राज्यातील कामगार आणि भांडवलदार यांची विळ्या-भोपळ्याची मोट बांधण्याचे काम त्यांना सहज जमले. विदर्भाच्या शेतकरी वर्गातून म्हणजेच कास्तकार वर्गातून आलेले तिडके महाराष्ट्राच्या स्थापनेपूर्वी विदर्भात कामगारांचे नेते म्हणून ओळखले जात. मात्र कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी काँग्रेसची साथ सोडली नाही तर कायम काँग्रेसलाच साथ केली. कधीही एका वर्गाची बाजू न घेता समन्वयाच्या भूमिकेतून अनेक प्रश्न सोडविण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
दीर्घकाळ कामगार आणि उद्योग विभागाचे मंत्रिपद सांभाळणाऱ्या तिडके यांच्या काळात कामगारांच्या संपाचे प्रमाण काहीसे कमी होते. राज्यातील कामगार धोरणाला आकार देण्याचे काम त्यांच्याच काळात झाले. अत्यंत हळू आवाजात बोलणारे तिडके यांचे म्हणणे चर्चेच्या काळात कामगार नेत्यांना आणि भांडवलदारांना (मालकांना) कधीही ऐकू येत नसे, म्हणून कदाचित कामगार आणि भांडवलदार यांच्यात समन्वय साधण्यात ते यशस्वी झाले असावेत, असे विनोदाने बोलले जात असे. अनेक कामगार संघटनांचे पदाधिकारी म्हणून प्रदीर्घ काळाचा अनुभव असलेल्या तिडके यांनी १९५६ आणि १९६९ मध्ये जिनिव्हा येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेच्या परिषदेत भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्त्व केले होते.
१९५६ मध्ये ऑक्सफर्ड येथे झालेल्या राष्ट्रकुल देशांच्या परिषदेत त्यांनी भाग घेतला होता. १९४२ च्या स्वातंत्र्यलढय़ात विद्यार्थी दशेत सहभागी झालेल्या तिडके यांनी कारावासही भोगला होता. १९५२ मध्ये तत्कालीन मध्यप्रदेश राज्य विधानसभेचे सदस्य म्हणूनही संसदीय कामकाजाचा अनुभव घेतला होता. १९५३ मध्ये तत्कालीन मुंबई राज्य विधानसभेवर त्यांची निवड झाली होती. १९६० मध्ये प्रथम उपमंत्री म्हणून राज्य मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला आणि त्यानंतर त्यांनी ग्रामीण विकास, कामगार, उद्योग, ऊर्जा, मुद्रणालये, नियोजन आणि विधानकार्य आदी विभागांचे मंत्री म्हणून कामकाज सांभाळले. १९७६ मध्ये राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थितीत त्यांनी काही काळ हंगामी मुख्यमंत्री म्हणूनही काम सांभाळले होते. कधीही कोणत्याही प्रश्नावर न चिडता सर्वाना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिडके यांनी संसदीय कामकाजमंत्री म्हणूनही आपला ठसा उमटवला.
विधिमंडळाच्या कामकाजामध्ये सुसूत्रता आणणाऱ्या तिडके यांना आदर्श संसदीय कामकाजमंत्री म्हणूनही गौरविले जातेच पण त्यांच्या काळातील विधिमंडळाच्या कामकाजाचा अनेकदा दाखला देण्यात येतो. सध्या काँग्रेसमधील अनेक गटातटात सुरू असलेल्या कुरघोडीच्या राजकारणामध्ये नरेंद्र तिडके यांच्यासारख्या समन्वयकाची उणीव भासते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष असताना किंवा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (आय) पक्षाच्या निवडणूक आघाडीचे प्रमुख म्हणून काम करीत असताना तिडके यांनी कधीही अंतर्गत गटबाजीला खतपाणी घातले नाहीच, पण अशी गटबाजी होऊ नये यासाठी सर्वच घटकांना एकत्र आणण्याचेच प्रयत्न केले. त्यांच्या निधनाने काँग्रेस एका सच्चा समन्वयवादी काँग्रेस नेत्याला मुकली आहे.
VV
दूरदर्शनवर त्यांनी ‘माध्यम चित्रवाणी’ नावाचे पुस्तक लिहिले. या पुस्तकाला राज्य सरकारचा सवरेत्कृष्ट पुरस्कारही मिळाला. त्याचबरोबर बालसाहित्यिक म्हणून त्यांची वेगळी ओळख होती. त्यांनी मुलांसाठी सुमारे ३०० पुस्तके लिहिली.
Copyright © 2025 | Marathisrushti