मनोहर पर्रीकर २००० ते २००५ व २०१२ ते २०१४ ह्या कालावधीत गोवा राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर होते. पर्रिकर यांच्याकडे गोव्याचे राजकारण आमुलाग्र बदलणारे नेते म्हणून गोव्यात पाहिले जाते. संघाच्या विचारधारेत वाढलेले पर्रिकर मोदींप्रमाणेच डिक्टेटर सारखे काम करतात. त्यांचाही त्यांच्या मंत्र्यांवर कमी विश्वास आहे. आठवड्याचे सातही दिवस आणि दिवसाचे चोवीस तास कामात घालविणारे पर्रिकर मोदींप्रमाणेच अतिशय शिस्तीचे, वेळेचे कोटेखोर नियोजन करणारे, स्वच्छ कारभार, साधी राहणी आणि मिडीयापासून दूर राहणारे नेते आहेत.
“बारा बलुतेदार, तडीपार, सांगावा, गावशीव” आदी कथासंग्रह, “पारधी, हातभट्टी, झोपडपट्टी या कादंबर्या, तसेच “आज इथं उद्या तिथं” हे त्यांचे ललित लेखसंग्रह मराठीत मोलाचे मानले जातात.
अजित प्रधानांकडे प्रामुख्याने १९८०पर्यंतच्या हिंदी चित्रपट संगीताचा संग्रह आहे. शंकर-जयकिशन आणि ओ. पी. नय्यर या दोन संगीतकारांचं जवळजवळ सगळं कलेक्शन त्यांच्याकडे आहे. त्याशिवाय सी. रामचंद्र, एस. डी. बर्मन आणि त्या काळातल्या बहुतेक सगळ्या संगीतकारांच्या रेकॉर्ड्स त्यांच्या खजिन्यात आहेत.
भक्तीरसात ओथंबलेले गायन ऐकून राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी आशालता यांना आंध्रलता म्हटले. हीच उपाधी पुढे त्यांची ओळख झाली.
महाराष्ट्रातील गडकिल्ले आणि अन्य प्रेक्षणीय स्थळे यांची दूरचित्रवाणीच्या पडद्यावर ओळख करून देणारे मिलिंद गुणाजी यांचे ते कार्यक्रम अतिशय लोकप्रिय आहेत. मिलिंद गुणाजी हे उमदे आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्व आहे यात शंकाच नाही.
१९६१ साली ते पुण्यात आले आणि एक वर्षाचा डिप्लोमा कोर्स करुन, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून रूजू झाले. त्यावेळी पुणे विद्यापीठातून त्यांनी कायद्यात बॅचलर डिग्री मिळवली आणि पुढे पुणे विद्यापीठातून मास्टरचेही शिक्षण पूर्ण केले. १९६४ मध्ये अवघ्या २० वर्षाच्या वयात त्यांनी ‘भारती विद्यापीठ’ ही शैक्षणिक संस्था स्थापन केली.
चित्रपट, दूरचित्रवाणी, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यांचे माहेरचे नाव सुप्रिया सबनीस. सुप्रिया पिळगांवकर यांचा जन्म १७ ऑगस्ट १९६७ रोजी झाला.
सुप्रियाचा रंगभूमीवरचा प्रवेश मधुकर तोरडमलांच्या 'म्हातारे अर्क बाईत गर्क' ह्या व्यावसायिक नाटकाने झाला. त्याच दरम्यान सुप्रिया दूरदर्शनवर 'किलबिल' ह्या मुलांसाठीच्या कार्यक्रमात म्हातारीची भूमिका करत होती. योगायोगाने सचिनच्या आईच्या नजरेत ही 'तरुण' म्हातारी भरली आणि त्यांनीच सचीनकडे त्याच्या नवीन चित्रपटाच्या नायिकेसाठी सुप्रियाची शिफारस केली. सुरुवातीच्या नकारानंतर आई वडिलांनी सुप्रियाला चित्रपटात काम करण्याची परवानगी दिली आणि सुप्रियाने 'नवरी मिळे नव-याला' द्वारा मराठी चित्रपट सृष्टीत पाऊल टाकले. चित्रपटादरम्यान दोघांमधे नाजूक बंध गुंफले गेले आणि प्रत्यक्षातली नवरी नव-याला मिळाली.
१९८५ साली सचिन-सुप्रियाच्या सहजीवनाला सुरवात झाली. पहिल्या चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनयाचे 'फिल्मफेअर' पुरस्कार मिळूनही सुप्रिया फारशी चित्रपटात दिसली नाही.
मराठीसृष्टीवरील सुप्रिया पिळगांवकर यांच्यावर लिहिलेला संपूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
वडिलांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळं लहान वयातच नंदू पोळ यांचा अभिनयाचा प्रवास सुरू झाला. 'साष्टांग नमस्कार' या नाटकातून त्यांनी अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. नंदू पोळ यांनी अनेक चित्रपट, मालिका तसेच नाटकातून आपल्या अभिनयाचे प्रेक्षकांची मने जिंकली होती.
नंदू पोळ यांची लहानखुरी मूर्ती ‘घाशीराम कोतवाल’ नाटकाच्या प्रारंभीच ‘श्री गणराय नर्तन करी’ या नांदीत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असे. 'गाढवाचं लग्न' या सिनेमातील 'राजा'च्या भूमिकेला वेगळी ओळख नंदू पोळ यांनी मिळवून दिली.
सिंहासन, सामना, एक होता विदूषक, नागिन, एक डाव भुताचा, कथा दोन गणपतरावांची, पक पक पकाक, दुर्गे दुर्गट भारी, गाढवाचं लग्न, इसराल गावाची इसराल माणसे, हसतील त्यांचे दात दिसतील या चित्रपटांतून त्यांनी काम केले होते. अनेक टीव्ही सीरियल्स आणि मालिकातूनही त्यांनी अभिनयाची चुणूक दाखवली.
नाजुका, प्रवासी, अडोस-प़डोस, मुक्ती, पिंपळपान, अकलेचे तारे, कायपालट यासारख्या मालिका-टीव्ही सीरियल्समध्येही त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. मराठीप्रमाणेच हिंदी, कन्नड, गुजराती चित्रपट मालिकांतही त्यांनी काम केले.
डॉ. जब्बार पटेल, सई परांजपे, मणी कौल, अरुण खोपकर, स्मिता तळवलकर हे दिग्दर्शक तसेच डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, ओम पुरी, नसिरुद्दीन शहा, मोहन आगाशे, नाना पाटेकर, अशोक सराफ यांच्यासोबत त्यांनी दीर्घकाळ काम केले.
मराठी रंगभूमीच्या इतिहासात अनन्यसाधारण स्थान असणाऱ्या थिएटर अकॅडमीचे ते संस्थापक सदस्य आणि २० वर्षे कार्यकारी सदस्य होते. नंदू पोळ यांनी देशात अडीच हजार, तर परदेशात शेकडो नाट्यप्रयोग केले. स्वत:चा कलाप्रवास त्यांनी ‘मी, नंदू पोळ’ या पुस्तकातून उलगडला आहे.
पोळ उत्तम ध्वनिमुद्रणतज्ज्ञ होते. त्यांच्यातल्या उत्तम ध्वनिमुद्रणतज्ज्ञतेमुळे गणेशोत्सवात मंडळांच्या देखाव्यांमागील शब्द- स्वर ध्वनिमुद्रित करण्यासाठी ते रात्र- रात्र कष्ट करत. नंदू पोळ यांनी स्वत:चा स्टुडिओही काढला होता. नंदू पोळ यांचे २८ जुलै २०१६ रोजी निधन झाले.
#NanduPol
भोसले, लीला
लढवय्या साम्यवादी चळवळीतील आपल्या साथीदाराचा संसार नेटाने चालवताना डाव्या चळवळीमध्येही योगदान देणाऱ्या त्या तिघीजणी. एकाच पक्षाशी म्हणजे लाल निशाण पक्षाशी बांधिलकी असलेल्या या तीन रणरागिण्यांचे अवघ्या काही दिवसांच्या अंतराने निधन झाले आणि एक पर्व संपले.
लीला भोसले म्हणजे पूर्वाश्रमीच्या लीला चव्हाण. लाल निशाण पक्षाचे नेते यशवंत चव्हाण यांच्या त्या भगिनी. रुबाबदार व्यक्तिमत्त्वाच्या लीलाताईंचा वावर सुरू झाला की आपोआपच स्वयंशिस्तीची आणि स्वावलंबीपाणाची झुळूक फिरायला लागायची.
भावाच्या आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या राजकीय मार्गदर्शनामध्येच त्या चळवळीमध्ये आल्या. त्यासाठी त्यांनी दहावीनंतर शाळा सोडून दिली. शाळा-महाविद्यालयांमध्ये जाऊन पिकेटिंग करणे, प्रभातफेऱ्या काढणे यामध्ये त्यांचा सहभाग होता. त्यांना कधी तुरुंगवास झाला नसला तरी तुरुंगामधील राजबंद्यांना बाहेरचे निरोप पोहोचवण्याचे काम त्या करीत असत. कोल्हापूर हे संस्थान असल्याने चळवळीतील स्त्रियांच्या भागीदारीवर थोडय़ा मर्यादा होत्या. तरीही सुशीला कुलकर्णी, विमल चव्हाण, सुमन कात्रे, लीला फडके (पाटील), सरल राशिंगकर (नाईक), प्रभा राशिंगकर, शशिकला सबनीस यांच्यासमवेत लीलाताई विविध राजकीय कामे करण्यात पुढे असत. स्त्री शिक्षण, जातिभेदविरोधी कार्यामध्ये त्यांचा सहभाग होता. लीलाताईंचे वडील (व्ही. जी. चव्हाण) कोल्हापूर उच्च न्यायालयामध्ये निस्पृह न्यायाधीश म्हणून ओळखले जात. त्यांनी कधी आपल्या मुलांना चळवळीमध्ये जाण्यापासून रोखले नाही. लीलाताईंच्या राजकीय कार्यामध्ये त्यांच्या सासर आणि माहेरचा मोठा वाटा होता. लीलाताईंचे सासरे कै. डी. बी. भोसले हे साखर कारखान्याचे इस्टेट मॅनेजर असल्याने त्यांचा कामगार चळवळीशी संबंध होता. चळवळीत वॉरंट असलेल्या कार्यकर्त्यांला आपल्या घरात आश्रय देणे हे जोखमीचे काम लीलाताईंनी आपले आईवडील, सासूसासरे, मोठी बहीण शकुंतला, तिचे पती एस. जी. पाटील यांच्या मदतीने केले. १९४७ मध्ये कॉ. आप्पासाहेबांबरोबर विवाह झाल्यावर त्या पुण्याला आल्या. पुणे महानगरपालिका युनियनच्या कामकाजात सहभागी झाल्या. लाल निशाण पक्षाच्या ‘लाल निशाण’ या पाक्षिकाच्या व्यवस्थापन आणि प्रकाशनाची जबाबदारी त्या सांभाळत होत्या. माणसाचे गुण हेरून त्याला पोषक असे वातावरण तयार करणे हा त्यांचा गुण होता. १९८० मध्ये त्यांनी मोलकरणींची संघटना स्थापन केली. त्यासाठी त्यांनी पुण्यातल्या सगळ्या झोपडपट्टय़ा पालथ्या घातल्या आणि त्यांचे प्रश्न समजावून घेतले. संघटित आणि सामुदायिक नेत्तृत्व तयार करणे यावर त्यांचा अधिक भर होता. वार्धक्य आणि आयुष्यभर चळवळीत खालेल्या खस्ता यामुळे शरीर थकले तरी मन थकले नव्हते. कष्टकऱ्यांच्या प्रश्नांना त्यांनी जीवन वाहिले होते.
अपर्णा संत या भावसंगीत व चित्रपट संगीतावरील सांगीतिक विश्लेषणात्मक कार्यक्रम सादर करतात. संगीतकार मदन मोहन किंवा इतर अनेक संगीतकारांवरचे संगीतकारांच्या विविध सांगीतिक परिभाषेतील बद्दलचे कार्यक्रम त्या त्यांच्या विद्यार्थिनींना घेऊन कार्यक्रम सादर करत असतात.
Copyright © 2025 | Marathisrushti