(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

  • संतकवि कृष्णदयार्णव

    संतकवि कृष्णदयार्णव हा संतकवि सातारा जिल्ह्यांतील कर्हाहड जवळील कोपरडें येथील रहाणारा. माध्यंदिनशाखी देशस्थ ब्राह्मण होय. याचें खरें नांव नरहरि असून बापाचें नांव नारायण व आईचें बहिणा होते.

  • गोपीनाथ सावकार

    नाट्य-चित्रपट क्षेत्रातले ख्यातनाम अभिनेते अशोक सराफ हे गोपीनाथ सावकार यांचे भाचे.

  • दिलीप पाडगावकर

    काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी काश्मीर कमिटीचे काम ते करत होते. जून महिन्यापासून धुमसत असलेल्या काश्मीर खोऱ्यात शांततेची फुंकर घालण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून राबवलेल्या आठ कलमी कार्यक्रमांतर्गत काश्मिरी जनतेशी संवाद साधण्यासाठी केंद्र सरकारचे संवादक म्हणून त्यांची अलिकडेच नियुक्ती करण्यात आली होती.

  • काशिनाथ वासुदेव अभ्यंकर

    महामहोपाध्याय काशिनाथ वासुदेव अभ्यंकर हे मराठीसह अर्धमागधी, प्राकृत आणि संस्कृतचे जाणकार होते. त्यांचा जन्म ७ ऑगस्ट १८९० रोजी झाला.

    “पातंजलीकृत व्याकरणमहाभाष्य” या ग्रंथाच्या सात खंडांचे संपादन त्यांनी केले होते.

    Kashinath Vasudeo Abhyankar

  • चंद्रकांत वर्तक

    वाड्मयीन चळवळीतील सक्रिय कार्यकर्ता, साहित्य विश्वाचा अचूक संदर्भग्रंथ, परखड समीक्षक, व्यवहारात पारदर्शक, लिखाणासोबत स्वभावातही नितळपण..अशा अनेक वैशिष्टय़ांनी व्यक्तिमत्व सजलेले असल्याने ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. चंद्रकांत रामचंद्र वर्तक यांच्या निधनाचा धक्का अवघ्या मराठी साहित्य विश्वाला बसणे साहजिकच. रायगड जिल्ह्य़ातील महाड या गावी २७ जुलै १९३० रोजी प्रा. डॉ. चंद्रकांत वर्तक यांचा जन्म झाला.

    प्राथमिक शिक्षण मुंबईतील छबिलदास शाळेत तर महाविद्यालयीन शिक्षण रुईया महाविद्यालयात झाले. विद्यार्थीदशेतच त्यांची लेखनकलाही बहरत होती. वर्धा येथील गोविंददास सक्सेरिया महाविद्यालयात प्राध्यापकी स्वीकारल्यानंतर हा पेशा व प्रवासाच्या आवडीमुळे त्यांच्या लेखनकलेस खतपाणी मिळाले. पुणे विद्यापीठातून ‘सन १८०० ते १९५० हा दीडशे वर्षांचा प्रवास’ या विषयावर त्यांनी पी.एचडी केली. नाशिक येथील गोखले एज्युकेशन सोसायटीचे हं.प्रा.ठा., बिटको आदी महाविद्यालयांमधून त्यांनी प्राध्यापक, विभागप्रमुख म्हणून काम पाहिले. पी.एचडी आणि एम.फिलसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले. १९९० मध्ये नाथीबाई ठाकरसी महिला महाविद्यालयातून ते निवृत्त झाले. कथाकार, समीक्षक, उत्कृष्ट वक्ता म्हणून असलेली त्यांची कामगिरी नवोदितांसाठी आदर्शवत अशीच. नाशिकमध्ये कविवर्य कुसुमाग्रज, वसंत कानेटकर या ज्येष्ठ साहित्यिकांच्या सान्निध्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व साहित्यिकदृष्टय़ा अधिकच बहरले. आपल्या साहित्यामधून त्यांनी वाचकाला जगाकडे पाहण्याची एक नवी दृष्टी दिली. ‘वळणावरचे साकव’ या व्यक्तिचित्रणसंग्रहातून ते सहजपणे वाचकाला अंतर्मुख करून जातात, तर ‘माळंदे’ या ललित लेखसंग्रहातून त्यांच्या खेळकर लेखनशैलीचा सहज सुंदर आविष्कार पहायला मिळतो. प्रवास करताना केवळ ‘पाहाणे’ नव्हे, तर ‘अभ्यासणे’ या त्यांच्या वृत्तीचे दर्शन ‘लू यू चीन,’ ‘देशादेशांतून’ या प्रवासवर्णनसंग्रहांमधून दिसते. ‘मराठी ललित गद्य’, ‘सफर बहुरंगी रसिकतेची’, ‘संशोधनाची लेखनशैली’ ही त्यांची समीक्षा व संशोधनपर पुस्तके. मुक्त विद्यापीठासाठी १६ पुस्तकांचे लेखन करणाऱ्या प्रा. वर्तक यांचे ‘पारंब्या’, ‘फुलपंखी दिवस’, ‘अंकुर’, ‘मनमोर’, ‘धून’, ‘केटलिक वार्ताओ’ (गुजराती) हे कथासंग्रहही प्रसिध्द आहेत. ‘कॉन्व्हर्सेशन विथ स्टॅलिन-एक शर्थीची झुंज’ या समीक्षात्मक व संशोधनात्मक ग्रंथाचीही साहित्यवर्तुळाने विशेष दखल घेतली. याशिवाय त्यांच्या नावावर ‘मराठी नियतकालिकांचा इतिहास खंड २, २४,’ ‘प्रभाकर पाध्ये-समग्र वाड:मयदर्शन’, ‘सर्वोत्कृष्ट मराठी कथा खंड १३’ आदी ग्रंथ आहेत. लघुकथा, प्रवासवर्णन, व्यक्तिचरित्रे, ललित गद्य या प्रकारांमध्ये स्वैर मुशाफिरी करणारे वर्तक समीक्षक म्हणून अधिक ओळखले गेले. नवीन लेखकांचे तर ते गुरूच. आपल्या पुस्तकासाठी वर्तक यांनी दिलेला अभिप्राय नवलेखकांना बहुमोलाचा वाटे. संस्कृतवरही त्यांचे प्रभुत्व होते. त्यांच्या कार्याची दखल घेत पुणे विद्यापीठाने साहित्यसम्राट न. चिं. केळकर पुरस्कार त्यांना प्रदान केला. याशिवाय डॉ. य. वा. परांजपे, किलरेस्कर, मराठी साहित्य परिषदेचा विद्याधर पुंडलिक पुरस्कार, यासारख्या अनेक पुरस्कारांनी त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव केला. नाशिक येथील सार्वजनिक वाचनालयाचा मु. ब. यंदे पुरस्कार त्यांना अधिक भावत असे. महाराष्ट्र राज्य आणि सांस्कृतिक मंडळाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या संशोधन समितीचे सदस्य, कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात येणाऱ्या साहित्यभूषण परीक्षा समितीचे अध्यक्ष, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी लीलया पेलल्या. येत्या २७ जुलै रोजी ८१ व्या वर्षांत ते पदार्पण करणार होते. वाढदिवस कशा पध्दतीने साजरा करावयाचा, या नियोजनात पत्नी, दोन मुले यांसह मित्रांना मग्न ठेवत ते स्वत: परलोकीच्या प्रवासाला निघून गेले.

  • आदिनाथ कोठारे

    अभिनेत्यासोबतच आदिनाथ निर्माता म्हणूनही समोर आले आहेत. छोट्या पडद्यावर ‘सरगम’ या कार्यक्रमाचा आदिनाथ क्रिएटिव्ह दिग्दर्शक आणि निर्माता होते. शिवाय ‘गणपती बाप्पा मोरया’ या मालिकेचासुद्धा निर्माता म्हणून त्यांनी काम केले आहे. उर्मिला कानेटकर आणि आदिनाथ कोठारे यांची लव्ह स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे.

  • वसंत कृष्ण वर्‍हाडपांडे

    लेखक, समीक्षक, भाषाभ्यासक वसंत कृष्ण वर्‍हाडपांडे

  • वनमाला

    साने गुरुजींनी लिहिलेल्या “श्यामची आई”वर प्र.के. अत्र्यांनी श्यामची आई चित्रपट बनवला. त्यात श्यामच्या आईची मुख्य व्यक्तिरेखा वनमालाबाईंनी साकारली. हा चित्रपट आणि त्यातील त्यांनी रंगवलेली आईची व्यक्तिरेखा प्रचंड लोकप्रिय ठरली. या भूमिकेसाठी त्यांना १९५३ सालचा भारतातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रपती पुरस्कार लाभला.

  • प्रसाद सावकार

    ‘पंडितराज जगन्नाथ’मध्ये त्यांना सुरुवातीला एकच गाणे होते. पण त्यांच्या गाण्यावर फिदा झालेल्या रसिकांनी त्यांच्यासाठी आणखी एखादे गाणे नाटकात घालण्याची मागणी केल्यानंतर ‘जय गंगे भागीरथी’ हे गाणे त्यात घालण्यात आले आणि ते चांगलेच गाजले.

  • मधु आपटे

    बोबडे बोल हा एकमेव गुण असुनही केवळ त्यावर अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपट करणारे मधू आपटे हे एकमेव कलावंत असतील. मधुकर शंकर आपटे हे मधू आपटे यांचे पुर्ण नाव.