(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • डॉ. प्रमोद पाटील, (पक्षीसंवर्धक आणि संशोधक)

    पदवीने एमबीबीएस असणारे डॉ. प्रमोद पाटील यांनी पक्षीसंवर्धनाच्या क्षेत्रात पारदर्शी असे काम केले आहे. काळाच्या पडद्याआड जात चाललेल्या माळढोक पक्षाला वाचविण्याच्या कामात डॉ. प्रमोद पाटील यांच्या संशोधनाने मुख्य बळ मिळाले. निसर्गरक्षक गिधाडांना वाचविण्याच्या कामीही त्यांनी असेच भरीव कार्य केले आहे. गिधाडांचा जीव घेणार्‍या औषधांवर बंदीसाठी त्यांचे काम मार्गदर्शक ठरले.

    महाराष्ट्र टाईम्समध्ये मटा नोंद डॉ. प्रमोद पाटील यांच्यावर आलेला माळढोक-गिधाडांचा रक्षणकर्ता हा लेख पुढील पानावर वाचा.


    महाराष्ट्र टाईम्समध्ये डॉ. प्रमोद पाटील यांच्यावर आलेला माळढोक-गिधाडांचा रक्षणकर्ता हा लेख खाली देत आहोत.

    patil-dr-pramod-modified

      July 24, 2015


  • गंगाधर बाळकृष्ण सरदार (गं बा सरदार)

    गंगाधर सरदार हे मराठी साहित्यिक आणि विचारवंत होते.

      December 15, 2010


  • प्र. के. घाणेकर

    घाणेकर, प्र. के.

    ध्यास आणि वेड या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. एखाद्या गोष्टीच्या ध्यासापायी सारे आयुष्य वेचणाऱ्यांची संख्या महाराष्ट्रात काही कमी नाही. त्यामध्ये प्र. के. घाणेकर यांचे नाव आता अग्रेसर ठरते आहे. स्नेहल प्रकाशनच्या वतीने या वर्षीचा ‘स्नेहांजली’ पुरस्कार त्यांना देण्यात आला, तेव्हा त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना, मित्रांना आणि विद्यार्थ्यांनाही कमालीचा आनंद झाला.

    गेल्या चाळीस वर्षांच्या काळात जे कुणी घाणेकर सरांच्या सान्निध्यात आले, ते त्यांच्या परिवाराचे सदस्य बनले. किल्ले हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक व्यवच्छेदक भाग आहे. छत्रपती शिवाजीमहाराजांनी या नव्या संस्कृतीचा उगम घडवताना ज्या अनेक गोष्टी विचारात घेतल्या होत्या, त्यांपैकी पर्यावरण आणि वनस्पती याही महत्त्वाच्या बाबी होत्या, याची जाणीव घाणेकर यांना अगदी महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच झाली. कारण त्यांच्या अभ्यासाचा विषय होता, वनस्पतिशास्त्र. प्रा. हेमा साने या त्यांच्या अध्यापक. त्यांच्या मते वनस्पतिशास्त्र वर्गात शिकता येत नाही, त्यासाठी निसर्गातच जायला हवे. म्हणून किल्ले, दुर्ग अशा ठिकाणी अभ्यास सहली जाऊ लागल्या. घाणेकरांच्या मनात वनस्पतींबरोबरच त्या किल्ल्यांच्या इतिहासाबद्दलही कुतूहल जागृत झाले आणि मग त्यांनी त्या इतिहासाकडे आपला मोर्चा वळवला. ३८ वर्षे वनस्पतिशास्त्र आणि पर्यावरणशास्त्र या विषयाचे विद्यार्थिप्रिय प्राध्यापक म्हणून काम करताना त्यांनी इतक्या व्यापक परिसरात भ्रमण केले, की एका माणसाला एका आयुष्यात एवढे सगळे कसे करता येईल, अशी आपल्याला चिंता वाटावी. ज्या काळात पर्यावरण हा विषय चर्चेतही नव्हता, तेव्हा म्हणजे १९८२ मध्ये प्रा. घाणेकर यांनी त्यावर पहिले पुस्तक लिहिले. ‘इतिहास घडवणाऱ्या वनस्पती’ या त्यांच्या पुस्तकात वनस्पतींमुळे घडलेल्या इतिहासाची रोचक कहाणी आहे. म्हणजे भारतात मसाल्याच्या वनस्पती पिकत असल्यानेच भारतावर आक्रमण झाले आणि पारतंत्र्य आले, असे त्यांचे म्हणणे. इतिहास समजून घेण्यासाठी किल्ले पाहायचे, तर त्यात भटकंतीचाही आनंद मिळवता आला पाहिजे. त्यामुळे त्यांनी भटकंती या विषयावरही अर्धा डझन पुस्तके लिहिली. ५६ पुस्तकांचे लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेतच, परंतु हिमालय, वृक्ष, निसर्ग, किल्ले या विषयांवर त्यांनी सादर केलेल्या ‘स्लाईड शो’चे किमान पाचशे कार्यक्रम झाले आहेत. देशभरात हजारांहून अधिक ठिकाणी त्यांनी या अनेक विषयांवर व्याख्याने दिली आहेत आणि हा वाचायज्ञ अजूनही तेवढय़ाच दमदार रीतीने सुरू आहे. त्यांच्याकडे सातवाहन कालापासूनच्या नाण्यांचा अमूल्य संग्रह आहे. अनेक प्रकारच्या जीवाश्मांचे, शंख-शिंपल्यांचे एक उत्तम संग्रहालयच त्यांच्या घरी आहे. त्याशिवाय त्यांच्या आवडीच्या विषयांवरील किमान पंधरा हजार कात्रणांचा संग्रहही त्यांनी तयार केला आहे. एवढे सगळे घडताना आपल्याला आयुष्यात नेहमी उत्तम गुरू मिळाले, याचे समाधान ते नेहमीच व्यक्त करतात. त्यांना मिळालेला हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या कर्तृत्वाला सलामच आहे.

      August 5, 2017


  • तुषार शेटे

    तुषार शेटे हे टी. व्ही. नाईन या वेगाने फोफावणार्‍या व आदर्श समाजबांधणीचे स्वप्न घेवून जगणार्‍या वृत्तवाहिनीच्या मुंबई विभागामधले धडाडीचे तरूण पत्रकार आहेत. सिनीयर करस्पॉन्डन्ट या हुद्यावर कार्यरत असलेल्या शेटेंनी या वृत्तवाहिनीच्या अनेक मोहिमा, कारवाया, व भेटींमध्ये हिरिरीने सहभाग घेतला असुन या क्षेत्रातील अनुभव अतिशय दांडगा आहे. प्रवासाची त्यांना लहानपणापासूनच भयंकर आवड होती व ती आवड आता आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून पुर्ण करावयास मिळते आहे या गोष्टीचे त्यांना अतीव समाधान आहे.

      August 16, 2011


  • जयकुमार पाठारे

    व्यावसायिक व उद्योग वर्तुळात व्ही.आय.पी मॅन म्हणुन प्रसिध्द असलेल्या आणि व्ही.आय.पी ब्रॅंडचे सर्वेसर्वा जयकुमार पाठारे यांचं आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथानकासारखं पण तितकंच प्रेरणादायी आहे. कोल्हापूरात एका मध्यमवर्गीय कुटंबात जन्मलेल्या जयकुमार यांच्या वडिलांचं निधन जयकुमार लहान असतानाच झालं.

      June 26, 2013


  • प्रज्ञा प्रदीप परब

    वेंगुर्ल्यातील सामाजिक कार्यकर्त्या सौ. प्रज्ञा प्रदीप परब यांनी ‘कल्पवृक्ष कन्येसाठी…!’ या गाण्याचे बोल सार्थक करीत महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्था, मर्यादित वेंगुर्लाचे सक्षमपणे व्यवस्थापकीय संचालक पदाची जबाबदारी यशस्वीपणे पेलली आहे.

      September 13, 2011


  • ज्येष्ठ गायक पं. अजित कडकडे

    कडकडे कुटुंबीय मूळचे गोव्याजवळील डिचोली गावचे. इंटरपर्यंतचे त्यांचे शिक्षण गोव्यातच झाले. कडकडे घराण्यात किंवा आजोळीही गाण्याचा वारसा नव्हता. केवळ घरच्यांनी सांगितले म्हणून ते गोव्यातील माडीये गुरुजींकडे गाणे शिकायला जाऊ लागले. अजित कडकडे यांनी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे प्राथमिक धडे पं. गोविंदराव अग्नी व पं. गोविंदप्रसाद जयपूरवाला यांच्याकडे घेतले. नंतर पं. जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे त्यांनी दहा वर्षे संगीताची तालीम घेतली.

    अजित कडकडे यांनी सुरुवातीच्या काळात 'संगीत शारदा', 'संगीत सौभद्र' या संगीत नाटकांतून गाणाऱ्या पात्रांच्या भूमिका केल्या होत्या. एका मुलाखतीत त्यांनी सांगीतले होते की ‘संगीताचा कोणताही वारसा आमच्या घरात नव्हता. माझ्या मनात गाण्याचा कसलाही विचार नव्हता. मला डॉक्टहर व्हायचे होते. परंतु पं. अभिषेकीबुवांमुळे मी या क्षेत्रात आहे. मा.आर.एन.पराडकर यांची परंपरा अजित कडकडे चालवताना दिसतात. मा.अजित कडकडे यांनी गेल्या तीस वर्षांत दत्तगुरूंवर सुमारे चाळीस-पन्नास अल्बम केले आहेत, यातल्या बहुतांश रचना कवी प्रवीण दवणे यांच्या आहेत तर संगीत नंदू होनप यांचे आहे. ‘निघालो घेऊन दत्ताची पालखी, अलौकिक दत्तात्रेय अवतार’ आदी त्यांची गाणी भक्तप्रिय ठरली आहेत.

    दत्तगुरूंवरील अन्य रचनांपैकी ‘त्रिगुणात्मक त्रमूर्ती दत्त हा जाणा’ ही पारंपरिक आरती तर घरोघरी म्हटली जाते. ‘मला हे दत्तगुरू दिसले’ हे आशा भोसले यांचं गीतही (आम्ही जातो आमच्या गावा) अजरामर आहे आणि रघुनाथ साळोखे यांनी गायलेलं ‘दत्त दर्शनाला जायाचं, जायाचं, आनंद पोटात माझ्या माईना’ हे गीतही आगळंवेगळं आहे. अजित कडकडे आणि संगीतकार मा.नंदू होनप यांच्या भक्तिसंगीताने रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. तब्बल ३५ वर्षे या जोडीने एकत्र काम केले. अजित कडकडे यांनी अनेक भावगीतेही गायली आहेत..

    हे हासणे गुलाबी..
    सजल नयन नीत धार..
    मैफलीचे गीत माझे..
    अशी सुमारे दहा..

    तुझ्या कृपेने दिन उगवे..
    भक्तिवाचुनि मुक्तीची मज..
    अशी कित्येक भक्तिगीते..
    तर चक्क "चल गो चंपा.." हे कोळीगीतही गायले आहे.

    "आर. एन. पराडकर" यांची भक्तीगीतांची व्हर्शन्स त्यांनी खास आग्रहाखातर केली हे विशेष.. मा.अजित कडकडे यांना "संगीतकार प्रभाकर पंडित स्मृती पुरस्कार‘ मिळाला आहे.

    अजित कडकडे यांचे मराठीसृष्टीवरील लेख.

    ज्येष्ठ गायक पं. अजित कडकडे (11-Jan-2018)

    ज्येष्ठ गायक पं. अजित कडकडे (12-Jan-2017)

    #AjitKadkade

      May 5, 2022


  • मंगेश पाडगावकर

    ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, ‘भातुकलीच्या खेळामधली’, ‘शुक्रतारा मंद वारा’ यासारख्या एकापेक्षा एक लोकप्रिय गाण्यांचे गीतकार, ज्येष्ठ कवी. मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर आणि वसंत बापट या त्रयीचे एकत्रित काव्यवाचनाचे कार्यक्रम प्रचंड गाजले. त्यांनी अनेक कार्यक्रमांमधून आपल्या कविता सादर करून रसिकांचे मन जिंकले. प्रेम म्हणजे प्रेम असंत, तुमचं आमचं अगदी ‘सेम’ असतं, ही त्यांची कविता तरुनांना भुरळ घालून गेली.

      December 30, 2015


  • बाबामहाराज सातारकर

    बाबामहाराज सातारकर यांनी वारकरी कीर्तनाला सैद्धांतिक बैठक प्राप्त करुन दिली. सामाजिक सलोखा, व्यसनमुक्ती, सहकाराची भावना त्यांच्या कीर्तनातून वृद्धिंगत झाली व महाराष्ट्राची सांस्कृतिक एकात्मता टिकविली गेली. याबरोबरच महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे ईतरही अनेक अनोखे पैलू आहेत.

      July 11, 2022


  • प्रसाद वनारसे

    चित्रपट क्षेत्रातील ग्लॅमर सोडून सर्जशील नाट्यकलावंत घडवण्याचा वसा रंगकर्मी प्रसाद वनारसे यांनी घेतला आहे. देशविदेशातील नाट्यप्रशिक्षणांमुळे नाट्यगुरू अशी त्यांची ओळखही निर्माण झाली आहे.

    प्रसाद वनारसे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला हाडाचा नाट्यशिक्षक हा लेख पुढील पानावर वाचा.

    प्रसाद वनारसे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला हाडाचा नाट्यशिक्षक हा लेख वाचा.

    vanarase-prasad-modified

      September 7, 2015