सुभाष देशमुख हे सोलापूर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेत निवडून आलेले भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. सध्या ते महाराष्ट्राचे सहकारमंत्री आहेत.
ते १४ व्या लोकसभेचे सदस्यही होते.
लोकमंगल समुहाचे ते संस्थापक व अध्यक्ष आहेत.
## Subhash Deshmukh
ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक सुहास भालेकर यांनी सहा दशकांहून अधिक काळ नाटक, मालिका, तसंच रुपेरी पडदा गाजवला. कीर्तनकार वडिलांकडून आलेली शुद्ध वाणी, तसंच आई कडून या क्षेत्रात काम करण्यासाठी मिळालेलं पाठबळ यामुळे त्यांच्यातील कलाताराला आपसूकच प्रोत्साहन मिळत गेलं.
सत्तरीच्या दशकाचा काळ हा मराठी व्यावसायिक नाटकांच्या बहराचा काळ. या काळात अनेक गुणी कलावंत मराठी रंगभूमीला मिळाले. या कालखंडात अभिनेत्रींची एक सशक्त फळी उभी राहिली. त्यात सुहास जोशींचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.
सुभाष नाईक हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. ते विविध विषयांवर विपुल लेखन करतात. ते मराठीसृष्टीचे एक मुख्य लेखक असून मराठीसृष्टीविषयी प्रचंड आत्मियता असलेले आधारस्तंभ आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत.
आपल्या कर्तृत्वाने देशपातळीवर स्थिरावलेले महाराष्ट्रातील प्रतिभाशाली नेतृत्व. सत्ता हे समाज परिवर्तनाचे साधन आहे, असे मानून सदैव क्रियाशील राहणारा नेता.
प्रा. सुभाष भेंडे यांनी आपल्या अमेरिकावारीनंतर ’गड्या आपुला गाव बरा’ या शीर्षकाचा एक लेख लिहिला होता. तो महाराष्ट्रातील बारावीच्या पाठ्यपुस्तकासाठी निवडला गेला.
सुभाष शहा यांनी 1965 मध्ये आपले बंधु विमलकुमार यांच्या समवेत चेतन फौंड्रीची स्थापना करून उद्योगाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यांना वालचंद समुह, कुपर, एस्कॉर्ट, एच. एम. टी. सारखे ग्राहक मिळाले. शहा यांचे सुपुत्र यतिन यांचे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर 1992 साली प्रिसिजन उद्योग समुहाचा श्रीगणेशा केला. त्यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असलेल्या प्रिसिजनने सन 2007 मध्ये ब्रिटनची व्हल्वट्रेन कंपनी ताब्यात घेतली.
दुनियादारी या लोकप्रिय कादंबरीचे लेखक. याच कादंबरीवर आधारित चित्रपट फार गाजला.
निवेदक म्हणून सुधीर मोघे यांची स्वतःची अनोखी शैली होती. पण त्यांची आणखीन एक ओळख महाराष्ट्राला होती ती म्हणजे प्रतिभावान साहित्यिक म्हणून; कविता, गीतकार, ललितकार, पटकथा -संवाद लेखक,गायन, संगीत दिग्दर्शन, रंगमंचीय आविष्करण आणि दिग्दर्शन या माध्यमांतून रंगभूमी, आकाशवाणी, दूरदर्शन, चित्रपट, या क्षेत्रात संचार होता.
हिमाचल प्रदेशातील एकल महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी अहनिर्श झटणार्या 'सुत्र' संस्थेचे संस्थापक सुभाष मेंढापुरकर.
हिमाचल प्रदेशातील निराधार, अविवाहित, विधवा, परित्यक्त्या, वृद्ध महिलांच्या पुनर्वसनासाठी 'सोशल अपलिफ्टमेंट थ्रू रुरल अॅक्शन' अर्थात 'सुत्र' या संस्थेची स्थापना करणारे मेंढापूरकर हे मूळचे सोलापूरचे. पुण्यात राहून त्यांनी मराठीत एमए आणि त्यानंतर टीआयएसएस मधून एमएसडब्ल्यू केल्यानंतर १९७७ साली एका प्रकल्पाच्या निमित्ताने ते हिमाचल प्रदेशात गेले. महिलांवर होणारे अत्याचार, कौटुंबिक हिंसा, दारू पिऊन महिलांना मारहाण असे प्रकार तेथे सर्रास सुरू होते. त्या परिस्थितीत गरज होती ती तेथील महिलांच्या सक्षमीकरणाची तसेच त्यांना संघटित करण्याची. मेंढापूरकरांनी हे आव्हान उचलले आणि वंचित महिलांना 'सुभाष भय्या'चा मोठा आधार मिळाला. सुरूवातीच्या काळात मेंढापूरकरांना गावकर्यांचा बराच रोष पत्कारावा लागला, पण ते मागे हटले नाहीत. महिला सक्षमीकरण, आथिर्क स्वावलंबन, बचतगट, आरोग्य सुविधा, विधवांच्या मुलांना शिष्यवृत्या अशा विविध पातळ्यांवर त्यांचे काम सुरू राहिले.
स्त्री भ्रूण हत्येच्या विरोधात आवाज उठवणारी पहिली संस्था म्हणून 'सुत्र'कडे पाहिले जाते. आज मात्र सामाजिक आणि आथिर्क संदर्भ बदलले असल्याचे मेंढापूरकरांना प्रकर्षाने जाणवते आहे. आजच्या राजकारण्यांना सभ्यतेचा आदर करण्याची सवय राहिलेली नाही. पूर्वी विरोधकांनाही इज्जत होती, पण आता सगळे चित्रच बदललेय असे ते सांगतात.
महाराष्ट्रात संस्था-संघटना खूप आहेत. पण मनापासून काम करण्याची त्यांची तयारी नाही. एकीकडे व्यावसायिक संस्था तर दुसरीकडे राजकारणाबाबत जागृती नसणार्या संघटना भरपूर झाल्या आहेत, हेही त्यांचे एक निरीक्षण. आत्ताच्या लोकांना राजकारणाचे मर्म कळत नसल्यामुळे त्यांना आपल्या कामाचे राजकारण करता येत नाही म्हणूनही ते मागे पडतात किंवा दुर्लक्षित राहतात असे त्यांचे मत बनले आहे. याला कारण म्हणजे १९८० नंतर महाराष्ट्रात विद्यार्थ्यांचा किंवा युवकांचा कोणताच लढा उभा राहिलेला नाही. त्यामुळे आत्ताची पिढी प्रगल्भ असली तरी राजकारणाचे भान, जाण त्यांना नाही असे ते सांगतात. पूर्वीच्या लोकशाहीत सर्वसामान्यांमध्ये संघर्ष करण्याची ताकद होती. आता लढ्यांमध्ये मध्यमवर्ग कुठेच दिसत नाही. लोकशाहीच्या लढ्यांची जागा हिंसेने, दंडुकेशाहीने घेतली आहे आणि लोकशाहीला ते सर्वात घातक ठरू शकते याची चिंता मेंढापूरकरांना सतावते आहे.
शेती करू इच्छिणार्या महिलांना जमीन द्या यासाठी सध्या त्यांचा लढा सुरू आहे. शेती करून महिला स्वत:च्या पायावर उभ्या राहू शकतात असा विश्वास मेंढापूरकरांना असून त्यासाठी ते लढताहेत.
त्यांना 'सारडा समान संधी पुरस्कार' बहाल करण्यात आला आहे.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
Copyright © 2025 | Marathisrushti