(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

  • ज्येष्ठ अभिनेत्री नलिनी कृष्णराव चोणकर

    इंद्रायणी सावकार यांनी लिहिलेली The White Dove ही कथा, इंग्रजी आणि जर्मन भाषेतील ’एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रियांसाठी लिहिलेल्या कथा’ या प्रकारच्या कथासंग्रहांत समाविष्ट झाली आहे. Our Inheritance of Spirituality (आपला संस्कृतिक वारसा) या त्यांच्या पुस्तकाला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.

  • अभ्यासू दिग्दर्शक – विजू माने

    विजू माने हे मराठी सिनेइंडस्ट्रीतलं जुनं-जाणतं नाव. एक अभ्यासू दिग्दर्शक म्हणून विजूची ओळख आहे. माझी आणि विजूची ओळख साधारणपणे बारा-पंधरा वर्षांपूर्वीची. विजूचा तेव्हा ‘डॉटर’ नावाचा सिनेमा येऊ घातला होता. एकदा वृत्तसंकलनाच्या निमित्ताने ही ओळख झाली आणि दिवसागणिक ती गुणोत्तराने वाढतच गेली.

  • विधानसभेतील पहिले आमदार रामभाऊ म्हाळगी

    रामभाऊ म्हाळगी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, जनसंघ या राजकीय पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले सरचिटणीस आणि विधानसभेतील पहिले आमदार, तसेच भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राचे पहिले प्रादेशिक अध्यक्ष होते. जनता पार्टीचे खासदार म्हणून १९७७ साली व १९८० साली ते ठाणे लोकसभा मतदार संघातून निवडून आले होते. पूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात प्रथमच जनसंघाची पताका फडकावणारी राम कृष्णाची जोडी होती ती आणीबाणीमध्ये फुटली (कृष्णराव भेगडे व रामभाऊ म्हाळगी ) कृष्णराव भेगडे कॉंग्रेस मध्ये गेले परंतु रामभाऊ अखेर पर्यंत जनसंघ– जनता पक्ष व शेवटी भाजपात राहिले त्यांचे साधी राहणीमान व नवीन उप्रकमाची शैली यामुळे ते राजकारणात आघाडीवर राहिले.

  • सुप्रसिद्ध हिंदी साहित्यिक डॉ. राही मासूम रझा

    उत्त्तर प्रदेशातील गाझीपुर येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचा जन्म १ ऑगस्ट १९२७ रोजी झाला. डॉ. राही मासूम रझा महाविद्यालयीन शिक्षण अलीगढ विद्यापीठात झाले. १९६४ साली त्यांना पी.एच.डी. मिळाली. नंतर काही काळ ते अलीगढ विद्यापीठात शिकवत होते. १९६८ साली ते मुंबईला आले. आपल्या साहित्य कृती बरोबरच ते हिंदी सिनेमाला जोडले गेले. डॉ. राही मासूम रझा यांनी अनेक चित्रपटांचे तसेच अनेक मालिकांचे संवादही लिहिले. दूरदर्शन साठी १०० हून अधिक धारावाहिक त्यांनी लिहिल्या त्यातील 'महाभारत' और 'नीम का पेड़' या अविस्मरणीय होत्या. "महाभारत" या गाजलेल्या दूरदर्शन मालिकेचे संवाद लेखक म्हणूनही डॉ.राही मासूम रजा यांनी काम केले. "महाभारत" बनवायच्या आधी डॉ. राही मासूम रझा यांनी बी.आर.च्या बॅनरखाली संवादलेखक म्हणून पूर्वीही काम केलं होतं. बी आर चोप्रा यांनी "महाभारत"ची कल्पना जेव्हा डॉ. राही मासूम रझा यांना सांगितली. आश्चर्य म्हणजे डॉ. राही मासूम रझा केवळ चोवीस तासातच, ‘समय अथवा काळालाच आपण महाभारताचा सूत्रधार केला तर?’ अशी एक भन्नाट व अभिनव कल्पना घेऊन चोप्रांकडे आले, इतकंच नव्हे तर त्यांनी महाभारताच्या अगदी पहिल्या भागाचं सूत्रधाराचं निवेदनही लिहून बरोबर आणलं होतं. मा.चोप्रांना डॉक्टरांची कल्पना विलक्षण आवडली आणि त्या दिवशी प्रथम चोप्रांना समजलं की, डॉ.राही मासूम रझा हे नुसतेच पटकथालेखक नसून संस्कृत व हिंदी विषयाचे गाढे विद्वान आहेत. चोप्रांनी त्या क्षणापासून डॉक्टरांना महाभारताचे कथालेखक म्हणून आपल्या टीममध्ये सन्मानाने सामावून घेतलं. मा.राही आपल्या एकूण यांनी ३०० चित्रपटाच्या पटकथा लिहिल्या. त्यांनी अनेक कादंबऱ्या लिहिल्या तसेच कविताही लिहिल्या आहेत. निमका पेड या कादंबरीतून त्यांनी स्वातंत्र्य पूर्व भारत व आताचा भारत याचे वर्णन केले आहे. आधा गाव, उसकी बुंद वगैरे त्यांचे चित्रपट गाजले. "तिलिस्म -ए -होशरुबा" हा त्यांचा कथा संग्रह आहे. आधा गाँव, नीम का पेड़, कटरा बी आर्ज़ू, टोपी शुक्ला, ओस की बूंद और सीन अशी ७५ प्रसिद्ध पुस्तके आहेत. १९७९ मध्ये 'मैं तुलसी तेरे आँगन की' या चित्रपटासाठी फिल्म फेयरचा सर्वश्रेष्ठ संवाद पुरस्कार डॉ. राही मासूम रझा यांना मिळाला होता. भारत सरकारने ’पद्मश्री’ , पद्म भूषण देऊन त्यांचा गौरव केला होता. त्यांचे चिरंजीव नदीम खान हे सिनेमेटोग्राफर आहेत. डॉ.राही मासूम रजा यांचे निधन १५ मार्च १९९२ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    डॉ. राही मासूम रझा यांची रामजन्म भूमी वरील कविता
    "लेकिन मेरा लावारिस दिल”
    मस्जिद तो अल्लाह की ठहरी
    मंदिर राम का निकला
    लेकिन मेरा लावारिस दिल
    अब जिस की जंबील में कोई ख्वाब
    कोई ताबीर नहीं है
    मुस्तकबिल की रोशन रोशन
    एक भी तस्वीर नहीं है
    बोल ए इंसान, ये दिल, ये मेरा दिल
    ये लावारिस, ये शर्मिन्दा शर्मिन्दा दिल
    आख़िर किसके नाम का निकला
    मस्जिद तो अल्लाह की ठहरी
    मंदिर राम का निकला
    बंदा किसके काम का निकला
    ये मेरा दिल है
    या मेरे ख़्वाबों का मकतल
    चारों तरफ बस खून और आँसू, चीखें, शोले
    घायल गुड़िया
    खुली हुई मुर्दा आँखों से कुछ दरवाजे
    खून में लिथड़े कमसिन कुरते
    जगह जगह से मसकी साड़ी
    शर्मिन्दा नंगी शलवारें
    दीवारों से चिपकी बिंदी
    सहमी चूड़ी
    दरवाजों की ओट में आवेजों की कबरें
    ए अल्लाह, ए रहीम, करीम, ये मेरी अमानत
    ए श्रीराम, रघुपति राघव, ए मेरे मर्यादा पुरुषोत्तम
    ये आपकी दौलत आप सम्हालें
    मैं बेबस हूँ
    आग और खून के इस दलदल में
    मेरी तो आवाज़ के पाँव धँसे जाते हैं।

  • सिनेसंगीताच्या सुवर्णयुगाचे प्रतिनिधी अमीन सायानी

    अमीन सायानी यांचा पूर्ण परिवार स्वातंत्र्यसंग्रामाशी जोडला गेला होता. महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल आणि मौलाना आझाद हे चार प्रमुख नेते त्यांच्या परिवाराला व्यक्तिश: ओळखत होते त्यांच्या वडिलांचे काका रहेमतुला सायानी साहब गांधीजींचे निकटचे स्नेही होते.

  • एव्हरेस्ट शिखरावर यशस्वी चढाई करणारा पहिला नेपाळी शेर्पा तेनझिंग नोर्गे

    २९ मे १९५३ साली श्री. शेर्पा तेनझिंग नोर्गे व श्री. एडमंड हिलरी यांनी सर्वप्रथम एव्हरेस्ट सर केले. या मोहिमेनंतर श्री. शेर्पा तेनझिंग नोर्गे यांच्या कौशल्याचा व अनुभवाचा फायदा सर्वांना मिळावा व गिर्यारोहण क्षेत्राचा भारतवर्षामध्ये प्रसार व विकास व्हावा या विचारातून श्री. पंडित नेहरू यांनी रक्षा मंत्रालयाच्या अख्यारीत हि संस्था दार्जिलिंग येथे स्थापन केली. शेर्पा तेनझिंग हे तिबेटी कि नेपाळी ह्यावर वाद होते. पण हा भला माणूस होता. शेर्पा तेनझिंग आणि हिलरी ह्यात ‘आधी’ शिखरावर कोण गेले असे फालतू वाद कित्येक पत्रकारांनी उपस्थित केले. आम्ही दोघे एकदमच पोचलो असे दोघेही सांगत.

  • रवि शंकर

    रवि शंकर यांचा जन्म ७ एप्रिल १९२० रोजी झाला. रवि शंकर यांचे वडील श्याम शंकर विद्वान व कायदेतज्ज्ञ होते. त्यांचे पूर्ण बालपण वडिलांच्या गैरहजेरीतच गेले. त्यांची आई हेमाङ्गिनी यांनी त्यांचे पालन केले. थोरले भाऊ उदय शंकर हे विख्यात भारतीय नर्तक होते. ते पॅरिस येथे राहत. १९३० साली रवि शंकर आईसोबत पॅरिस येथे गेले. त्यांचे आठ वर्षांचे शालेय शिक्षण तेथेच झाले. १९३८ साली, वयाच्या अठराव्या वर्षी रविशंकर यांनी उस्ताद अलाउद्दीन खान यांच्याकडे शिक्षण सुरू केले. शिक्षणकाळात ते उस्ताद साहेबांचे वडील व आजचे प्रसिद्ध सरोदवादक अली अकबर खान यांच्याशी परिचीत झाले. त्यांनतर त्या दोघांनी अनेक ठिकाणी एकत्र जुगलबंदी केली. उस्ताद अलाउद्दीन खान यांच्याकडिल शिक्षण १९४४ पर्यंत चालले. १९३९ साली अमदावाद शहरात प्रथम खुली मैफल केली. १९४५ सालापासूनच रविशंकराच्या साङ्गीतिक सृजनशीलतेचे भ्रमण इतर शाखांमध्येही सुरू झाले. त्यांनी बॅलेसाठी संगीत रचना व चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शन सुरू केले. त्याकाळातील गाजलेले चित्रपट धरत्री के लाल व नीचा नगर या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन त्यांनी केले. इक्बाल यांच्या सारे जहासे अच्छा या गीतास त्यांनी दिलेले संगीत अतिशय लोकप्रिय ठरले. इ.स. १९४९ साली रवि शंकर दिल्लीच्या ऑल इन्डिया रेडिओत संगीत दिग्दर्शक म्हणून रूजू झाले. याच काळात त्यांनी वाद्य वृन्द चेम्बर ऑर्केस्ट्रा स्थापन केला. १९५० ते १९५५ सालात रवि शंकर यांनी सत्यजित राय यांच्या अपु त्रयी - (पथेर पांचाली, अपराजित व अपुर संसार) या चित्रपटांना संगीत दिले. यानंतर त्यांनी चापाकोय़ा , चार्ली व सुप्रसिद्ध गांधी चित्रपटांस संगीत दिले. १९६२ साली पन्डित रवि शंकर यांनी किन्नर स्कुल ऑफ म्युझिक, मुंबई व १९६७ साली किन्नर स्कुल ऑफ म्युझिक, लॉस ऍन्जलेस स्थापन केली. रवि शंकर यांचे संगीत व्यक्तित्व दुमुखी होते. सतारवादक व संगीतकार अशी ती दोन रूपे होती. सतारवादक म्हणून ते परंपरावादी व शुद्धतावादी; पण संगीतकार म्हणून उन्मुक्तपणा अशा रूपात वावरत. १९६६ साली त्यांनी प्रसिद्ध पाश्चात्य संगीतकार जॉर्ज हॅरिसन यांच्या सोबत जॅझ, अभिजात पाश्चात्य संगीत व लोकसङ्गीत अशा विविध प्रवाहांवर काम केले. १९५४ साली सोव्हिएत युनियनमधील मैफिल ही त्यांची पहिली आंतरराष्ट्रीय मैफिल. त्यानंतर १९५६ साली त्यांनी युरोप अमेरिकेत नेक कार्यक्रम केले. यात एडिनबर्ग फेस्टिव्हल, रॉयल फेस्टिव्हल हॉल अशा प्रतिष्ठेच्या मंचांचा समावेश आहे. १९६५ साली बीटलसच्या जॉर्ज हॅरिसन यांनी सतार शिकण्यास सुरूवात केली. या काळात त्यांचे हॅरिसन यांच्याशी प्रस्थाप्त झालेले मैत्रीपूर्ण संबंध त्यांना आंतरराष्ट्रीय मंचांची पायरी चढवण्यास मदतभूत ठरले. जॉर्ज हॅरिसन हे रवी शंकरांचे पॉप जगतातील "मेन्टर" (पालक) मानले जातात. मा.रवि शंकर यांचे ११ डिसेंबर २०१२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • नौशाद अली

    हिंदी चित्रपटसंगीताचा सुवर्णकाळ ज्याला म्हटलं जातं त्याची सुरुवात नौशादजींनी केली. त्यांचा जन्म २५ डिसेंबर १९१९ रोजी झाला. नौशादजींनी १९४२ च्या शारदा पासून १९६८ च्या संघर्ष पर्यंत २६ वर्षात ५ हिरक महोत्सवी रतन, अनमोल घडी, बैजू बावरा, मदर इंडिया आणि मुघल-ए-आझम, १२ सुवर्णमहोत्सवी आणि तब्बल ३५ रौप्यमहोत्सवी चित्रपटाना संगीत दिले. त्यांच्या हिरक महोत्सवी चित्रपटांची नावं बघीतली तर पहिले दोन चित्रपट आणि बैजू बावरा हे केवळ आणि केवळ नौशादजींच्या संगीताने तारले होते. हिंदूस्थानी शास्त्रीय संगीतातला असा एकही राग नाही ज्यावर आधारित नौशादजींचं एकतरी गाणं नाही. पण नौशादजींच्या संगीतातून रफी यांना वेगळा काढणे केवळ अशक्य आहे. रफीच्यां आवाजाच्या रेंजचा, त्याच्या क्लासिकल वरील हुकुमतीचा, वेगवेगळे प्रयोग करण्याच्या तयारीचा सर्वात जास्त आणि अप्रतिम वापर जर कुणी केला असेल तर तो नौशादजींनीच. हिंदी चित्रपट संगीतातले काही ठळक आणि वेगळे प्रयोग करण्याचं श्रेय मात्र नौशादजींकडेच जातं. खरंतर शास्त्रिय संगीत हाच त्यांचा पाया असला तरी याही क्षेत्रातले बर्मनदादा, शंकर जयकिशन यासारख्या समांतर संगीतकारांची स्पर्धा त्यांना होतीच. पण या सर्वातूनही आपला बाज न बदलता वर्षानू वर्ष टिकून रहाणे या साठी मेहनत आणि सृजनशिलतेची आवश्यकता असते. पं. पलूस्कर आणि खाँसाहेब आमिरखान यासारख्या दिग्गजांना बैजू बावरा साठी केवळ साडे-सहा मिनीटांच्या जुगलबंदीसाठी तयार करणे, हिंदी चित्रपट संगीतकारांना दारातही उभे न करणार्या खाँसाहेब बडे गुलाम अली खान यांच्याकडून मुघल-ए-आझम साठी चक्क दोन बंदिशी गावून घेणे, महेंद्र कपूर सारख्या गुणी गायकाला पहिली संधी देणे ही नौशादजींची कमाल होती. बैजू-बावरा हा चित्रपट तर त्यांनी अक्षरश: निर्धाराने केवळ आपल्या संगीताच्या जोरावर हिरक-महोत्सवी केला. या चित्रपटाचे निर्माते जरी प्रकाश भट असले तरी या चित्रपटाची खरी निर्मीती नौशादजींचीच होती. आपल्या मित्रासाठी त्यांनी दिलेले हे योगदान होते. त्यांनी काही चित्रपटांची निर्मितीही केली. उडन खटोला हे त्यातले ठळक नाव. गुलाम मोहम्मद यांनी काही काळ त्यांच्या सहाय्यकाची भुमिका केली होती. त्यामुळेच पुढे स्वतंत्र संगीतकार म्हणून गुलाम मोहम्मद यांनी संगीत दिलेल्या पाकिजाचे पार्श्वसंगीत गुलाम मोहम्मद यांच्या निधनानंतर नौशादजींनी पुर्ण केलं. पाकिजा न पाहिलेल्यांना या पार्श्वसंगीताची गंमत कदाचित कळणार नाही. कारण चित्रपटाच्या संगीताच्या एल.पी. रेकॉर्डस, कॅसेटस, सी.डी.ज वर जितकी गाणी आहेत तितकीच किंबहून थोडी जास्तच गाणी या पार्श्वसंगीतात लपली आहेत जी केवळ चित्रपट पाहतानाच ऐकायला मिळतात. पण नौशादजींच्या प्रयोग करण्याच्या हौसेमुळे काही वेळेला त्यांचं संगीत हे केवळ ऐकायला छान आणि म्हणायला कठिण बनलं. सामान्य संगीतरसिकांना काहीसं अडचणीचं भासू लागलं. रफीला देखील याचा काही वेळेला त्रास झाला. उदा. बैजू बावरा मधलं "ओ दुनिया के रखवाले" गाताना ताण असह्य होऊन रफीच्या नाकाचा घुळणा फुटला आणि रक्त वाहू लागलं. पण त्याही स्थितीत त्याने ते गाणं पुर्ण केलं. तिच गोष्ट मुघल-ए-आझम मधल्या "जिंदाबाद ऐ मुहोब्बत जिंदाबाद" या गाण्याची.
    नौशाद यांचे ५ मे २००६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • उस्ताद अली अकबर खान

    उस्तादजींना त्यांच्या वडीलांकडून अनेक वाद्याचे प्रशिक्षण मिळाले पण ते सरोदकडे जास्त आकर्षित झाले .त्यांचे वडील अलाउदिन खान कडक शिस्तीचे होते. पहाटेच त्यांचे संगीताचे धडे सुरु होत ते अठरा तास चालत. उस्तादजी तबला आणि पखवाज त्यांच्या काकांकडून आफताबुददीन खान यांच्याकडून शिकले. सुप्रसिद्ध सरोद वादक तामीर बरन आणि सुप्रसिद्ध बासरीवादक पन्नालाल घोष यांच्याकडेही शिकले त्यावेळी ते शिबपूर येथे येत असत.

  • हरदीपसिंग पुरी

    संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीवर भारताची अलीकडेच दोन वर्षांसाठी जी निवड झालीतिच्या मागे भारताच्या तिथल्या प्रतिनिधीचा मोठा वाटा आहे. हरदीपसिंग पुरी हे भारताचे संयुक्त राष्ट्रसंघातले कायमचे प्रतिनिधी आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीवर अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, रशिया आणि चीन हे कायमचे प्रतिनिधी आहेत आणि त्यांना व्हेटोचा (नकाराधिकार) अधिकार आहे. व्हेटोचा अधिकार नसलेले दहा प्रतिनिधी निवडण्यात येतात. त्यात यंदा भारताची निवड झाली. भारताला १९१ मतांपैकी १८७ मते पडली हे विशेष आहे. पाच वर्षांमध्ये कोणत्याही एका देशाला मिळालेली ही सर्वाधिक मते आहेत. आशिया विभागातून कझाकस्तानला प्रतिनिधीत्व हवे होते, पण ऐन वेळी कझाकस्तानने आपली उमेदवारी मागे घेतली आणि भारताने ही निवडणूक लढवायचे ठरवले. दरवर्षी कायम नसलेल्या पाच प्रतिनिधी देशांना अशी संधी मिळत असते. गेल्या वर्षी हरदीप बोस्निया, ब्राझील, गेबॉन, लेबानन । आणि नायजेरिया निवडले गेले होते. यंदा जपान, ऑस्ट्रिया, मेक्सिको, तुर्कस्तान आणि युगांडा हे देश निवृत्त होत आहेत. भारताबरोबर दक्षिण आफ्रिका, जर्मनी, कोलंबिया आणि पोर्तुगाल हे देश निवडले गेले आहेत. नव्याने निवडले गेलेले सदस्य आता सुरक्षा समितीवर १ जानेवारीपासून काम पाहायला लागतील. अशा पद्धतीने निवडून येण्याची भारताला जवळपास १९ वर्षांनी संधी लाभलेली आहे. विशेष हे की भारताच्या या प्रतिनिधित्वाला पाकिस्ताननेही पाठिंबा दिला होता. ज्यांनी या प्रतिनिधित्वासाठी कसोशीने प्रयत्न केले ते हरदीपसिंग पुरी हे गेल्या वर्षीच संयुक्त राष्ट्रसंघात प्रतिनिधी म्हणून पाठवण्यात आले होते. त्याआधीचे प्रतिनिधी निरूपम सेन हे निवृत्त झाल्याने ती जागा रिकामी झाली होती. परराष्ट्र सेवेच्या १९७४ च्या तुकडीचे हरदीपसिंग पुरी हे संयुक्त राष्ट्रसंघात दाखल होण्यापूर्वी ब्राझीलमध्ये राजदूत होते. भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आर्थिक सहकार्य वाढावे यासाठी निर्माण झालेल्या गटासाठीही त्यांचेच प्रयत्न कारणीभूत ठरले आहेत. ब्राझील हा देश आहे.

    अणुपुरवठादार अमेरिकेबरोबरच्या अणुकरारानंतर ब्राझीलचे महत्त्व भारताच्या दृष्टीने अधिकच वाढले होते. त्यातच ब्राझील, भारत आणि चीन असाही आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा गट निर्माण करण्यात आला. जागतिक व्यापार संघटनेविषयीचा पुरी यांचा चांगलाच अभ्यास आहे, त्याचा ब्राझीलमध्ये उपयोग करून घेण्यात आला. ब्राझील हा देशही संयुक्त राष्ट्रसंघात कायमचे प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी प्रयत्नशील आहे.

    भारताला कायमचे प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत, पण भारताचा त्यासाठीचा संपर्क कमी पडतो असा आक्षेप नेहमी घेतला जातो, पण तो वाढवण्यात आपल्याला यश येईल, असे पुरी यांचे म्हणणे आहे. भारताचा आत्मविश्वासही त्यामुळे वाढणार आहे. परराष्ट्र सेवेत दाखल झाल्यावर पुरी यांना त्या खात्याचा आर्थिक विभाग सोपवण्यात आला. नवी दिल्लीमध्ये परराष्ट्र सेवेत त्यांनी इतर अनेक विभागही सांभाळले आहेत. ते परराष्ट्र सेवेत काही काळ सचिवही होते. संयुक्त राष्ट्रसंघाच्या जीनिव्हामधील कार्यालयामध्येही त्यांनी कायम प्रतिनिधी या नात्याने काम पाहिले आहे. पुरी हे अतिशय धूर्त आणि कार्यतत्पर राजनैतिक प्रतिनिधी म्हणून परिचित आहेत परी हे अतिशय थोड्याच अवधीत न्यूयॉर्कमध्ये लोकप्रिय ठरले आहेत. पुरी यांच्या पत्नी लक्ष्मी याही परराष्ट्र सेवेत आहेत. या दांपत्यास दोन मुली आहेत. ३५ वर्षांच्या परराष्ट्र सेवेत त्यांनी जपान, श्रीलंका, ब्रिटन या देशांमध्येही काम केले आहे. परराष्ट्र सचिवांच्या कार्यालयामध्ये ते सचिवपदीही होते. अमेरिकेच्या विभागावर ते सहसचिव होते. त्यांनी संरक्षण मंत्रालयामध्ये काही काळ नेमणुकीवर काम केले आहे. त्यांचे आतापर्यंत पाच 'पेपर्स' प्रसिद्ध झाले आहेत. बोस्नियामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. पुरी यांचा जन्म १९५४ मध्ये झाला.