मिशी ठेवणार्या एका कालाकराने हॉलीवूडमधे प्रवेश केला. तीन वर्षात ऑस्कर नामांकन व तीन गोल्डन ग्लोब अवॉर्ड मिळवले. पहिल्या हॉलीवुडपटात उत्कृष्ट दिग्दर्शकाबरोबर व प्रसिद्द नटासोबत काम करून त्याने आपली भूमिका अजरामर केली. हाताने पत्र लिहीण्याच्या व पोस्टमने पत्र पोचवण्याच्या काळात, त्याला आलेल्या प्रेमपत्रांची व मागण्यांची संख्या होती एक महिन्यात ३०००! सुरुवातीची कारकीर्द इजिप्त मधे अरेबिक चित्रपटात घडवलेला व पुढे इंग्रजी येत असल्याच्या गुणावर हॉलिवुड्चा झालेला हा थोर कलाकार म्हणजे ‘ओमर शरीफ’. तरुणींच्या दिलाची धडकन ‘ओमर शरीफ’.
रसायनशास्राच्या अध्यापनात मौलिक सुधारणा करण्यासाठी ‘युनेस्को’ने त्यांची ‘पायलट प्रोजेक्ट ऑन टीचिंग केमिस्ट्री’ या प्रकल्पात आंतरराष्ट्रीय सल्लागार म्हणून नेमणूक केली होती. कृत्रिम किरणोत्सर्गाच्या शोधाला ५० वर्षे पूर्ण झाल्यामुळे त्यांनी १९८५ साली भाभा अणू संशोधन केंद्र यांच्या सहकार्याने एक भव्य आंतरराष्ट्रीय चर्चासत्र यशस्वीपणे पार पाडले होते.
सुरेश हळदणकर यांचा जन्म १८ डिसेंबरला झाला.
सुरेश हळदणकर यांचा जन्म गोमांतकातील. गाणे शिकण्याच्या निमित्ताने पुण्यात आले. त्यांना पं. बापुराव केतकर यांच्याकडे शास्त्रीय संगीताची तालीम मिळाली. त्याच सुमारास गोविंदराव टेंब्यांकडून काही नाट्यपदांचीसुद्धा तालीम मिळाली. सुरेश हळदणकर हे दीनानाथ, बालगंधर्व व कृष्णराव यांना गुरुस्थानी मानत.पुण्यातून मुंबईला आल्यावर हळदणकरांचे शास्त्रीय गायनाचे शिक्षण पं. मनहर बर्वे, पं. जगन्नाथबुवा पुरोहित, पं. गणपतराव देवासकर आदी संगीततज्ञांकडे झाले. दैवयोगाने, त्यांना सुरेल, बारीक परंतु धारदार आवाज प्राप्त झाल्याने त्यांच्या गाण्यात दीनानाथ मास्तरांच्या गाण्यातील तडफदारपणा व बालगंधर्वांच्या गाण्यातील लडिवाळपणा या दोन्ही गोष्टी साधता आल्या व त्यामुळे अनेक वर्षे संगीत रंगभूमीवरून व खासगी मैफलीतून ते त्यांच्या गाण्याचा आनंद रसिकांना देऊ शकले. ‘होनाजी बाळा’ या नाटकातील त्यांची भूमिका व विशेष करून त्यातील ‘श्रीरंग कमलकांता’ हे त्यांचे पद गाजले.
एके दिवशी त्या नाटकाच्या प्रयोगाला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे प्रणेते प्र. के. अत्रे हजर होते. त्या दिवशी ‘श्रीरंगा कमलकांता’ हे त्यांचे पद इतके रंगले, की अत्रे मोहित होऊन अंक संपल्यावर रंगमंचावर आले व सर्व रसिकांच्या समोर पडदा उघडून त्यांनी सुरेश हळदणकरांना ‘महाराष्ट्र गंधर्व’ ही पदवी बहाल केली. पुढे ते प्रसिद्धीपासून दूर गेले. तरीसुद्धा त्या अगोदर अनेक वर्षे ते त्यांच्या गाण्याचा आनंद रसिकांना देऊ शकले. त्यांनी गायलेल्या काही जुन्या रेकॉर्ड्स उपलब्ध आहेत. त्यांतील पदे उदाहरणार्थ, ‘विमल अधर निकटी’, ‘रघुराया गं माझा’, ‘रघुराजा हा माझा विसावा’, ‘श्रीरंगा कमलकांता’, ‘मानिली आपुली’, ‘सुरसुखखनि तू विमला’, ‘पद्मनाभा नारायणा’ ही पदे त्यांना प्रसिद्धी देऊन गेली.
सुरेश हळदणकर यांचे १७ जानेवारी २००० रोजी निधन झाले.
सुरेश हळदणकर यांची काही गाणी.
‘विमल अधर निकटी’
‘रघुराजा हा माझा विसावा’
‘श्रीरंगा कमलकांता’
‘मानिली आपुली’
‘सुरसुखखनि तू विमला’
‘पद्मनाभा नारायणा’
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
दोन-तीन चित्रपटात राजा ठाकूरांनी जुन्नरकरांबरोबर संकलनात सहाय्यक म्हणून काम केले. त्यांचा जन्म २६ नोव्हेंबर १९२३ रोजी झाला.१९४७ साली संगीतकार शंकरराव पवार यांना जी. एम. शहा नावाचा निर्माता भेटला. त्याला चित्रपट काढायचा होता. शंकररावांनी त्याला राजाभाऊ परांजपे यांचं नाव दिग्दर्शक म्हणून सुचवलं.
राजाभाऊंनी राजा ठाकूरचं संकलनाचं काम पाहिलं होतं. व राजा ठाकूर यांच्यावर संकलनाची जबाबदारी सोपवली. चित्रपटाचं नाव होतं ‘बलिदान. १९४७ च्या ‘बलिदान’ पासून ते १९५३ पर्यंत सुमारे १५ चित्रपटांचं संकलन राजानं केलं आणि मराठी चित्रपटसृष्टीत एक उत्तम संकलक म्हणून नाव मिळवलं.
संकलक राजा ठाकूर हे दिग्दर्शक राजाभाऊ परांजपे यांचे घनिष्ठ सहकारी होते. छायाचित्रकार बाळ बापट आणि संकलक राजा टाकूर हे राजाभाऊ परांजप्यांचे डावे-उजवे हात होते. राजा ठाकुरांनी संकलक म्हणून नाव कमावलं. परंतु त्यांच्या मनात एक ‘प्रतिभावंत’ कल्पक दिग्दर्शक दडला होता. १९५३ सालच्या ‘बोलविता धनी’ या चित्रपटापासून राजा ठाकूर यांची दिग्दर्शक म्हणून कारकीर्द सुरु झाली. १९५३ ते १९७५ या २३ वर्षांत त्यांनी २० मराठी, २ हिंदी व ‘बिरबल ब्रदर’ या इंग्रजी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं.
दिग्दर्शक म्हणून राजा ठाकूरांची अनेक वैशिष्ठ्ये होती. उत्तम साहित्यिकांकडून त्यांनी पटकथा-संवाद लिहून घेतले. त्यात ग. दि. माडगूळकर, ग. रा. कामत, मधुसूदन कालेलकर, शं. ना. नवरे, राम केळकर, पु. भा. भावे, सुरेश खरे, रणजित देसाई अशी मंडळी होती. यातील शं. ना. नवरे, पु. भा. भावे, सुरेश खरे, राम केळकर व रणजित देसाई यांना त्यांनीच आग्रह करून पटकथा-संवाद लेखक बनवले.
ठाकुरांच्या चित्रपटांचे मूळ कथा लेखक दत्त रघुनाथ कवठेकर, अरविंद गोखले, चिं. वि. जोशी, पं. महादेव शास्त्री जोशी, द. ग. गोडसे, बाबुराव अर्नाळकर, वसुंधरा पटवर्धन, व. पु. काळे, ग. वा. बेहेरे असे ख्यातकीर्त साहित्यिक होते. मराठी चित्रपटसृष्टीत त्याकाळी तमाशा, लावणी, पाटील व कुर्हाटड यांचा वापर करणार्या ग्रामीण चित्रपटांची चलती होती. पण राजा ठाकूर त्या वाटेला गेले नाहीत. त्यांच्या चित्रपटांपैकी ‘मी तुळस तुझ्या अंगणी’ आणि ‘रंगल्या रात्री अशा’ या दोन्ही चित्रपटांचं कथानक जरी तमाशाप्रधान असलं तरी तिथे चाळांचा किंवा लावण्यांचा उपयोग गल्ल्यासाठी केला नव्हता.
राजा ठाकुरांनी सामाजिक चित्रपट दिले. पण त्याबरोबर ‘गजगौरी’सारखा पौराणिक, ‘राजगडचा राजबंदी’सारखा ऐतिहासिक, ‘गोरा कुंभार’सारखा संतपट आणि ‘मी तुळस तुझ्या अंगणी’ व ‘रंगल्या रात्री अशा’सारखे थोडा तमाशा दाखवणारे चित्रपट दिले. ‘बिरबल माय ब्रदर’ सारखा इंग्रजी चित्रपट दिग्दर्शित करणारे ते पहिले मराठी दिग्दर्शक होते. याच चित्रपटानं त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीचं दार खुलं केलं.
‘जखमी’ने अनेक ठिकाणी रौप्यमहोत्सव साजरा केला. ‘जखमी’नंतर ‘रईसजादा’ हा हिंदी चित्रपट राजा ठाकुरांनी करायला घेतला. हा चित्रपट त्यांच्या हयातीत पुरा होऊ शकला नाही. राजा ठाकूर यांना महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात सहा वेळा उत्कृष्ट चित्रपटाचा व सहा वेळा उत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला. त्यांच्या तंत्रज्ञालाही अनेक पुरस्कार मिळाले. ‘मी तुळस तुझ्या अंगणी’, ‘रंगल्या रात्री अशा’, ‘एकटी’ व ‘मुंबईचा जावई’ या चार चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले.
शांत स्वभावाचे राजा ठाकूर साहित्यिक, कलावंत नट, यांच्यात रमत. त्यांचा सुसंस्कृतपणा बोलण्यात व आचरणातून दिसत असे. राजा ठाकूर यांचे २८ जुलै १९७५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. मधू पोतदार
अनेक शास्त्रज्ञांनी हॅन्रिच हर्ट्झच्या बिनतारी संदेशांच्या प्रयोगांमधून हवेतून जात असलेल्या अदृश्य लहरींचे अस्तित्व स्वत:ही तसेच प्रयोग करून तपासले होते. त्यामुळे अशा लहरी आपल्या डोळ्यांना दिसत नसल्या तरी त्या प्रत्यक्षात असतात या विषयी कुणाच्याच मनात शंका नसायच्या. तसेच मॅक्सवेलनेही इलेक्ट्रोमॅग्नेटीक लहरींच्या संदर्भात मांडलेली समीकरणेसुद्धा पडताळून पाहतात येतात, हेही अनेक जणांना पटले होते. पण या सगळ्याचा उपयोग प्रत्यक्षात कुठे आणि कसा करता येईल हे मात्र कुणालाच उमगत नव्हते.
मल्लिका साराभाई या नर्तकी मृणालिनी साराभाई व वैज्ञानिक विक्रम साराभाई यांची कन्या. समांतर सिनेमा पासून आपल्या करीयरची त्यांनी सुरवात केली. त्यांचा जन्म ९ मे १९५४ रोजी झाला.
मल्लिका साराभाई यांनी पीटर ब्रुक यांचे नाटक महाभारत मध्ये द्रोपदी ची भूमिका केली होती. याच नाटकावर नंतर चित्रपट बनवला गेला होता. मल्लिका साराभाई यांनी भारतात व परदेशात अनेक कार्यक्रमात भाग घेतला आहे. मल्लिका साराभाई यांनी हर्ष मन्दर यांच्या पुस्तकावर आधारित अनसुनी या नाटकाची पटकथा लिहिली आहे. मल्लिका साराभाई या दर्पणा अकादमी ऑफ आर्टस् (अहमदाबाद) च्या निदेशक आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक मोहम्मद अझिज यांचा जन्म २ जुलै १९५४ रोजी पश्चिम बंगालमध्ये झाला. मोहम्मद अझिज यांचे पूर्ण नाव सईद मोहम्मद अझिज उन नबी. ८० आणि ९० च्या दशकातले एक नावाजलेले गायक म्हणून त्यांचा लौकिक होता. मोहम्मद अझिज यांनी बॉलिवूड, उडिया आणि हिंदी चित्रपटांसह बऱ्याच प्रादेशिक भाषांमध्ये पार्श्वगायन करून हिट गाणे दिली. मोहम्मद अझिज यांनी 'दूध का कर्ज', 'खुदा गवाह', 'हीना', 'स्वर्ग', 'गीत' यासारख्या चित्रपटांत त्यांनी पार्श्वगायन केले.
'प्यार हमारा अमर रहे', 'ऐ मेरे दोस्त', 'तेरी बेवफाई का शिकवा', 'मितवा भूल ना जाना', 'फूल गुलाब का', 'दुनिया में कितना गम है', 'रब को याद करु', 'बहुत जताते हो', 'तू कल चला जायेगा', 'हम तुम्हें इतना', 'माय नेम इज लखन', 'तुने प्यार की बिन बजाई', 'तुमसे बना मेरा जीवन', यासारखी हिट गाणी गायली आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
मोहम्मद अझिज यांची गाणी.
https://www.youtube.com/watch?v=MNOjKA6vO-0
https://www.youtube.com/watch?v=zczC3QjqArA
सुरुवातीस राजिंदरसिंग बेदी यांनी पंजाबीत लेखन केले; पण नंतर ते उर्दूतून लिहू लागले. त्यांचा जन्म १ सप्टेंबर १९१५ रोजी झाला. त्यांच्या पंजाबीतील कथांचे हड्डीआँ ते फुल्ल (१९४२) व घर विच बजार विच (१९४४) हे दोन संग्रह होत. आपल्या कथालेखनाची सुरुवात त्यांनी प्रख्यात रशियन लेखक चेकॉव्ह याच्या लेखनाने प्रभावित होऊन केली होती. चेकॉव्हशिवाय त्यांनी टॉलस्टॉय, ब्रेट हार्ट, डी.एच्.लॉरेन्स आणि मोपासा यांच्या साहित्याचेही वाचन केले. ‘भोला’ ही कथा १९३६ मध्ये लिहून त्यांनी आपल्या उर्दू कथालेखनाची सुरुवात केली आणि दाना-व-दाम हा आपला पहिला कथासंग्रह १९३९ मध्ये प्रकाशित केला. या संग्रहामुळे त्यांना खूपच प्रसिध्दी मिळाली. या कथासंग्रहात अपार सहानुभूती आणि प्रखर वास्तवता यांचा प्रत्यय प्रकर्षाने येतो.
बेदी हे आपल्या कथांतून जीवनातील दुःखमय पैलूचे दर्शन घडवत असतानाही त्यातील सुखमय पैलूंचेही विस्मरण त्यांना होत नाही, हे त्यांच्या कथेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. या दृष्टीने त्यांचे गर्म कोट हे आत्मवृत्त विशेष लक्षणीय म्हणावे लागेल. त्यांच्या कथालेखनाचे आणखी काही विशेष म्हणजे त्यांच्या कथातील सुरुवातीच्या काही वाक्यातच ते सबंध कथेच्या आशयाचे सार सूचकतेने गोठवत असत. कथांशिवाय बेदींनी काही नाटके व एकाकिंकाही लिहिल्या आहेत आणि त्याचे अनुक्रमे बेजान चीजे (१९४३) व सात खेल (१९४६) हे संग्रह प्रकाशित झाले आहेत. एक चादर मैली सी (१९६२) ही त्यांची लघुकांदबरी असून तिला १९६४ चा साहित्य अकादेमी पुरस्कार मिळाला. पंजाबमधील एका गावाच्या पार्श्वभूमीवर ती लिहिली असून तीत ‘राणू’ च्या वैवाहिक जीवनाचे उत्कृष्ठ चित्रण आहे. खूशवंतसिंग यांनी तिचा इंग्रजीत (आय टेक धिस वूमन - १९६७) अनुवादही केला आहे.
‘मिथुन’या कथेतही अशाच प्रकारचे सुंदर शैलीत वर्णन आहे. बेंदीनी ‘सिर्फ एक सिगरेट’ ह्या आणखी एका रमणीय कथेमध्ये पिढयांच्या तफावतीबाबत सुंदर चित्रण केले आहे. दाना-ष-दाम (१९३९) , गिऱ्हान (१९४२) , कोख जली (१९४९) अपने दुख मुझे दे दो (१९६५) , हाथ हमारे कलम हुए (१९७४) हे त्यांचे उल्लेखनीय उर्दू कथासंग्रह होत. मिर्झा गालिब (१९५४), देवदास (१९५६), मधुमती (१९५८), अनुराधा (१९६०) सत्यकाम (१९६९), मेरे सनम इ. गाजलेल्या चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या असून एक आघाडीचे पटकथा लेखक म्हणून त्यांनी मोठाच लौकिक संपादन केला. एक चादर मैली सी (१९७१), फागुन (१९७२) आणि आँखो देखी (१९७७) हे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केलेत. दस्तक(१९७२) ह्या अत्यंत गाजलेल्या चित्रपटांची कथा, पटकथा, दिग्दर्शन व निर्मितीही त्यांचीच असून ह्या चित्रपटास तीन राष्ट्रीय पुरस्कार लाभले आहेत. १९७५ मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. मा.राजिंदरसिंग बेदी यांचे निधन १९८४ मध्ये झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. marathivishwakosh
संदीप खरे यांनी इयत्ता चौथीत असताना पहिली कविता केली. त्यांचा जन्म १३ मे १९७३ रोजी झाला. अनेक शालेय स्पर्धांमध्ये त्याने कविता आणि कथा या विषयात अनेक पारितोषिके मिळवली आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेने आयोजलेल्या 'उमलते अंकुर' या कार्यक्रमात त्यांनी सादर केलेल्या कविता ही कवी म्हणून ओळख निर्माण होण्याच्या दृष्टीने महत्त्वाची घटना ठरली. ‘मौनाची भाषांतरे’, ‘नेणिवेची अक्षरे’, ‘तुझ्यावरच्या कविता’ आणि ‘अग्गोबाई ढग्गोबाई’ या त्याच्या कवितांसग्रहांची विक्रमी विक्री झाली आहे. त्याने स्वत: स्वरबद्ध केलेल्या तसेच सलिल कुलकर्णी आणि अन्य संगीतकारांनी संगीतबद्ध केलेल्या सीडीही अपार लोकप्रियता लाभली आहे. सलग अनेक वर्षे हाऊसफुल्ल गर्दीत सुरू असलेला आणि १२०० प्रयोगांजवळ पोहोचलेला ‘आयुष्यावर बोलू काही’ हा कार्यक्रम तर मराठी भावसंगीतामध्ये एक इतिहास घडवतो आहे. या कार्यक्रमातील गीतांसोबत संदीप करीत असलेल्या गद्य कवितांचे सादरीकरण हे देखील या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले आहे. ‘मी मोर्चा काढला नाही, मी संपही केला नाही’.. ‘मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात’.. ‘लव्हलेटर लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे लव्हलेटर असतं’.. ‘दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला’.. ‘डिपाडी डिपांग’.. यांसारख्या कविता आणि लोकप्रिय गीतांमधून कवी संदीप खरे यांनी खरे मराठीत नाव कमवले आहे.
संदीप खरे आता ‘मोबाइल अॅप’च्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येत आहे. ‘संदीप खरे’ज वर्ल्ड या अॅपद्वारे रसिकांना संदीपच्या काही कविता विनाशुल्क तर काही कविता अल्बमच्या माध्यमातून सशुल्क उपलब्ध होणार असून मोबाइल अॅपच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचणारा संदीप खरे हे मराठीतील पहिलाच कवी ठरले आहे. जगभरातील मराठी रसिकांमध्ये आणि विशेषत: युवा पिढीमध्ये संदीप खरे यांच्या कविता अत्यंत लोकप्रिय आहेत. पायरसी आणि ‘संदीप खरे’ज वर्ल्ड – ‘गुगल प्ले स्टोअर’वरून हे अॅप विनाशुल्क ‘डाऊनलोड’ करता येऊ शकेल. लिंक
https://play.google.com/store/apps/details?id=com.innomobilesystems.skworld
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
संदीप खरे यांच्या कविता व गाणी
https://www.youtube.com/watch?v=AhyCHlFF_9Q
https://www.youtube.com/watch?v=U-yKzJsJWVk
https://www.youtube.com/watch?v=EThnG-4lp7w
स्त्रियांना वर्ज्य असणार्या क्षेत्रातच एखादी स्त्री पाय रोवून उभी असेल तर नवल वाटेल ना! आज प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. त्याचप्रमाणे मर्चंट नेवीसारख्या कठीण समजल्या जाणार्या क्षेत्रात तरी महिला मागे कशा राहतील? या क्षेत्रात कामगिरी केलेल्या रेश्मा मुरकर या तरुणीचा हा जिद्दीचा प्रवास आपण अनुभवूया.
एकतर आकाशात उडायचं किंवा पाण्यातून प्रवास करायचा अशी रेश्माची स्वप्नं होती. या स्वप्नांना साकार करण्यासाठी केवळ जिद्द लागते. जिद्दीशिवाय खडतर स्वप्न साकार करणं कठीणच. त्यातही सर्वसामान्य घरात जन्मलेल्या महिलांना तर ते त्याहून कठीण. लहानपणापासूनच विविध क्षेत्रांत आपलं नाव उमटवणा-या रेश्माला एका अशा क्षेत्रात काम करायचं होतं जिथे स्त्रियांनी जाण्याचं स्वप्नही पाहिलं नसेल.
बारावी झाल्यावर नक्की कोणतं क्षेत्र निवडायचं याविषयी तिच्या मनात खलबतं सुरू होती. खरं तर तिला पायलट व्हायचं होतं. मात्र त्यावेळेस पायलटसाठी तिला प्रवेश मिळाला नाही. मात्र तिने हिरमुसून न जाता एका वेगळ्या करिअरचा शोध घेत राहिली. याच शोधात असताना र्मचट नेवीविषयी माहिती सांगणा-या व्याख्यानाबद्दल तिला कळलं. र्मचट नेवी हे क्षेत्र रेश्माला वेगळं वाटलं, त्यामुळे हे व्याख्यान ऐकण्याची तिची इच्छा झाली. व्याख्यानात या क्षेत्राविषयी तिने ऐकलेली माहिती तिला फार आवडली.
काहीतरी आव्हानात्मक, कठीण, अशक्य करण्याची तिची धडपड या र्मचट नेवीच्या करिअरमुळे पूर्ण होणार होती. त्यामुळे आता याच क्षेत्रात तिला जाण्याची इच्छा झाली. या क्षेत्रात आल्यावर स्वत:चं वैयक्तिक आयुष्य लांब होतं. घरच्यांपासून वर्षानुवर्षे दूर राहावं लागतं. अथक परिश्रम आणि अभ्यास करावा लागतो. लहानपणापासून खेळ, नृत्य अशा गोष्टींमध्ये अव्वल असणारी रेश्मा आता मरिन क्षेत्रात जाऊ पाहत होती. आपली मुलगी इतरांच्या पावलांवर पाऊल न ठेवता स्वत:चं वेगळं अस्तित्व निर्माण करतेय हे तिच्या पालकांना जाणवलं आणि त्यांनीही तिच्या या निर्णयाचं स्वागत केलं.
मुळातच अभ्यासू विद्यार्थी असल्याने प्रत्यक्ष शिक्षणाला सुरुवात करण्याआधी तिने या क्षेत्रात येणा-या सर्व गोष्टी तपासल्या. म्हणजेच शिक्षण झाल्यावर नोकरी कशी मिळते, पगार किती असतो, सर्वात वरची पोस्ट कोणती? त्यासाठी किती अभ्यास लागतो? त्या अभ्यासाला किती वर्षे जातात? या सा-या गोष्टींची खातरजमा करून तिने अभ्यासाला सुरुवात केली.
या मुलाखतीत ती बोलताना तिने सांगतिलं की, ‘मला एकतर आकाशात उडायचं होतं किंवा पाण्यावर राहायचं होतं. वस्तुत: जमिनीवर नसतानाही तिचे पाय आजही जमिनीवरच आहेत. वयाच्या अवघ्या २८व्या वर्षी ती र्मचट नेवीमध्ये चिफ ऑफिसर आहे. नेहमीच्या मार्गावर चालून, १० ते ५ नोकरी करून घर-संसार सांभाळायचा एवढया माफक अपेक्षा मुलींच्या असतात. मात्र या अपेक्षांना छेद देत आपण मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे असं तिला वाटतं.
या क्षेत्रात काम करण्याविषयी आणि काम करताना आलेल्या अडचणींविषयी तिला विचारलं असता ती म्हणाली की, ‘मुळातच या क्षेत्रात आजही पुरुषांची मक्तेदारी फार आहे. शिवाय आपल्या या क्षेत्रात महिलांनी प्रवेश करावा अशी काही लोकांची इच्छाही नसते. पुरुषांच्या समुदायात राहून त्यांच्यासोबत मिळून-मिसळून काम करणं फार कठीण आहे. त्यांच्यात समरस होण्यासाठीच फार वेळ लागतो. कठीण काम असल्यामुळे महिलांना एखादं काम जमणारच नाही अशी समजूत पुरुषांमध्ये असते. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करून त्यांचा विश्वास संपादन करणं सर्वप्रथम काम मानलं जातं. आपल्या सहका-यांचा विश्वास संपादन करण्यासाठी प्रत्येकीला मानसिक, शारीरिक आणि भावनिकदृष्टया सक्षम राहणंही तितकंच गरजेचं आहे.’ पुढे ती म्हणाली, ‘शिपमध्ये असल्यामुळे निसर्गातले अनेक चमत्कार मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहेत. सूर्य क्षितिजाला जाताना त्याचा होणारा लालबुंद रंग म्हणजे नैसर्गिक जादूच वाटते. असे विविध निसर्गातील चमत्कार नेहमी अनुभवता आले.’
‘जेव्हा मी पहिल्यांदाच बोर्ड-शिपवर गेले तेव्हा प्रत्येक ऑफिसर मला एकच प्रश्न विचारत होते की, का तू र्मचट नेव्हीमध्ये यायचं ठरवलंस? या निर्थक प्रश्नांमुळे मी कधीकधी खूप डिस्टर्ब व्हायचे, शिवाय माझ्यातला आत्मविश्वासही कमी व्हायचा. आजही महिलांना त्यांना आवडत्या क्षेत्रात जाण्यासाठी जर कष्ट पडत असतील तर महिलांनी केवळ चूल आणि मूल याच संकल्पनेत रमायचं का?’ असं ती म्हणते.
‘र्मचट नेवीमध्ये करिअर करण्याचा माझा निर्णय किती चुकीचा आहे असं काहींनी मला येथे जाणवून दिलं. मात्र या टिपिकल संकल्पनेतून मला समाजाला बाहेर काढायचं होतं. कालांतराने माझं काम पाहून माझ्या वरिष्ठांनी माझ्यावर विश्वास ठेवला. पुरुषांप्रमाणे मीही काम करू शकते, असं त्यांना जाणवलं आणि अल्पावधीतच माझे वरिष्ठ माझ्यावर विश्वासाने काम सोपवू लागले. र्मचट नेवीमध्ये पुरुषांची मक्तेदारी आहे हे सिद्ध करण्यासाठी दुसरं उदाहरण द्यायचं झालंच तर मी जेव्हा तिकडे रुजू झाले त्यावेळेस माझ्या मापाचे युनिफॉर्म तिथे उपलब्धच नव्हते,’असं रेश्मा सांगत होती.
रुळलेल्या वाटेवरून न जाता स्वत:ची वेगळी वाट निर्माण करणं खरं तर फार अवघड काम आहे. वेगळी वाट धरणा-या महिलांच्या आयुष्यात अनेक संकटंही येतात; मात्र ती संकटं दूर सारून त्यातूनही नवा दृष्टिकोन साधून जी स्त्री नैया पार करते तिलाच आजची खरी सक्षम स्त्री म्हणायला हवं, त्यामुळे रेश्मा मुरकरही त्यापैकीच एक आहे. आज ती र्मचट नेवीमध्ये चीफ ऑफिसर पदावर आहे.
विचार केला नसेल अशा सुख-सुविधा तिच्या पायाशी लोळतायत. या सा-या यशामागे तिच्या आई-वडिलांनी तिला मोलाची साथ दिली म्हणून ती पुढे जाऊ शकली असं ती अभिमानाने सांगते. खेळ, कला आणि अभ्यास अशा सा-या गोष्टींचा यथासांग मेळ घालत तिने तिची सारी स्वप्नं पूर्ण केलीत. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात रेश्माने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली हे आजच्या महिला दिनाच्या दिवशी सांगणं म्हणजे फार कौतुकाची गोष्टच ठरेल ना!
-- स्नेहा कोलते
Copyright © 2025 | Marathisrushti