(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

  • कोटक महिंद्राचे मुख्य संचालक उदय कोटक

    वडिलांनी विचारले मग तुला काय हवे आहे? उदय म्हणाले, मी फायनान्शियल कन्सल्टन्सी करेन.त्याच कार्यालयात ३०० चौ.फुटाची जागा त्यांना देण्यात आली. त्या काळात बँकेतील ठेवीदारांना ६ टक्के व कर्जावर १६.५ टक्के व्याज घेतले जात होते. त्यावेळी टाटाची एक कंपनी नेल्कोची आर्थिक बाजू पाहणाऱ्या एका व्यक्तीची त्यांची चर्चा झाली. नेल्को बाजारातून पैसा घेत होती. उदय यांनी आपल्या मित्राला हे काम पाहण्यास सांगितले. नेल्कोने त्यांना वित्त पुरवठा केला. १९८० मध्ये अनेक विदेशी बँकांनी भारतात शाखा सुरू केल्या. यातून त्यांना अनेक आर्थिक स्त्रोत मिळाले.

  • बुंदेलखंडचा महाराजा छत्रसाल बुंदेला

    बुंदेलखंडचा महाराजा छत्रसाल बुंदेला यांचा जन्म ४ मे १६४९ रोजी झांशीजवळ ककर-कचनय गावामध्ये झाला.

    छत्रसाल राजाने बुंदेलखंडला शक्तिशाली राज्य बनवले होते. छतरपूर नगर छत्रसालनेच वसवले होते. त्यांची राजधानी महोबा होती. ते धार्मिक स्वभावाचे होते. छत्रसाल यांना बुंदेलखंडचे शिवाजी म्हणून ओळखले जायचे. छत्रसाल यांच्या वडिलांचे नाव होते बुंदेला वीर चंपतराय. त्यांनी १७ व्या शतकाच्या तिसऱ्या दशकात ओरछा प्रदेशाला मुघल साम्राज्यातून स्वतंत्र करण्याचा प्रण केला होता. यासाठी त्यांनी विद्रोचा झेंडा हाती घेतला होता. परंतु चंपतराय यांना स्वकीयांविरुद्धच अनेकदा युद्ध करावे लागले. कारण स्वकीयांपैकी काही जण हे मुघलांची हुजरेगिरी करून त्यांचे बंड थोपवण्याचे प्रयत्न करत होते. ३० वर्षे संघर्षानंतर स्वकीयांपैकीच काहींनी कट करून १६६१ मध्ये चंपतराय यांचा वध केला आणि मुंडके कापून औरंगजेबाकडे पाठवले. या संघर्षाच्या काळात बालक छत्रसालही आपल्या वडिलांसोबत जागोजागी भटकत राहिले. आणि त्यांच्याकडून युद्धकलेचे प्रशिक्षण घेत राहिले.

    आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला घेण्याची भावना छत्रसाल यांच्यात वाढीस लागली होती. यासाठी त्यांच्याकडे काही साधन नसल्याने ते सुसंधीची प्रतीक्षा करत होते. दरम्यानच्या काळात छत्रसाल मुघल सैन्यात भरती झाले. आणि सैन्यासह दख्खनच्या मोहिमेवर आले. तेथे मिर्झा राजे जयसिंग यांच्यासह सैन्यासह पुरंदरच्या वेढ्यात, आपला भाऊ अंगद तथा काका जामशहा यांच्या सोबत होते. त्या वेढ्याच्या वेळी शौर्य गाजवल्याने त्यांना पुरस्कृतही करण्यात आले. परंतु, छत्रसालच्या हृदयात आपल्या वडिलांच्या हत्येचा प्रतिशोध घेण्याची जिद्द पेटलेली होती. शिवाजी महाराजांच्या मुघलांविरुद्धच्या संघर्षामुळे ते प्रभावित झाले. मुघल सल्तनतीला आव्हान देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची भेट घेण्याची तीव्र इच्छा त्यांच्या मनात जागी झाली.

    एका दिवशी शिकारीच्या बहाण्याने छत्रसाल मुघलांच्या कंपूतून बाहेर पळून गेले. त्यांनी भीमा नदी पार करून आपल्या पत्नीसह शिवाजी महाराजंची पुण्यात भेट घेतली. इतिहासकारांच्या मते, छत्रपती शिवाजी व छत्रसाल भेट, शिवाजी महाराजांच्या आग्ऱ्याहून सुटकेनंतर 1667 मध्ये झाली. छत्रसाल काही काळ शिवाजी महाराजांकडे पुण्यात राहिले. तेथे त्यांनी महाराजांकडून युद्धनीती, कूटनीती आणि शासननीतीचे शिक्षण घेतले. नंतर त्यांनी या शिक्षणाचा आपल्या मुलखात बुंदेलखंडात मोठ्या खुबीने उपयोग केला.

    महाराजा छत्रसालची इच्छा होती की, दक्षिणेत राहून मुघलांविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराजांसोबत स्वराज्याच्या कामी यावे. परंतु छत्रपती शिवाजी महाराज दूरदर्शी होते. त्यांनी स्वराज्याच्या प्रयत्नाला फक्त दक्षिणेपर्यंत सीमित ठेवायचे नव्हते. म्हणून त्यांनी छत्रसालला सल्ला दिला की, तुम्ही बुंदेलखंडात परता आणि मुघलांविरुद्ध स्वातंत्र्याचा शंखनाद करा.

    छत्रपती शिवाजी महाराजांचा सल्ला प्राणपणाने मानून छत्रसाल बुंदेलखंडात परतले. तेथे त्यांनी फक्त ५ घोडदळातील सैनिक आणि २५ तलवारबाज यांच्यासह संघर्षाला सुरुवात केली. जवळ होती फक्त छत्रपतींनी चेतवलेले स्वराज्याचे स्फुलिंग. लवकरच ती संधी आली जेव्हा औरंगजेबाने आपल्या सैन्याला ओरछातील मंदिरे नष्ट करण्याचा आदेश दिला. या वेळी रयतेच्या दृष्टीने छत्रसालच एकमेव आशेची किरण होते. म्हणून सर्व जण छत्रसाल यांच्या नेतृत्वा संघटित झाले. यानंतर एकेक जहागीरदार अन् सरदार छत्रसाल यांना जोडत गेले अन् सर्वांनी मुघलांचा सशस्त्र प्रतिकार केला.

    छत्रसाल बुंदेला यांचे निधन २० डिसेंबर १७३१ रोजी झाले.

  • इज्रायलच्या माजी पंतप्रधान गोल्डा मायर

    इज्रायलच्या माजी पंतप्रधान गोल्डा मायर यांचा जन्म ३ मे १८९८ रोजी झाला. गोल्डा माबोविच म्हणजेच गोल्डा मायर या इज्रायलची "आयर्न लेडी" म्हणून ओळखल्या जात असत. १९६९ ते १९७४ त्यांनी इज्रायलचे पंतप्रधानपद भुषविले. ज्युईश धर्माभिमानी, कणखर देशभक्त, मुरलेली राजकारणी, लोकप्रिय व्यक्तिमत्व ह्या सर्व व्याख्यांनी ओळखली जाते. १९७० साली अमेरिकेत "सर्वात आवडती (admired) स्त्री" म्हणून निवडल्या गेलेल्या गोल्डा यांचा जन्म तेंव्हाच्या रशियामध्ये (आता युक्रेन) झाला. त्या लहान असताना वडील नोकरीधंद्यासाठी अमेरिकेला गेले आणि लवकरच त्यांनी आपल्या कुटुंबाला तिथे बोलवून घेतले.

    गोल्डा अमेरिकेतल्या मिलवॉकी शहरातील ज्युईश वसाहती मध्ये मोठी होऊ लागल्या. माध्यमिक शाळा संपल्यावर गोल्डा यांना उच्च माध्यमिक शिक्षणाकरता मात्र आईवडीलांकडून विरोध व्हायला लागला. लग्न करुन मुलीनं घर वसवावं अशी आईवडीलांची इच्छा तर पुढे शिकून शिक्षक व्हावं ही गोल्डा यांची इच्छा! शेवटी कंटाळून त्या आपल्या मोठ्या बहिणीकडे डेन्व्हरला पळून गेल्या. तिथे त्यांच्या कुटुंबाबरोबर राहून उच्च्माध्यमिक शिक्षण घ्यायला सुरुवात केली. इथ पर्यंत गोल्डा यांचा राजकारणाशी, प्रखर ज्युईश धर्मियांशी फारसा संबंध आला नव्हता, पण बहिण आणि तिच्या नवर्याचकडे ज्युईश अभ्यासक, धर्माभिमानी लोक येऊन चर्चांच्या, गप्पांच्या मोठ्या फैरी झडायच्या. त्यांचं बोलणं ऐकून, हळूहळू चर्चांमध्ये सहभागी होऊन गोल्डा झायऑनिझम कडे जास्त आकृष्ट होऊ लागल्या. डेन्व्हर मध्ये असताना त्या मॉरिसच्या, प्रेमात पडली. त्या काळात १९१७ मध्ये ब्रिटिशांनी त्यांच्या अंमलाखाली पॅलेस्टाईनची घोषणा केली.

    जगभरातील 'ज्यू लोकांसाठी त्यांची एक जागा / घर' अशी ह्या पॅलेस्टाईनची संकल्पना होती (National Home for the Jewish people). त्यानंतर महिन्याभरातच लग्न झाल्यावर पॅलेस्टाईनला रहायला जायचं ह्या अटीवर गोल्डा यांनी मॉरिसशी लग्न केले. १९२१ साली दोघही पॅलेस्टाईनला रवाना झाले आणि आयुष्याच्या पुढच्या टप्प्याला सुरुवात झाली. सुरुवातीचे आयुष्य अतिशय गरिबीमध्ये खडतर रितीने जात होते. गोल्डा हळू हळू छोट्या पातळीवर झायॉनिझम आणि त्यासंदर्भातील कामांमध्ये स्वतःला व्यस्त करत होत्या. काम, दोन मुले, संसार ह्यामध्ये गोल्डा पारंपारीक ज्युईश पद्धतीने घर चालवायचा प्रयत्न करत होत्या. मॉरिस आधीपासूनच फार पारंपारिक ज्यू नव्हता. खटके उडायला लागले.

    १९२८ मध्ये गोल्डा मुलांसकट कामाकरता तेल अविवला रवाना झाली आणि हळू हळू लग्न संपुष्टात आले. ह्यापुढे मात्र गोल्डा ज्युईश कष्टकरी लोकांकरता काम करणार्याह "Histadrut" ह्या संघटनेत झटपट एक एक पायरी चढत त्यांच्या पॉलिटीकल विभागची प्रमुख बनल्या. त्याकाळात दुसरे महायुद्ध सुरु झाले होते. वर्ल्ड झायॉनिस्ट ऑर्गनायझेशन मध्ये गोल्डा यांनी अनेक महत्वाच्या भूमिका पार पाडल्या. ज्यूंच्या पुनर्वसनाकरता एकट्या अमेरिकेतून ५० मिलीयनपर्यंत देणग्या जमा केल्या. प्रखर धर्माभिमानी, देशभक्त आणि तेवढीच प्रभावी वक्ती अशी त्यांची प्रतिमा होती.

    पुढे १९४८ साली इज्रायलची स्थापना झाली. पहिले पंतप्रधान बेन-गुरीयन यांच्या मंत्रिमंडळात 'मिनिस्टर ऑफ लेबर' म्हणून गोल्डा यांची निवड झाली. स्वतंत्र झाल्या झाल्या शेजारी अरब राष्ट्रांनी इज्रायल वर हल्ला चढवला. ह्या धामधुमीत स्वतःचा जीव धोक्यात घालून मुस्लीम स्त्रीच्या पेहेरावात वेशांतर करुन सरहदी पलिकडे जॉर्डनच्या किंग अब्दुल्लला युद्धात भात घेऊ नका म्हणून विनवणी करायला गोल्डा गेल्या. नवीन सैन्याला लढायला शस्त्रास्त्र आणि पैशांची गरज होती तेंव्हा ती मागणी करायला गोल्डा तडक अमेरिकेला पोहोचल्या. १९५६ साली परराष्ट्र मंत्री म्हणून गोल्डा यांची नेमणूक झाली. इतर राष्ट्रांबरोबर सौहार्दाचे संबंध प्रस्थापित करणे, औद्योगिक, तांत्रिक, मिलिटरी क्षेत्रात सहकार्याने काम करणे इत्यादी बाबींवर त्यांनी विशेष भर दिला. १९६६ साली गोल्डा यांनी निवृत्ती पत्करायचे ठरवले.

    शांत आयुष्य जगणे, कुटुंबियांबरोबर वेळ व्यतित करणे, तब्ब्येतीकडे लक्ष देणे इत्यादी गोष्टींकरता ही निवृत्ती आवश्यक होती. पण नियतीच्या मनात वेगळेच काही होते. १९६९ झाली त्यावेळच्या पंतप्रधानांचे निधन झाले आणि राजकीय अस्थिरता निर्माण होऊ नये म्हणून तिच्या पक्षाने पंतप्रधानपदाकरता त्यांची निवड केली. ही त्यांची राजकीय कारकिर्दीची परमावधी होती. त्या लोकांची आवडती पंतप्रधान होती. देशात राजकीय स्थैर्य येत होते तेवढ्यात १९७३ मध्ये इजिप्त आणि सिरियाने इज्रायल वर अनपेक्षितपणे हल्ला चढवला (योम किप्पूर वॉर). निकराने प्रतिकार परत इज्रायलने हल्ला परतवला आणि शेवटी त्यांचा विजय झाला, त्यात २७०० इज्रायली सैनिक धारातिर्थी पडले. एका छोट्या राष्ट्रकरता ही जबर किंमत होती. स्वत:च्या मनचे ऐकण्यापेक्षा मिलिटरीचे ऐकून सैन्य आधीच सीमेपाशी न हलवल्याचा गोल्डा यांना प्रचंड पश्चाताप झाला पण वेळ गेली होती. सगळे देशवासी आता तिच्याविरुद्ध झाले होते. सैनिकांच्या मृत्यूंचे खापर तिच्यावर फोडले गेले आणि १९७४ साली गोल्डा यांनी राजीनामा दिला.

    योम किप्पूरच्या युद्धमुळे झालेले सर्व दु:ख आणि पश्चाताप, लोकांनी नाकारल्यामुळे झालेला अपमान आणि उपमर्द ह्यामुळे खचलेली गोल्डा शेवटच्या काही वर्षात मात्र परत समाधानाने जगू शकली. काळ लोटला लोकांचा प्रक्षोभ कमी झाला आणि आधीच अतिशय लोकप्रिय असलेल्या गोल्डाला लोकांचे उदंड प्रेम मिळले. गोल्डा मायर यांचे ८ डिसेंबर १९७८ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

  • भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके

    दादासाहेब फाळके यांचे पूर्ण नाव धुंडिराज गोविंद फाळके. त्यांचा जन्म ३० एप्रिल १८७० रोजी झाला. १५ एप्रिल १९११ रोजी ख्रिस्ताचे जीवन हा अर्ध्या तासाचा मूकपट त्यांच्या पाहण्यात आला. त्यातून प्रेरणा घेऊन स्वदेशी चित्रपटव्यवसाय उभारण्याचे त्यांनी ठरविले आणि त्या दृष्टीने त्यांचा चित्रपट निर्मिति विषयक अभ्यास रात्रंदिवस सुरू झाला. डोळ्यांवरील अतिताणाने त्यांना तात्पुरते अंधत्व आले; परंतु सुदैवाने मुंबईचे डॉ. प्रभाकर या नेत्रविशारदाने त्यांना पुन्हा दृष्टी प्राप्त करून दिली. १ फेब्रुवारी १९१२ रोजी ते इंग्लं डला रवाना झाले. आवश्यक यंत्रसामग्री व कच्च्याा फिल्मची मागणी नोंदवून १ एप्रिल १९१२ रोजी ते भारतात परत आले. सर्व सामग्री १९१२ च्या मे अखेर हाती आल्यावर त्यांनी कुटुंबियांचे चित्रीकरण करून पाहिले व त्यानंतर जून-जुलैमध्ये रोपट्याची वाढ हा एक मिनिटाचा लघुपट तयार केला. तो समाधानकारक वाटल्यानंतर ते मोठ्या चित्रपटाच्या निर्मितीकडे वळले. भांडवलासाठी पत्नीुचे दागिनेही त्यांनी गहाण टाकले.

    लेखक, छायालेखक, रंगवेशभूषाकार, कलादिग्दर्शक, दिग्दर्शक, रसायनकार, संकलनकार इ. सगळ्या भूमिका दादासाहेबांनीच पार पाडल्या.भारताचा पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र सहा महिन्यांत पूर्ण करून तो मुंबईच्या त्यावेळच्या सँड्हर्स्ट रोडवरील नानासाहेब चित्रे यांच्या कोरोनेशन थिएटरमध्ये ३ मे १९१३ रोजी प्रदर्शित केला. हा चित्रपट एकूण २३ दिवस चालला. राजा हरिश्चंद्रानंतर फाळक्यांनी मोहिनी भस्मासूर या चित्रपटाची निर्मिती केली व तो १९१४ च्या जानेवारीत कोरोनेशन सिनेमामध्ये प्रदर्शित केला. या चित्रपटासोबत पिठाचे पंजे हा एक विनोदी लघुपटही ते दाखवीत. पुढे सत्यवान सावित्री नावाचा आणखी एक चित्रपट तयार करून प्रदर्शित केला. आपला राजा हरिश्चंद्र हा चित्रपट ३ एप्रिल १९१७ रोजी नव्याने पुण्याच्या आर्यन सिनेमात प्रथम प्रदर्शित केला. तसेच लंकादहन हा चित्रपटही त्याच वेळी तयार करून तोही प्रदर्शित केला. हा चित्रपट भारतभर लोकप्रिय झाला.

    महानंदा सारख्या दर्जेदार अशा एकूण ३८ चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले. १९१८ ते १९३४ या १६ वर्षांच्या काळात हिंदुस्थान सिनेमा फिल्म कंपनीने एकूण ९७ चित्रपट काढले. त्यांत फाळकेदिग्दर्शित ४० चित्रपट होते. तसेच गंधर्वाचा स्वप्ना विहार, खंडाळा घाट, विंचवाचा दंश, विचित्र शिल्प, खोड मोडली, वचनभंग इ. लघुपटही फाळक्यांनी दिग्दर्शित केले. दादासाहेब फाळके दिग्दर्शित सेतुबंधन हा हिंदुस्थान फिल्म कंपनीचा अखेरचा चित्रपट. दादासाहेबांच्या जन्मशताब्दीपासून (१९७०) चित्रपटसृष्टीत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कलावंत-तंत्रज्ञाला ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ देण्यात येतो. दादासाहेब फाळके यांचे १६ फेब्रुवारी १९४४ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • श्रेष्ठ गायक नट भाऊराव कोल्हटकर

    अण्णासाहेब किर्लोस्करांनी ३१ ऑक्टोबर १८८० रोजी संगीत शाकुंतल नाटकाचा प्रयोग करून संगीत मराठी रंगभूमीची स्थापना केली. २० सप्टेंबर १८८२ रोजी भाऊरावांनी वयाच्या अठराव्या वर्षी किर्लोस्कर नाटक मंडळीत प्रवेश केला.

  • क्रिकेटपटु खंडेराव रांगणेकर

    प्रत्येक सामन्यामध्ये आपल्या झंझावाती व नैसर्गिक खेळाने विरूध्द गोलंदाजाला चकित करणार्‍या, रांगणेकरांना त्यांच्या तमाम भारतीय चाहत्यांकडून, व मुंबई आकाशवाणीचे कॉमेंटेटर होमी तल्यार खान यांजकडून क्रिकेटचा बाजीराव ही मानाची उपाधी मिळाली होती.

  • लोकप्रिय कॉमेडी स्टार ल्युसिल बॉल

    गेल्या शतकातली अमेरिकेची अत्यंत लोकप्रिय कॉमेडी स्टार ल्युसिल बॉलचा जन्म ६ ऑगस्ट १९११ रोजी न्यूयॉर्क येथे झाला.

    सुरुवातीची काही वर्षं रंगभूमीवर धडपड केल्यानंतर ल्युसिल बॉलला रोमन स्कॅन्डल्स, ब्लड मनी, किड मिलियन्स असे चित्रपट मिळाले. १९४० सालच्या ‘टू मेनी गर्ल्स’मध्ये ती डेझी आर्नेझबरोबर चमकली आणि त्यांनी लग्नही केलं. ऑक्टोबर १९५१ पासून पुढची सहा वर्षं त्यांची ‘आय लव्ह ल्युसी’ ही टेलिव्हिजन सीरियल दणक्यात चालली आणि ल्युसी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली.

    तिच्यातल्या कॉमेडीच्या लाजवाब टायमिंगने लोकांवर भुरळ पडली. पुढे तिने डेझी आर्नेझशी घटस्फोट झाल्यावरही दी ल्युसी शो (१९६२-६८) आणि हिअर इज ल्युसी (१९६८-७४) या मालिका केल्या आणि ती लोकप्रियतेच्या शिखरावरच राहिली. तिला एकदा गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला होता. १३ वेळा प्राइमटाइम एमी पुरस्कारांचं नामांकन तिला मिळालं होतं आणि चार वेळा तो पुरस्कार मिळाला होता.

    तिने प्रतिष्ठेचा क्रिस्टल पुरस्कारही मिळवला होता. ल्युसिल बॉलचे २६ एप्रिल १९८९ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • भारतीय फिरकीपटू इरापल्ली प्रसन्ना

    प्रसन्ना यांनीच भारताला परदेशी भूमीवरचा आपला पहिला टेस्ट सिरीज विजय न्यूझीलंडमध्ये मिळवून दिला. त्या सिरीजमध्ये त्यांनी एकूण २४ विकेटस काढल्या होत्या. कारकिर्दीतल्या १०० विकेट्सचा टप्पा गाठायला त्यांना अवघ्या २५ मॅच लागल्या. तो देखील एक विश्वविक्रम ठरला होता, जो पुढे त्यांचा वारसदार समजल्या जाणाऱ्या आर. अश्विनने पन्नास वर्षांनी मोडला.

  • राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका अपर्णा सेन

    अपर्णा सेन ह्या एक प्रसिध्द सिनेअभिनेत्री आणि दिग्दर्शिका आहेत. त्यांचा जन्म २५ ऑक्टोबर १९४५ रोजी झाला. १९८१ मध्ये अपर्णा सेन यांनी ३६ चौरंगी लेन या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले होते. अपर्णा सेन यांना सुचित्रा सेन यांच्या एकांतवासाच्या जीवनावर एक डॉक्युमेंट्री बनवायची होती, परंतु यासाठी त्यांना परवानगी मिळू शकली.

    कोंकणा सेन ह्या अपर्णा सेन यांची मुलगी. त्यांचे पती सायन्स रायटर आणि जर्नलिस्ट मुकुल शर्मा. अपर्णा सेन ह्यांनी पश्चिम बंगालच्या वस्त्रोद्योगमंत्री म्हणून काम केला आहे. जगभरातील चित्रपट महोत्सवांमध्ये सेन यांनी ज्युरीवर काम केले आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • भावकवी कृ. ब. निकुंब

    कृ.ब.निकुंब यांची ‘घाल घाल पिंगा वाऱ्या’ ही कविता तिच्या वेगळेपणामुळे आणि रसाळ काव्यआशया मुळे उठून दिसते. थेट काळजाला हात घालणारे शब्द अन भावविभोर झालेल्या सासूरवाशिणीचे हृदयंगम प्रकटन जणू आपण अनुभवत आहोत असा भास या कवितेतून होतो.