(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

  • चौकटीबाहेरचा माणूस – कुशल बद्रिके

    अमूक एका चौकटीत बसणारा अभिनेता असं कुशलचं वर्णन करता येत नाही. कुशलचा अभिनय, त्याचं भाषेवरील प्रभुत्व, संवादांची फेक, अभिनयाची उंची हे सारं पाहता कुशल येणाऱया काळात छोटय़ा पडद्यापेक्षा रूपेरी पडदा चांगलाच गाजवेल, अशी खात्री मला वाटते. कलाकार चेहऱयापेक्षा त्याच्या अभिनयाने ओळखला जातो, ही जाण असलेले दिग्दर्शक पुढे आले की कुशलचा हात अभिनय क्षेत्रात कोणी धरणार नाही, हे नक्की!

  • हिंदी सिनेसृष्टीतील जेष्ठ कलाकार वहिदा रेहमान

    गाईड, प्यासा, चौदहवीं का चाँद, कागज के फूल, साहिब बीबी और गुलाम, तीसरी कसम यांसारख्या सर्वोत्कृष्ट सिनेमांसाठी वहिदा रेहमान यांना ओळखले जाते. त्यांचा जन्म ३ फेब्रुवारी १९३६ रोजी तामिळनाडूतील चेंगलपेट येथे झाला. वहिदा रेहमान यांना डॉक्टर बनण्याची इच्छा होती. मात्र नशीबाने त्या बॉलिवूडमध्ये आल्या. वहीदा रहमान यांनी आपल्या बहिणीसोबत भरतनाट्यमचे धडे गुरु त्रीचुंबर मिनाक्षी सुंदरम पिल्लई आणि मुंबई येथे गुरु जयलक्ष्मी अल्वा यांच्या कडून घेतले होते. वाहिदांनी आपल्या करिअरची सुरुवात १९५५ मध्ये ‘राजूला मरायी’ या तेलगु चित्रपटापासून केली व या चित्रपटात त्यांना यशही मिळाले. त्यांनी आपली कारकीर्द तामीळ आणि तेलुगू सिनेमांपासून सुरू केली असली तरी त्यांच्या हिंदी सिनेमांतील अभिनयामुळे त्या लोकप्रिय झाल्या. त्यांना त्यांच्या करिअरमधला मोठा ब्रेक 'सीआयडी' सिनेमात खलनायिकेच्या रुपात मिळाला. तामिळ सिनेमातील वहिदा यांचा जबरदस्त अभिनय बघून गुरुदत्त भारावले होते. अवघ्या सोळाव्या वर्षी चित्रपटसृष्टीत प्रवेश केलेल्या वहिदा यांना कमी वयामुळे चित्रपटाच्या करारावर सहीदेखील करण्यास कायद्याने मुभा नव्हती. परंतु, गुरूदत्त यांच्या नाव बदलण्याच्या सल्याला त्यांनी खंबिरपणे नकार दिला. त्यावेळी आपण खूप जिद्दी असल्याचे सांगत, या प्रसंगाची आठवण कथन करताना वहिदा एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या, दिलीप कुमार आणि अन्य कलाकारांचे उदाहरण देत चित्रपटसृष्टीत काम करण्यासाठी मला नावात बदलण्याचा सल्ला देण्यात आला. परंतु, मी खंबिरपणे यास नकार दिला. त्यांच्या मते माझे भले मोठे नाव न भावणारे होते. यामुळे स्वत्वाला ठेच पोहोचल्याची भावना माझ्या मनात निर्माण झाली. वहिदाने नाव बदलण्यास सरळ सरळ नकार दिल्याने सीआयडी चित्रपटासाठी तिची निवड करण्यासाठी गुरूदत्त आणि राज खोसला यांना तीन दिवस लागले. वहीदा ह्या गुरुदत्त यांच्या आवडत्या अभिनेत्रींच्या यादीत होत्या. हे दोघे आपल्या खासगी आयुष्यातही जवळ आले होते. 'प्यासा' या सिनेमानंतर रिलीज झालेला 'कागज के फूल' हा सिनेमा या दोघांच्या प्रेमावरच आधारित असल्याचे म्हटले जाते. त्यानंतर या दोघांनी 'चौदहवीं का चाँद' आणि 'साहिब बीबी और गुलाम' या सिनेमांमध्ये एकत्र काम केले. गुरुदत्त आणि वहीदा रहमान ही जोडी भारतीय सिनेमातील ऑन स्क्रिनवरील सर्वोत्कृष्ट जोड्यांपैकी एक होती. गुरुदत्त आणि वहीदा रहमान यांचे प्रेम उमलण्याआधीच कोमेजले. १० ऑक्टोबर १९६४ रोजी गुरुदत्त यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे वहीदा रहमान कोलमडून गेल्या होत्या. मात्र त्यांनी स्वतःला सावरत १९६५ साली 'गाईड' सिनेमात काम केले. हा सिनेमा तुफान गाजला होता. या सिनेमाला फिल्मफेअर अवॉर्डही मिळाला होता. 'गाईड'नंतर १९६८ मध्ये रिलीज झालेल्या 'नीलकमल' या सिनेमाने वहीदा यांना यशोशिखरावर पोहोचवले. १९७४ साली त्यांनी अभिनेता कमलजीतबरोबर लग्न करुन आपला संसार थाटला. लग्नानंतर वहीदा बंगळूरूमध्ये स्थायिक झाल्या. त्यांना दोन मुले आहेत. अनेक वर्षे सिनेमांमधून ब्रेक घेतल्यानंतर १९९१ साली 'लम्हे' या सिनेमाद्वारे त्या मोठ्या पडद्यावर परतल्या. २००० साली पतीच्या निधनामुळे त्यांना मोठा झटका बसला होता. मात्र पुन्हा एकदा स्वतःला सावरत त्यांनी 'दिल्ली 6' आणि 'रंग दे बसंती' या सिनेमांमध्ये काम केले. ‘गाइड’ आणि ‘साहेब बीबी और गुलाम’ या चित्रपटांतील सुंदर अभिनयामुळे नावाजलेल्या मा.वहीदा रहमान यांना भारत सरकारने १९७२ साली पद्मश्री आणि २०११ मध्ये पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले आले. वहीदा रहमान यांना गाईड व नील कमल या चित्रपटांतील अभिनयासाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचे फिल्मफेअर पुरस्कार व रेशमा और शेरा या चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. विकीपिडीया / इंटरनेट

    वहीदा रहमान यांचे गाजलेले काही हिंदी सिनेमे.
    साहब बीबी और गुलाम, कागज के फूल, कूली, गाईड, चौदहवी का चाँद, तीसरी कसम, नीलकमल, प्यासा, रेशमा और शेरा, सी.आय.डी., सोलवाँ साल, दिल्ली 6, रंग दे बसंती.

  • जलतरंगवादक मिलिंद तुळाणकर

    जलतरंग हे प्राचीन भारतीय वाद्य असून ते वाजविणाऱ्या व्यक्ती दुर्मीळ आहेत. ‘ही ६४ कलांमधील एक कला आहे. या वाद्याला जलवाद्य किंवा ‘जलतंत्री वीणा’ असेही म्हणतात. यात कमीतकमी १२, तर जास्तीत जास्त २६ भांडी असतात. भांड्यांची रचना मोठ्यापासून छोट्यापर्यंत, अर्धवर्तुळाकार स्वरूपात केली जाते. बांबूच्या किंवा प्लास्टिकच्या काठ्यांनी ते वाजवितात.

  • भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल

    ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार आणि सर्वोत्तम फलंदाज व भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांचा जन्म ७ ऑगस्ट १९४८ रोजी झाला.

    ग्रेग चॅपेल हे ऑस्ट्रेलियाच्या महान फलंदाजांपैकी एक आहेत. ग्रेग चॅपेल यांनी १९७० साली पर्थ येथे ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड या सामन्याने कसोटीत पदार्पण केले. व १९७१ साली वन डे मध्ये पदार्पण केले. ४८ कसोटीत त्यांनी ऑस्ट्रेलियन संघाच्या कर्णधाराची भूमिका बजावली होती. ७००० धावांचा टप्पा ओलांडणारे ते पहिले ऑस्टेलियन खेळाडू होते. ग्रेग चॅपेल यांनी ८७ कसोटीत ५३.८६च्या सरासरीने ७११० धावा केल्या. ग्रेग चॅपेल यांच्या नावावर अनेक विक्रम आहेत. त्यांनी त्यांच्या पदार्पणातील व शेवटच्या कसोटीत शतक नोंदवले होते. कर्णधारपद मिळाल्यावरही पहिल्या व दुसर्या डावात शतक नोंदवले.

    भाऊ इयान चॅपेल बरोबर खेळताना दोघांनी एकाच कसोटीत शतक नोंदवले होते. त्यांचा आणखी एक विक्रम म्हणचे प्रथम दर्जाच्या सामन्यात त्यांनी १९७५-७६ या वर्षांत १५४७ धावा काढल्या. हा त्यांचा विक्रम २३ वर्षे अबाधित होता. ऑन साईडला त्याने मारलेले फटके आकर्षक असत. क्रिकेटच्या त्यांच्या या योगदानाबद्दल १९७३ मध्ये विस्डेनतर्फे सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू या पुरस्काराने गौरविण्यात आले. २००२ मध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेट हॉल ऑफ फेमनेही त्यांना गौरविले. १९८४ साली त्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. निवृत्तीनंतर त्यांनी ऑस्ट्रेलियन संघाचे प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिले. चॅपेल यांनी २००५ ते २००७ या काळात भारतीय संघाला प्रशिक्षण दिले होते.

    त्यांनी या काळात बरेच प्रयोग केले. मात्र, यात कुठल्याही निष्कर्षाप्रत आले नाहीत. त्यामुळे २००७ च्या विश्वकरंडक स्पर्धेत संघ पहिल्याच फेरीत गारद झाला. त्यानंतर त्यांनी हे पद सोडले. त्या दरम्यान धोनी हा क्रिकेट कारकिर्दीत नव्याने पाऊल ठेवले होते. त्यावेळी चॅपेल यांचे भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंशी मतभेद होते. यामध्ये तत्कालिन संघाचा कर्णधार सौरव गांगुलीचा समावेश होता. ग्रेग चॅपेल यांनी समालोचक म्हणूनही काम पाहिले आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

  • चतुरस्त्र आचार्य अत्रे

    आचार्य प्रल्हाद केशव अत्रे हे नाव उच्चारताच डोळ्यासमोर उभा राहतो एक कणखर लढवय्या, ज्यांनी आपल्या धारदार शब्दांनी, ओजस्वी वाणीने महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनं पहाणार्‍या द्वेष्ट्यांना सळो की पळो करुन सोडलं.अत्रेंचा हजरजबाबीपणा, वाकचातुर्य आणि लोकांना तासनतास एकाच जागेवर खिळवून ठेवण्याची हातोटी काय असेल आणि होती, या प्रसंगामुळे अधोरेखीत होतं. 

  • स्मरणीय भूमिका करणा-या दुर्गा खोटे

    चित्रपट कलाकारांकडे पाहण्याचा दृष्टोकोन दूषीत होता त्या काळात दुर्गा खोटे यांना चित्रपटात येणे भाग पडले. त्यांचा जन्म १४ जानेवारी १९०५ रोजी झाला. मुलीने चित्रपटात काम करणे घरच्या लोकांना पसंत नव्हते. मा.दुर्गा खोटे यांनी चित्रपटात अशा भूमिका केल्या की चित्रपटातील महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलून टाकला. चांगल्या घरातील महिलाही अभिनय क्षेत्रात येऊ शकतात असा एक प्रकारे संदेशच त्यांनी दिला. सुरूवातीस त्यांनी छोट्या भूमिका केल्या आणि लवकरच त्यांना नायिकेची भूमिका मिळाली. प्रभात फिल्म्सचा १९३२ मध्ये प्रदर्शित झालेल्या अयोध्येचा राजा या ‍चित्रपटाने तर त्यांना ओळख करून दिली. मराठी आणि हिंदीमध्ये बनलेल्या या चित्रपटात त्यांनी राणी तारामतीची भूमिका केली.त्यावेळी स्टूडियो सिस्टमचा जमाना होता त्यावेळचे कलाकार ठरावीक पगारावर स्टूडियोमध्ये काम करायाचे. पण, आत्मविश्वासच्या जोरावर त्यांनी फ्रीलांस काम करण्यास सुरूवात करून ही पध्दत माडीत काढली. न्यू थियेटर्स, ईस्ट इंडिया फिल्म कंपनी, प्रकाश पिक्चर्स आदींसाठी त्यांनी काम केले. १९३० च्या शतकाच्या अखेरीस त्या निर्माता आणि दिग्दर्शक बनल्या आणि त्यांनी चरणों की दासी, भरत मिलाप अशा एकावर एक उत्कृष्ट चित्रपटांची निर्मिती केली. या चित्रपटांनी त्यांचा गौरव केला.चित्रपटांबरोबरच मा.दुर्गा खोटे यांनी मराठी रंगभूमीवरही आपली कारकिर्द गाजवली. इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन च्या माध्यमातून त्यांनी रंगभूमीसाठी भरीव कार्य केले. मुंबई मराठी साहित्य संघाच्या अनेक नाटकांमध्ये त्यांनी काम केले. शेक्सपीयर यांच्या मॅकबेथवर आधारीत राजमुकूट या नाटकातील त्यांचा अभिनय वाखणण्या.जोगा होता. या क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल मा.दुर्गा खोटे यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानीत करण्या त आले. मुगले आजम, बॉबी, बावर्ची अशा चित्रपटातील त्यांच्या भूमिका आजही स्मरणात आहेत. त्यांनी लिहलेल्या आत्मकथेचा इंग्रजी अनुवाद 'दुर्गा खोटे' या नावाने प्रकाशित झाला आहे. मा.दुर्गा खोटे यांचे २२ सप्टेंबर १९९१ मध्ये निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट

  • मराठमोळी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर

    ऐश्वर्या नारकर या माहेरच्या पल्लवी आठल्ये. त्यांचे पहिलं व्यावसायिक नाटक होतं ‘गंध निशिगंधाचा’! त्यात प्रभाकर पणशीकर, रेखाताई कामत, अविनाश नारकर, शरद पोंक्षे,अशी तगडी स्टारकास्ट होती. मराठमोळी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांचा जन्म ८ डिसेंबर १९७० रोजी नाशिक येथे झाला. त्या नाटकाच्या दरम्यानच अविनाश नारकर यांच्या बरोबर प्रेम जमले. यानंतर त्यांनी विवाह केला.

    तंबाखू विक्रीची नारकर कुटुंबाची लोअर परळ आणि डिलाइल स्ट्रीटवर दोन दुकानं होती. ३५० चौ. फुटांच्या जागेत, तेरा-चौदा जण राहत होते. अवीनाश नारकर घरातील सर्वात लहान. त्या वेळी अविनाश नारकर नाटक, चित्रपट, मालिका व डिबग करायचे. अनेक इंग्रजी मालिकांना त्यांनी हिंदी, मराठी आवाज दिलाय. ‘अल्लाद्दीन’ मालिकेतला इयागोचा आवाज अवीनाश नारकर यांचा आहे. ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर या दोघांकडे मराठी सिनेसृष्टीतील अगदी सोज्वळ कपल म्हणून पाहिलं जातं. अनेक सिनेमा आणि नाटकांमध्ये हे दोघ आहेत. तसेच मालिकांमध्येही यांनी काम केली आहे. या सुखांनो या ही त्यांची गाजलेली मराठी मालिका आहे. याशिवाय 'बेटियाँ' या हिंदी मालिकेतही त्यांनी साकारलेली भूमिका विशेष गाजली होती.

    'सून लाडकी या घरची' या सिनेमाद्वारे त्यांनी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून 'चॅम्पिअन्स' या सिनेमाची निर्मिती केली होती. या सिनेमाचे विशेष कौतुक झाले. ऐश्वर्या नारकर हा जाहिरातींमधीलही प्रसिद्ध चेहरा आहे. ऐश्वर्या नारकर यांनी माझे मन तुझे झाले या मालिका, गंध निशिगंधाचा, तुमच्या आमच्या घरात, आम्ही सौ. कुमुद प्रभाकर आपटे ही नाटकं, तर बाबांची शाळा, सून लाडकी सासरची, समांतर, चॅम्पियन्स, यलो असे चित्रपट केले आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • मराठी भाषेतील कवी दत्तात्रेय कोंडो घाटे ऊर्फ दत्त

    रविकिरण मंडळातील एक तेजस्वी किरण समजला जाणारा हा तरुण कवी, पुढे त्यांच्या जीवनग्रंथाचं अवघं एकच पान उलगडलं गेलं. त्यांचा जन्म २७ जून १८७५ रोजी झाला.अवघ्या चोवीस वर्षांचं आयुष्य म्हणजे जाणत्या वयातली केवळ सात ते आठ वर्षच लाभली. पण एवढय़ा अल्पकाळात कवी मा.दत्तांनी जो वारसा मागे ठेवला तो चार पिढय़ांपर्यंत झिरपला. विपुल लेखन केलेल्या, आपल्या नातवंड-पतवंडांच्या सहवासात रमलेल्या किती कवी-लेखकांच्या वाटय़ाला हे भाग्य आलं असावं? काव्यप्रतिभेचा दुर्मीळ वारसा जपणारी चार पिढय़ांची परंपरा लाभलेलं घराणंही दुर्मीळच म्हणायला हवं. कवी मा. दत्त, त्यांचे मा विठ्ठलराव घाटे, त्यांच्या कन्या डॉ. अनुराधा पोतदार आणि त्यांची मुलं.. डॉ. प्रियदर्शन पोतदार आणि यशोधरा पोतदार-साठे. कवी दत्त यांचे शिक्षण अहमदनगर येथील मिशन हायस्कूलमध्ये झाले, महाविद्यालयीन शिक्षण विल्सन कॉलेज, मुंबई आणि ख्रिश्चन कॉलेज, इंदूर येथे झाले. कलकत्ता विद्यापीठातून बी. ए. ही पदवी मिळाल्यावर पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात शिक्षक म्हणून नोकरीला लागले. कवी दत्त यांच्या बहुसंख्य कविता १८९७ व १८९८ या काळातील आहेत. त्या काव्यरत्नावली, मनोरंजन, सुविचार समागम, बालबोध मेवा, करमणूक इत्यादी नियतकालिकांतून प्रसिद्ध झाल्या. एकूण एक्कावन्न कविता आज उपलब्ध आहेत. त्यांपैकी ४८ कवितांचा संग्रह त्याचे शिक्षणतज्ज्ञ चिरंजीव कवी वि.द. घाटे यांनी इ.स. १९२२ साली दत्तांची कविता या नावाने प्रसिद्ध केला. ’नवे पान’ या डॉ. मा.गो. देशमुख संपादित संग्रहात मात्र त्यांच्या सर्व कविता आहेत.

    दत्तात्रेय कोंडो घाटे यांचे १३ मार्च १८९९ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • प्रभावी वक्ते व उत्तम लेखक शंकर धोंडो तथा मामा क्षीरसागर

    सुमारे ४०० वर्षांपूर्वी गोव्यातील सक्तीने ख्रिश्चन केलेल्या हजारो गावकऱ्यांचे शुद्धीकरण केले. या शुद्धीकरण आंदोलनात मामांचा सिंहाचा सहभाग होता. या घटनेचे सांगोपांग विवेचन करणारा ‘गोमंतक शुद्धीचा इतिहास’ हा ४०० पानांचा स्वतंत्र विस्तृत ग्रंथ मामांनी लिहिला. विशेष म्हणजे या ग्रंथाला, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची सुंदर प्रस्तावना लाभली.

  • शाहीर अनंत फंदी

    अनंतफंदीस “फंदी” नांव पडण्याचें कारण, पूर्वी संगमनेर येथें मलकफंदी म्हणून एक फकीर होता. तो नेहमीं लोकांत चमत्कारिक रीतीनें वागत असे म्हणून त्यास फंदी म्हणत. त्या फकिराचा आणि अनंतफंदीचा स्नेह असे. यावरुन यासही लोक फंदी म्हणूं लागले