(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

  • राहुल देशपांडे

    राहुल देशपांडे यांचे आजोबा पं वसंतराव देशपांडे हे संगीत रंगभूमीवरचे नावाजलेले व्यक्तिमत्व. त्यांचा जन्म १० आक्टोबर १९७९ रोजी झाला. श्री. राहुल देशपांडे यांनी आजोबांच्या गायकीचा वारसा समर्थपणे पेलला आहे. राहुल देशपांडे यांच्यावर संगीताचे संस्कार जन्मापासूनच जरी होत असले तरी खरा संगीतप्रवास वयाच्या सहाव्या वर्षापासून सुरु झाला. सहाव्या वर्षापासून पं. गंगाधरबुवा पिंपळखरे यांच्याकडे पठडीबाज तालमीला सुरुवात झाली. सुरुवातीला सगळ्या मुलांना शास्त्रीय संगीताचा कंटाळा असतो तसा राहुलना ही होता. त्यावेळी आई-वडील पाठवतात म्हणून क्लासला जायचे असे चालले होते. नंतर गाण्याचा कंटाळा आला म्हणून त्त्यांनी एक वर्ष गाण बंद ठेवले. त्याच सुमारास १९९२ साली कुमार गंधर्वांचे निधन झाले आणि त्यानंतर दोनच महिन्यांनी राहुलजींच्या वडीलांनी इंदौरहून कुमारजींच्या भजनाची कॅसेट आणली. एक दिवस घरातले सगळे बाहेर गेले असताना काहीच काम नाही म्हणून राहुलजींनी कॅसेट लावली आणि त्या सुरांनी त्यांना अक्षरशः झपाटून टाकले. दोन दिवसात त्यांनी सगळी भजनं पाठ केली. त्यावेळी पहिल्यांदाच कुमारांच्या गायकी बद्द्ल ओढा त्यांच्या मनात निर्माण झाला.

    त्यानंतर उषाताई चिपलकट्टी यांच्याकडे सहा वर्ष शिकायला मिळाले. उषाताईंकडचे शिक्षण आव्हानात्मक होते. विचार तयार करणे हे उषाताईंकडे घडले आणि बुध्दी तयार झाली. त्यानंतर मुकुल शिवपुत्र यांच्याकडे सहा-सात वर्ष शिकायचा योग आला. तिथला अनुभव फ़ारच निराळा होता. ज्याला दिशा देणं म्हणतो ते तिथे झाले. सुरांकडे, रागांकडे बघण्याचा दृष्टीकोन मुकुल शिवपुत्रांनी दिला. राहुलजींच्या मते गुरुंकडे शिकत असताना काय घेतलं हे सांगता येत नाही पण जे मिळतं तो एक अनुभव असतो आणि तो अतिशय व्यक्तिगत असतो. पिंपळखरेबुवांकडे शिकताना पठडीबाज तालमीचा कंटाळा यायचा पण नंतर लक्षात आले की आपण जे काही शिकलो त्यावरच आपण उभे आहोत. आपल्या सांगितीक जीवनात सर्वच गुरुंचे खूप महत्वाचे योगदान आहे असे ते मानतात.

    त्यांच्या आयुष्यावर प्रभाव टाकणारी अजून एक व्यक्ती म्हणजे पु. ल. देशपांडे. पुलंचा फ़ार मोठ पगडा राहुलजींवर होता. पुलं दरवर्षी राहुलजींचे गाणं ऎकायला यायचे. असेच एकदा पुलं आले असताना राहुलजी सगळ्या कुमार गंधर्वांच्या बंदिशी गायले. राहुलजींच्या घरात सगळेच कुमारभक्त होते. पण त्यावेळी राहुलजींची आई, पुलंना म्हणाली की हा कुमार काकांसारखा गातो यात आनंद आहे पण हा बाबांसारखा(वसंतरावांसारखा) गात नाही याची कुठेतरी खंत आहे. तेव्हा पुलं म्हणाले की आत्ता तो कुमारसारखा गातो आहे ना! आवाज फ़ुटू दे!

    मग तो आपोआप वसंतासारखा गाईल. आणि झालं ही तसेच. आवाज फ़ुटल्यावर राहुलजींचा आवाज खूप आजोबांच्या जवळ गेला आणि मग ते जे काही गायचे तेव आजोबांसारखे ऎकू यायला लागले. नंतर सुरताल हया कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी वसंतरावाची गाणी बसवली आणि ती लोकांच्या पसंतीस उतरली. त्यानंतर त्यांनी आजोबांच्या गायकीचा मागोवा घ्यायला सुरुवात केली आणि त्यांना ते गाणं हळूहळू उलगडू लागले. अजूनही ते संपूर्णपणे उलगडलेले नाही असे त्यांना वाटते. कॉलेजमध्ये असताना CA foundation पास झाल्यावर आर्टिकल्स सुरु असताना ते पुलंना भेटायला गेले. पुलंची तब्येत त्यावेळी बरीच खालावली होती. पुलंनी जवळ बोलावून विचारले की तू असा बारीक का झाला आहेस? तेव्हा राहुलजींनी सांगितले की कॉलेज, क्लास आणि रियाझ या सगळ्या गोष्टी सांभाळताना खूप दगदग होते. तेव्हा पुलंनी विचारले की तू स्टेशनपासून घरापर्यंत जातोस तेव्हा तुला डॉक्टर्स, आर्किटेक्टस, इंजिनीयर अशा खूप पाट्या दिसत असतील पण गायक अशी पाटी दिसते का? नाही ना? मग तुला अशी पाटी लावायची आहे. त्यामुळे तू गाण्याकडे लक्ष दे.

    मग राहुलजींनी घरच्यांशी सल्लामसलत केली आणि पूर्णवेळ गाण्यासाठी द्यायचे ठरविले. त्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले. रियाज हा अतिशय महत्वाचा आहे असे ते मानतात. गाणं ही एक-दोन वर्षात येणारी कला नाही. त्यासाठी अनेक वर्ष कष्ट घ्यावे लागतात. पण जसेजसे तुम्ही रियाज करत जाता तसे रियाजच तुम्हाला फ़ळ देतो. सुरुवातीच्या काळात ठराविक वेळ रियाज झाला नाही तर जेवायचे नाही असे बंधन त्यांनी घालून घेतले होते. आजही त्यांच्या अतिशय व्यस्त अशा दिनचर्येतून वेळ काढून ते ठराविक वेळ रियाजासाठी देतात. सुरुवातीच्या काळात ते जेव्हा कुमारजींच्या बंदिशी, भजनं सादर करायचे त्यावेळी नागपूरला त्यांचा कार्यक्रम झाला होता. तिथेही त्यांनी कुमारजींच्या बंदिशी आणि भजनम सादर केली आणि दुसर~या दिवशी पेपरमधे बातम्या आल्या की नातू वसंतरावांचा पण गायकी कुमारांची. त्यावेळी थोडे वाईट वाटले असे त्यांनी सांगितले. पण आता ते वसंतरावांची गायकी लोकांपर्यंत पोहचवत आहेत याचा त्यांना अभिमान आहे. वसंतरावांची गायकी लोकांना आवडते आणि ती त्यांच्यामार्फ़त लोकांपर्यंत पोहचते आहे.

    गेली अनेक वर्षे ते वसंतोत्सव हया कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत. त्यांचे वडील दरवर्षी वसंतरावांच्या स्मृतीप्रीत्यर्थ कार्यक्रम करायचे. वसंतरावांवर प्रेम करणारे कुमार गंधर्व, भीमसेन, वीणाताई, अभिषेकी असे अनेक कलाकार त्यात गाऊन गेले होते. २५ वर्षे झाल्यावर वडीलांनी सांगितले की मी आता निवृत्त होत आहे. यापुढे तू तुला पाहिजे त्या पध्दतीने कार्यक्रम कर. वसंतरावांचे जसे व्यक्तिमत्व होते त्याला साजेसाच कार्यक्रम व्हावा असे राहुलजींना वाटत होते. नाना पाटेकर आणि वसंतरावांचे जिव्हाळ्याचे नाते होते. त्यामुळे राहुलजी पाटेकरांना भेटले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करण्याचा प्रस्ताव पाटेकरांनी लगेच स्वीकारला आणि कायम पाठीशी उभे राहिले. मा. वसंतराव देशपांडे गझल गायचे चित्रपटातही गाणी त्यांनी गायली आहेत. शास्त्रीय,ठुमरी, नाट्यसंगीत तर ते गायचेच पण लावणीही उत्तम सादर करायचे. पाश्चात्य आणि दक्षिण भारतीय संगीताचाही त्यांचा अभ्यास होता. ते नृत्य शिकले होते. उत्तम अदा करायचे. त्यामुळे राहुलजींनी ठरविले की अशा हरहुन्नरी व्यक्तिमत्वाच्या स्मृतीप्रीत्यर्थ फ़क्त शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम न करता सर्व प्रकारचे संगीत समाविष्ट असलेला कार्यक्रम करावा, त्यामुळे या उत्सवात गझल, फ़्युजन, शास्त्रीय संगीत, जुगलबंदी, लोकसंगीत, सूफ़ी संगीत असे विविध प्रकार लोकांना ऎकायला मिळाले.

    युवावर्ग मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाकडॆ आकर्षिला गेला. आजोबांसारखेच हरहुन्नरी व्यक्तिमत्व लाभलेले राहुलजी समर्थपणे गेली काही वर्षे हा कार्यक्रम आयोजित करत आहेत. कट्यार काळजात घुसली आणि संशयकल्लोळ ही नाटके राहुलजींनी पुन्हा रंगमंचावर आणली. त्याविषयी सांगताना ते म्हणतात की लहान असताना कट्यार मधे छोट्या सदाशिवाचे काम त्यांनी केले होते. पण नंतर नाटकात काम करावे असे कधी वाटले नाही. वसंतोत्सवाच्या निमित्ताने पत्रकार परिषद चालू होती. तेव्हा एका पत्रकाराने विचारले की वसंतरावांनी संगीत नाटकांसाठी एव्हढे मोठे योगदान दिले तर तुम्ही संगीत रंगभूमीसाठी काय करणार? तर राहुलजी म्हणाले की मी दरवर्षी एक नाटक करीन. मग त्यावर विचार सुरु झाला आणि ’कट्यार काळजात घुसली’ करुन पहावे असे ठरले. सुरुवातीला हे आव्हान पेलू शकू की नाही अशी धास्ती होती. पण सगळयांनी प्रोत्साहन दिले आणि तालमींना सुरुवात झाली. सुबोध भावेंनी हे नाटक दिग्दर्शित केले. त्यांनी सल्ला दिला की मुस्लिम व्यक्तिरेखा साकारण्यासाठी तू मशिदीत जाऊन बस आणि निरिक्षण कर. त्याप्रमाणे राहुलजींनी केले आणि त्यामुळे मी ती भूमिका प्रामाणिकपणे करु शकलो असे त्यांनी सांगितले.

    त्यांच्या मते नाटक ही एक नशा आहे.त्यामुळेच कट्यार नंतर तिथेच न थांबता त्यांनी संशयकल्लोळ करायला घेतलं. त्यावेळी मात्र अनेकांनी हे नाटक करु नकोस असा सल्ला दिला कारण संशयकल्लोळ हे खूप यशस्वी नाटक आधीही नव्हते. पण संशयकल्लोळ यशस्वी ठरले. त्यातील राहुलजींची भूमिकाही रसिकांना खूप आवडली जेष्ठ नागरिकांप्रमाणे युवा पीढीही ह्या नाटकाकडे आकृष्ट झाली.
    त्यानंतर आला बालगंधर्व सिनेमा. या सिनेमासाठी रवी जाधवांनी राहुलजींना भूमिका करण्याविषयी विचारले. नाटक आणि सिनेमाचे तंत्र वेगळे असते आणि या चित्रपटात नाट्यगीत चित्रीत करायचे होते. पण सारेगमपच्या चित्रीकरणाचा अनुभव होता आणि त्यामुळे पेशन्स वाढला होता. त्याचा या चित्रपटाच्यावेळी फ़ायदा झाला.या चित्रपटासाठी स्टुडिओमध्ये १०-१५ मिनिटांचे गाणे चित्रीत झाले आणि नंतर एडिट करुन ते तीन मिनिटांवर आणले गेले.सारेगमपच्या वेळी काम करतानाही खूप मजा आली असे ते म्हणतात.

    सतत नवीन प्रयोग करत रहाणे हा राहुल देशपांडे यांचा स्थायीभाव आहे.कुठलीही गोष्ट करताना खूप मेहनत घेऊन, अभ्यासपूर्वक करण्याचा त्यांचा स्वभाव त्यांनी आत्तापर्यंत केलेले विविध प्रयोग पाहिले की जाणवतो.सध्या संगीताचे तंत्र खूपच बदलले आहे. त्यामुळे पठडीबाज शिक्षणाबरोबरच थोडेसे वेगळे प्रयोग आवश्यक आहेत असे त्यांना वाटते. प्रत्येक विद्यार्थी हा कलाकार बनू शकत नाही. तशी गरजही नाही. चांगला कलाकार चांगला समीक्षक असेलच असे नाही तसेच चांगला समीक्षक चांगला कलाकार असेलच असे नाही.

    संगीतशिक्षणातून चांगले कलाकार, समीक्षक, संगीतकार तसेच चांगले जाणकार रसिक श्रोतेही निर्माण झाले पाहिजेत. केवळ गाणे आवडते म्हणून ऎकण्यापेक्षा त्याचे शास्त्र माहित झाले की ऎकण्यातली मजा अजून वाढते. राहुल देशपांडे यांनी भारतातल्या जवळजवळ सर्व नावाजलेल्या संगीत महोत्सवांमध्ये आपली कला सादर केली आहे. तसेच परदेशातील रसिकांची ही वाहवा मिळवलेली आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. रसिकाग्रणी दत्तोपंत देशपांडे पुरस्कार आणि सुधीर फ़डके पुरस्कार हे त्यातील काही प्रमुख. शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात सामान्यतः ज्या वयात कारकीर्दीला सुरुवात होते त्या वयात राहुल देशपांडे यांनी खूप यश मिळविले आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.विराट गर्जना.कॉम

  • स्मिता पाटील – भारतीय चित्रपटांची अनभिषिक्त महाराणी

    वयाच्या विसाव्या वर्षी रुपेरी पडद्यावर पदार्पण करणाऱ्या स्मिता पाटील जवळजवळ ७५ चित्रपटांच्या अनभिषिक्त महाराणी ठरल्या होत्या. १९८४ मध्ये त्या आंतरराष्ट्रीय नायिका बनल्या. १९८२ साली आला जब्बार पटेलांचा ‘उंबरठा’ त्यात तिने ‘सुलभा महाजन’ ची साकारलेली भूमिका अजूनही मराठी चित्रपटसृष्टीमध्ये बिनतोड आहे. सार्वजनिक जीवनातही ती महिलांविषयक काम करणाऱ्या अनेक संस्थांशी प्रत्यक्ष पण जोडली गेली होती. त्यामुळे उंबरठा मधल्या तिने साकारलेली भूमिका अधिकच वास्तवदर्शी वाटते.

  • सुप्रसिद्ध नाटककार, लेखक विजय तेंडुलकर

    तेंडुलकरांनी चित्रपट माध्यमही नाटकांच्याच ताकदीने हाताळले. सामना, सिंहासन, आक्रीत, उंबरठा, अर्धसत्य, आक्रोश, आघात, इत्यादी चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या. स्वयंसिद्धा या दूरचित्रवाणी मालिकेचे लेखनही त्यांनी केले. सुरुवातीच्या नाटकांपासूनच माणसाच्या जीवनाचा, त्यांच्या विकारांचा, एकारलेपणाचा वेध घेण्याचा त्यांचा प्रयत्‍न दिसतो. विशिष्ट तत्त्वज्ञानाचा, विचारसरणीचा ठसा नाकारून तेंडुलकर मनस्वीपणे लिहीत गेले. कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणार्‍या जनस्थान पुरस्काराचे तेंडुलकर पहिले मानकरी होते.

  • अमर चित्रकथाकार अंकल पै

    पहिल्या भारतीय कॉमिक चित्रमालिकेचे निर्माते ही अंकल पै म्हणजेच अनंत पै यांची प्रमुख ओळख. ही कॉमिक चित्र मालिका अमर चित्र कथा या नावाने जगप्रसिद्ध आहे. वयाच्या बाराव्या वर्षी ते मुंबईत आले, तसा त्यांचा जन्म कर्नाटकातील करकाला गावचा. वयाच्या दुसऱ्या वर्षीच त्यांचे आई वडिल वारले. त्यानंतर त्यांनी मुंबईचा रस्ता धरला.

  • पहिल्या भारतातील बोलपटाचे जनक अर्देशीर इराणी

    अर्देशीर इराणी याचे पूर्ण नाव खान बहादूर अर्देशीर इराणी. त्यांचा जन्म ५ डिसेंबर १८८६ रोजी झाला. अर्देशीर इराणी यांनी भागीदारीत १९१४ मध्ये लोहारचाळ येथे अलेक्झांड्रा थिएटर घेतले. अर्देशीर इराणी यांच्याकडे ‘युनिव्हर्सल पिक्चर्स कॉर्पोरेशन’ या विदेशी सिनेवितरण कंपनीची एजन्सी होती. तेथे ते विदेशी चित्रपट प्रदर्शित करत. तेथे लागणारे बहुतेक इंग्रजी चित्रपट हे हाणामारीने भरलेले देमारपट, युध्यपट, स्टंट किंवा कामुक हावभावाचे असत. शेजारीच कामाठीपुरा, उत्तरेस नागपाडा तर दक्षिणेस पिला हाऊस... असा परिसर त्या चित्रपटांसाठी योग्यच! इंग्रजी चित्रपट फोर्टमधील थिएटरमध्येही प्रदर्शित होत, परंतु ‘अलेक्झांड्रा’ने त्यांचे एक वेगळे अस्तित्व जपून ठेवले होते. ते म्हणजे इंग्रजी सिनेमाचे उत्तेजित करणारे पोस्टर.

    मुंबईची चित्रपटसृष्टी त्या काळी कोल्हापूर, पुणे व नासिकपेक्षा वेगळी होती. बहुतेक भांडवलदार गुजराती, पारशी होते. पौराणिक चित्रपटाबरोबरच देमार (स्टंट) चित्रपट, जादुईपट अथवा कौटुंबिक चित्रपट तयार केले जात. मुंबईतील मूकपटांची प्रेरणा व्यावसायिकच होती. महाराष्ट्र फिल्म कंपनी किंवा प्रभात फिल्म कंपनी यांच्यासारखा ध्येयवाद किंवा आदर्शवाद मुंबईतील संस्थात नव्हता. अर्देशीर इराणी यांची इंपीरिअल, व इतर चित्रपटसंस्था धंदा करण्याच्या हेतूने स्थापन झाल्या होत्या. त्याचा परिणाम म्हणून चित्रपटसृष्टी वाढीला लागली. त्याकाळी देमार चित्रपटांची पौराणिक चित्रपटांप्रमाणे चलती सुरू झाली.

    शारदा फिल्म कंपनीसाठी भालजी पेंढारकर यांनी दिग्दर्शित केलेल्या १९२५ सालच्या बाजीराव मस्तानी चित्रपटातील अभिनेता मा. विठ्ठल पुढे देमार चित्रपटांचा नायक झाला. त्याने अफाट लोकप्रियता संपादन केली. हाच मा.अर्देशीर इराणी १९३१ साली ‘आलम आरा’ काढून पासून हिंदी बोलपटाचा प्रवास सुरू झाला. विठ्ठल हे आलमआरा या पहिल्या भारतीय बोलपटाचे नायक होते. ‘आलम आरा’ हा पहिला बोलपट व ‘दे दे खुदा के नाम पर’ हे भारतीय चित्रपटातील पहिले गाणे मानले जाते. हे गाणे आणि एकूणच या चित्रपटाचे संगीत प्रचंड लोकप्रिय ठरले. त्या वेळी पाश्र्वगायनाचे तंत्रज्ञान विकसित झाले नव्हते. त्यामुळे कलाकार स्वत:च गाणी गायचे.

    गाण्यांचे तबला, हार्मोनियमच्या साथीने ‘लाइव्ह’ रेकॉर्डिग केले जायचे. महत्त्वाचे म्हणजे हिंदी सिनेमा आणि गाणी हे समीकरण अगदी पहिल्या सिनेमापासून जुळले. गाणी आणि संगीत हे भारतीय चित्रपटांचे आणि त्यातही हिंदी चित्रपटांचा अविभाज्य अंग बनले. युरोपप्रमाणेच भारतातही चित्रपट निर्माण करण्यासाठी स्टुडिओ निर्माण झाले. इम्पिरियल मुव्हिटोन, बॉम्बे टॉकीज, प्रभात फिल्म कंपनी हे सगळे स्टुडिओ होते. कंपनीत ज्याप्रमाणे कर्मचारी असायचे त्याचप्रमाणे फिल्म स्टुडिओमध्येही कलावंत, तंत्रज्ञ सगळेजण पगारी नोकर असायचे. अर्देशीर इराणी यांचे १४ आक्टोबर १९६९ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • मराठी नाट्य अभिनेते आणि नाट्यदिग्दर्शक दत्ता भट

    “सिंहासन” मधील “माणिकराव” यांची दत्ता भट यांची एक अजरामर भूमिका. हा जब्बार पटेलांचा सिनेमा अप्रतिमच आहे. या चित्रपटातील दत्ता भट हे सत्यनारायणासमोर साष्टांग दंडवत घालून मनातील विचार तो बोलतात, त्यावेळचा मुद्राभिनय आणि आवाजाचा बाज व फेक जबरदस्त होती.

  • पंजाबी आणि हिंदी मधील प्रसिद्ध कवयित्री अमृता प्रीतम

    अमृता प्रीतम यांची पन्नासहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली. त्यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९१९ रोजी झाला. त्यांनी लिहिलेल्या साहित्यापैकी महत्त्वपूर्ण साहित्यकृतींचा अनेक देशी-विदेशी भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. त्यांना १९५७ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार, १९५८ मध्ये पंजाब सरकारच्या भाषा विभागाचा पुरस्कार, १९८८ मध्ये बल्गेरियामधील वैरोव पुरस्कार आणि १९८२ मध्ये भारतातील सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार समजल्या जाणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सोळाव्या वर्षी पहिले पुस्तक प्रसिद्ध झाले अन सोळाव्या वर्षीच प्रीतमसिंहांशी विवाह झाला, पुढे साहीरवर त्यांचे उत्कट प्रेम जडले जे अखेरच्या श्वासापर्यंत टिकून होते. साहिरबद्दल लिहिताना अमृता प्रीतम एके ठिकाणी म्हणतात- "साहिर आणि माझ्यात नि:शब्दतेचं एक अनोखं नातं होतं. त्यात शारीरिक ओढीचा अंश नव्हता. मला ‘आखरी खत’साठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याचं जाहीर झाल्यावर एका प्रेस रिपोर्टरनं मी लिहीत असतानाचा फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली. त्याप्रमाणे तो फोटो काढून निघून गेल्यावर मी त्या कागदाकडे पाहिलं, तर त्यावर ‘साहिर.. साहिर.. साहिर’ हा एकच शब्द मी अनेकदा लिहिला होता.

    माझ्या त्या वेडेपणाचं माझं मलाच आश्चर्य वाटलं. दुसऱ्या दिवशी तो फोटो प्रसिद्ध झाला. पण तो कागद कोरा असल्यासारखा भासत होता. साहिर आणि माझ्यातलं नातं तेव्हाही नि:शब्दच होतं. आणि अखेपर्यंत ते तसंच नि:शब्द राहिलं. अमृता प्रीतम रात्रीच्या निरव शांततेत आपलं लेखन करायच्या, कुठलाही गोंगाट - आवाज नसताना त्यांची लेखणी प्रसवत असे. अमृता रात्रीतून तासंतास लेखन करत राहायच्या. अमृता प्रीतम यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली होती. आपलं आयुष्य आपल्या विचारांनुसार जगणार्या अमृता कर्तव्यसन्मुख राहिल्या, त्या मुक्त होत्या. मा.अमृता प्रीतम यांचे ३१ ऑक्टोबर २००५ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • ग. त्र्यं. माडखोलकर

    स्पष्टवक्तेपणा, निर्भिडपणा आणि स्वतंत्र विचाराचे प्रकटीकरण हे ज्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य होते ते म्हणजे कादंबरीकार, समीक्षक, वृत्तसंपादक गजानन त्र्यंबक माडखोलकर. त्यांचा जन्म २८ डिसेंबर १८९९ रोजी झाला. माडखोलकरांचे वडील मुंबईत भिक्षुकी करीत. त्यांच्या आई पार्वतीबाई या त्याकाळी शिक्षित असलेल्या स्त्रियांपैकी एक होत्या. आईने केलेल्या संस्कारामुळे लहानपणीच माडखोलकरांनी मराठी आणि संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळवले होते. मुंबईच्या आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत त्यांचे सर्व शिक्षण झाले होते. नवयुग, विविध ज्ञान विस्तार इ. मासिकातून त्यांच्या काव्यलेखनाला सुरुवात झाली. केशवसुतांचा संप्रदाय या नवयुगमध्ये लिहिलेल्या टीकालेखामुळे माडखोलकर एकदम प्रसिद्धीस आले. त्यानंतर केसरीत त्यांचे लेख छापून आले. त्यावेळी रविकिरण मंडळाशी त्यांचा संबंध आला. तेथे अनेक साहित्यिकांशी त्यांचा स्नेह जडला. १९२२ साली माडखोलकर पुण्याला आले. त्यावेळेस रेव्हरंड टिळक, केशवसुत, विनायक, गोविंदाग्रज आणि बालकवी यांच्या काव्याची मीमांसा करणारे आधुनिक कवी पंचक हे पुस्तक त्यांनी प्रकाशित केले. १९३३ नंतर नागपूरला आल्यावर त्यांच्या कादंबरी लेखनाला सुरुवात झाली. मुक्तात्मा, भंगलेले देऊळ, शाप, कांता, दुहेरी जीवन, मुखवटे, नवे संसार या त्यांच्या गाजलेल्या कादंब-या. शुक्राचे चांदणे, रातराणीची फुले हे कथासंग्रह तर वाङ्मयविलास, स्वैरविचार, परामर्श हे समीक्षात्मक लेखनही त्यांनी केले. १९४४ पासून माडखोलकर तरुण भारत चे संपादक म्हणून काम पाहू लागले. १९४६ साली महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष झाले. बेळगाव येथे झालेल्या संमेलनाच्या अध्यक्ष पदावर संयुक्त महाराष्ट्राचा ठराव सर्व प्रथम माडखोलकरांनी मांडला. याशिवाय पुढील काळात काही नाटकं आणखी काही कादंब-या, साहित्य समस्यांवरील लेख व्यक्ति तितक्या प्रकृती, मी आणि माझे वाचक इ. विविधपूर्ण लेखन माडखोलकरांनी केले. त्यातून वृत्तपत्रीय लेखनाप्रमाणे त्यांचे विविधांगी लेखन प्रतिबिंबित झाले आहे. ग. त्र्यं. माडखोलकर यांचे २७ नोव्हेंबर १९७६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ.इंटरनेट/ ग्लोबल मराठी वेब

  • हिंदी चित्रपट सृष्टीतील जेेष्ठ अभिनेते जलाल आगा

    जलाल आगा हे सुप्रसिद्ध विनोदी नट आगा यांचे चिरंजीव. उच्च शिक्षणानंतर पुण्यातील F.T.I मध्ये शिक्षण घेतले.
    जलाल आगा यांनी मुगल-ए-आझम या चित्रपटातल्या बालपणातल्या जहांगीराची भूमिकेद्वारे हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले.
    जलाल आगा यांनी १९६७ साली के.ए.अब्बास यांच्या बंबई रात की बाहो में या चित्रपटा द्वारे हिरो म्हणून पदार्पण केले.
    त्यांचे शोले मधील गाणे मेहबुबा मेहबुबा अजुन ही लक्षात आहे. त्यांनी ज्युली, घर घर की कहानी, थोडीशी बे वफाई, दिल आखीर दिल है,गांधी अशा चित्रपटातुन १९९० च्या दशकापर्यंत विनोदी व चरित्र अभिनेता म्हणून हिंदी, तसेच काही इंग्लिश चित्रपटांतून अभिनय केला.
    सई परांजपे यांनी सांगीतलेली मा.जलाल आगा यांची F.T.I मधील आठवण.
    उच्च शिक्षण झालेला, हुशार, मिश्किल आणि महाद्वाड. एकसारखे काही ना काहीतरी करून वर्गाला आणि मलाही तो हसवायचा. एकदा मी मुलांना एक उतारा लिहून घ्यायला सांगत होते. मधला मजकूर गाळायचा होता. तेव्हा मी म्हटलं, ‘या वाक्यानंतर काही टिंबे टाका. म्हणजे काही भाग गाळला आहे, हे लक्षात येईल.’ हात वर करून जलाल उभा राहिला. गंभीर चेहरा करून त्याने विचारले, ‘दीदी, किती टिंबं टाकायची?’ एकदा मी त्याच्यावर फारच रागावले. त्याच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करण्याचे ठरवून त्याच्याकडे अजिबात न पाहता मी वर्ग घेऊ लागले. दोन दिवसांच्या या उताऱ्यानंतर तो मला भेटला आणि म्हणाला, ‘मला रागवा, उभे करा; पण प्लीज, माझ्याकडे दुर्लक्ष करू नका. नटाला ती फार कठोर शिक्षा आहे. मी यापुढे शिस्त पाळीन.’ त्यानंतर दोन-चार दिवस तो बरा वागला.
    जलाल आगा यांचे ५ मार्च १९९५ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • गोव्यातील ओल्डचर्चमधील सेंट फ्रान्सिस झेविअर

    गोव्यात आल्यानंतर त्यांनी ख्रिस्ती धर्माच्या विस्ताराचं ‘न भुतो..’ असं कार्य करून धर्मविस्तार केला. त्यामुळेच त्यांना पुढे संतपद (सेंट) हे पद बहाल करण्यात आलं व त्यांना ‘गोंयचो सायब’ हे बिरूदही लागू झालं.