विठ्ठलराव गाडगीळ स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळातील मंत्री नरहर विष्णू उर्फ काकासाहेब गाडगीळ
यांचे चिरंजीव. त्यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९२८ रोजी झाला. मराठी राजकारणी आणि काँग्रेसपक्षाचे सक्रीय कार्यकर्ते आणि राज्यसभा व लोकसभेचे खासदार आणि सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील होते.
विठ्ठलराव गाडगीळ हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी होते. ते संसदीय काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी, १९७१ आणि १९७६ मध्ये राज्यसभा सदस्य होते. विठ्ठलराव गाडगीळ हे १९७५ ते १९७७ या काळात इंदीरा गांधी यांच्या मंत्रीमंडळात संरक्षण उत्पादन मंत्री राहिले होते, राजीव गांधींच्या कारकिर्दीत "माहीती आणि नभोवाणी" खात्याचे मंत्री होते. त्यांच्या काळात मुंबई दूरदर्शनचे दुसरे चॅनल चालू झाले होते.
विठ्ठलराव गाडगीळ यांनी विवीध वृत्तपत्रातून वेळोवेळी लेखन केले ते "संसदमार्ग - लोकशाहीचा राजमार्ग" (लेखक: विठ्ठलराव गाडगीळ, प्रकाशकः प्रेस्टीज प्रकाशन) या ग्रंथात संकलीत झाले.
ग.प्र. प्रधान यांच्या मतानुसार "लोकशाहीच्या राजमार्गावरील विवीध संघर्षांचे,घटनांचे घटनांमागील विचार प्रवाहांचे वर्णन विवेचन आणि विश्लेषण विट्ठलराव गाडगिळांच्या लेखनातून झाले असून , खासदार आणि मंत्र्यांच्या आधीकार कक्षा आणि मर्यादांचे पैलू गाडगीळांच्या लेखनात येतात परंतु इंदिरा गांधींची कार्यपद्धती आणि आणीबाणी विषयी लेखन करताना ग.प्र. प्रधानांच्या मतानुसार विट्ठालराव गाडगीळांची लेखणी अडखळत असे.
विठ्ठलराव गाडगीळ यांचे ६ फेब्रुवारी २००१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
मराठवाडी बोलीच्या ढंगातील संवादफेकीसाठी व विनोदी अभिनयासाठी ते प्रसिद्ध आहेत. मकरंद अनासपुरे यांचा जन्म २२ जून १९७३ रोजी औरंगाबाद येथे झाला.
मकरंद अनासपुरे यांनी ''सरकारनामा'' या चित्रपटातुन आपली मराठी चित्रपट सृष्टीतील कारकीर्द सुरु केली. २००५ मध्ये आलेल्या चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ''कायद्याच बोला'' या चित्रपटाच्या यशाने त्यांना मराठी चित्रपटांमध्ये एक नवीन ओळख मिळाली. त्या नंतर अनेक विनोदी चित्रपटात त्यांनी अभिनय केला. पण विनोदी अभिनेता असा ठसा पुसण्यासाठी त्यांनी ''सुम्भराण'', ''पारध'', ''अनवट'' अशा चित्रपटांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी ''डँबीस'' या चित्रपटाचे दिग्दर्शन हि केले आहे. सोबतच त्यांनी ''गोष्ट छोटी डोंगराएवढी'' आणि ''गल्लीत गोंधळ'' दिल्लीत मुजरा या चित्रपटांची निर्मिती केली आहे.
राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना आधार देण्यासाठी पुढे आलेल्या अभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांचे कार्य कौतूकास्पद ठरत आहे. कारण त्यांनी सुरू केलेल्या नाम फाऊंडेशनला राज्यातील जनतेने भरभरून प्रतिसाद दिला आहे. या संस्थे अंतर्गत ते महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील शेतकर्यांना मदत करतात.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
डॉक्टर म्हणून झोपडपट्टीत दवाखाना चालविताना उपचारासाठी येणाऱ्या स्त्रियांचे वास्तव दर्शन त्यांना झाले आणि त्यांचे शब्द कवितेतून प्रकटले आहेत.
इंग्रजीतील रोमँटिक प्रवृत्तींच्या काव्यातून प्रखर व्यक्तिवादी, आत्मनिष्ठ जाणीव आणि सौंदर्यवादी दृष्टीकोन या दोन गोष्टी केशवसुतांनी प्रथम मराठीत आणल्या. कविप्रतिभा ही एक स्वतंत्र, चैतन्यमय शक्ती आहे. तिला कुणीही व कसलेही आदेश देऊ नयेत असे ते आग्रहाने सांगत. वर्डस्वर्थ, शेली, किटस् यांसारख्या इंग्रजी कवींच्या कवितांचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव होता.
मराठी लेखक, भाषांतरकार, पत्रकार, आनंद मासिकाचे संस्थापक व संपादक, बंगाली कथा-कादंबर्यांाचे अनुवादक, निबंधकार व कोशकार वासुदेव गोविंद आपटे यांचा जन्म १२ एप्रिल १८७१ रोजी झाला.
ते १८९६ साली कलकत्ता विद्यापीठाची बी. ए. परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर नागपूरच्या 'हिस्लॉप' कॉलेजात एक वर्ष फेलो आणि नंतर पुण्यात काही काळ शिक्षक होते. पुणे येथे असताना त्यांना हरि नारायण आपटे यांच्या सहवासात मराठी भाषा व साहित्याची विशेष गोडी निर्माण झाली. अशोक अथवा आर्यावर्तातला पहिला चक्रवर्ती राजा याचे चरित्र हे आपट्यांचे पहिले प्रकाशित पुस्तक. ते कोल्हापूरचे प्रोफेसर विजापूरकर यांच्या ग्रंथमालिकेतून प्रसिद्ध झाले. त्यानंतर भगवान बुद्ध आणि त्याचा धर्म ह्या विषयावरील बौद्धपर्व अथवा बौद्ध धर्माचा साद्यंत इतिहास हा अभ्यासपूर्ण ग्रंथ त्यांनी १९०५ मध्ये लिहिला व १९१४ साली तो प्रसिद्ध झाला. काही काळ अलाहाबाद येथील 'मॉडर्न रिव्ह्यू"त मराठी पुस्तकांच्या परीक्षणाचे व नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या 'ज्ञानप्रकाशा'च्या संपादनाचे काम त्यांनी केले. १९०६ साली त्यांनी 'आनंद' हे मुलांचे मासिक सुरू केले, ते अद्यापही सुरू असावे.
'आनंद'चे संपादन व ग्रंथलेखन ह्यांच्या बरोबरीने तरुण पिढीला राष्ट्रीय, सामाजिक व धार्मिक गोष्टींचे सम्यक ज्ञान मिळावे या उद्देशाने त्यांनी विचारसाधना नावाचे वर्तमानपत्रही सुरू करून पाहिले, परंतु प्रकृतिअस्वास्थ्यामुळे ते बंद करावे लागले (१९२०). त्यांच्या एकूण लेखनापैकी सुमारे ७५ टक्के लिखाण भाषांतरित, रूपांतरित व आधारित अशा स्वरूपाचे आहे. लेखन हा व्यवसाय त्यांनी आर्थिकदृष्ट्या यशस्वी करून दाखविला. सुप्रसिद्ध बंगाली कादंबरीकार बंकिमचंद्र यांचे संपूर्ण कादंबरीवाङ्मय, त्यातील बंगाली वातावरण, पार्श्वभूमी व पात्रांची नावे कायम ठेवून वा. गो. आपट्यांनी चार खंडांत मराठीत आणले आहे. वाल्मीकीचा जय ही त्यांची कादंबरीही बंगालीचे भाषांतर आहे.
मूर्तिमंत देशाभिमान, माणिकबाग, आणि दुःखाअन्ती सुख ही पाश्चात्य कादंबऱ्यांची रूपांतरेही उत्कृष्ट आहेत. याशिवाय श्रीहरनाथ ठाकुर यांची पत्रावली, महाभारतातील सोप्या गोष्टी, नाट्यभारत, नाट्यरामायण, बालभारत, मनी व मोत्या, महाराष्ट्राचा बालबोध इतिहास, मुलांसाठी गोड गाणी, एक दिवसाच्या सुटीत यासारखी बालवाचकांच्या दृष्टीने रंजक असूनही उद्बोधक अशी पुस्तके त्यांनी लिहिली. पुराणे, इतिहास, विविधज्ञानसंग्रह, संतांची व थोरांची चरित्रे यांच्या आधारे श्री. वा. गो. आपटे यांनी बाल व कुमारांसाठी निर्माण केलेले साहित्य उल्लेखनीय आहे. 'महाराष्ट्र साहित्य परिषदे'चे ते पहिले घटनाकार, एका परीने जनक व संवर्धकही होते. 'मराठी शब्दरत्नासकर' हा मराठी-मराठी शब्दकोश हे आपटे यांचे अजरामर स्मारक आहे. वासुदेव गोविंद आपटे यांचे निधन २ फेब्रुवारी १९३० रोजी झाले.
वासुदेव गोविंद आपटे यांचे साहित्य:- मिसेस हेन्री१वुड, सॅम्युएल लव्हर, बंकिमचंद्र चटोपाध्याय यांच्या कादंबऱ्यांचे अनुवाद; मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी (१९१०), लेखनकला आणि लेखनव्यवसाय (१९२५), मराठी शब्दरत्नापकर (१९२२), मराठी शब्दार्थचंद्रिका (१९२२), आणि मराठी-बंगाली शिक्षक (१९२५) ही भाषाभ्यास विषयक; जैनधर्म (१९०४), टापटीपचा संसार (१९१४), बालोद्यान पद्धतीचे गृहशिक्षण (१९१८), सौंदर्य आणि ललितकला (१९१९) इत्यादी विविध विषयांवरील चोवीस-पंचवीस पुस्तके व बालवाङ्मय विभागात छोटीछोटी तीस-बत्तीस पुस्तके त्यांनी लिहिली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
बाहुबली चित्रपटात देवसेनाची भूमिका करणारी अनुष्का ही रियल लाइफमध्ये मात्र खूपच ग्लॅमरस आहे. अनुष्का शेट्टी हे साऊथ सिने इंडस्ट्रीतील एक मोठं नाव असून तिकडे ती टॉपची हिरोईन आहे. इतकेच नाहीतर सिनेमासाठी पैसे घेण्याबाबतीतही ती साऊथमधील सर्व अभिनेत्रांच्या कितीतरी पुढे आहे.
१९६० साली प्रदर्शित झालेल्या ‘दीदी’ या चित्रपटाने त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांचा जन्म २५ सप्टेंबर १९३९ रोजी बंगलोर येथे झाला. १९६२ साली प्रदर्शित झालेल्या ‘टारझन गोज टू इंडिया’ या इंग्रजी चित्रपटातही त्यांनी व्यक्तिरेखा साकारली होती. १९६५ साली प्रदर्शित झालेला ‘ऊँचे लोग’ हा चित्रपट त्यांचा पहिला ‘हिट’ चित्रपट ठरला. त्यानंतर आलेल्या ‘आरजू’ या चित्रपटातील भूमिकेने त्यांचे हिंदी चित्रपटसृष्टीतील स्थान पक्के केले आणि सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेसाठी फिरोझ खान यांना पसंती देण्यात येऊ लागली.
‘आदमी और इन्सान’मधील भूमिकेसाठी त्यांना पहिला सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. त्यांची निर्मिती व दिग्दर्शन असलेल्या ‘धर्मात्मा’ या १९७५ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला खूप लोकप्रियता लाभली. सत्तर-ऐंशीच्या दशकात फिरोझ खान यांचा चाहतावर्ग तयार झाला. त्यांनी दिग्दर्शित केलेले ‘कुर्बानी’, ‘जाँबाज’ आणि ‘दयावान’ हे चित्रपटही हीट ठरले. १९९२ साली दिग्दर्शित केलेल्या ‘यल्गार’नंतर फिरोझ खान चित्रपटसृष्टीपासून दूर गेले होते. मा.फिरोझ खान यांनी पन्नासहून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या होत्या. त्या काळात फिरोज खान आणि मुमताज यांची जोडी खूप लोकप्रिय झाली होती. मैत्रीसोबतचे दोघे व्याहीसुध्दा होते.
२००५ मध्ये फिरोज यांचा मुलगा फरदीनने मुमताज यांची मुलगी आणि बालपणीची मैत्रीण नताशासोबत लग्न केले. पुत्र फरदीन खानला ‘लॉँच’ करण्यासाठी १९९८ साली ‘प्रेम अगन’ या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसे यश लाभले नाही. २००३ साली त्यांनी फरदीनलाच घेऊन ‘जाँनशीन’ या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले. याच चित्रपटाद्वारे त्यांनी मोठय़ा पडद्यावर पुनरागमन केले. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘वेलकम’ या चित्रपटात त्यांनी साकारलेली ‘आरडीएक्स’ची भूमिका लोकप्रिय झाली होती. मा.फिरोझ खान यांचे २७ एप्रिल २००९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
जागता पहारा या नावाचा त्यांचा एक ब्लॉग आहे. तसेच त्यांचं ‘ प्रतिपक्ष ‘ नावाचे यूट्यूब चॅनेल आहे. भाऊंच्या ‘जागता पहारा’ या ब्लॉगवर ७५ लाखाहून अधिक वाचक आहेत.
वसंत शिंदे यांनी १९४६ पासून १९९६ पर्यंत ४० दिग्दर्शकांकडे कामे केली अगदी दादासाहेब फाळके यांच्यापासून संजय सुरकरपर्यंत जवळ जवळ सर्वच म्हणावे लागतील. त्यांना ‘ सांगत्ये ऐका ‘ या चित्रपटासाठी ‘ दादासाहेब फाळके गौरवचिन्ह ‘ मिळाले, तर नाटक आणि चित्रपट यांच्यामधील भूमिकांसाठी ‘ दिनकर कामण्णा सुवर्णपदक ‘ मिळाले , शांताबाई हुबळीकर पुरस्कार , बालगंधर्व पुरस्कार , चिंतामणराव कोल्हटकर पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले.
कबीर बेदी,फिल्म इंडस्ट्रीतील हे असं नाव आहे,जो आपलं आयुष्य नेहमी आपल्या अंदाजात जगत आला आहे. त्यांचा जन्म १६ जानेवारी, १९४६ रोजी लाहोर(पाकिस्तान)मध्ये झाला.या व्यक्तीने कधीही सामाजिक आदर्शांना महत्त्व दिले नाही किंवा व्यवहारिक नैतिकेवरही विश्वास ठेवला नाही.मॉडेलिंग क्षेत्रातून आपल्या करिअरला सुरुवात करणारे कबीर बेदी आपल्या काळातील सुंदर स्त्रियांना आकर्षित करण्यात नेहमीच यशस्वी राहिले.करिअरमध्ये ते आपल्या समवयीन अभिनेत्यांपेक्षा नेहमी वेगळे ठरले.कबीर बेदींनी केवळ बॉलिवूडमध्येच नव्हे तर परदेशातही काम करुन नाव आणि प्रसिद्धी मिळवली.भारतात परतल्यानंतर ते हिप्पी लाइफ स्टाइल आणि अनेक स्त्रियांसह असलेल्या संबंधांमुळे नेहमीच चर्चेत राहिले.
गेल्या वर्षी आपल्या ७०व्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी म्हणजे १५ जानेवारी २०१६ रोजी त्यांनी त्यांच्यापेक्षा वयाने २९ वर्षांनी लहान गर्लफ्रेंड परवीन दोसांजसोबत लग्न केले होते. खास गोष्ट म्हणजे,त्यांची चौथी पत्नी परवीन(वय 42 वर्षे)त्यांची मुलगी पूजा बेदी(वय 46 वर्षे)पेक्षा चार वर्षांनी लहान आहे. परवीन ही ब्रिटीश वंशाची अॅक्ट्रेस आणि मॉडेल आहे.गेल्या दहा वर्षांपासून ती कबीर बेदींसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती.
कबीर बेदी हे सत्तरच्या दशकात ‘कच्चे धागे’ चित्रपटानंतर हिंदीत आपली मागणी कमी होत चालल्याचे लक्षात येताच, हॉलीवूडला गेले व ‘सांदोकन’ या विदेशी चित्रपटातून भूमिका साकारत तेथे आपला जम बसवला. त्यांना त्याच्या हँडसम व्यक्तिमत्त्वाचा भरपूर फायदा झाला; पण त्या काळात कबीर बेदी विदेशात गेले म्हणजे नेमके काय करतात याची इकडे काहीही कल्पना येत नव्हती. काही प्रतिष्ठित इंग्रजी मासिक वगळता कबिर बेदी यांचा शोध घेणे फारसे कोणाला गरजेचे वाटले नाही. चार लग्न,तीन घटस्फोट,तीन मुले आणि दोन नातवांचे आजोबा असलेले कबीर बेदी मनाने आजही तरुणच आहेत.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti