इंटरनेटच्या महाकाय पसाऱ्यातून खास निवडलेल्या वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओजचा संग्रह.
महात्मा गांधीजीच्या चलेजाव चळवळी नंतरच्या काळात ब्रिटीश सरकारला समांतर अशी यंत्रणा महाराष्ट्राच्या काही भागात उभी करताना क्रांतीसिंह नाना पाटील यांनी स्वयंपूर्ण कारभाराचं सूत्र पुढे आणलं. त्यासाठी ग्रामीण भागातल्या बहुजन समाजात स्वाभिमान जागृतीचं काम त्यांनी निष्ठेनं आणि अथकपणे केलं. ‘स्वातंत्र्यचळवळीत सर्वसामान्यांचं योगदान’ हीच त्यांची भूमिका होती. परिणामी ‘प्रतिसरकार’ ही संकल्पना अस्तित्वात आली.
https://www.youtube.com/watch?v=4jKy4wpaSvo
पु.ल.देशपांडे यांनी घेतलेल्या मुलाखतीत पं. वसंतराव देशपांडे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
राम नगरकर यांची रामनगरी
मराठी संगीत रंगभूमीला संजीवनी देणारे नाटककार, साक्षेपी संपादक, प्रभावी वक्ते आणि पत्रकार, बहुभाषाकोविद हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व. यंदाचे वर्ष त्यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे, तर आज 26 सप्टेंबर हा त्यांचा स्मृतिदिन.
ज्या गीताला ऐकताना पूज्य विनोबाजीं सारख्या कर्मयोग्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळले …स्वातंत्र्यवीर सावरकारांना कुणाचं कौतुक करावं हा प्रश्न पड्ला त्या गीत रामायणातल्या सर्वात लोकप्रिय गीताची चाल बाबूजींनी कशी बांधली ?


सारांश: श्रीरंगा त्याच्या आयुष्यातील सर्व स्त्रियांबद्दल निराश आहे; तथापि, त्याच्या गावी उत्सवात भाग घेतल्यानंतर, त्याला समजले की त्याला अलौकिक शक्तींची देणगी मिळाली आहे, जी त्याला कोणत्याही स्त्रीचे विचार ऐकू देते.
Running Time – 2:23:44
छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्राला वारसा लाभला आहे तो शौर्याचा, पराक्रमाचा आणि देशप्रेमाचा. देव, देश आणि धर्मासाठी तळहातावर प्राण घेऊन लढणाऱया शूरवीरांची ही भूमी. या भूमीत जन्माला आलेल्या अनेक वीरांनी १८५७च्या ही आधी जुलमी ब्रिटीशांविरुद्ध सशस्त्र लढे दिले होते.
रामजन्माच्या गीतासाठी गदिमा मुंबईहून धडपडत आले . दिवसभर बैठक मारून बसले .पण कागदावर अक्षर काही ऊमटेना ! हा प्रतिभेचा रूसवा तर नव्हता?
दिनांक ३० एप्रिल… स्व. दादासाहेब फाळके यांची जयंती… भारतीय चित्रपट व्यवसायाच्या या जनकाचं आणि त्यांनी केलेल्या कार्याचं पुन:पुन्हा स्मरण केलं, तरच त्याचं कार्य नवीन पिढीसमोर सातत्यानं येऊ शकतं आणि याच भावनेतून दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर पुसाळकर यांची ही मुलाखत प्रसारित करत आहोत.
Copyright © 2025 | Marathisrushti