मित्र हो , एकच एक गाव आणि एकच एक शाळा , अशी दीर्घ आणि घट्ट मैत्री “असे मी अनुभवले नाहीये .पण अनेक गावं ,अनेक शाळा , अनेक मित्र .आणि मैत्रीची विविध रूपे मी अनुभवली ,या अनुभावंनी मला घडवले .
January 13, 2019
प्लास्टिक मनीचा (डेबिट कार्डस्, क्रेडिट कार्डस् ) चा वापरआपल्या आयुष्यातील महत्वाचा घटक बनलाय, कारण शॉपिंग पासून, दैनंदिन बिलं भरण्यापर्यंत “क्रेडिट” अथवा “डेबिट कार्डस्” चा वापर करण्यात येतो; भली मोठी शॉपिंग असेल किंवा किराणा दुकानात सुद्धा सर्वत्र नोटाच नोटा पहायला मिळतात.
November 27, 2013
एकाच छताखाली राहणारी ,रक्ताचे नाते असणारी मंडळी एकमेकांना “परिचित “असतीलच असे नाही. सध्याच्या काळात तर हे ठळकपणे अधोरेखित होतंय. एक नितांतसुंदर ,कॊटुंबिक ,अभिनयसंपन्न चित्रपट म्हणजे “परिचय ” ! यात रूढार्थाने प्रेमकहाणी नाही ,खलनायक नाही , रक्त वगैरे चुकूनही नाही (नाही म्हणायला आजारी संजीवकुमार खोकतो ,तेव्हा रक्ताचे डाग दिसतात.) अढी ,गैरसमज ,अहंकार यामुळे निरगाठी पडलेली नातेवाईक मंडळी येथे अपरिहार्यपणे (आणि सुरुवातीलातरी मनाविरुद्ध ) एकत्र राहात असतात. त्यांचाही नियतीमुळे नाईलाज झालेला असतो.
November 13, 2021
दसरा झाला की वेध लागायचे ते दिवाळीचे.घराची साफसफाई तर दसर्यालाच झालेली आसायची,घर कसल ते दहाबाय दहाची खोलीच ती,वर एक पोटमाळा त्यातच आईने जुन्या कपडयांच बोचक,ताईच्या लग्नात आलेली आहेराची भांडी,वापरात न आलेल सामान अस बरचस काहीबाही सामान कस नीट लावून ठेवलेल आसायच.
December 5, 2023
आज महामार्ग, फ्लायओव्हर आणि रेल्वेच्या जाळ्याने एकसंघ बनलेल्या मुंबई शहराच्या दळणवळणाच्या सुविधांमध्ये तेव्हा पालखी, होड्या आणि घोडागाड्या यांचा समावेश असे. कालांतराने रस्तांचे जाळे विणले गेले. भारतातील पहिली रेल्वे मुंबईत सुरु झाली. वाहतुकीची साधने वाढली तशीच नव्या साधनांची गरजही वाढू लागली. १८७४ मध्ये मुंबईत ट्रामगाडयांची वाहतूक सुरु झाली.
February 13, 2013
भांड्यांवर नाव टाकण्यामागे कारण असं असायचं की, कधी शेजारी पाजारी ते भांडं काही वस्तू घालून दिलं, तर ते सहज परत मिळावं व त्याची त्यांच्या भांड्यात सरमिसळ होऊ नये म्हणून…त्यावर नाव असल्याने आपण ते भांडे आपलेच आहे, हे ‘पुराव्याने शाबित’ करु शकतो..
July 16, 2021
दत्तूकाका व माझे वडिल अनेक वर्षे खडकपूरला सुट्टीमध्ये जातच राहिले. मोठी रेल्वे कॉलनी. रोज निरनिराळ्या गाड्यांच्या गप्पा त्यातही वन डाऊन विशेष चर्चेत असे. गाड्यांचे टाईमटेबल व त्या लेट का होतात यावर तासन्तास काथ्याकूट. या सर्व मार्याचा दत्तूकाकांच्या मनावर असा काही जबरदस्त पगडा बसला की त्यांनी चक्क इंजिनमधील फायरमनची नोकरी पकडली.
February 11, 2019
पाचेक वर्षे झाली.. जवळपास टीव्ही पाहताच नाही! अगदी खास असं कारण नाही, पण वडिलांच्या हातातला रिमोट माझ्याकडे येता येता टीनेज मुलाच्या हाती गेला, मग बातम्या आणि फुटबॉल मॅचेसच्या मध्ये माझ्या आवडीच्या प्रोग्रॅमचं सँडविच व्हायला लागलं! त्यातच टॅब घेतला होता, त्यावर आवडीचं सगळं हेडफोन कानाला लावला की बघता यायला लागलं..
March 11, 2023
परवा सहजच संध्याकाळच्या वेळी गावाहून येता येता गोदावरी काठी थोडा वेळ थांबलो.ताडकळस आणि पालम या दरम्यान धानोरा (काळे) या ठिकाणी गोदावरी नदीवर मोठा पूल बांधण्यात आला आहे. तिथे थोडा वेळ काम नसतांना ही रेंगाळलो पुलावरून खाली पाहिले असं काही मनोहर दृश्य दिसलं की मला पूर्वीच्या काळच्या दिपमाला ची आठवण झाली संध्याकाळ म्हणजे दिवे लागणीची वेळ, त्यातल्या त्यात त्यात दूरवरून झगमगणारे हे दिवे पाहिले जी माणसाला अधिकच आनंद होतो.
June 6, 2022
पूर्वीच्या चाळ संस्कृतीत आरती म्हणजे एक मोठा इव्हेंट असायचा. त्यातही मोठी आरती म्हणजे कमालच. मोठी आरती म्हणजे विसर्जनाच्या आधल्या रात्री केलेली आरती. काही ठिकाणी तर ही मोठी आरती तब्बल तासभरच काय तर त्याहीपेक्षा जास्त वेळ चालायची.
September 25, 2014
Copyright © 2025 | Marathisrushti