(User Level: User is not logged in.)

कथा

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

Sort By:

  • ड्रॅक्युलाचा पाहुणा (संक्षिप्त रूपांतरीत कथा १९)

    ब्रॅम स्टोकर ह्या लेखकाची ‘ड्रॅक्युला’ ही कादंबरी खूप गाजली. तीही त्याच्या मृत्यूनंतर. त्याच्या इतरही भूतांवरच्या कादंब-या आहेत. ड्रॅक्युला जेव्हां चित्रपट रूपात लोकांच्या समोर आली त्यानंतर जास्तच लोकप्रिय झाली. प्रस्तुत कथा त्याच्या पत्नीने त्याच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी प्रकाशित केली. ही कथा म्हणजे ड्रॅक्युला ह्या कादंबरीचं पहिलं प्रकरण आहे, असं अनेकांच म्हणणं आहे. ड्रॅक्युला जेव्हां प्रसिध्दीसाठी पाठवली तेव्हां पुस्तकाची लांबी कमी करण्यासाठी हे पहिलंच प्रकरण गाळण्याचे प्रकाशकांनी ठरवले व लेखकाने ते मान्य केले. पुढे त्यांत थोड्या सुधारणा करून ती कथा म्हणून प्रसिध्द केली गेली.
    ड्रॅक्युलाचा अर्थ ड्रॅक्युल ह्या उमरावाचा मुलगा तो ड्रॅक्युला असा आहे. पंधराव्या शतकांत ट्रान्सिल्व्हानियामधे ड्रॅक्युला राजा होता. त्याचे राज्य दोन मोठ्या राज्यांच्या मधे सांपडल्यामुळे दोघांच्या युध्दात तें भरडले जाई. १४४८ ते १४७६ पर्यंत तो तिथला राजा होता. आतां हा भाग रोमानियामधे येतो. दोनदां त्याचे सिंहासन गेले व त्याला झगडून परत मिळवावे लागले. तो अतिशय क्रूर प्रकारे शिक्षा देत असे व त्याने हजारो बळी घेतल्याचा उल्लेख आहे. परंतु ख्रिश्चॅनिटीचा तो पुरस्कार करीत असे. त्यामुळे व्हॅटीकन त्याच्याविरूध्द बोलत नसे. तो युध्दातच मारला गेला. त्याचे शव जिथे पुरले होते तिथून नाहीसे झाले. नंतर त्याचे अवशेष दुसरीकडे सांपडले ते म्युझियममध्ये ठेवण्यांत आले होते पण तेंही नाहीसे झाले (बहुदा चोरले गेले). ब्रॅम स्टोकरने कादंबरीत ड्रॅक्युला हा एकोणीसाव्या शतकांतला उमरावाच्या रूपांतील भूत म्हणून सादर केला आहे. प्रस्तुत गोष्टीत मात्र तो कथा सांगणा-याची मर्जी सांभाळण्यासाठी सुरूवातीला त्याला मदत करतांना दाखवला आहे. कथेत ड्रॅक्युलाचा तीनदा उल्लेख येतो. प्रथम तो एक उंच किडकिडीत माणसाच्या रूपांत दिसतो व नाहीसा होतो. दुस-यांदा तो काउंटेसच्या कबरीवर वीज पडते तेव्हां लेखकाला तिथून उचलून वाचवतो आणि लांडग्याच्या रूपांत थंडीत त्याचे रक्षण करतो. तिसरा उल्लेख नांवानिशी पत्रांत येतो. गूढ निर्माण करण्यासाठी प्रत्यक्ष उल्लेख मात्र केलेला नाही.

  • युगांतर – भाग ४

    सुमंत जयंत परचुरे. 

    रवीने हातातला कप बाजूला ठेवला, “ताई काय बोलत्येस तू? कसला आजार? काय सांगत्येस तू हे”, रवीने ताईच्या खांद्यांना हाताने गदगदा हलवून विचारले, त्याच्या चेहऱ्यावर अशक्य गूढ भाव निर्माण झाले होते पण ताईने आपलं तोंड घट्ट मिटून घेतलं होतं, नकारार्थी मान हलवून ती सांगायचं टाळायचा प्रयत्न करत होती. “प्लिज ताई बोल ना ग, काय झालं होतं तुला? अण्णा मुंबईला काम आहे सांगून गेले होते ते आठवतंय मला चांगलंच, भयानक पाऊस होता तेव्हा, अगदी श्रावणातील ऐन दिवस, इथल्या पुजाऱ्याने भैरोबाच्या आवरातल्या महादेवाच्या मंदिरात असणे गरजेचेच होते, पण पण…. अण्णांनी अचानक एका संध्याकाळी आईला सांगितलं रात्री मुंबई ला जात असल्याचं.

  • एकदम आयटम…

    तिला काय अपेक्षित होते ते माहित नाही पण मी बोलून गेलो. मला माझीच मजा वाटली कारण हे उत्तर मी कसे दिले .

  • लोकशाही का बालूशाही ?

    तडजोडीच्या राजकारणात सामान्य कार्यकर्त्याची होणारी फरपट व्यक्त करणारी कथा.

  • घरटं छोटं

    पशुपक्ष्यांचे शिक्षण, लग्न वगैरे काही नाही तर ते एकमेकांना समजून सांभाळून घेतात. कदाचित भांडण करत असतील. मात्र घर सोडून एकमेकांना सोडून देत नाहीत. कारण त्यांचे घरटं छोट आहे पण मन मात्र खरंच खूप मोठे आहे. दोघेही उच्च शिक्षित. आर्थिक स्वावलंबन. जबाबदारी नाही. बंधन नाहीत सगळ्या सुखसोयी. अजून काय हवं असतं सुखी संसारासाठी ते सगळे काही आहे तरीही असे का व्हावे? हे समजत नाही. पण माणसा परीस… हेच खरं आहे….

  • डॉक्टर …डॉक्टर …’ (मी आणि ती कथा)

    खरे तर मला तिचा लहानपणचा चेहरा नीट आठवत नाही… चाळीमधल्या त्या गमती आहेत… खेळाच्या …त्यावेळी एक खेळ सॉलिड पॉप्युलर होता… तो अर्थात आमच्यापेक्षा मोठ्या मुलींनी शोधून काढला होता… अर्थात त्याचे अनुकरण लहानही करत असत.. त्या खेळाचे नाव होते.. ‘ डॉक्टर …डॉक्टर …’

  • सोंग

    पिंट्या अन बाळ्या दोघं लय जिगरी दोस्त व्हते.दोघबी शेजारी शेजारीच राहायचे.एकाच वयाचे आसल्यानं ते शाळत बी संगमंगच व्हते.जिवणातल्या जवळपास सगळ्याच उन्हाळ्या पावसाळ्यात ते साथीलं व्हते.नेहमी एकमेकांचे सुख दुख वाटुन घेयाचे.तेह्यचे लग्न बी दहा पंधरा दिवसांच्या अंतरानच झाले व्हते.

  • मतिपोसक जातक

    अनेक जन्मींच्या संसारात संसरत असता आमचा बोधिसत्त्व एकदा हत्तीच्या योनीत जन्माला येऊन वयात आल्यावर मोठ्या गजसंघाचा धुरीण झाला होता. वृद्धापकाळामुळे त्याची आई अंध झाली व हत्तीच्या कळपाबरोबर तिला रानावनात फिरणे अशक्य झाले. तिला एका सुरक्षित स्थळी ठेऊन बोधिसत्त्व इतर हत्तींबरोबर चांगली चांगली फळे वगैरे आहाराचे पदार्थ पाठवीत असे. परंतु ते रसलोलुप हत्ती वाटेतच ती फळे खात असत व बिचाऱ्या वृद्ध हत्तीणीच्या वाट्याला पालापाचोळा वगैरे नीरस पदार्थच येत असत.

  • व्यथा

    “आहो ताई,आमच्या समद्या झोपडपट्टीत हेच हाय, येथे आम्ही घरोघरी रोजच्या वीसतीस रुपयांसाठी भांडी घासतो,कामं करतो ते काही उगीच नाही.सर्वांचे नवरे खूप कमाई करत्यात दिवसभर, आणि रात्री पुरी दारूत घालवत्या. पुन्हा काही बी बोलायचे नाही आम्ही.बोललो तर भांडण, शिव्या आणि मारामारी. जरा जास्त काही बोलायला गेलो तर हे, आज घडले तसे चालू असते चार आठ दिवसांला”.

    “नवरे कशे हे असे? हे तर बुजगावणे आहेत आपले. यांचा एकही पैसा लागत नाही कधी संसारासाठी, घरासाठी. पण आमची कमाई मात्र सलते यांच्या डोल्यात. संसार हाकायला एकाची तरी कमाई नको का?”

  • रेव्हन काळा कसा झाला?

    एकदा समुद्रात होडी वल्हवत असताना रेव्हनला गनूक भेटला. त्यावेळी गनूकला त्याचे सामर्थ्य दाखवायची आणि रेव्हनवर त्याचे वर्चस्व सिद्ध करून दाखवायची इच्छा झाली. म्हणून त्याने त्याची जादूची टोपी काढून टाकली आणि सगळ्या समुद्रावर दाट धुके निर्माण केले.