नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा
काही दिवसांनी समोरच्या सोसायटीत एक अॅम्ब्युलन्स आली .. कोणीतरी दोघे उतरले .. बिल्डिंगमधल्या बाकीच्यानी त्यांच्या त्यांच्या खिडकीतून टाळ्या वाजवल्या .. आनंदानी कसल्याश्या घोषणा दिल्याचे आवाज ऐकू आले.

गुस्टॉव्ह फ्लॉबर्ट ह्या प्रथितयश साहित्यिकाने त्याला आपल्या छत्रछायेखाली घेतला. फ्लॉबर्टच्या घरी त्याची एमिल झोला व रशियन कादंबरीवर आयव्हॅन तुर्गानेव्ह यांच्याबरोबर भेट झाली. ते दोघेही वास्तववादी लिखाणाचे पुरस्कर्ते होते. १८७५मधे फ्लॉबर्टच्या उत्तेजनाने त्याने एक विनोदी नाटक लिहिले व त्यांत कामही केले.
१८७८मधे त्याची बदली माहिती मंत्रालयाकडे करण्यात आली व तिथे वृत्तपत्रांसाठी लिहिण्याची जबाबदारी त्याच्यावर आली. ते काम करून त्याला खूप फावला वेळ मिळे. त्या वेळांत त्याने कथा व कादंबऱ्या लिहायला सुरूवात केली. १८८०मधे त्याने बौल द सीफ ह्या नांवाने त्याच्या मते त्याचा “मास्टरपीस” प्रसिध्द केला.
ती छोटी कादंबरीच होती. त्याचे वाचकांनी स्वागत केले. फ्लॉबर्टनेही त्याची स्तुती केली. लागलीच त्याने दोन कथा लिहिल्या व त्याही खूप गाजल्या.
देव सुद्धा, कधी कधी कोणत्या धुनकीत लग्नाच्या गाठी मारतो कोणास ठाऊक? आता माझं लग्न लव्ह मॅरेजच आहे म्हणा. दोन चार महिने आम्ही भेटत होतो. साधारण तो थोडासा रिझर्व्ह वाटला, पण चालता है. असतात काही माणसं अंतर्मुख. अन अशी माणसं कमालीची शांत आणि ‘कुल’ असतात.

आम्ही कुठेही मोट्या हॉटेलमध्ये खाल्ले तरीपण चहा प्यायला टपरीवर जायचो. ठाण्याच्या गडकरीमध्ये चहा प्यायला जायचो परंतु एका चहासाठी ३० -३२ रुपये टू मच ..वाटत असे, म्हणून जवळच्या टपरीवर सात रुपये कटींग बेस्ट..

संगीता अंधारात मुसमुसत पडली होती, नाना विचारांनी डोके भणभणत होते, आपल्या आनंदात बिपीन सहभागी नसेल तर काय अर्थ ? स्वभावाचे पैलू लग्नानंतरच कळतात, ही तर सुरवातच होती.
अण्णा एकदम प्रसन्न दिसत होते. बाहेर जाण्याची तयारी सुरू होती. घोटून घोटून दाढी केली होती. केसांना हलक्या हाताने तेल लावून भांग पाडला होता. पांढरे शुभ्र मुलायम केस त्यांच्या वृध्दत्वाला सौंदर्य बहाल करीत होते. काळी पँट व पांढरा शुभ्र सदरा घातला. खिळ्याला अडकवलेली त्यांची अतिशय आवडती शबनम खांद्यावर अडकवत विनयाला म्हणाले, “जरा जाऊन येतो, आधी देवीला जातो. मग चितकडे, मग मंडईत, एक तास लागेल. तू काळजी करू नकोस, मी नीट जातो.
हे बाबूजींचं गाणं ऐकत स्मिता खिडकीत विचार करत उभी होती. तिची पण अशाच प्रकारची अवस्था झाली होती. सौ. स्मिता अमोल तावडे एका खासगी शाळेत गणित विषयाची शिक्षिका होती. तिची साधारणतः २०-२२ वर्ष नोकरी झाली होती. घरी तिचा नवरा तिला खूप सपोर्ट करणारा आणि अगदी प्रेमळ होता.
झेलमच्या पाण्याचं दर्शन घ्यायचं , गेल्या पंचाहत्तर वर्षातले साठवून ठेवलेले अश्रू तिला अर्पण करायचे , आई , दोघी बहिणी , आत्या आणि गल्लीतल्या कित्येक जणींना श्रद्धांजली अर्पण करायची , अशी कैक वर्षांची इच्छा होती तिची .
दरवर्षीच्या चौदा ऑगस्टला आशाराणी गप्पगप्प असायची . मौन असायचं तिचं. सकाळपासून पाण्याचा थेंबही घेत नसे ती . छावणीत ती एकटीच बसून राहायची . आणि डोळ्यातून अश्रूंचा अविरत पूर वाहत असायचा .

सराईत गुन्हेगारानाही टेलिफोन ही एक पर्वणीच आहे. प्रत्यक्ष न भेटता गुन्हेगारी करता येते. लोकाना धमकावता येते. खंडणी वसूल करता येते. पोलिसांकडे नसेल इतकी अत्याधुनिक टेलिफोन यंत्रणा या गुन्हेगारांकडे आहे. त्यावर कॉन्फरन्स सेवेपासून रिमोट कंट्रोलपर्यंत सर्वच सोय आहे.
नेहमीच्या कोपर्यावर मी मोटार थांबवली. माझे ऑफिसातले मित्र आंत चढले. मोटार ऑफिसच्या दिशेनं धावूं लागली. ‘‘आज साठे दिसत नाहीं’’, मी म्हणालो. ‘‘तुम्हाला माहीत नाहीं कां पराडकर ? साठेला मुलगी झाली.’’ पाटीलनं सांगितलं, ‘‘हो कां ? अरे वा !’’, मी. साठे हा आमच्या ऑफिसातला एक तरुण ऑफिसर. त्याच्या खेळकर स्वभावामुळे तो सर्वांनाच आवडत असे. दीडएक वर्षांपूर्वी त्याचं लग्न झालं होतं. आतां मुलगी झाली होती. बेटा अगदी खुशीत असणार ! साठे भेटला की त्याचं अभिनंदन करायचं मी ठरवलं.
दुसर्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे मित्र कारमध्ये चढले. आज साठेही होता. ‘‘साठे, अभिनंदन !’’, मी. ‘‘थॅंक्यू’’ , साठे. ‘‘बर्फी हवी बरं का साठे’’, मी. ‘‘छे छे, बर्फीनं भागणार नाही, पार्टीच हवी’’, काळेनं फर्माईश केली. ‘‘देऊं ना’’, साठे म्हणाला. पण त्याच्या बोलण्यात उत्साह दिसत नव्हता.
कार पुढे धावत होती. संभाषणाला खीळ पडली होती. नेहमीचा खेळकर साठे आज इतका गप्प गप्प कां? मी विचार करत होतो. अखेर न राहवून मी विचारले, ‘‘काय साठे, आज अगदी गप्प आहेस ? बाळ बाळंतीण ठीक आहेत ना ?’’. साठेच्या आधी पाटीलनंच उत्तर दिलं, ‘‘त्याचं काय आहे, मुलगी झाली म्हणून साठे नाराज झालाय्’’. ‘‘खरं का रे’’, मी. साठे गप्पच. त्याला समजवत मी म्हणालो, ‘‘अरे, नाराज कशाला व्हायचं? उलट खूषच व्हायला हवं. म्हणच आहे, पहिली बेटी धनाची पेटी’’. ‘‘हो धनाची पेटी ! मला आत्तांपासूनच धन जमवायच्या मागे लागायला हवं, म्हणजे मुलीच्या लग्नासाठी धनाची पेटी तयार करता येईल’’, साठे उद्गारला. ‘‘अरे साठे, मूल होणं ही किती आनंदाची गोष्ट आहे ! त्यातून तुझं तर पहिलं मूल ! मुलगा काय, मुलगी काय, सारखंच’’, काळे म्हणाला. त्याला लग्नानंतर पांच वर्षांनी मूल झालं होतं. पण साठेला काळेचं सांगणं पटलं नाही. ‘‘अरे बाबा, एवढं सोपं नाहीं तें. आज मुलीच्या लग्नाला चार-पांच लाख खर्च येतो. पंचवीस वर्षांनी पंधरा-वीस लाख तरी लागतील. आपण मध्यमवर्गीय माणसं, आपला पगार तो कितीसा, अन् त्यातून शिल्लक किती पडणार ? महागाई तर दिवसेदिवस वाढतेच आहे ! मुलीला वाढवायचं, शिकवायचं, ग्रॅज्युएट-पीजी करायचं. त्यातून तिने इंजिनियरिंग किंवा मेडिकलला जायचं म्हटलं तर झालंच ! एवढं सगळं करून इतके लाख शिल्लक टाकायचे कसे अन मुलीचं लग्न करायचं कसं ?’’, साठे व्यथित झाला होता. जणूं मुलीचं लग्न उद्यावर येऊन ठेपलं होतं !
मी वेगळा मुद्दा मांडत साठेची समजूत काढू लागलो, ‘‘पण मुलगा होणं किंवा मुलगी होणं आपल्या हातात थोडंच असतं ? मग मुलगाच व्हावा अशी अपेक्षा ठेवणं योग्य आहे कां ?’’. ‘‘पराडकर, तुमचं काय जातं असं म्हणायला?’’, साठे चिडून बोलला, ‘‘तुम्हाला दोन्ही मुलगेच आहेत. जावें त्याच्या वंशा तेव्हां कळे !’’.
खरं म्हणजे मला साठेशी खूप बोलायचं होतं. मुलगा किंवा मुलगी असा प्रेफरन्स मला नव्हता, हे त्याला सांगायचं होतं. हल्ली मुली मुलांच्या बरोबरीने चमकतात, स्त्रिया पुरुषांपेक्षा कुठल्याही बाबतीत कमी नाहीत, हेही सांगायचं होतं. ह्या विषयाचे वेगवेगळे पैलू आहेत, त्यांची चर्चा करायची होती. पण साठेचा मूड् बघून मी विषय वाढवला नाही. बाकीची मंडळीही उरलेला रस्ता गप्पच राहिली.
संध्याकाळी साठे ओव्हरटाईमला थांबल्यामुळे आमच्याबरोबर नव्हता. साहजिकपणें पुन्हां साठेचाच विषय सुरुं झाला. ‘‘साठेनं मुलगी झाल्याचं फारच मनाला लावून घेतलं आहे’’, मी म्हणालो , ‘‘खरं म्हणजे मुलगा किंवा मुलगी होणं किंवा न होणं हें आपल्या हातात नसतं’’. ‘‘खरं आहे, पण साठेसारखे लोक बरेच आहेत, पराडकर’’ , इति पाटील.
पाटील सांगूं लागला, म्हणाला, ‘‘माझा एक परिचित आहे, लिमये. त्याला दोन मुली आहेत. बायकोची प्रकृती यथातथाच आहे. तिसरं मूल नको असा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. पण ह्या सद्.गृहस्थाला मुलगा हवाच होता, म्हणायचा, ‘मुलगा नसला तर मला सद्गती मिळणार नाहीं’. जग एकविसाव्या शतकात पोंचलंय आणि याचे असे जुनाट विचार ! बायकोला तिसर्यांदा दिवस राहिले. ह्याला कांही चैन नाहीं, मुलगा होईल की मुलगी ? गर्भतपासणी करून घेतली”. ”अरे, पण तशी चाचणी तर बेकायदेशीर आहे”. ”हो, पण तरीही घेतली करून. मुलगी आहे असा निर्णय समजला. झालं. हा पठ्ठ्या बायकोच्या मागे लागला की गर्भपात करून घे. दोनचार दिवस तिनं तग धरला. पण हा कांही पाठ सोडेना. शेवटी ती बिचारी नाइलाजानें तयार झाली. अन् सांगायची गोष्ट म्हणजे गर्भपाताच्या वेळी ती बाई रक्तस्त्रावाने जवळजवळ मेलीच होती, केवळ सुदैव म्हणून वाचली ! त्या वेळी तिची मोठी मुलगी होती चार वर्षांची अन धाकटी दोन वर्षांची. आतां बोला ! ”. ”बिचारी बाई खरोखरच जर मेली असती तर त्या लहान जिवांचे काय हाल झाले असते !’’, काळे त्वेषानं उद्गारला. ‘‘खरी गंमत पुढेच आहे’’, पाटील म्हणाला, ‘‘थोड्या दिवसांनी बाईला पुन्हां दिवस राहिले, अन या वेळी मात्र तिला मुलगाच झाला’’. ‘‘त्या लिमयेला अगदी धन्य धन्य झालं असेल!’’ मी म्हणालो. ‘‘हो ना ! त्याला आता आभाळ ठेंगणं झालंय. आतां स्वर्गात जायची सोय झाली ना !’’ पाटीलची प्रतिक्रिया.
”पण साठे काय किंवा लिमये काय, यांच्या या अवस्थेला आपली समाजरचनाच जबाबदार आहे”, काळे म्हणाला, ”अगदी माझ्या घरातलंच उदाहरण सांगतो. परवाचीच गोष्ट. माझी बायको नलू सांगत होती – ‘दुपारी मी आणि शेजारची सुमा बोलत उभ्या होतो. पलिकडच्या मालतीकाकू त्यांच्या पुष्पाच्या बाळाला घेऊन जात होत्या. त्या आमच्याशी बोलायला थांबल्या. मी कौतुकानं म्हणाले, कित्ती छान जावळ आहे बाळाचं. तर म्हणतात कशा, ‘असं बोलूं नये हो. बाळाला दृष्ट लागेल’. मला अस्सा राग आला. नंतर मी सुमाला म्हटलं सुद्धा, आमची कशी दृष्ट लागेल ? आम्हाला मुलं नाहींत की काय ?’. नलूचं बोलणं ऐकून मी थक्कच झालो . म्हटलं , ‘मालतीकाकूंचं जाऊं दे ; अल्पशिक्षित म्हातारी ती. पण तूं ! तूं तर कॉलेजात फिजिक्सची लेक्चरर आहेस ! दृष्ट लागणं अन त्यातूनही निपुत्रिकेची दृष्ट लागणं असल्या अंधश्रद्धांवर तुझ्यासारखी बाई विश्वास ठेवते म्हणजे मात्र कमाल आहे !’ . ’माझा विश्वास आहे की नाहीं ते जाऊं द्या’, नलू म्हणाली, ‘जगाचा तर आहे ना ! आपला विश्वास असो वा नसो, समाज आपल्याला अशा गोष्टींमध्ये जखडून ठेवतो. इतकी वर्ष आपल्याला मूल नव्हतं. तेव्हां याच बायकांच्या बोचर्या नजरा मला घायाळ करत, त्यांची कुत्सित बोलणी ऐकवत नसत. आतां देवानं मला सोन्यासारखी मुलगी दिली आहे. आतां मी दुसर्यांची बोलणी कां म्हणून ऐकून घ्यावी ?’ या अजब तर्कानं मी सर्द झालो”, काळेंनं गोष्ट पूर्ण केली. मग काळेनं विचार मांडला, ”सांगायचा मुद्दा असा की, समाजाची रचना, समाजाच्या रूढी बदलायला हव्यात. तरच साठे आणि लिमयेसारखे लोक मुलगी झाली म्हणून दुःखी होणार नाहींत”.
*
पाटील अन् काळे नेहमीच्या कोपर्यावर उतरून गेले. कार घराकडे धावत होती. कारबरोबर माझे विचारही धावत होते. कधी बदलणार हा समाज ? दुष्ट रुढी कधी नाहींशा होतील ? कधी स्त्रियांना समाजात बरोबरीचं, मानाचं, स्थान मिळेल ? आपल्यासारखी माणसं त्यासाठी काय काम करूं शकतील? एक ना दोन, अनेक विचार.
विचारांच्या नादात घर केव्हां आलं ते मला कळलंच नाहीं, कार पार्क करतां करतां मी ठरवलं की गेल्या गेल्या लगेचच स्त्रीस्वातंत्र्य-पुरस्कर्त्या आपल्या बायकोला आजची सर्व चर्चा सांगायची.
घरात पाऊल टाकतांच दिसलं की माझी चुलतबहीण रजनी आलेली होती अन् ‘मुलगा व्हावा’ म्हणून कुठलसं व्रत धरल्याचं ती माझ्या बायकोला सांगत होती. मी ओठावरचे शब्द तात्पुरते गिळून टाकले.
+ + +
( Note – This story is based on a real-life experience. The Author has taken some literary liberties. Name of characters have been changed ).
_ _ _
[ पूर्वप्रसिद्धी : ‘कीर्तिस्तंभ’ पाक्षिक, वडोदरा ( बडोदा) , आवृत्ती दि. ०१.०९.१९९६.
कांहीं बदल : १४ फेब्रु. २०१८ ]
= = =
- सुभाष स. नाईक Subhash S. Naik
मुंबई.
M - 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com , www.snehalaatnaik.com
Copyright © 2025 | Marathisrushti