(User Level: User is not logged in.)

कथा

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • शिवाला पडलेले स्वप्न…

    गावाकडची गोष्ट………..।
    .. सकाळ झाली होती झाडावरील पक्षानी आपापली घरटी सोडली होती पक्षी पूर्व दिशेला आकाश मार्गाने भरारी घेऊन पोट कसे भरेल या तयारी त होते. प्रत्येक मानवाला स्वतःचे पोट कसे भरेल याची चिंता लागलेली असते त्याच प्रमाणे मुक्या पक्षाची सुद्धा अशीच गत असते. पोटासाठी मुखे पक्षी भ्रमंती करतात त्याचप्रमाणे मानव सुद्धा वीतभर पोटासाठी भ्रमंती करतो. असे हे उदाहरण सर्वांनाच लागू आहे असे म्हणायचे वावगे ठरणार नाही. माणूस म्हणून किंवा पक्षी म्हणून अशा साठी जगणे हे मला मान्य नाही माणसाने कष्ट करावे स्वतःचे पाय हलवावेत. किंवा मुक्या प्राण्यांची हलचाल करून पोट भरावे असे मला वाटते.

  • इच्छाशक्ती

    शुभा आणि शाम बड़ोदा सोडून मुंबईत स्थाईक झाले. दोघांचा राजा राणीचा संसार सुरु झाला. दोघही आपल्या आई वडिलांची एकुलत एक अपत्य होती. दोघांची घर बडोद्याच्या दोन टोकाला होती.

  • बाई आली पणात

    सुगीचे दिवस आले होते अन् समधी माणसं कशी पटापटा आपल्या कामाला लागली व्हती. शाळूकाढायला आला व्हता. कारडी गहू, हरभऱ्यानी रानं कशी फुलून तरारली व्हती. चिंचोळलीमधी जिकडं तिकडं घाई गडबड चालू व्हती. समधं शेतकरी लई कामात व्हढाचढीनं मरमर मरोस्तवर काम उरकीत व्हती. गावात शिंद्याची आळी विठ्ठल रखमाई दोन्ही हात देवळात कमरेवर ठेवून जणू चिंचोलीची राबणारी कष्टकरी बाई बाप्पे पाहत होती.

  • गणेशछाया

    संध्याकाळी गणेश त्या पत्यावर पोहोचला. त्यानं त्या टुमदार बंगल्याच्या दारावरची बेल वाजवली. सकाळच्या त्याच मुलीने दरवाजा उघडला व वडिलांना तिने ‘दादा, आलाय..’ असं सांगितलं.

  • वेदांग शिरोडकर

    वेदांग शिरोडकर अन्य कोणत्याही सुशिक्षित, सुसंपन्न, सुसंस्कारित मराठी मुंबईकराप्रमाणे एक खेळकर, आत्मविश्वासू, मनमिळावू, शहरी, सभ्य, शिष्टाचार माहीत असलेला, स्वच्छ, परिपक्वता आलेला, सामान्य ज्ञान नि वाचन असलेला, इत्यादि, इत्यादि प्राणी होता. अशा अनेक परिमाणांत आम्हा दोघांत अत्यंत शार्प काँट्रास्ट होता.

  • एक परीस स्पर्श (भाग – ५५)

    सहा महिन्यांनंतर बरेच प्रयोग, औषधे आणि व्यायामाचे प्रकार सातत्याने केल्यावर आता कोठे विजयचा पाय दुखायचा कमी झाला होता म्हणजे तो आता पायऱ्या सहज उतरू लागला होता. पायाच्या निमित्ताने विजयला सहा महिने सक्तीचा आराम करावा लागला होता तरीही या सहा महिन्यात त्याने त्याचा आर्थिक भार दुसऱ्या कोणाच्याही खांद्यावर पडू दिला नव्हता. त्याचा खर्च निघावा इतके छोटे मोठे काम तो करतच होता पण याकाळात त्याला घराला आर्थिक हातभार लावता आला नाही त्यामुळे त्याचे बाबा थोडे थोड वैतागल्यासारखे वागू लागले होते कारण आता कुटुंबाचा सर्व आर्थिक भार त्यांच्यावर येऊन पडला होता.

  • खरे सुख

    संत तुलसीदासाच्या काळातच रैदास नावाचे एक संतकवी होऊन गेले. त्यांचे खरे नाव रविदास. मात्र रैदास या नावानेच ते ओळखले जातात.

    संत तुलसीदासांनी 'तुलसीरामायण' लिहिले तर संत रैदासाने अनेक भक्तिगीते लिहिली. ते वाराणसीत गंगेच्या किनाऱ्यावर एका झोपडीत राहत असत. आपल्या झोपडीच्या बाहेर बसून ते वहाणा शिवत असत. त्याच्यातून जेवढे उत्पन्न मिळायचे त्यावरच त्यांची गुजराण व्हायची.

    त्यांची पत्नीही अतिशय समंजस होती. रैदास जेवढे काही मिळवून आणायचे त्यातच ती सुखासमाधानाने संसार चालवित असे. वहाणा शिवताशिवताच रैदास भक्तिगीते करीत असे त्यामुळे हातात काम व ओठात ईश्वराचे नाम असाच त्यांचा दिनक्रम चालत असे.

    एकदा एक साधू वहाणा दुरुस्त करण्याच्या हेतूने संत रैदासाकडे आला. त्याच्या वहाणा दुरुस्त केल्यावर त्याने त्याच्या झोळीतून एक वेगळ्या रंगाचा दगड काढला आणि तो रैदासांना म्हणाला, '' हा परीस आहे. त्याला लोखंड लावल्यास त्याचे सोने होऊ शकते. त्यामुळे हा परीस तुझ्याकडे ठेव म्हणजे तुझे जन्माचे दारिद्र्य मिटेल.''

    साधू एवढेच बोलून थांबला नाही. त्याने तेथलाच एक लोखंडाचा तुकडा घेतला. त्याला परीस लावताच त्याचे सोन्यात रूपांतर झाले. हा सोन्याचा तुकडा साधूने रैदासाला देऊ केला. मात्र रैदासाने तो सोन्याचा तुकडा नाकारला.

    रैदास साधूला म्हणाला, 'मी दिवसभर कष्ट करतो.. त्यातून पोटापाण्यापुरते जे काही मिळते, त्यात मी व माझी पत्नी मुखी व आनंदी. आहे. सोन्याचा हा तुकडा घेऊन मला माझा नेहमीचा आनंद हरवायचा नाही. कारण माझी सुखासमाधानाची व्याख्याच वेगळी आहे. तुला हा परिसाचा तुकडा कोणाला द्यायचाच असेल तर तो जे रात्रंदिवस पैशाच्या मागे लागले आहेत त्यांना दे.'

    असे म्हणून रैदास पुन्हा आपल्या वहाणा शिवण्याच्या कामात मग्न झाले व तो साधू संत रैदासापुढे नतमस्तक होऊन तेथून निघून गेला.

  • बांड मस… (बोलीभाषेतील लघु कथा)

    सोमवारी रातीच्यान जरा गडबड होती घरात. मोठ्या म्हशीला डब्बल भरडा घाल, उरल्या सुरल्या शिळ्या भाकरी मोडून घाल अशी धावपळ गंवडीमामा करत होता. शेलका चारा फक्त त्या मोठ्या म्हशीला घातला व उरलेल्या खंडोरभर 8 जनावरांसनी नुसतं पिंजरावर बसविलं.. ह्या सर्व धावपळीच्या मागच गम्य मला त्या रातीला उमगलचं नाही. त्यानंतर असच सहज फेरी मारून येवूया म्हणून दोन दिवसांनंतर शशीदाच्या घरी गेलो. जरा घरी निराशमय वातावरण होतं. काय भानगड काय समजत नव्हती.

    मग फांगसूनच जरा शशीदाच्या आईला मी विचारलं ‘काय झालं आज घर जरा शांतच दिसतयं’..

  • सोनलबेन

    दुपारच्या वेळेस जेवण उरकून थोडीशी विश्रांती घ्यावी म्हणून झोपले होते. जरा डोळा लागला होता की फोन वाजला, अगदी त्रासून फोन उचलला. समोरुन संध्याचा आवाज आला, “हॅलो, मॅडम कशा आहात? ” खरे तर ठीक आहे म्हणण्यापेक्षा ही काय फोन करायची वेळ आहे का? असे विचारवासे वाटत होते पण काय करणार असे बोलता येत नाही नां नाईलाजास्तव अगदी उसना उत्साह आणून म्हणाले, “बरी आहे, बोल कां फोन केलास ह्या वेळेस आज? ” “मॅडम, उद्या दुपारी तीन वाजता संस्थेमध्ये मिटींग ठेवली आहे,

  • आज मात्र माझी सटकली.. (मी आणि ती)

    आज मात्र माझी सटकली.. आमचे लग्न ठरत होते, सांगून आली होती.. म्हटले आधी भेटावे आमचीच जातवाली मच्या घरी जातवालीच हवी ना.. मिळाली एकदा