नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा
विद्वत्तेचा वारसा तिला लहानपणापासूनच मिळाला होता. फ्रेडरिक विज्ञानाचे प्राध्यापक तर आई मारिया चूल ज्योपर्ट शिक्षिका होती. वडिलांना विज्ञानाची फार आवड होती. त्यामुळे निसर्गातील अनेक विज्ञानवादी चमत्कार तिला लहानपणीच पहायला मिळाले. त्यामुळे तिचीही विज्ञानदृष्टी तयार झाली व पुढे ' वैज्ञानिक संशोधन' हेच तिने आपले ध्येय मानले व परमाणू संरचनेबाबत नवा शोध लावून तिने विज्ञानाला नवी दिशा दिली. याच संशोधनाबद्दल तिला १९६३ मध्ये भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार विभागून मिळाला.
तिचे नाव मारिया ज्योपर्ट मायर (Maria Goeppert Mayer)
मारिया मूळची जर्मनीतील कॅटोविसची. ( आता हा भाग पोलंडमध्ये आहे.) २८ जून १९०६ रोजी तिचा जन्म झाला. एकुलती एक असली तर तिचे लाड करण्याबरोबरच आई-वडिलांनी तिला विज्ञानवादी दृष्टी दिली. त्यामुळे अभ्यासाबरोबरच तिची संशोधनाची आवड वाढत गेली. उच्च शिक्षणासाठी तिने गोटिंजन विद्यापीठाची निवड केली व तेथे भौतिकशास्त्रात तिने संशोधन सुरू केले. संशोधनानिमित्त ती इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठातही गेली. तेथेच तिची भेट प्रख्यात संशोधक अर्नेस्ट रुदरफोर्ड यांच्याशी झाली. १९३० साली तिला गोटिंजन विद्यापीठाची डॉक्टरेट मिळाली. त्यानंतर जोसेफ ई. मायर यांच्याशी विवाह केल्यानंतर दोघे अमेरिकेत आले व जान हाफकिन्स विद्यापीठात नोकरी करत तिने अणू व परमाणूबाबत संशोधन सुरू केले. शिकागोमधील एका राष्ट्रीय प्रयोगशाळेत तिला फर्मी, युरे, क, टेलर आदी प्रसिद्ध शास्त्रज्ञांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. परमाणू संरचनेबाबत आपले मौलिक संशोधन पूर्ण झाल्यानंतर मारियाने ते 'फिजिकल रिव्हर या पत्रिकेत प्रसिद्ध केले. नेमका असाच काहीसा सिद्धांत जे.एच.डी. जेन्सन यानेही त्याच काळात प्रसिद्ध केला. त्यामुळे उभयतांना १९६३ चे नोबेल विभागून देण्यात आले. पुरस्काराचा अर्धा भाग युजीन पी. विगनर यांना देण्यात आला. मारिया नंतर कॅलिफोर्निया विद्यापीठात रसायनशास्त्राची प्राध्यापक झाली. मात्र तेथे काम करताना तिला पक्षाघात झाला व तिची वाचा गेली, तरीही तिने आपले काम चालूच ठेवले होते. २० फेबुवारी १९७२ रोजी मारियाचे हृदयविकाराने निधन झाले.
काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे षड्रिपू आहेत. त्यांच्या पासून सावध असावे असे नीती तत्त्व सांगते. पण प्रत्येक गुन्ह्यामागे ते दडलेले असतात. चांगल्या भल्या माणसांनाही ते कधी आणि कसे गाठतील सांगता येत नाही. म्हणूनच म्हटले आहे, ‘क्रोधः पापस्य कारणम्।’

बोलत बोलत तो चारूदीच्या अगदी समोर जाऊन उभा राहिला आणि दीच्या नजरेला नजर मिळवत तो म्हणाला, ” खरं तर सुंदर आणि सुगंधी गुलाबाची फुलं आवडत नाहीत अशी कुणी सुंदर मुलगी, निदान माझ्यातरी पाहण्यात नाही. So, मी मनकवडा वगैरे काही नाही….. असच…. सहजच आणली. पण तुम्हाला मनापासून आवडली ना ही फुलं? मग झालं तर….”
पोलिस ठाण्यातील ड्यूटी ऑफिसरची खुर्ची कधीही रिकामी नसते. चौकशी किंवा गुन्हे तपासाच्या निमित्ताने ड्यूटी ऑफिसरला पोलिस ठाण्यातून बाहेर जावे लागलेच तर त्याप्रमाणे ” स्टेशन डायरी ” मधे नोंद करूनच “रिलीफ ऑफिसर” म्हणजेच पर्यायी ठाणे अंमलदारकडे चार्ज देऊन तो बाहेर पडतो.
आज पाच वर्षांनी ती पुन्हा त्याला बसस्टॉपवर दिसली. गळ्यातील मंगळसूत्रावरून कळत होतं की तिचं लग्न झालंय. पाच वर्षानंतरसुद्धा ती तितकीच सुंदर दिसत होती. तिच्याशी बोलण्यासाठी तो तिच्याजवळ जातो आणि तिला विचारतो, “ओळखलंस?” त्याला पाहताच तिचे मन पुन्हा पाच वर्ष मागे जाते. काही वेळ तसंच त्याला बघितल्यानंतर ती म्हणते, “हो, न ओळखायला काय झालं” तिचे हे उत्तर ऐकून तो तिला म्हणतो, “पण त्यावेळेस मी तुला ओळखण्यात चूक केली प्रतीक्षा . मला वाटलं नव्हतं की तू मला प्रेमाची स्वप्नं दाखवून दुसऱ्याच मुलाबरोबर पळून जाऊन सुखाचा संसार थाटशील. काय कमी होती माझ्यात? का माझ्या प्रेमाचा असा अपमान केलास? मी असं काय चुकीचं वागलो होतो प्रतीक्षा, ज्याची तू मला इतकी मोठी शिक्षा दिलीस?
“आहो ताई,आमच्या समद्या झोपडपट्टीत हेच हाय, येथे आम्ही घरोघरी रोजच्या वीसतीस रुपयांसाठी भांडी घासतो,कामं करतो ते काही उगीच नाही.सर्वांचे नवरे खूप कमाई करत्यात दिवसभर, आणि रात्री पुरी दारूत घालवत्या. पुन्हा काही बी बोलायचे नाही आम्ही.बोललो तर भांडण, शिव्या आणि मारामारी. जरा जास्त काही बोलायला गेलो तर हे, आज घडले तसे चालू असते चार आठ दिवसांला”.
“नवरे कशे हे असे? हे तर बुजगावणे आहेत आपले. यांचा एकही पैसा लागत नाही कधी संसारासाठी, घरासाठी. पण आमची कमाई मात्र सलते यांच्या डोल्यात. संसार हाकायला एकाची तरी कमाई नको का?”
तिच्या मानात विचारांचे काहूर माजले होते, ती अचानक थांबली, तिला वाटले, पुन्हा जर असाच हमला झाला आणि माझा जीव गेला तर माझ्या मुलाकडे आणि नवऱ्याकडे कोण लक्ष देईल?, त्यांचा सांभाळ कोण करेल?. या विचाराने ती खूप घाबरली.
सन 1980 ची गोष्ट त्यावेळी माझी आई घरामध्ये जळण नाही म्हणून. रानातून कुर्डू च्या फुलांच्या झाडाचे जळण डोक्यावरून एक मोठा भारा रोज घेऊन येत असे. स्वयंपाकासाठी घरांमध्ये वेळ नव्हते मी रेल्वेमध्ये नुकताच रेल्वेमध्ये कामाला लागलो होतो. त्यावेळी पगार महिना दोनशे रुपये पर्यंत मिळत होता.

या जगात कोणतीही घटना विनाकारण घडत नाही. घडणाऱ्या प्रत्येक घटनेला एक अर्थ असतो. घडणाऱ्या प्रत्येक घटनेला भविष्यात घडणाऱ्या एकातरी घटनेचा संदर्भ असतोच.असे विजयला वाटते. इतकेच नव्हे तर विजयचा पाय दुखणे हे ही विनाकारण नसावे त्यामागेही नियतीची काहीतरी योजना नक्कीच असावी. विजय पाय धरून जरी घरी बसला असला तरी त्याचे डोके कधीच गप्प बसत नाही त्या डोक्यात सतत काही ना काही सुरू असतेच.
सुरेशने आईचं मन वळवलं होतं. लक्कीला भेटायला तो उत्सुक झाला होता. आईने संमती दिल्यावर त्याने लक्कीला फोन केला, वेळ ठरवली आणि आईला घेऊन तो निघाला. जुहूला त्याला पत्ता फार वेळ शोधावा तागला लाहीं. ‘रंगनाथ पै’ अशी दारावरची पाटी पाहून त्यांने घंटीचं बटन दाबलं. एक वयस्कर गृहस्थ दारापाशी आले. ” Yes? Whom do you want?” त्यानी विचारलं. “Is Ms. Lilly Sequeira staying here?” सुरेशने विचारलं. त्यावर त्या गहस्थाने आंत हांक मारली.”ऐ लक्की, हंग यो गो, कॉण आयलो पळे”
Copyright © 2025 | Marathisrushti