नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

लग्नाला ६ महिने झाले होते, आएचे घर तर साफ तुटल्यासारखेच होते, बिपीनचा अहंकारी स्वभाव, आणी आईचा लग्नाला विरोध संगीताची चांगलीच कोंडी झालेली, पण कामच्या आनंदात ती बुडून गेली होती,
स्मिता कॉम्प्युटर इंजिनीअर. चार वर्षे झाली विक्रोळीला एका छोट्याशा कंपनीत नोकरीला होती. तिला प्रोग्रॅमिंग व काही क्लाएंटचे प्रोजेक्ट्स बघावे लागत. ती घरातून बारा-साडेबाराला निघे व रात्री बारा साडेबारापर्यंत परत येई. अर्थात तिला कारने घरापर्यंत ड्रॉप असे. पण काल रात्री तिला अजिबात झोप आली नाही.
गेले चार दिवस मुंबईतील कमलाबेन हॅास्पिटल चुकीच्या कारणासाठी पेपरांत गाजत होतं. हॅास्पिटलच्या प्रसूती विभागातून तीन दिवसांच बाळ गायब झालं होतं. तिथल्या नर्स, मेट्रन, डॅाक्टर, ह्या त्याबद्दल कांहीच सांगू शकत नव्हत्या. हॅास्पिटल मोठ्या उद्योगपतीचे असल्यामुळे प्रथम त्यांनी ही बातमी दाबून टाकण्याचा प्रयत्न केला गेल्याचा आरोपही हॅास्पिटल मॅनेजमेंटवर होत होता.
“तुम्हाला भविष्यात खूप मोठं व्हायचं आहे, आणि त्यासाठी तुम्ही उराशी एक मोठं स्वप्न बाळगलं पाहिजे. आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तुम्ही स्वप्न पाहता तेव्हाच तुम्ही अर्धी लढाई जिंकलेली असते.”

चार्लस डीकन्स हा व्हीक्टोरीयन काळांतील सर्वांत सुप्रसिध्द लेखक. त्याचे लिखाण आजही वाचले जाते. आजही शालेय/महाविद्यालयीन अभ्यासक्रमात त्याच्या वाङमयाचा समावेश असतोच. त्याला स्वतःला मात्र जास्त शिक्षण घेतां आलं नव्हतं. त्याच्या अनेक कादंबऱ्या, कथा आणि एखाद-दोन नाटके प्रसिध्द झाली. त्याचे बरेच लिखाण प्रथम साप्ताहिक किंवा इतर नियतकालिकांमधून मालिका स्वरूपांत प्रसिध्द झालं. सामाजिक विषयांवर लिहिणारा लेखक म्हणून तो गाजला. अनेक कृतींचे चित्रपटांत रूपांतर झाले. पिकवीक पेपर्स, टेल आॕफ टू सिटीज, डेव्हिड कॉपरफील्ड, आॕलीव्हर ट्वीस्ट, ग्रेट एक्स्पेक्टेशन्स आणि वरील कादंबरी ख्रिसमस कॕरोल ह्या कांही त्याच्या प्रसिध्द साहित्यकृती. ख्रिसमस कॕरोल ही कादंबरी सर्वांत प्रसिध्द कृती म्हणावी लागेल. त्यांत स्क्रूजच्या माध्यमातून दिलेला संदेश फारच महत्त्वाचा आहे. कादंबरी अर्थातच मोठी आहे. परंतु ख्रिसमस आलेला असल्यामुळे ती कथेच्या स्वरूपांत मी आपल्यापुढे सादर केली आहे.
(ब्रह्मदेशातली लोककथा )
आज आपण जगभरात जेवढी लोकसंख्या पाहातो, तेवढी एके काळी नव्हती. या जगात खूप कमी लोक राहत होते. तेव्हा आजच्यासारखी शहरे नव्हती. प्रत्येक जण उंच बर्फाच्छादित डोंगरांच्या दरीत राहत असत. डोंगरात रहाणाऱ्या या लोकांना ‘चीन्स’ म्हणत.
माधव ! गाडी वेगात धावतेय. डोंगर, शेतं, झाडं सगळे मागं पळत आहेत. त्यांच्याबरोबर माझं मन ही मागंच पळतंय. शरीर गाडीबरोबर पुढं, मन मात्र मागं, कोल्हापूरच्या त्या माझ्या वाड्यात. त्या शाळेत, त्या देवळात, त्या तलावावर. खरंच, माधव, मन अजून तिथंच रेंगाळतंय रे. वयाची बावीस वर्षं तिथंच काढली ना मी. लग्नानंतर तुझ्याबरोबर तिथून आले. नंतरही अधूनमधून मी जायचे ना तिथं. तूही असायचाच बरोबर कधी कधी. नागपूरला आपला संसार थाटला होता. नागपूर-कोल्हापूर अंतरच किती मोठं रे ! इतक्या लांब सारखं सारखं नाही जमायचं. आपल्या पहिल्या बाळाच्या, हर्षदच्या वेळी मी माहेरी म्हणून आले होते. तेव्हा सलग तीन महिने राहिले, तोच माहेरचा मोठा मुक्काम अन् शेवटचाही.
दोन भाऊ सख्खेच. पण दोघांच्या दोन तन्हा होत्या व्यवसायाच्या मोठा “होना” पाण्यात गळ टाकून मासे पकडून विकत असे, तर धाकटा “होकी” हा डोंगरदऱ्यात हिंडून धावून शिकार करणारा. पक्षी मारणारा फासेपारधी म्हणून लोक त्याला ओळखीत असत.
टळटळीत दुपारी तेनालीरामने एका व्यक्तीला त्याच्या डोक्यावर सूर्यापासून आडोसा करताना पाहून उत्सुकतेने विचारले, “मित्रा तू हे काय करतो आहेस?”
एस. टी. केळव्याच्या समुद्रकिनाऱ्याजवळ पोहचताच आम्ही आमच्या सामानासह खाली उतरून उंच उंच माडाच्या सावळीतून चालू लागलो. भर उन्हातही अंगाला गार गार स्पर्श करणारी हवा तिथे सुटली होती. त्या गार गार हवेचा आनंद घेत उल्हसित होत चालता – चालता आम्ही ज्या तरुणींचा पाठलाग करण्याचे ठरविले होते त्यांच्यापासून कधी दुरावलो ते कळलेच नाही.
Copyright © 2025 | Marathisrushti