नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा
मी एका बांधकाम कंपनीच्या भल्यामोठ्या कार्यक्षेत्रात नोकरी करणारा एक सामान्य इंजिनियर होतो , आमच्या कंपनीला या गावाच्या जवळून जाणाऱ्या महामार्गाचे काम मिळाले आणि , या कामाची बातमी स्टाफ मध्ये पसरली …मी पण साहेबांच्या मागे लागून .नव्हे अगदी हट्ट करून प्रोजेक्ट करणाऱ्या टीम मध्ये मी माझा समावेश करून घेतला महिन्यापूर्वी या साईटवर आलो.
शेकडो वर्षांमागची गोष्ट. इराण देशातील एका पहाडाजवळ एका विस्तीर्ण तलावाच्या काठी एक लहान झोपडी होती. त्या झोपडीत एक गरीब धनगर, त्याची बायको, व इमाम नावाचा त्यांचा आठ-दहा वर्षांचा एक लहान मुलगा, ही रहात असत. या तिघांनाही पोटाकरता संबंध दिवस राबावे लागे. धनगर व त्याची बायको पहाडावर जाऊन सरपण गोळा करीत व त्याच्या मोळ्या बांधून त्या जवळच्या शहरात नेऊन विकीत.
पूर्वीच्या काळी गावागावात, चोपेवर, देवळाच्या पारावर, किंवा एखाद्या मोठ्या वृक्षाच्या सावलीत चौथऱ्यावर त्याचप्रमाणे शहरातील मुख्य चौकात, एखाद्या पानठेल्यावर किंवा नाक्यावर लोक समूहाने एकत्र यायचे. उशिरापर्यंत त्यांचे रात्री गप्पांचे फड बसायचे. त्याच पद्धतीने हल्ली इंटरनेटच्या माध्यमातून, व्हाट्सअप किंवा फेसबुक यांच्या ओट्यावर बसून म्हणू या हवं तर आपण. तर समूहानेच एकत्र येऊन गप्पांचे फड रात्री उशिरापर्यंत भरलेले दिसून येतात.

ते आवाज आता वजनदार आणि जास्त जोरात येवू लागले…. पालापाचोळ्यावरील त्या आवाजांचा वेग तिला जाणवू लागला…. सगळं बळ एकवटून, मनाचा हिय्या करून ती येणार्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी, येणार्या आवाजांचा कानोसा घेत सावधपणे त्या दिशेने पाहू लागली आणि …..
(महाभारताच्या ‘वनपर्वा’तील कथा )
वनामध्ये युधिष्ठिराची चारही भावंडे मृत झाली होती. तो प्रसंग असा की, महाभारतात वनपर्वाच्या अखेरीस यक्षप्रश्नांचा प्रसंग वर्णिला आहे.
रितीरिवाज , परंपरांच्या बेडया , पिढयानपिढया चालत आलेले संस्कार .. सगळ्या सगळ्याची बंधन तोडून आपल्या लेखनाच्या माध्यमातून खुल्या आसमंतात श्वास घेण्याची .. मुक्त विहरण्याची जबरदस्त किंमत चुकवणारी … आपल्या मायभूमीला पारखं होऊन दुसऱ्या देशात आश्रयाला जाऊन रहाणं तिच्या प्राक्तनात लिहीलंय …. जिथं ती जन्मली ,वाढली ,लहानपणीचे निरागस सुंदर क्षण जगली त्या गावात , त्या नदीकिनारी , त्या शेतांमधे , त्या माणसांमधे ती परत जाऊ शकणार नाही इतकी व्यवस्था करून ठेवलये तिच्या आपल्या देशातल्या माणसांनी …. मातृभूमीपासून दुरावली ती .. तिच्या लेखनातून व्यक्त होण्याच्या बंडखोरीला ही शिक्षा ? तिच्या सच्च्या , वर्मावर बोट ठेवणाऱ्या शब्दांनी घायाळ झालेले तिला फासावर लटकवायला टपलेत … तसं बघायला गेलं तर तिचं माझं सगळच भिन्न , काही म्हणजे काही जुळणारं नाही अगदी काही बाबतीत विचारही … पण शब्दांतून व्यक्त होण्याची तिची पद्धत … तिचं आपल्या विचारांवर ठाम रहाणं .. लिहीतांना एक एक शब्द फक्त तिचाच .. तिच्या मालकीचा .. तिचा दास … जस वाटेल अगदी तसंच व्यक्त होणं …. पारदर्शी ! हेच कुठेतरी मला फार भावतं … मनानं तिच्या जवळ नेऊन पोहोचवतं … कुठ्ला खोटेपणा नाही की लपवाछपव नाही … दांभिकता नाही … मनात येणाऱ्या नैसर्गिक भावभावनांना जाणून त्या लिहून व्यक्त करणे म्हणजे त्यांना योग्य न्याय मिळणे … अभिव्यक्त स्वातंत्र्य तिने स्वःताचं स्वःताच पुरेपुर मिळवलंय …. मी आहे ही अशी आहे … माझे विचार असे आहेत माणि मी ते मांडत रहाणार … तुम्हाला आवडो वा ना आवडो …
तिच्या लेखनाचा झंझावात माझ्या विचारांची बैठक कधी कधी मुळापासुन हादरवून टाकतो … गदागदा हलवतो …. सोशिकतेच्या
सीमांविषयी पुन्हा पुन्हा विचार करायला भाग पाडतो .. माझ्या पासून शेकडो मैल लांब कुठेतरी असलेली ती पार कब्जा घेते माझ्या मनाचा … झिम्मा घालत रहाते माझ्या मनाच्या अंगणात … मला थोडीशी चिडवत … मी मात्र तटस्थ रहाण्याचा प्रयत्न करत रहाते ..
सुविख्यात वकील श्री. नारायण – (ऊर्फ नानू) प्रभु याला अशी सलगी मुळीच आवडली नाहीं. तो कामात गर्क होता. इतर वकीलांबरोबर कोर्टाच्या प्रतीक्षालयात (Common Room मध्ये) बसून आजच्या कामाचा आढावा घेत होता. त्याची पाठ दाराकडे होती म्हणून कोण हांक मारत होतं ते आधी समजलं नाहीं. त्याने पाठ वळवली आणि त्याला ओळख पटली. इतर वकीलही माना वळवून पाहूं लागले. ।।
विजय ! म्हणजे तुझा लग्नसंस्थेवर विश्वासच नाही ? यामिनीने विचारलेल्या या प्रश्नात जोर होता. त्यावर विजय म्हणाला, ‘ लग्न संस्थेवर माझा विश्वास नाही असं मी म्हणालो तर तू म्हणशील अरे लग्नसंस्था नसती तर तुझा जन्मच झाला नसता हा आता तू जो विचार करतोयस तो वेचार करायला ! पण मी स्पष्टच सांगतो ! कुत्री मांजरे कुठे लग्न करतात तरी त्यांचा वंश वाढतो ना ? आमचा वंश वाढवा म्हणून आम्ही लग्न करतो ! अरे पण वाढलेला वंश पाहायला असतो कोण ? तसही म्हणतात की प्रत्येकाचा वंश दहा पिढ्या झाल्या की संपतो. तुला सांगतो कालच मला माझ्यापेक्षा आठ दहा वर्षांनी लहान असणारा मित्र भेटला होता समाजाच्या नजरेत अंत्यत साधा भोळा भोळसट पण त्याने जे जे उकिरडे फुकले आहेत त्याबद्दल ऐकून मला पेलाभर पाण्यात डुबून मरावस वाटत होत. प्रत्येक आईवडिलांच्या नजरेत आपली मुलं धुतल्या तांदळाची असतात पण ती तशी असतातच असं नाही, आजचे आई- वडील आपल्या मुलांची लग्ने ठरवत नसतात तर फक्त नगाला नग जुळवू पहात असतात. त्यातही अज्ञानामुळे चुकीचे नग जुळवितात.
आपल्या हातावर अनेक प्रकारच्या रेषा असतात. ज्योतिषशास्त्राच्या मते त्यातील काही रेषा विद्येच्या, धनाच्या तसेच आयुष्याच्या कालमर्यादेच्या असतात. अर्थात अनेकांच्या मते हे थोतांड आहे. त्यामुळे बऱ्याचजणांचा हातावरील या रेषेवर विश्वास नसतो. मात्र या संदर्भात प्रसिद्ध व्याकरणकार पाणिनी यांची मजेदार कथा सांगितली. पाणिनी तरुण असताना एका आचार्याकडे शिक्षण घेत होता. पाणिनीसारखेच आचार्यांचे असंख्य शिष्य त्यांच्या आश्रमात त्यांच्याकडून शिक्षण घेत होते. एकदा आचार्यानी सर्व शिष्यांना एक गृहपाठ दिला व दुसर्या दिवशी त्याची संपूर्ण तयारी करून द्यायला सांगितले. अनेक शिष्यांनी गृहपाठ तयार केला होता, मात्र काही शिष्यांची या ना त्या कारणामुळे गृहपाठाची तयारी झाली नव्हती. त्यामध्ये पाणिनीही होता. दुसऱ्या दिवशी सर्व शिष्य एकत्र आल्यावर आचार्यानी त्यांना गृहपाठाविषयी विचारायला सुरुवात केली. ज्यांचा गृहपाठ तयार नव्हता अशा शिष्यांना त्यांनी छडी मारायला सुरुवात केली. छडी खाल्लेले शिष्य आपापल्या जागी जाऊन बसले. पाणिनीची वेळ आली तेव्हा त्यानेही आपला हात पुढे केला. त्याचा हात पाहताच आचार्य म्हणाले, ' अरे, तुझ्या हातावर तर विद्येची रेषाच नाही. मग तू कसला गृहपाठ करणार. जा तुझ्या जागेवर जाऊन बैस. ' असे म्हणून आचार्यांनी पाणिनीला छडीही मारली नाही. आचार्यांचे ते म्हणणे ऐकून इतर सर्वशिष्यांना हसू आले. पाणिनीला त्याचा भयंकर अपमान वाटला. त्याने तेथेच प्रतिज्ञा केली, की मी एवढा अभ्यास करेन, की माझ्या हातावर विद्येची रेषा काढीनच. त्यानंतर त्याने संस्कृत भाषेचा परिश्रमपूर्वक अभ्यास करून 'व्याकरणकार पाणिनी' म्हणून नावलौकिक मिळविला.
साल आपल्याच खोबडीत दोष आहे भलतेच उदात्त वगैरे विचार करतो…. जग हे अनेक पायांवर चालते … आपल्यासारखे दोन पायावर नाही….
Copyright © 2025 | Marathisrushti