नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा
नाताळची सुटी लागली. सुटीत काय करायचे असा प्रश्न सागर, सीमा, परेश या मुलांपुढे पडला. सीमा म्हणाली, अभ्यासापेक्षा वेगळं काहीतरी करूया? परेश म्हणाला, संक्रांत येतेच आहे. आपणपतंग उडवू या. सागरने आकाशाकडे पाहिलं तर खरंच, काही मुलांनी पतंग उडवायला सुरुवातही केली होती. प्रत्येकाने पॉकेट मनीतले पैसे एकत्रित केले.

प्रत्येक पोराला ‘पराठे’ आणि मुलींना ‘कराटे’ आले पाहिजेत. हि आजची गरज होऊ पहात आहे. बेफिकीर मायबाप, मोकाट पोर, नवतारूण्याचा माज(जोश असायला हवा!) हे कोण अन कस आवरायचं? प्रश्न आपलेच आहेत. आज दारात असतील. उद्या घरात येतील! उत्तर शोधायला हवीत.
गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये चिऊताईच्या घरट्यासमोर कोरोना नावाचा परदेशी कावळा येऊन उभा राहिला. आपल्या बाळांच्या जीवाला आता धोका आहे, हे समजून चिऊताई घाबरुन गेली. कावळा बाहेरुन चिऊताईला सारखा ‘दार उघड, दार उघड’ म्हणून सतावत राहिला. त्याचा असा समज झाला की, मागील गोप्टीप्रमाणे चिऊताई बाळांना आंघोळ घालेल, पावडर, काजळ लावेल आणि नंतर दार उघडेल…पण तसं घडलं नाही…

दोन्ही गाड्या थांबलेल्या पाहून निशा आणि रोहन बाकावरून उठून तिकडे जावू लागले. ऍम्ब्युलन्स मधून दोन माणसं उतरली. त्यांनी ऍम्ब्युलन्सचे मागचे दार उघडून त्यातून एक स्ट्रेचर बाहेर ओढून काढला आणि ते रस्त्याच्या कडेला झाडीत शोधू लागले. तोपर्यंत एक डॉक्टरही खाली उतरले. त्या दोन लोकांच्या मागोमाग तेहि झाडीत खाली उतरू लागले.
सकाळपासून तो मुख्य रस्त्याच्या कडेच्या भुसभुशीत जमिनीमध्ये खड्डे खणण्याच्या उद्योगाला लागला होता. कुदळ मारून मारून आता तो अगदी थकला होता. थोडा वेळ विश्रांतीसाठी म्हणून तो बाजूला बसला. तेव्हाच राज्याचे एक मंत्रीमहोदय तेथून जात होते.

हातात धरलेला पेपर सुटून खाली पडला. हाताला कुणीतरी जबरदस्त चावा घेतला होता. इतक्या स्वच्छ, नवीन विमानतळावर काय चावणार ? उजेडात काही दिसलं नाही. पण आजूबाजूचे प्रवासी चुळबुळ करताना दिसत होते. त्यता प्रखर प्रकाशात इतस्तत: फिरणार इवले इवले डास दिसत नव्हते. पण चावत होते.
नेहमीच्या सवयीनं डोअरबेल वाजवण्यासाठी , नंदिनीनं हात वर केला , पण बेल न वाजवता ती तशीच उभी राहिली . बेल वाजवावी की पुन्हा लिफ्टनं खाली जावं ? तिनं गोंधळलेल्या मनालाच प्रश्न विचारला .
आणि तसंही आता खाली जाऊन काय उपयोग ? तो रिक्षावाला एव्हाना गेटमधून दूर गेलासुद्धा असेल. आपण उगीच बोललो त्याला. तो काय म्हणत होता हे ऐकून घ्यायची आपल्या मनाची तयारीसुद्धा नव्हती. अक्षरशः हाकलून दिल्यासारखं केलं आपण . असला कसला आपला संताप ? समोरच्याचं ऐकून न घेण्याइतका संताप ? छे ! चुकलंच आपलं . नंदिनी अस्वस्थ झाली .
एक होती “ही” आणि एक होती “ती”. दोघी समवयस्क आणि अनेक वर्ष शेजारी-शेजारी. म्हणजे तशी “ही” राहायची पहिल्या मजल्यावर आणि “ती” दुसऱ्या. पण शेजारधर्म मात्र कायमच होता.
बायडाला आणि बाबुला एकत्र पहिल्या नंतर त्या रात्री जेव्हा दादा घरी आले तेव्हा त्यांनी आल्या आल्या बाबू ची चौकशी सुरु केली ,
त्यांना तो त्याच्या नेहमीच्या ठिकाणी झोपायला गेला हे समजल्यावर ते तसेच उठून त्याच्या कडे गेले .
बाबू ला झोप लागतच होती कि त्यांना शेजारी कोणीतरी येऊन बसलय अशी चाहूल लागली आणि सोबत दारू चा वास देखील आला.
“ झोपलास व्हय र “ दादांनी त्याच पांघरून उघडून विचारल .

विजयला आता त्याच्या आयुष्यात त्याच्या मर्जीने त्याच्या मर्जीचे असे काहीतरी करायचे होते कारण आता पर्यत विजय त्याच्या आयुष्यात जे काही करत आला ते इतरांसाठी. पण त्या इतरांनी त्याच्यासाठी कधीच काही केले नव्हते आणि भविष्यात करतील अशी त्याला आशाही नव्हती. विजयच्या मनात त्या मालकाविषयी काही राग वगैरे नव्हता कारण तो आयुष्यभर व्यवहारानेच वागत आला पण विजयला व्यवहार जमला नाही. ना त्याच्या कारखान्यात, ना कुटुंबात आणि ना त्याच्या आयुष्यात.
Copyright © 2025 | Marathisrushti