(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • विमर्श

    Vimarsh-front-300
    मराठी साहित्यविषयक विविध मान्यवरांचे अभ्यासपूर्ण लेखांचा संग्रह.

    त्यात महात्मा फुले यांची मराठी वाङमयाला देणगी, प्रा. वा. म. जोशी यांच्या तात्विक लेखनातून प्रकटणारी जीवनदृष्टी, साने गुरुजींचे निबंधखन, कला म्हणजे काय? वाङमयीन वादळ, गो.वि. करंदीकरांचे अॅिस्टॉटलच्या काव्यशास्त्रविषयक, सुखांतिका, अभिजात साहित्य आणि लोकप्रिय साहित्य, अनुभवामृताचे साक्षेपी विवेचन, र. धों. कर्वे प्रकल्पाची फलश्रुती, ज्योत्स्ना देवधर: एक सफल लेखनप्रवास, नाट्यदर्पणकार रामचंद्र - गुणचंद्र आणि त्यांची रसविषयक भूमिका, स्त्रियांच्या साहित्यातील देशीयतेचा आविष्कार, स्त्री-पुरुष संबंधाच्या चित्रनाच्या समस्या, मराठी नाटकातील स्त्रियांची रुपे, कवितेचा अन्वयार्थ, इत्याची लेखांचा अभ्यासपूर्ण आढावा या पुस्तकात एस.एन.डी.टी विद्यापीठातील मराठी भाषा विभागाचे प्रमुख डॉ. विलास खोले यांनी घेतलेला आहे.

    विमर्श
    लेखक
    : विलास खोले
    प्रकाशक : अनघा प्रकाशन, ठाणे पूर्व
    मूल्य :

  • नांदी स्वर सोहळ्याची

    स्व र-मंच'तर्फे पहिला जाहीर कार्यक्रम संगीतबद्ध करण्याची विनंती मी प्रभाकर पंडितांना केली आणि त्यांनी आनंदाने ती मान्य केली. संपूर्ण तीन तासांचा कार्यक्रम मला सादर करायचा होता, पण प्रभाकरजींनी मला सल्ला दिला की, पहिला कार्यक्रम मी काही मान्यवर कलाकारांबरोबर सादर करावा, त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढेल. त्यांचा सल्ला मला पटला. मराठी अभंगांच्या या कार्यक्रमात रंजना पेठे-जोगळेकर आणि मी मध्यंतरापर्यंत आणि मध्यंतरानंतर मान्यवर गायक प्रभाकर कारेकर गातील असे ठरले. कार्यक्रमाच्या निवेदनासाठी मी शंकर वैद्यांना गळ घातली. २ जून १९८६ ही गडकरी रंगायतनची तारीख मला मिळाली आणि कार्यक्रमाच्या रिहल्सल दादरला सुरू झाल्या. हा माझा पहिला जाहीर कार्यक्रम असल्याने मी उत्साहात होतो. पण ते तसे व्हायचे नव्हते. मी आजारी पडलो आणि मला कावीळ झाली. डॉक्टरांनी किमान दीड महिने विश्रांतीचा सल्ला दिला. आता रंगायतनची तारीख बदलून घ्यावी लागणार होती आणि हे काम बिलकूल सोपे नव्हते. माझी स्वर-मंच ही नवीन कंपनी असून मोठ्या कष्टाने मला तारीख मिळाली होती. त्यावेळचे रंगायतनचे व्यवस्थापक श्री. अभय पटवर्धन यांची भेट घेतली. त्यांना माझ्या धडपडीचे कौतुक वाटले असेल कदाचित, पण त्यांनी तारीख बदलून दिली. माझी नवीन तारीख होती १३ ऑगस्ट १९८६. कार्यक्रमातील सर्व कलाकारांच्या तारखा बदलून घ्याव्या लागल्या.

    एकंदरीत पहिल्या कार्यक्रमातच मी अनेक गोष्टी शिकलो. आता कार्यक्रमाच्या खर्चासाठी पैसे उभे करायचे होते. माझ्या पगाराचे काही पैसे माझ्याकडे होते. पण तिकीटविक्री हाच एक उत्पन्नाचा मार्ग आमच्या जवळ होता. माझ्या अनेक मित्रांनी मदत केली. अगदी घरोघरी जाऊन आम्ही तिकिटे विकली. रंगायतनचा प्लॅन ११०० तिकीटांचा होता. त्यातील सुमारे ६०० तिकीटे आम्ही विकली. माझ्या इतकाच उत्साह माझ्या आई-वडिलांचा होता. त्यांनी भक्कम पाठिंबा दिला होता, म्हणूनच मी हे अवघड काम करू शकत होतो. कार्यक्रमाच्या रिहल्सल पुन्हा सुरू केल्या. आयुष्यात पहिल्यांदा वर्तमानपत्रात जाहिरात दिली. त्याआधी जवळ जवळ एक महिना वर्तमानपत्रातील कार्यक्रमांच्या जाहिरातींचा अभ्यास करीत होतो. त्यांचे दर काढले होते. त्या सर्व अभ्यासाचा उपयोग जाहिरात देताना झाला. तेव्हा समजले की गाण्याचा कार्यक्रम सादर करण्यासाठी गाण्याबरोबरच आणखी चाळीस गोष्टी याव्या लागतात. मदत करणारे हात अनेक असतात, पण निर्णय स्वतःला घ्यावे लागतात आणि त्याचे चांगले-वाईट परिणाम स्वतः भोगायचे असतात.

    कार्यक्रमाचा दिवस उजाडला. त्या दिवशी मला कार्यक्रमात गायचे असल्याने कमीत कमी बोलण्याचा सल्ला श्रीकांत ठाकरेसाहेबांनी दिला होता. त्यामुळे तोंडाने कमी बोलत मला सगळी कामे उरकावी लागत होती. पावसाळ्याचे दिवस असल्याने थोडा पाऊस होता. पण उपस्थिती चांगली होती. मंदिरात जाऊन मी श्रीदत्तगुरूंचे आणि श्रीगणरायाचे दर्शन घेतले. त्यांच्या आणि गुरुवर्यांच्या आशीर्वादानेच 'देवाचिये द्वारी' हा तीन तासांचा मराठी अभंगाचा कार्यक्रम ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये वेळेवर सुरू झाला. स्वर-मंच या माझ्या कंपनीतर्फे माझा हा पहिलावहिला जाहीर कार्यक्रम! थोडेसे दडपण माझ्यावर होतेच, पण त्यापेक्षा कितीतरी जास्त उत्साह होता. माझे गुरु पं. विनायकराव काळे मला आशीर्वाद देण्यासाठी आले होते. सुप्रसिद्ध साहित्यिक वि. आ. बुवा हेही उपस्थित होते. शंकर वैद्यांनी कार्यक्रमाचे निवेदन अत्यंत परिणामकारक केले. रंजना पेठे ही तेव्हा खूपच लोकप्रिय गायिका होती. “तू नवीन असलास तरी घाबरू नकोस. आत्मविश्वासाने गा. मी तुझ्याबरोबर आहेच." या शब्दांनी रंजनाने माझा उत्साह वाढवला. मग मध्यंतरापर्यंत आम्ही दोघांनी दहा अभंग सादर केले. मध्यंतर झाला आणि मला हायसे वाटले. कारण या पुढील कार्यक्रम प्रभाकर कारेकर सादर करणार होते. त्यामुळे आता मला गायचे नव्हते. त्यामुळे इतर कामांना मी सुरवात केली.

    मध्यंतरानंतर प्रभाकर कारेकरांनी आपल्या कसलेल्या आवाजात अनेक अभंग सादर केले आणि माझा पहिला जाहीर कार्यक्रम संपला. सर्व कलाकारांचे मी आभार मानले. इतर कामे संपवली आणि रात्री दोनच्या सुमारास घरी पोहोचलो. अतिशय दमल्यामुळे काही मिनिटातच मला झोप लागली. हाती घेतलेले एक अवघड काम केल्याचा आनंद देणारी ती एक कृतार्थ झोप होती.

    या कार्यक्रमाला अनेक पत्रकारांना मी निमंत्रित केले होते. त्यामुळे काही दिवसातच अनेक वर्तमानपत्रांतून या कार्यक्रमाबद्दल लेख आले. बहुतेकांनी पहिल्या कार्यक्रमाबद्दल माझे कौतुक केले होते आणि काही सूचनाही केल्या होत्या. एका वर्तमानपत्राने गाणे गाताना माझा फोटो छापला होता. वर्तमानपत्रात आलेला माझा पहिला फोटो. या छोट्या गोष्टींनी मला भरपूर आनंद दिला. मी इतका खूष झालो होतो की केवळ या फोटोबद्दल मी मित्रांना पार्टी दिली.

    - अनिरुद्ध जोशी

  • आमचा नाना आप्पा

    नाना आप्पा म्हणजे एक विलक्षण माणूस. क्षणात इथे तर दुसऱ्या क्षणात दुसरीकडे, एखाद्या पाखरासारखा त्याचा संचार असतो. नारद मुनी जसे स्वर्ग, मृत्यू व पाताळ असे सतत भ्रमण करतात. तसाच हा. जसे नारदाकडे कोणतेही वाहन नाही. तसेच नाना आप्पा कडे ही अद्याप कोणतेही वाहन नाही.

  • जग हे अनेक पायांवर चालते (कथा)

    साल आपल्याच खोबडीत दोष आहे भलतेच उदात्त वगैरे विचार करतो…. जग हे अनेक पायांवर चालते … आपल्यासारखे दोन पायावर नाही….

  • शून्यत्व ……

    अनुभव आणि अनुभूती हे शब्द आपण नेहमी ऐकतो अर्थात अनुभूती म्हटले की त्याला अध्यात्मिक टच वगैरे आहे असे मी स्वतः कधीच समजत नाही अर्थात प्रत्येक अनुभव हा अनुभूती देतोच असे नाही कारण अनुभवाची अनुभूती होणे हहे व्यक्तीसापेक्ष आहे. आपण सतत अनेक गोष्टी बघत असतो त्याचा परिणाम आपल्यावर होतोच असा नाही.

  • पुरस्कार आणि सत्कार

    कोणत्याही कामाचं केलेलं कौतुक म्हणजे तो एक पुरस्कारच असतो. त्या कौतुकानं त्या व्यक्तीला उमेद मिळते. पाठीवर मिळणारी शाबासकी, हे देखील एक प्रकारचं कौतुकच असतं.

  • चंद्रावरील मुलगी

    कोणे एके काळी निकोबारमध्ये एकाकी जागी असलेल्या घरात एक विधवा स्त्री चार मुलींसह राहत होती. त्या चौघींमध्ये तीन मुली मोठ्या वय झालेल्या तर शेवटची मुलगी छोटी होती. त्या छोटीचे नाव होते टो-मी-रॉक (म्हणजे सौंदर्य ) तर इतर मुलींची नांवे अशी होती. टो-केन (मेहनती), टो-पेट-नागेन (स्वतःपूरते पाहणारी) आणि वा-मी-रो (गोष्ट सांगणारी)

  • कृतज्ञता

    शब्दांना जेव्हा अर्थाचं सक्रिय पाठबळ लाभतं, त्यावेळी ते शब्दही ख अर्थानं जिवंत होतात. एखादाच नव्हे, तर व्यापक जनसमुदायाच्या जीवनात क्रांती निर्माण करण्याची ताकदही त्यांच्यात निर्माण होते. `कृतज्ञता’ हा असाच एक शब्द. प्राणिमात्रांच्या भावनेशी संबंधित. जेव्हा ही भावना प्रत्यक्षात येते, त्यावेळी या शब्दाला अर्थ प्राप्त होतो. अन्यथा, कृतज्ञतेला कृतिशीलतेची जोड नसेल, तर शब्दाचा अर्थच नव्हे, तर शब्दही बदलून जातो. कृतघ्नता हा शब्द डोळ्यांपुढे येऊ लागतो. हे सगळं आज आठवण्याचं कारणही तसंच आहे. कृतज्ञता या शब्दाला सक्रिय अर्थ देण्याचा हा एक प्रयत्न आहे. सन 1971चा डिसेंबरचा तो काळ होता.

  • शब्दकोडे

    वर्तमानपत्र ,शब्दकोडे आणि वाचक यांचे काही वर्षापुर्वी त्रिकूटच तयार झालेलं होत असं म्ह्टल तर ते वावग ठरणार नाही. पुर्वी काही वर्तमानपत्रे फक्त शब्दकोड्यांमुळेच ओळखली जात होती अस म्ह्णा अथवा काही वर्तमानपत्रे फक्त शब्दकोड्यांसाठीच विकत घेतली जात होती असे ही म्ह्णता येईल . 

  • निद्रा नाश करुनि होते ते काय (सुमंत उवाच – ६९)

    सुमंत जयंत परचुरे. 

    झोपच येत नाहीये, झोपच येत नाही अजिबात रात्री. काय करावं कळत नाही, अख्खी रात्र विचारांमध्ये जाते. सुचतंच नाही काही, नुसता डोक्याचा भुगा झालाय. काहीतरी गडबड आहे डोक्यात त्याशिवाय हे असं होणार नाही.