(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • माझे शिक्षक – भाग १ (आठवणींची मिसळ १५ )

    शिक्षक म्हणजे गुरू.दत्तात्रेयांनी २४ गुरू केले असे म्हणतात.अनेक सुप्रसिध्द गायकांनी दोन-तीन गुरू केल्याचे सांगितले आहे.जो जो आपल्याला कांही शिकवतो, तो आपला गुरू, अशी व्याख्या केली तर आई-वडिलांपासून सुरूवात करून ह्या वयातही आपल्यात सुधारणा व्हावी म्हणून सतत प्रयत्नशील असणाऱ्या आपल्या पत्नीपर्यंत असंख्य गुरू आपल्याला आठवतील.अगदी लोकलच्या प्रवासांत चपळाईने चौथी सीट कशी मिळवावी हे शिकवणाऱ्या गुरूचीही आठवण होईल.पण शाळा कॉलेजमधे जे आपल्याला शिकवतात, तेंच आपले अधिकृत गुरू, म्हणजेच शिक्षक.अगदी बिग्रीपासून ते युनिव्हर्सिटीपर्यंत खूप शिक्षक आपल्याला भेटतात.कांही कायम लक्षात रहातात.कांहीना विसरावसं वाटत पण विसरतां येत नाही.आपल्याला घडवण्यात आपल्या शिक्षकांचा खूप मोठा वाटा असतो.

      August 20, 2022


  • सावली

    मुलांनी आपल्या समजतील अशीच चित्रं काढली पाहिजे असं नाही तर मुलांनी काढलेली चित्र आपण त्यांच्याकडूनं समजून घेतली पाहिजेत, असा एकनवीन शोध मला तेव्हा लागला. “मुलांच्या चित्रातलं मर्म ओळखण्यासाठी चित्रकाराची नव्हे तर तुमच्या ह्रदयातल्या प्रेमाची गरज आहे” ही चिनी म्हण तुम्ही ऐकलीच असेल.

      September 24, 2010


  • एक परीस स्पर्श (भाग – २२)

    जयेशच्या वडिलांची म्हणजे जयराम शेठची कथा जी आपण नंतर सांगणार होतो…ती सांगतो….

      February 28, 2022


  • सांगायलाच ह्वंय, असं नाही…

    bhagwan nikleसांगायलाच ह्वंय, असं नाही... हा भगवान निळे यांचा सृजन प्रकाशनचा नुकताच प्रकाशित झालेला कवितासंग्रह वाचला.

    मी म्ह्णजे, तुम्हीही! या पहिल्याच कवितेत कवी सर्वसामान्य लोकांच प्रतिनिधित्व करताना दिसतो. तेव्हाही आजच्यासारखे... ही कविता अजूनही आपल्या समाजव्यवस्थेत फार आशादायी असे बदल झालेले नाहीत हे पटवून देते . अशी कित्येक वर्षे लोटतील या कवितेतून कवीने आपण आजही कसं भीतीच्या सावटाखाली जीवन जगत आहोत हे नवरा- बायको संबंधाच्या माध्यमातून उत्तमरित्या पटवून दिले आहे.

    सर्पमिठी ही कविता स्त्री-पुरूष समानतेवर भाष्य करते. आरस्पानी बाई या कवितेत नवर्‍याच्या कुशीतील आपल्या पत्नीकडेही नवरा आजही फक्त एक बाई म्ह्णूनच पाह्त असतो हे सत्य उत्तमरित्या मांडताना दिसते. कोण हा पुरुष सारख्या काही कविता पुरुषातील पुरूष नाही तर माणूस शोधण्यास प्रवृत्त करताना दिसतात. सत्यामागे दडलेले सत्य सारख्या कविता अश्लीलता ही पाह्णार्‍याच्या डोळयात दडलेली असते हे सत्य उगडपणे पटवून देते. पुरूषांच्या सावलीमागे लपलेल्या बायका ही कविता आजही स्‍त्री पुरूषाचाच आधार शोधत असते हे सत्य मांडताना दिसते.

    दोन चेहरे मुंबई नगरीचे या कवितेत एकाच नाण्याच्या दोन बाजू पण त्या दोन बाजूत असणारा पराकोटीचा विरोधाभास कवीने अप्रतीम मांडला आहे. असं का होतं? या कवितेत आजचा माणूस कसा सुखाला पोरका झालेला आहे हे सांगण्याचा कविचा प्रयत्न यशस्वी झालेला दिसतो. पाच तुकडे प्रार्थनेचे या कवितेत कवी आजही समाज मनात रुतून बसलेल्या अंधश्रध्देवर भाष्य करताना दिसतो. माझाही बाप आणि आई गेल्यानंतर या कविता आई बापावर त्यांच्यातील नाते- संबंधावर फार दाह्कपणे पण वास्तववादी भाष्य करताना दिसतात. मुलगी मोठी होते तेव्हा... या कवीतेत कवी बाप-मुलीच्या नातेसंबंधाची एक झाकलेले बाजू मांडण्याचा प्रयत्न करताना दिसतो. या कवितासंग्रहातील मी मरेन तेंव्हा ... या शेवटच्या कवितेत कवी जगातील नश्वरता मांडताना दिसतो...

    भगवान निळे यांच्या सांगायलाच ह्वंय असं नाही... या कवितासंग्रहातील प्रत्येक कविता एक सुविचार आहे असं म्हटलं तर ते वावगे ठरणार नाही. प्रत्येकाने वाचावा असा हा कवितासंग्रह आहे मी वाचला आता तुम्हीही वाचा वाचल्यावर तुंम्ही नक्कीच म्ह्णाल की सांगायलाच ह्वंय, असं नाही...

    -- निलेश बामणे

      January 6, 2016


  • नेत्रदान (अलक)

    आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमध्ये अभिनेता व दिग्दर्शक म्हणून मोलाची कामगिरी त्यांनी बजावली. “मृगजळ”, “उन्मेष” यांसारख्या अनेक नाट्यस्पर्धांमध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या बळावर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे पुरस्कार त्यांनी पटकावले आहेत.

      June 27, 2022


  • बाबा, होते म्हणून…

    लहानपणी आमच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज कळले ते, बाबा होते म्हणून.. भालजी पेंढारकरांचे 'छत्रपती शिवाजी', 'पावनखिंड', 'नेताजी पालकर', 'मोहित्यांची मंजुळा', 'मराठा तितुका मेळवावा' हे चित्रपट आम्ही पाहिले. ते पाहून शिवाजी महाराजांविषयी मनात अपार आदर निर्माण झाला. अशा संस्कारमय ऐतिहासिक चित्रपटांसाठी बाबांना मानाचा त्रिवार मुजरा!!
    १८९८ साली भालजींचा कोल्हापूर येथे जन्म झाला. शिक्षणात मन न रमलेल्या भालजींनी तरुण वयातच कोल्हापूर सोडले व पुणे गाठले. पुण्यातील 'केसरी'मध्ये त्यांनी काही काळ नोकरी केली. 'केसरी'चे जुने अंक व ग्रंथालयातील इतर अनेक पुस्तके, ग्रंथ वाचून त्यांच्यातल्या लेखकावर संस्कार झाले. या काळात त्यांच्यावर वि. दा. सावरकर व बाबाराव सावरकर यांच्या विचारसरणीचा प्रभाव पडला. लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर ते कोल्हापूरला परतले.

    त्यांनी देशप्रेमावर सहा नाटके लिहिली. नाटकात भूमिकाही केल्या. 'बकंभट' या व्यंगपटाचे लेखन दिग्दर्शन केल्यानंतर सरस्वती सिनेटोनच्या 'श्यामसुंदर' या पौराणिक बालचित्रपटाची दिग्दर्शन, पटकथा, संवाद, गीते ही आघाडी सांभाळली. या चित्रपटाने पहिला ऐतिहासिक रौप्यमहोत्सव होण्याचा मान मिळवला.
    यानंतर भालजींनी कोल्हापूर सिनेटोन, श्याम सिनेटोन, शालिनी सिनेटोन, सरस्वती सिनेटोन, अरूण पिक्चर्स अशा अनेक चित्रसंस्थांच्या चित्रपटांची दिग्दर्शन अथवा पटकथा संवादाची जबाबदारी सांभाळली. भालजींच्या प्रत्येक चित्रपटाच्या सुरुवातीलाच 'बहु असोत सुंदर ...' हे महाराष्ट्र गीत असायचेच. १९३४ च्या 'आकाशवाणी' पासून १९८६ च्या 'शाबास सूनबाई' पर्यंत भालजींनी ४० कृष्णधवल व २ रंगीत अशा ४२ चित्रपटांची निर्मिती-दिग्दर्शन केले.
    १९४५ साली कोल्हापूरच्या छत्रपतीं राजाराम महाराजांनी तेरा एकरचा जागा भारतींना दिली. तिथे स्टुडिओ उभारुन त्याचे 'जयप्रभा स्टुडिओ' असे नामकरण केले. १९४८ साली गांधी हत्येनंतरच्या जाळपोळीत स्टुडिओ जळाला. या आगीत 'मीठ भाकर' व 'मेरे लाल' या दोन चित्रपटांची राख झाली. भालजींनी सर्वांची देणी भागवून पुन्हा शून्यातून 'मीठ भाकर' चित्रपटाची निर्मिती केल्यावर या चित्रपटाने व्यवसायही चांगला केला.
    भालजींनी ऐतिहासिक बरोबर सामाजिक विषयही चित्रपटासाठी हाताळले. 'साधी माणसं' हा चित्रपट लोहार व त्याच्या रणरागिणी पत्नीच्या सरळसाध्या जीवनावर बेतलेला होता. या चित्रपटाला महाराष्ट्र राज्य सरकारची अकरा पारितोषिके मिळाली. सूर्यकांत, चंद्रकांत हे मांढरे वंदू, जयश्री गडकर, सुलोचना, राजशेखर, अनुपमा व दादा कोंडके अशा अनेक नामवंत मराठी कलाकारांना त्यांनी घडविले.
    दादा कोंडके 'विच्छा माझी पुरी करा'च्या प्रचंड यशानंतर एखाद्या व्यवसायात गुंतवणूक करणार होते, बाबांनी त्यांना 'सोंगाड्या'च्या निर्मितीस प्रोत्साहन दिले...आणि दादांनी स्वतःच्या अनेक सलग रौप्यमहोत्सवी चित्रपटांचे युग निर्माण केले.
    बाबा असेपर्यंत 'जयप्रभा स्टुडिओ'तून अनेक उत्तम चित्रपटांची निर्मिती होत होती. काही कारणाने बाबांनी घेतलेले कर्ज फेडू न शकल्यामुळे स्टुडिओची मालकी लता मंगेशकरकडे गेली. जिने बाबांच्या चित्रपटांतून मराठी सिनेसृष्टीत पाऊल टाकले, तिनेच बाबांना क्लेश दिले.
    भालजींना ९६ वर्षांच्या आयुष्यात चित्रपटसृष्टीला दिलेल्या योगदानाबद्दल १९९२ साली दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले. १९६६ च्या 'साधी माणसं' व १९७० च्या 'तांबडी माती' या दोन चित्रपटांना सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला.
    आज भालजींची १२५वी जयंती. शेकडो वर्षांतून एखादी अशी युगप्रवर्तक व्यक्ती जन्माला येते. जसे छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपण राहिलो तसेच... बाबा, होते म्हणून आपल्याला चित्रपटांतून छत्रपती शिवाजी महाराज समजले...
    चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा!!
    - सुरेश नावडकर २-५-२३
    मोबाईल ९७३००३४२८४
    या रचनेचे सर्वाधिकार रचयिता © सुरेश नावडकर यांच्याकडेच आहेत.

      May 4, 2023


  • करुणा

    (जैन लोककथा)

    एका कुटुंबात तीन भाऊ होते. त्यांच्या बायका आळीपाळीने स्वयंपाक करीत असत. एके दिवशी लहान सूनेला स्वयंपाक करावयाचा होता.

      November 25, 2025


  • ऋणानुबंध

    अण्णा एकदम प्रसन्न दिसत होते. बाहेर जाण्याची तयारी सुरू होती. घोटून घोटून दाढी केली होती. केसांना हलक्या हाताने तेल लावून भांग पाडला होता. पांढरे शुभ्र मुलायम केस त्यांच्या वृध्दत्वाला सौंदर्य बहाल करीत होते. काळी पँट व पांढरा शुभ्र सदरा घातला. खिळ्याला अडकवलेली त्यांची अतिशय आवडती शबनम खांद्यावर अडकवत विनयाला म्हणाले, “जरा जाऊन येतो, आधी देवीला जातो. मग चितकडे, मग मंडईत, एक तास लागेल. तू काळजी करू नकोस, मी नीट जातो.

      June 7, 2026


  • दिसणे आणि पाहणे

    तेनालीराम आणि त्याची पत्नी घराला कोणता रंग द्यावा हे ठरवत होते. पत्नीला गुलाबी रंग पसंत होता. तेनाली म्हणत होता, आपण सफेद रंग देऊ या. दोघांमध्ये काही केल्या एकमत होत नव्हते. पत्नीने अखेर निकराने सांगून टाकलं की, “मी ठरवलं आहे, गुलाबीच रंग द्यायचा. आणि त्याचं कारण एकच आहे, फक्त गुलाबी रंगामुळेच मी आनंदी राहू शकते.

      December 22, 2023


  • ज्या प्रश्नी मन कोंडून जाते (सुमंत उवाच – ९)

    सुमंत जयंत परचुरे. 

    मनात कोणा विषयी शंका असेल, कोणाबद्दल खात्री नसेल तर ते पहिले त्या व्यक्तीशी बोलावे, इतर कोणाशी बोलून अजून पिळ देऊ नये.

      August 31, 2021