नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
जेट एअर वेजच्या विमानाने मुंबईतून दुबईच्या दिशेने झेप घेतली. शबानाचे मन त्याच्यापेक्षा अधिक वेगाने आरिफकडे धावले. स्वतंत्र संसाराची सोनेरी स्वप्ने प्रत्यक्षात उतरण्याचा क्षण काही तासांवर येऊन ठेपला होता. शबानाचे आरिफशी लग्न होऊन चार वर्षांचा काळ लोटला होता. लग्नानंतर दुसऱ्या वर्षात आरिफला एका कंपनीमध्ये नोकरीची संधी मिळाल्यामुळे तो तिकडे गेला. कोकणातल्या गावी सासू, सासरे आणि धाकटा दीर यांच्या सोबत शबानाला राहावे लागले. सासूचे आजारपण सततचे असल्यामुळे त्या घराची जबाबदारी शबानावर पडली. आरिफ वर्षातून एकदा एक महिन्याच्या सुटीवर गावी यायचा. तेवढ्या एकच महिन्यापुरते दोघांचे सहजीवन असे. पुढे दिराचे लग्न होऊन जाऊ घरात आली. सासूचा संसार चालवत असल्याची खंत शबानाच्या मनात सलत असे. जावेचे घरात आगमन झाल्यावर तिथून सुटका होण्याची तिची आशा पालवली. तेथून घेऊन जाण्याचा लकडा तिने आरिफकडे सुरू केला. सगळ्यांच्या विचारांचे एकमत होऊन तिची पाठवणी आरिफकडे करण्याचे ठरले. दिराने तिला मुंबईच्या विमानतळावर सोडले. आरिफ तिला घेण्यासाठी विमानतळावर येणार होता, तरीपण दक्षता म्हणून त्याच्या घराचा व कंपनीला पत्ता तिने एका कागदावर लिहून घेतला होता.दुबईच्या एअरपोर्टवरून बाहेर पडण्याचा गेटजवळ तिने थांबावे असे तिला बजावून ठेवले होते. आखाती देशातील वैभव, झगमगाट याविषयी तिने आरिफकडून खूप ऐकले होते. कोकणातल्या लहान गावातून तिकडे जाण्याची भुरळ तिच्या मनाला पडली. नवऱ्यासोबत राहून ती आता जीवनाचा भरपूर आनंद लुटणार होती.
तिने गर्रकन मानेला झटका देत माझ्याकडे मान वळवली. पूर्वी 180 अंश कोनात तिची मान वळायची आता 80 अंशापर्यंत जेमतेम पोहोचते. तिने विचारलं, ‘तुमचं पूर्वी प्रेमप्रकरण होतं कीकाय? छे.. मी सोडल्यास एवढी रिस्क घेईल कोण?’ पण तिला काय वाटलं कोणास ठाऊक, तिने पुन्हा विचारलं, ‘तुम्हाला दुसऱ्या कोणामुळे मूल वगैरे झालंय का?’

त्याचे लिखाण संशोधित करून, एकत्र ठेवण्याचा व त्याची सूची ठेवण्यासाठी एक संस्था अजूनही कार्यरत आहे. त्याने अनेकानेक वृत्तपत्रांतून अनेक वर्षे लिहिल्यामुळे तो संशोधनाचा विषय झाला आहे व नेहमी नवीन कांही तरी सापडतच असते. त्याची सामाजिक विषयांवरची मते अत्यंत प्रागतिक होती. काळ्या लोकांना जी वागणूक देण्यात यायची त्यावर तर तो टिका करतच असे पण एकंदरीतच स्त्रीयांसह सर्वांना व्यक्तीस्वातंत्र्य त्याला अभिप्रेत होते. साम्राज्यशाही, भांडवलदारांनी चालवलेली कामगारांची पिळवणूक ह्यांवर तो प्रखर टिका करत असे. अनेकवेळा चर्चच्या त्या काळांतील प्रभावामुळे व त्याच्या अशा मतांमुळे त्याच्या पुस्तकांवर सेन्सॉरकडून बंदी घालण्यांत आली. त्याला कॉपीराईटसाठीही अनेकदा झगडावे लागले. त्याला पूर्ण लोकमान्यता व राजमान्यता नंतरच मिळाली परंतु त्याने आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत एकूण साहित्यावरच कायम आपला ठसा राहिलं असे विपुल लेखन केले यांत शंका नाही. त्यामुळे साहित्यात मार्क ट्वेनचे नांव अजरामर झाले आहे.
निसर्ग शक्यतो सृष्टीमध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी मात्र निसर्गाकडून हे संतुलन बिघडले, की त्याचा फटका मनुष्यप्राण्यालाच बसतो. अतिशय कडक उन्हाळ्यामुळे 'नको तो उन्हाळा'असे म्हणण्याची पाळी येते. तर प्रचंड पाऊस होऊन महापूर आला, की पावसाळाही नकोसा होतो. कडाक्याच्या थंडीमुळे तर अनेक वेळा अनेकांवर जीव गमावण्याची पाळी येते.
निसर्गाचे हे संतुलन काही वेळा बिघडत असले तरी सहसा समतोल राखण्याचाच त्वाचा प्रयत्न असतो.
निसर्गाप्रमाणेच मानवी जीवनातही समतोल राखण्याची नितांत गरज आहे. कारण मानवी जीवन ही तारेवरची कसरत आहे याची प्रचिती अनेकदा येते. अनेक वेळा थोडासा तरी 'तोल' गेला, की कधीही कोसळण्याची शक्यता असते.
डोंबारी लोक त्यांच्या खेळामध्ये तारेवरील संतुलन सांभाळण्यासाठी काठीचा वापर करतात. तशीच सद्सद्विवेकबुध्दीची व सारासार विचाराची काठी घेऊन त्याच्या मदतीने ही तारेवरची कसरत केली तर जीवनात कुठे खाली कोसळता येणार नाही.
'तारेवरील कसरत' करण्यात तरबेज असणाऱ्या एका डोंबाऱ्याच्या पोराला एकदा गर्व झाला, की मी काठीशिवाय तारेवरची कसरत करून दाखवितो. या खेळात अनुभवी असलेला त्याचा बाप त्याला म्हणाला, तू या खेळात जरूर तरबेज असशील, मात्र काठीशिवाय ही कसरत खेळण्याचे धाडस करू नकोस, मात्र पोराने बापाचे ऐकले नाही. तो काठीशिवाय तारेवर चढून कसरत करायला गेला. मात्र दोन-तीन पावले टाकली नाही तोच तो खाली कोसळला. त्याला बापाच्या म्हणण्याचे प्रत्यंतर आले होते.
महाराष्ट्राने ज्या लाडक्या व्यक्तिमत्वावर जीव ओवाळून टाकला त्या पु.ल. उर्फ भाईंचा जन्मदिवस येताच मी आठवणींच्या हिंदोळ्यांवर झुलू लागलो.
माझं वय होतं अकरा वर्षे. इयत्ता सहावी. एक दिवस आईने माझ्या हातात एक चिटोरा दिला व मला म्हणाली जोग काकांकडे जा आणि त्यांच्याकडे उतरलेल्या पाव्हण्यांची सही घेऊन ये. सही कशाला म्हणतात, ती कशासाठी घ्यायची असते हे न कळण्याच्या वयात अत्यंत अनिच्छेने मी जाण्यासाठी निघालो. जाता जाता आई ओरडली, ‘आणि हो, त्यांच्यासमोर शुंभासारखा उभा राहू नको, त्यांना काका म्हण आणि सही देण्याची विनंती कर.’ आमच्या घरापासून जोगांचं घर अगदी जवळ असल्यामुळे मी काही मिनिटातच तिथे पोहोचलो. पांढरा पायजामा आणि फिकट निळ्या रंगाचा झब्बा परिधान केलेले पाव्हणे कोणतं तरी गाणं गुणगुणण्यात तल्लीन होऊन झोपाळ्यावर झकास झोके घेत होते. सही घेण्याच्या भानगडीत त्यांची तंद्री भंग पावली तर काय होईल या कल्पनेने मला घाम फुटला. पण तरीही धीर एकवटून मी हळूच म्हणालो – ‘काका’. त्याचं माझ्याकडे लक्ष जाताच ते तत्परतेने म्हणाले ‘बोल पुतण्या’! ते मला पुतण्या वगैरे म्हणतील याची कल्पना नसल्यामुळे मी बावळटासारखा त्यांच्या तोंडाकडे बघू लागलो. त्यांनी मला झोपाळ्यावर त्यांच्या शेजारी बसवून घेतलं व म्हणाले ‘बोल कसा काय आलास?’ मी थोडाही वेळ वाया न घालवता त्यांच्यासमोर आईने दिलेला कागदाचा चिटोरा धरला व त्यावर सही देण्याची विनंती केली. मला त्या धर्मसंकटातून स्वतःची शक्य तितक्या लवकर सुटका करून घ्यायची होती. पण पाव्हणे काही मला सोडायला तयार नव्हते. त्यांनी मला विचारलं ‘ काय होतं असतं रे कुणाची सही घेऊन?’ माझा रडवेला झालेला चेहरा बघून त्यांना माझी कीव आली आणि त्यांनी सही देऊन व माझ्या पाठीवर थाप मारून मला पिटाळलं.
मित्रांनो, काही वर्षांनंतर कागदाच्या त्या छोट्याशा तुकड्याचं मोल मला कळल्यानंतर मी तो तुकडा आजपर्यंत प्राणपणाने जपून ठेवला आहे कारण त्यावर सही करणारे ते पाव्हणे होते पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थातच अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे !
श्रीकांत पोहनकर
98226 98100
shrikantpohankar@gmail.com
सकाळचा फेरफटका मारून घरी आलो. घरी येताच आठ महिन्याची नात मानसी रांगत रांगत माझ्याकडे आली आणि झेपावली. तिला मी लगेच उचलून घेतले. जवळ केले व तिचे पापे घेतले. किती आनंद आणि समाधान ती मला देत होती. नातवंड म्हणजे दुधावरची साय. ज्यांना त्यांचा सहवास लाभतो ते आजोबा आजी खरोखरच नशीबवान व भाग्यवान. आयुष्याची दोर पक्की करणे, आणि वाढविणे ह्या दोन्हीही गोष्टी निसर्ग त्यांच्या कडून करून घेत असतो. ह्यात शंकाच नाही.
लगेच सून बाहेर आली. ती मानसीची तक्रार करु लागली. ” बाबा हिने आज खूप उच्छाद मांडला. तिला शिक्षा करा. “
” काय केले मानसीने?” मी तिच्याकडे कौतुकाने बघत विचारले.
” बाबा मी स्वयंपाक करीत असताना, ती नजर चुकावून देवघरात गेली, आणि तिने देव्हाऱ्यातले देव ओढून पाडून अस्ताव्यस्त केले.”
देवघरातील देव ज्यांना भक्तिभावाने देवत्व दिले जात होते. आणि हे शुषु अवस्थेतील मुल, ज्यालाही एका द्र्ष्टीकोनातून देवत्व दिले जाते. अशा ह्या दोन देवांचे ते एक प्रकारे द्वंदच नव्हते काय? त्यात फक्त दर्शनी अस्ताव्यस्तपणा दिसला होता. त्यांच्या त्या लढाईमध्ये मी हतबल झालो असल्याचा भास होत होता. डोळे मिटून मी क्षमा मागत प्रार्थना करीत होतो. नातीला न समजणारी व देवाला ती पोहोंचली असेल का? हे मला न समजणारी.
आज तरी ह्या जगाचा, ह्या मिथ्या विश्वाचा तिला स्पर्श नाही. जो पर्यंत हे सभोवतालचे खोटे मुखवटे, आचरण, तिच्यावर आघात करून तिला तथाकथित सुसंस्कृत मानवामध्ये बदलणार नाहीत, तोपर्यंत हे लहानगे लेकरू, म्हणजे निसर्गाचीच एक अप्रतिम देणगी आहे. निसर्गाचा तो ठेवा आहे. एक ईश्वरी गुणधर्म, असे समजण्यास हरकत नाही. कश्यावरून मानसीच त्या आदिमायेचे जगदंबेचे स्वरूप नसावे? आज तरी आहे. काळाच्या ओघात तीचातले, नैसर्गिक ईश्वरी गुणधर्म लोप पावू लागतील व त्याची जागा कृत्रिमता घेईल.
तेव्हा मीच म्हणेन - -
ती म्हणजे- – - मानसी- – - शिकलेली शहाणी माझी नात.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
लहानपणी आई मुलाला खाऊ म्हणून एखादा पदार्थ तोंडात भरवते, इथूनच त्याचा तो पदार्थ आवडीचा होतो. बालवाडीत जाऊ लागल्यावर दप्तरात खाऊचा डबा दिला जातो.
“बाळ श्रावणा", आईने हाक मारली. “कोठे आहेस तू?"
“हा काय तुझ्या जवळच आहे", श्रावण म्हणाला.
“असा जवळ ये बरं", आई म्हणाली.
“हा आलो, काय पाहिजे आई तुला?" श्रावणाने विचारले.
आई म्हणाली, “हे बघ, मी आणि तुझे वडील आता अगदी पिकली पाने झालो आहोत. केव्हा गळून पडू, ते कळायचेही नाही. तेव्हा, त्यापूर्वी....' “त्यापूर्वी काय? आई मी तुझी कोणतीही इच्छा अपुरी ठेवणार नाही.' श्रावण म्हणाला.
आई म्हणाली, “ते आम्हाला ठाउक का नाही? आम्ही उभयता म्हातारी माणसं, त्यात आंधळी. आमचं सर्व काही तू प्रेमाने करतोस. आम्हाला क्षणभरही विसरत नाहीस. सर्व प्रकारची सेवा करतोस. तुझ्यासारखा मातृभक्त आणि पितृभक्त मुलगा आम्हांस मिळाला आहे, ही देवाची कृपा. पण ..
“पण काय आई?, मी तुमचा मुलगा आहे. मुलाने मातापितरांची सेवा केलीच पाहिजे. ते त्याचे कर्तव्यच आहे. पण आई, तुला काय हवे ते संकोच न करता सांग. बघ मी तुझी इच्छा पूर्ण करतो की नाही." - श्रावण म्हणाला.
“तू करशील रे, म्हणूनच संकोच वाटतो. तुला किती त्रास द्यायचा!” “बाबा, तुम्ही तरी सांगा हो. माझं काही चुकलं आहे का? सेवेत काही कमी तर पडलो नाही?” “नाही रे बाळा, तुझ्या आईच्या मनांत काशी यात्रेला जावयाचे आहे. तुला कष्ट द्यायला तिचं मन तयार होत नाही.” श्रावणाचे बाबा म्हणाले.
“त्यात कसले कष्ट? बाबा, आई, आपण उद्याच निघायचे.
“अरे, पण आम्हांला चालणे कसे होणार? बैलगाडीचे हादरे आम्हांस सहन होणार नाहीत.' “त्याची व्यवस्था मी करतो. तुम्ही काही काळजी करू नका.” श्रावण म्हणाला. दुसऱ्या दिवशी आपल्या वृद्ध व अंध मातापितरांना घेऊन श्रावणाने काशीचा मार्ग धरला. त्याने एक कावड केली. तिच्यामध्ये त्याने त्यांना बसवले.
ती खांद्यावर घेऊन तो मार्ग आक्रमू लागला. बरेच दिवसानंतर तो एका घनदाट अरण्यात आला. माता पितरे थकल्यामुळे त्याने अरण्यातच मुक्काम करावयाचे ठरविले. त्यांना तहान लागली म्हणून तो लोटा घेऊन पाणी आणण्यासाठी नदीवर गेला.
याच वेळी आयोध्येचा राजा दशरथ त्याच अरण्यात आलेला होता. नदीवर पाणी पिण्यासाठी हिंस्त्र प्राणी आले की त्यांची शिकार करावयाची म्हणून नदीच्या तीरावरील एका झाडावर धनुष्यास बाण लावून बसला होता.
श्रावण नदीवर आला. त्याने लोटा धुतला आणि तो पाण्यात बुडविला.
लोट्यात पाणी भरताना त्याचा आवाज झाला. दशरथ राजाने तो आवाज ऐकला. त्याला वाटले, हत्तीच पाणी पिऊ लागला आहे. आवाजाच्या दिशेने त्याने बाण सोडला आणि "आई ग!" अशी आर्त किंकाळी त्याच्या कानावर पडली. घात झाला असे वाटून तो घाईघाईने नदीवर आला. श्रावणाच्या बरगडीत बाण घुसल्याचे त्याला दिसले. रक्त भळाभळा वहात होते. धावत जाऊन त्याने श्रावणाचे मस्तक आपल्या मांडीवर घेतले.
“कोण तू? अशा रात्री या अरण्यात काय करीत होतास?” - दशरथाने विचारले.
“मी श्रावण. माझ्या वृद्ध आणि अंध मातापितरांसाठी पाणी न्यायला आलो होतो. पण आपण कोण?” श्रावणाने क्षीण आवाजात विचारले.
“मी आयोध्येचा राजा दशरथ. शब्दवेधाची विद्या मला येत नसती, तर किती बरं झालं असतं! हा प्रसंग टळला असता.”- राजा म्हणाला.
“झालं ते झालं. होणारं कधीच टळत नाही. आता असं करा महाराज, हा कुशीत घुसलेला बाण काढा. फार वेदना होताहेत हो. अन् मग हे पाणी घेऊन माझ्या आईवडिलांना द्या. मात्र काही बोलू नका. तुम्ही श्रावण नाही, हे त्यांना कळणार नाही.” राजाने सांगितले की, बाण बाहेर काढल्याबरोबर तू मरण पावशील. तुला मी आयोध्येस नेतो व राजवैद्याकडून उत्तम औषधे देऊन बरा करतो. पण श्रावणाने ते ऐकले नाही. या वेदनेपेक्षा मृत्यू बरा, असे तो म्हणाला. नाइलाजाने राजाने बाण बाहेर काढला. विव्हळत विव्हळत मातृपितृभक्त श्रावणाने "आई! बाबा!” करीत प्राण सोडला.
दशरथ पाणी घेऊन श्रावणाच्या मातापितरांकडे आला. त्याची चाहूल लागताच आई म्हणाली, "बाळा, किती रे वेळ झाला तुला! किती कष्टतोस तू आमच्यासाठी! बाळा पाणी मिळेना का? फार दूर जावे लागले का रे?” दशरथाने तोंडातून चकार शब्द न काढता लोटा आईच्या हाती दिला. पण ती माऊली पाणी न पिताच म्हणाली, “बाळ, बोल ना रे. रागावलास आमच्यावर? तुला फार त्रास देत आहोत आम्ही. पण काय करू? रागावलास म्हणून बोलत नाहीस, होय ना? तू बोलल्याशिवाय आम्ही पाणी पिणार नाहीत."
तहानलेल्या त्या वृद्धांनी पाणी प्यावे म्हणून दशरथास बोलावे लागले.
त्याचा आवाज ऐकताच दोघेही एकदम म्हणाले, "कोण तू? आमचा बाळ कोठे आहे? सांग काय केलंस तू त्याला?” दशरथाला सर्व हकिगत सांगावीच लागली.
ती ऐकताच त्या दोघांनी एकच आकांत मांडला. “बाळ, आम्हाला सोडून कसा रे गेलास? आम्हा आंधळ्यांची काठी गेली! बाळ किती कष्ट पडले रे तुला आमच्याकरता! आणि आमच्यासाठी प्राणही दिलास रे! तुझ्याशिवाय आम्ही जिवंत तरी कसे राहू? बाळ श्रावणा, श्रावणा...' दशरथाने त्यांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. पण त्यामुळे ती दोघे त्याच्यावरच उसळली आणि संतापाने म्हणाली, “आमचा एकुलता एक मुलगा तू मारलास. आम्ही तर आता जगत नाहीच; पण लक्षात ठेव, आमच्यासारखाच तू पुत्रशोकाने मरशील. आमचा शाप आहे तुला.” आणि थोड्याच वेळात त्यांनी पुत्रशोकाने प्राण सोडला. धन्य मातृपितृभक्त श्रावण आणि धन्य ती मातापितरे!
[ 'बालसुधा', पुस्तक ३ रे, कर्नाटक सरकार, १९७७, पृ. १२०-१२४]
जातकुळीच्या झाडांनी आणि वनस्पतींनी समृध्द आहे. जागोजागी त्या त्या वातावरणात, नैसर्गिक पध्दतीने रुजलेले, जोमाने वाढलेले वृक्ष म्हणजे स्थानिक किंवा देशी वृक्ष अशी सोप्पी व्याख्या आपण करू शकतो. हे असे देशी वृक्ष आपल्या जंगलात किंवा स्थानिक हिरव्या पट्टयात पर्यावरणाचा समतोल साधत असतात.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून ताईने राहिलेल्या दुधाचा चहा करून घराची आवरा आवर आणि साफ सफाई करायला घेतली. डिसेंबर चा काळ असल्याने थंडी पडली होती. समुद्र जरी जवळ असला, उष्म वातावरण असले तरी थंडीत हवामान त्या उष्म्याला जुमानायचे नाही.
Copyright © 2025 | Marathisrushti