(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • अॅडव्होकेटांची बासुंदी

    वकिली सोडून देऊन अ‍ॅडव्होकेट चार दिवस सुन्न बसले होते. मग त्यांच्या डोक्यात मराठवाड्यात लग्नांच्या जेवणावळीत बर्‍यापैकी माहीत असलेली कानविंद्यांची बासुंदी चमकून गेली. तशी बासुंदी करून विकली तर? नक्कीच पुण्यात फेमस होईल! चितळेंच्या बाकरवडी सारखी! किंवा कयानीच्या श्रूजबेरी बिस्किटांसारखी! आणि अशा तर्‍हेनं ‘अ‍ॅडव्होकेटांच्या बासुंदी’चा उदय झाला होता.

  • गिरणी कामगार ते नॉलेज वर्कर

    एका पिढीतला तो गिरणी कामगार आणि दुसऱया पिढीतला हा नॉलेज वर्कर… सुखी कोण? हयातभर साच्यावर काम करुनही आज ऐन सत्तरीतही किमान दोन किलोमीटर सकाळ संध्याकाळ पायी चालणारा चंदूमामा? की डोळे-कान-तोंड-मान-मणका-पाठ-हात-मनगट-कंबर-गुढगे-पाय… सगळं काही पाच-सहा वर्षात कामातून घालवणारा आमचा आयटी युगातला नॉलेज वर्कर – प्रकाश? भले पैशाने नॉलेज वर्कर सुखी असेल पण तब्येतीने? कॉलेजमधून बाहेर पडल्यापडल्या वीस-पंचवीस हजाराचा पगार घेऊन दोन वर्षांनी औषध आणि डॉक्टरवर महिन्याला हजारो रुपये घालवायचे आणि कायमचे अनफिट होऊन बसायचे यात काय मजा?… शेवटी शरीर फीट तरच बाकी सगळं…. खरंय की नाही?

  • सणांचा महिना

    या वर्षीचा हा ऑगस्ट महिना म्हणजे खर्याप अर्थाने सणांचा महिना म्हणता येईल. या एकाच महिन्यात नागपंचमी, रक्षाबंधन, स्वातंत्र्य दिन, गोपाळकाला आणि श्री गणेश चतुर्थी इ. सण साजरे होत आहेत. भारतीय संस्कृतीतील सणांचे महत्व सार्याल जगालाच परिचित आहे पण आज होत चाललेला भारतीय सांस्कृतीचा र्हातस हे सण साजरे करण्याच्या पद्धतीत आमुलाग्र बदल होण्यास कारणीभूत होत आहे. त्यातील काही बदल स्वागतहार्य तर काही बदल आक्षेपाहार्य आहेत.

  • स्त्री ईश्वराची एक अप्रतिम कलाकृती

    ** मादी व नर ह्यांत फक्त मादीचीच खऱ्या अर्थाने योजना केलेली. तीला जीवन चक्रासाठी मातृत्व दिले. नराची संकल्पना नंतरची. एक सहाय्यक, मदतनीस, रक्षक, ह्या भूमिकेंमध्ये
    ** मातृत्वाला अनुसरुन वात्सल्य, जीव्हाळा, प्रेम, माया, करुणा, त्याग वृत्ती, संसारीक कौटूंबीक ओढ दिली
    ** जगदंबा सर्व श्रेष्ठ देवता. तीची तीन रुपे. शक्ती, धन, ज्ञान. हे महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, ह्यांच्या प्रतीकात्मक रुपाने दिसते. जीवनाची त्रीकोणात्मक रचना व्यक्त करणारी.
    ** जन्मताच स्त्रीची सर्वांगीन ताकत जास्त असते. जीवनाच्या प्रत्येक पाऊलावर हे सिद्ध झालेले आहे की तीच्यात प्रचंड क्षमता व उरक शक्ती असते. बौद्धीक, शारीरिक, मानसिक शक्तीमध्ये तीचा वरचढपणा स्पष्ट झालेला आहे.ज्या वेळी संधी मिळाली, तीने आपली योग्यता सिद्ध केली आहे.
    ** स्त्रीचे मात्रत्व ह्याचा पुरुषांनी गैर फायदा घेतला. तीला दुय्यम स्थान दिले. तीला अबला केले अशक्त ठरविले. गरजेच्या चक्रांत अडकलेल्या स्त्रीला गुलाम बनविले. आत्याचार झाले. भोग वस्तू म्हणून तीची संभावना झाली. तीला सौंदर्याचे प्रतिक बनवून शोभेची वस्तू समजले गेले.
    ** स्त्री आपले सौंदर्य हेच हत्यार समजू लागली. त्यांत ती फसली. पुरुषाना आकृर्षित करणे ह्यातच तीला मोठेपणा वाटू लागला. सौंदर्य, मादकता ह्या गैरसमजात ती राहीली. ह्याच कारणाने ताला सतत दुय्यम स्थान मिळत गेले. आपल्या अंगच्या गुणाना ती विसरु लागली.
    मत्सर, राग इर्षा ह्या गुणाना ती जवळ करु लागली.
    ** ज्या ज्या वेळी व्यासपिठ मिळत गेले त्या त्या वेळी तीने आपल्या कर्तव्याची, महानतेची झलक दाखविलीच. महान स्त्रीया प्रत्येक क्षेत्रात चमकल्या. जसे राजकारण, विज्ञान, शिक्षण, अर्थक्षेत्र, अध्यात्म, तत्वज्ञान, गिर्यारोहन, सैनिकी, अशा अनेक क्षेत्रांत त्यानी आपले कर्तव्य सिद्ध केलेले आहे.
    ** समानतेच्या विचारांत ती आजकाल प्रत्येक क्षणी कौटूंबीक आधार न मान्य करता राजश्रय अर्थात कायदे , कानून, ह्यांत गुंतली आहे. कायद्यानी तीला खूपच संरक्षण दिले असले तरी प्रत्येक वेळा ती ते शस्त्र विनाकारण पारजीत आहे. त्यामुळे एक प्रकारचा कौटूंबीक कलह निर्माण होत असल्याचे चित्र दिसू लागलेले आहे.
    ** अनेक वर्षांची सहन केलेली दुय्यम जागा दुर्दैवी होती. परंतु ती तो बदल इतका शिघ्र करु इच्छीते , जे घातक ठरेल. तीच्यात सुडबुद्धीची भावना येत असल्याची जाणीव होणे हे योग्य नाही. सारे चित्र मैत्रीपूर्ण बदलने जरुरीचे आहे. त्यासाठी घैर्य व धिरता असावी हे वाटते.

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    9004079850
    e-mail - bknagapurkar@ gmail.com

  • चंदर – बालकुमार कादंबरी – भाग २

    “माझ्या एकट्यासाठी आपल्या गावात शाळा सुरु होणार आहे “., रावसाहेब -मालकांनी स्वत: मला सांगितलाय “, ही गोष्ट भेटेल त्याला चंदर सांगत होता.

  • संपत्तीचा मोह

    प्राचीन काळची ही कथा आहे. एका नगरात रामरतन नावाचा एक धनाढ्य व्यापारी राहात होता. व्यापारधंद्यात त्याने इतकी संपत्ती मिळवली होती की, त्या नगरीच्या राज्याच्या खजिन्यातदेखील इतकी संपत्ती नसावी. एकदा रामरतनला वाटले की, राजाला आपली संपत्ती दाखवावी व त्याची मर्जी प्राप्त करून घ्यावी म्हणून त्याने राजाला बोलावण्याचा निर्णय घेतला.

    रामरतनला एकूण तीन मुले होती. त्यापैकी धाकट्या मुलाने मात्र याला विरोध केला. कारण तो हुशार होता. रामरतनला तो म्हणाला राजाला बोलावून तुम्ही आपल्या घरावर संकट ओढवून घेत आहात. मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करत रामरतनने राजाला एके दिवशी घरी बोलावले. राजा आल्यावर त्याला आपली सर्व संपत्ती दाखवली. तळघरात ठेवलेले सोने-चांदी, हिरे, पावू माणके व अगणित सोन्या-चांदीची नाणी पाहून राजाचेही डोळे दीपले. मात्र एवढी संपत्ती आपल्या खजिन्यात आली तर फार चांगले होईल असाही त्याच्या मनात विचार आला.

    राजवाड्यात परतल्यानंतर त्याने प्रधानाशी चर्चा केली. प्रधान म्हणाला, रामरतनची संपत्ती तुमची होऊ शकते. तुम्ही त्याला राजवाड्यात बोलावून असा एक प्रश्र विचारा की, त्याचे उत्तर त्याला देता येणार नाही व 'ज्याच्याकडे धन आहे, परंतु बुद्धी नाही, तो धन बाळगायला लायक नाही' असे सांगून त्याची सर्व संपत्ती तुम्ही जप्त करू शकता.

    त्याप्रमाणे राजाने रामरतनला बोलावून प्रधानाने पढविल्याप्रमाणे सांगितले व 'सतत काय वाढत जाते व काय कमी होत जाते', या प्रश्राचे उत्तर तू एका दिवसात दिले नाही तर छी सर्व संपत्ती सरकारी खजिन्यात जमा होईल, असे सांगितले. राजाची ती अट ऐकून रामरतन बेशुद्ध होण्याच्याच मार्गावर होता. परंतु कसाबसा स्वताला सावरत घरी आला व त्याने घरातील सर्वांना राजाची ही अट सांगितली. त्यामुळे घरातील सर्वजण काळजीत पडले. धाकट्या मुलाने मात्र रामरतनला धीर दिला व त्याने रामरतनच्या कानात या प्रश्राचे उत्तर सांगितले.

    दुसऱ्या दिवशी रामरतन आनंदाने राजाकडे गेला व आदल्या दिवशी त्याने विचारलेल्या प्रश्राला उत्तर देताना म्हणाला, तृष्णा (वासना) ही अशी एकच गोष्ट आहे जी सतत वाढत जाते व माणसाचे आयुष्य सतत कमी होत जाते. त्याचे उत्तर ऐकून राजाही खूष झाला व त्याने रामरतनला संपत्ती तुझीच आहे, तूच त्याचा चांगला वापर कर, असे सांगून परत पाठविले.

    रामरतनने घरी आल्यावर धाकट्या मुलाचे कौतुक केले व त्या संपत्तीचा चांगल्या प्रकारे विनियोग करण्याचे धाकट्या मुलालाच अधिकार दिले.

  • एक परीस स्पर्श ( भाग – ८ )

    पूर्वी आलेल्या अनुभवातून विजय बरंच काही शिकला होता. म्हणून तो किंचित व्यवहारी आणि सावध झाला होता. पूर्वी तो लोकांमध्ये फक्त चांगुलपणा शोधायचा पण आता तो त्यांच्यातील हरामखोरपणाही शोधू लागला होता.

  • पद्य आणि मृत्युविचार : भाग-६ / ११

    डोगरी ही जम्मूभागातील भाषा आहे. या भाषेतील, पद्मा सचदेव या एक श्रेष्ठ कवयित्री आहेत ; व त्या डोगरीरोबरच हिंदीतही लेखन करतात. त्याच्या एका काव्यांशाचें भाषांतर पाहूं या

  • हृदयांतर

    भाषांचे, उच्चारांचे, संकरांचे आपापले कप्पे असतात. शेजारची भिंत उडी मारून दुसऱ्या अंगणात पटकन घुसता येते, पण तेथे स्थिरावता येत नाही. आपली गांवे, गावकूस सांभाळणे आणि नंतर शक्य असेल तर उंबरा ओलांडणे हे श्रेयस्कर !

  • जागतिक रसायन शास्त्रज्ञ

    यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र वर्ष म्हणून जाहीर केले आहे. रसायनशास्त्राच्या प्रगतीमध्ये मोलाची भर टाकणार्‍या प्रमुख महिला व पुरुष रसायनशास्त्रज्ञांचा हा सचित्र परिचय सर्वांनाच प्रेरणा देणारा आहे. प्रा. प्रकाश माणिकपुरे यांनी. जागतिक रसायनशास्त्रज्ञ  लेखक : प्रा. प्रकाश माणिकपुरे पाने : 176 किंमत : 180 रू. प्रकाशक : नचिकेत प्रकाशन