नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
आये…वासुदेव आलाय गं…म्हणंत पळत पळत आंगणात गेलो.बाहेर झुंजूमुंजू झालं व्हतं.. आंगणातल्या नींबाच्या झाडावर चिमण्यांचा चिवचिवाट चालू व्हता..
व्हॅन गॉगच्या मृत्यूनंतर चित्रकार म्हणून त्याची कारकीर्द संपुष्टात आली असली तरी जगाला प्रेरणा देणारा भविष्यातील एक महान चित्रकार म्हणून त्यांचा वारसा जपला गेला आहे . त्याची कीर्ती त्याच्या मृत्यूनंतर वाढत गेली. त्याची गणना जगातील महान चित्रकारांमध्ये केली जाते . आधुनिक कलेच्या संस्थापकांपैकी एक असे त्याला मानले जाते.
काही लोक अतिशय उत्साही असतात. उत्साहाच्या भरात ते वेगवेगळ्या वल्गना करतात. मात्र प्रत्यक्ष कृतीची वेळ आली की, त्यांचा उत्साह मावळू लागतो.
नीलेश आणि ज्ञानेश हे दोघे मित्र खूपच उत्साही होते. प्रत्येक गोष्टीत ते इतके उत्साहाने बोलत की, ऐकणार्यांवर त्यांचा खूपच प्रभाव पडत असे. उत्साहाच्या बाबतीत दोघेही एकमेकाला हार जात नव्हते.दिवाळीचे दिवस जवळ आले होते. दिवाळीचे आणि फटाक्यांचे व फराळाचे जसे अतूट नाते आहे तसेच किल्ले तयार करण्याचेही आहे. अनेक मुले आपापल्या इमारतीत किले तयार करण्यात मग्न होती.
नीलेश आणि ज्ञानेश यांनाही किल्ला तयार करण्याची इच्छा होती. त्यांनी त्यांच्या शेजारच्या इमारतीत तयार होत असलेला किल्ला पाहिला आणि त्यांनी उत्साहाच्या भरात आपल्याही इमारतीत तसाच किल्ला तयार करण्याचे ठरविले. दोघेही उत्साहाने त्या किल्याबाबत बोलू लागले.
आपण किल्ला असा करू तसा करू यावर दोघांची बरीच चर्चा झाली. शेवटी किल्यासाठी माती आणायचे दोघांनी ठरविले. दोन-चार टोपली माती त्यांनी आणलीही. त्यात पाणी घालून चिखलही केला. मात्र प्रत्यक्षात किल्ला करताना त्यांचा उत्साह मावळला. सुरुवात झाली. किल्ला करून आपण आपले श्रम नि वेळ वाया घालवित आहोत, असे त्यांना वाटू लागले.
अर्थातच त्यांनी आपली कल्पना सोडून दिली. तो चिखल किल्ल्याची वाट पाहून केव्हाच वाळूनही गेला. किल्ला मात्र अस्तित्वात आलाच नाही. उत्साह आणि कृती यामध्ये किती अंतर असते याचे प्रत्यंतर त्यांना आले होते.
आज खरोखरच कोरोनाच्या संकटाला सामोरे जात असताना प्रत्येकाच्या डोळ्यासमोर अंधार दाटला आहे. आपले पुढे काय होईल आणि कधी व केव्हा सर्व पूर्ववत होईल अशाच अंधिकारमय विचारात सगळेच जण आहेत. दिवाळी अजून लांब आहे पण आता जर दिवाळी असती तरी या अवस्थेत आणि असेल त्या परिस्थितीत प्रत्येकाने घरासमोर दारासमोर किंवा देव्हाऱ्यात दिवा लावला नसता का??
प्रिय… २ दिवसांनी तुझा वाढदिवस आहे. तुझ्यासाठी अगदी नकोसा वाटणारा दिवस. कारण; सगळ्यांना तू हवा असतो तुझ्या वाढदिवसाला. गेल्या वर्षी पर्यंत माझही जरास असंच होत. नाही का? पण तुझ्या गेल्या वर्षीच्या वाढदिवसामध्ये आणि या वर्षीच्या वाढदिवसामध्ये खूप फरक आहे. हो ना? अगदी गेल्या वर्षापर्यंत आपण एकमेकांचे अगदी जवळचे मैत्र होतो. यावर्षी आपण एकमेकांचे कुणीही नाही. आपण एकमेकांसाठी कुणीही नाही. अगदी अनभिज्ञ आहोत आता एकमेकांसाठी.
भारतातील सर्वच प्रमुख नद्यांच्यामागे एखादी लोककथा (दंतकथा) दडलेली आहे. अशीच लोककथा नायगारा धबधब्याच्या बाबतीत असेल का याचा मी विचार करीत होतो. अमेरिका, कॅनडा ही प्रगत राष्ट्रे ! विज्ञान क्षेत्रात त्यांची प्रगती उल्लेखनिय ! त्यामुळे अशा निराधार दंत कथांवर त्यांचा विश्वास नसावा, अशीच माझी भावना! त्यामुळे नदी किंवा धबधब्याबाबत अशी एखादी लोककथा प्रचलित असेल असे मला वाटले नाही. परंतु बोटीत बसून धबधब्याजवळ जाताना कुणीतरी ‘मेड ऑफ दी मिस्ट’ असा शब्दोच्चार केल्याचे मी ऐकले. ही ‘मेड ऑफ दी मिस्ट’ काय भानगड आहे हे जाणून घ्यायची ओढ लागली; अधिक चौकशीअंती ती एक लोककथा असल्याचे समजले.

आमच्या मुंबईसारख्या शहरात आमचा शिव्यांशी नित्य संबंधं येतो. येवढा की आता त्याचं काहीच वाटेनासं झालंय. इथे गर्दीच येवढी की येता जाता धक्का लागतोच. तो मुद्दामहून दिलेला धक्का नाही हे देणाऱ्याला आणि लागणाऱ्यालाही माबिक असतं. तरी चार दोन शिव्या दिल्या-घेतल्या जातातच. एकमेकाची आय-माय साग्रसंगीत उद्धारली जाते..पण त्यात त्या धक्का देणाऱ्या-घेणाऱ्याविषयी राग नसतो तर त्या ‘व्यवस्थे’ला दिलेल्या शिव्या असतात..
चित्रपटांपेक्षा त्यांना नाटकांमध्ये काम करणे अधिक पसंत असायचे. गडकरींच्या नाटकांतील विनोदी पात्रं ते लीलया साकारायचे. ‘सौजन्याची ऐशीतैशी’ या नाटकातील ‘नाना बेरके’ ही व्यक्तिरेखा त्यांनी आपल्या सहजसुंदर अभिनयाने अजरामर करुन ठेवलेली आहे.
भोजराजा कलेचा भोक्ता असल्यामुळे त्याच्या पदरी अनेक विद्वान होते. कालिदासासारखे 'नवरत्न'ही दरबारात होते. त्यामुळे दूरदूरहून आलेले अनेक कलावंत आपली कला सादर करायचे व राजाकडून बिदागी घेऊन जायचे.
एकदा एक सुवर्णकार सोन्याच्या तीन मूर्ती घेऊन भोजराजाच्या दरबारी आला. त्या तिन्ही मूर्तीची किंमत वेगवेगळी होती. एका मूर्तीची किंमत होती दहा सुवर्णमुद्रा, दुसरीची होती शंभर सुवर्णमुद्रा, तर तिसरीची होती हजार सुवर्णमुद्रा. तिन्ही मूर्ती शुद्ध सोन्याच्या, समान वजनाच्या मात्र त्यांच्या किमती वेगवेगळ्या का, याचे कोडे भोजराजासह सर्व दरबारी लोकांना पडले. मात्र नेमके रहस्य सुवर्णकाराखेरीज कोणालाच माहिती नव्हते व ते ओळखावे म्हणून सुवर्णकार दरबारात आला होता. मात्र कोणालाच त्या मूर्तीच्या किमतीचे रहस्य सांगता येईना. शेवटी भोजराजाने कालिदासाला पाचारण केले.
कालिदासाने तिन्ही मूर्तीचे बारकाईने निरीक्षण केले. तिन्ही मूर्ती शुद्ध सोन्याच्या, समान वजनाच्या व दिसायला सारख्याच होत्या. बारकाईने निरीक्षण केल्यानंतर त्या मूर्तीमधील रहस्याची गोम कालिदासाच्या लक्षात आली.
त्याने एक मोठी काडी घेतली व पहिल्या मूर्तीच्या डाव्या कानात घातली व सरळ पुढे नेली तर ती उजव्या कानातून बाहेर पडली. तीच काडी त्याने दुसऱ्या मूर्तीच्या डाव्या कानात घातली तर ती त्या मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडली. नंतर त्याने ती काडी तिसऱ्या मूर्तीच्या कानात घातली, तर ती पोटातच राहिली.
कालिदासाने पहिल्या मूर्तीची (म्हणजे एका कानाने ऐकणे व दुसऱ्याने सोडून देणे) किंमत दहा सुवर्णमुद्रा, दुसऱ्या मूर्तीची (म्हणजे कानाने ऐकलेले लगेच दुसऱ्याला सांगणे) किंमत शंभर सुवर्णमुद्रा, तर तिसऱ्या मूर्तीची (म्हणजे कानाने ऐकलेले आपल्या पोटातच ठेवणे) किंमत हजार सुवर्णमुद्रा असल्याचे सांगितले.
त्या तिन्ही मूर्तीची किंमत कालिदासाने बरोबर ओळखल्यामुळे त्या सुवर्णकाराने खूष होऊन कालिदासाची प्रशंसा केली. नंतर भोजराजानेही माणसातील स्वभाव वैशिष्ठ्ये सांगणाऱ्या मूर्ती तयार केल्याबद्दल त्या सुवर्णकाराचा यथोचित सत्कार करून त्याला परत पाठविले.
Copyright © 2025 | Marathisrushti