(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ‘साहित्यिक’ ज्ञानेश्वर आणि वाङ्मयीन भाषा-वैविध्य : विभाग – ५ – अ

    ‘साहित्यिक’ ज्ञानेश्वर आणि वाङ्मयीन भाषा-वैविध्य व त्या अनुषंगानें एकाच रचनाकाराच्या भिन्नभिन्न भाषास्वरूपाची , (आणि अन्य क्षेत्रातील सृजनशील व्यक्तीँची) उदाहरणें यांची ओळख करुन देणारे सदर….

  • माणसं

    माझी ही आठवण तब्बल तीस वर्षांपूर्वीची. त्या वेळी मी नुकताच पुण्यातल्या एका मोठ्या वृत्तपत्रात काम सुरू केलं होतं. शहरातल्या
    घातपात-गुन्हेगारीच्या बातम्यांचा शोध घ्यायचा आणि त्या तयार करून द्यायच्या, असं काम. पुण्यात त्या वेळी अकरा पोलीस स्टेशन्स होती. सर्वच ठिकाणी जावं अशी अपेक्षा असायची; पण ते कठीण होतं. आजकालसारखी मोबाईल वगैरे साधनं नव्हती किंवा प्रेसनोटसारखी पद्धतही. क्राईम रिपोर्टर हा तसा वृत्तपत्राच्या व्यवस्थेतला शेवटचाच घटक. स्वाभाविकपणे सायकल हेच वाहन. रोज विठ्ठलवाडीहून निघावं, मिळेल तिथं, मिळेल तसं खावं, प्यावं अन् काम आटोपून मध्यरात्री परतावं, असा शिरस्ता. संस्था नवीन, माणसं नवीन, कामही नवीनच- खूप दमछाक व्हायची; पण कामावर आपला वेगळा ठसा उमठायला हवा म्हणून मेहनत तर आवश्यक होती. अवघा महिना झाला असेल; पण या कामात मी थकायला लागलो. भूक मंदावली, उत्साह कमी झाला. आजारी आहोत असं वाटायला लागलं. विश्रांतीसाठी रजा वगैरे घेणं कठीणच होतं. दुपारी मित्राच्या खोलीवर थांबायला लागलो. काम सुरू होतं; पण ते ओढून-ताणून. डॉक्टरांकडे गेलो; पण विशेष काही नाही, असं म्हणून त्यांनी रवानगी केली. भूक लागत नव्हती. उलटी होईलसं वाटायचं. असाच

    संध्याकाळी मित्राकडे गेलो. भूक लागत नाही, असं सांगितलं. तो म्हणाला, `तुला काय झालंय? हे घे थोडं, छान भूक लागेल.' घेतलं ते मी. घरी गेलो. जेवलो अन् भडभडून ओकलो. मद्य पचलं नव्हतं, हे खरं; पण त्यानंतर अन्नाचा कणही पचेनासा झाला. आता माझ्या आजाराचं निदान झालं होतं. कावीळ. त्यात विष घेतलेलं. विश्रांती, पथ्य आवश्यक. उपचाराला पैसे नाहीत. कुणीतरी सांगितलं म्हणून लोणावळ्याला गेलो. तिथं काविळीवरचा जालीम उपचार केला. पुढचे तीन दिवस कावीळ विसरून जावी, असा त्रास झाला. चालता येईना. प्रयत्न केला तर मस्तकात हादरे जात. ऑफिसमध्ये

    जाणं अशक्यच होतं. घरात

    राहावं तर पगार नसेल तर खायचे काय, असा प्रश्न होता. स्वत:च्या पायावर उभं राहायचं म्हणून बाहेर पडलो होतो; पण पुन्हा आई-वडिलांकडे गेलो. औषधं चालू होती आणि विश्रांतीही. आता प्रकृती सुधारत होती; पण कामाला लागावं एवढी स्थिती नव्हती अन् अचानक एके दिवशी पत्र आलं. पुण्याहून संस्थेचा लिफाफा होता. काय असेल त्यात याचा अंदाज मलाच काय घरातल्या सगळ्यांनाच येत होता. नव्यानं लागलेल्या नोकरीवर तीन आठवडे अनुपस्थिती हे कारवाईसाठी पुरेसं कारण होतं. पुरता हादरून गेलो होतो. थरथरत्या हातानं ते पत्र घेतलं. इतर माझ्याकडे पाहत

    होते. त्यांच्या भावना काळजीच्या की रागाच्या, या पलीकडे गेलो होतो मी. पत्र उघडलं. सही पाहिली. श्री. ग. मुणगेकर. संपादक. आता काय लिहिलंय ते पाहावं म्हणून वाचू लागलो. पत्रात लिहिलं होतं, प्रिय किशोर, तुम्ही आजारी असल्याचं कळालं. कावीळ हा गंभीर आजार असतो. त्यासाठी विश्रांती हाच उपाय. तुम्ही विश्रांती घ्या. कामाची किंवा नोकरीची काळजी करू नका. तुम्हाला काही मदत लागल्यास मला कळवा. हयगय करू नका. आपला...
    किती वेळा ते पत्र वाचलं हे आठवत नाही; पण खूपदा वाचलं. डोळ्यांत अश्रू होते. ते पत्र तसंच पत्नीच्या, आईच्या, वडिलांच्या हातात गेलं. तेही भारावून गेले. महिनाभराच्या कामानंतर आपल्या मुलाबाबतच्या संपादकांच्या भावना पाहून त्यांना आनंद झाला. श्री. ग. मुणगेकर गेल्यावर त्यांना अनेकांनी आदरांजली वाहिली. त्यांच्या आठवणी सांगितल्या. त्या वेळी मला कोणी तसं विचारावं असं माझं स्थानही नव्हतं आणि तेवढं धाडसही झालं नाही; पण ज्या ज्या वेळी कोणाला कावीळ झाल्याचं कळतं, त्या वेळी माझ्यावर आलेला प्रसंग आणि ते पत्र आवर्जून आठवतं.
    आज हे सारं आठवायचं कारणही तसंच आहे. मी राहतो तेथेच एक सॉप्टवेअर इंजिनिअर तरुण राहतो. चार महिन्यांपूर्वी त्याला बड्या पगाराची नोकरी लागली. तीन महिन्यांपूर्वी त्याला अपघात झाला. अलीकडे आठवड्यापूर्वीच तो बरा होऊन घरी आला. त्याच्या बॉसनं अवघ्या एका महिन्याच्या कामाच्या अनुभवावरून त्याला नोकरीत कायम केल्याचं पत्र त्याला आयसीयूमध्येच दिलं. आज तो तीन महिन्यांनंतर पुन्हा ऑफिसमध्ये गेला. त्याच्या ऑफिसनं त्याच्यासाठी रुग्णासाठी असलेली व्हॅन पाठविली. स्वागत केलं. जमेल तेवढाच थांब, असा स्नेहाचा सल्लाही दिला. तो घरी परत आला तेव्हा त्याचा चेहरा उजळला होता. शारीरिक त्रास अजूनही असेल; पण मानसिकदृष्ट्या तो पूर्णपणे उत्साहात होता.
    माझ्यासाठी श्री. ग. मुणगेकर होते, त्याच्यासाठी आणखी कोणी. माणसाचा माणसावर विश्वास बसण्यासाठी एवढं पुरेसं असावं- नाही का?

    -- किशोर कुलकर्णी

  • प्रेमाच्या वाटेवर – भाग ६

    रमा आणि रमेश निघून गेल्यावर प्रतिभा बिछान्यावर आडवी झाली. इतक्यात दारावरची बेल वाजली.

  • बॅड हॅबिट (कथा)

    तशी ती सॉलिड आहे ,
    सगळ्यांना माहित आहे हे ,
    तसे तिलाही माहीत आहे.
    पण मला ती फार उशीरा खरी कळली .

  • चिट्ठी

    कानाला हेडफोन होते,सहज पंकज उधासचे ‘ वतन से चिट्ठी आयी है ‘ गाणे ऐकत असताना संपूर्ण भूतकाळातच गेलो.
    आज तू इथे नाहीस , आहेस कुठे तरी परदेशात २० वर्षे झाली, सपंर्क नाही.

  • चर्चेच गुऱ्हाळ

    सकाळची वेळ होती, गार वारं सुटलं होत. कॉलनीला झोपेतून पूर्ण जाग आलेली नव्हती. दाराशी उभे राहून इकडे तिकडे पाहत असतानाच पेपरवाला आला.

  • मोठ्या मनाची माणसं

    मोठ्या मनाची माणसं भेटतात आणि आपले विचारही बदलून जातात.एवढ्या लोकांत मला सावरुन घेतले. लोकांच्या मनातील विचार समजून घेऊन त्यांचेही समाधान केले.

  • युगांतर – भाग ९

    सुमंत जयंत परचुरे. 

    रवींद्रची पाण्यातली हालचाल मंद होऊ लागली होती. त्याचा श्वास कमी कमी होत चालला होता. तो वाचवायला आला होता खरा त्या बाळाला, पण पाण्यात उडी मारल्या पासून तो जणू काही स्वप्नातून सत्यात उतरला होता. त्या बाळाला आणि त्या अण्णांच्या सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीला त्या काळोखात शोधत होता. पण तो सोडून त्या पुष्करणी मधे बाकी कोणाचंही नामोनिशाण नव्हतं. तो आता स्वतःला वाचवायच्या स्थितीतही नव्हता, त्याचा श्वास खूपच मंद होत होता आणि तो जणू आता जलसमाधी मिळणार या स्थितीत त्या पुष्करणी च्या तळाशी त्या काळोख्या रात्री बुडत होता. तळाशी बऱ्याच वेली होत्या, गाळ बसून झालेला चिखल होता. त्याचे डोळे हळूहळू मिटत होते, हात आणि पाय आता सैल झाल्या सारखे स्तब्ध झाले होते.

  • अनोखी गाणी अनोखी भेट

    एक दिवस एक व्यक्ती स्वर-मंचच्या ऑफिसमध्ये आली. त्यांचे नाव संजय पवार. रूबाबदार व्यक्तिमत्त्व आणि खर्जामधील लक्षात राहण्यासारखा आवाज. एका निराळ्या कामासाठी ते भेटायला आले होते. पण समोर हार्मोनियम पाहून त्यांनी चक्क गाणे ऐकवण्याची विनंती केली. हा माणूस गझलचा निस्सीम चाहता होता. त्यांचे काम काही झाले नाही. पण आमची मैत्री झाली. लवकरच त्यांनी 'प्रेशिया फार्मा' नावाची स्वतःची कंपनी काढली. या कंपनीसाठी लोणावळा येथे माझा गझलचा कार्यक्रम आयोजित केला. तेव्हापासून त्यांचा असा एकही समारंभ नाही की ज्यासाठी मी उपस्थित नाही. स्वर-मंचचाही असा एकही कार्यक्रम नाही ज्याला ते उपस्थित नाहीत. गाण्यामुळे असे अनेक चाहते आणि मित्र मला मिळाले.

    माझ्या पुढील गझलच्या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध क्रिकेट समालोचक सुरेश सरैय्या यांची उपस्थिती लाभली. काही कार्यक्रम महाराष्ट्राबाहेर केल्यानंतर आषाढी एकादशीनिमित्त 'विठ्ठल विठ्ठल' हा अभंगांचा कार्यक्रम अरविंद खेर यांच्या स्वबोध परिवारासाठी गडकरी रंगायतनमध्ये सादर केला. यावेळी 'हरिपाठ जसा समजला तसा' या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. नंतर 'गाणी आवडणारी' हा मराठी व हिंदी लोकप्रिय गाण्यांचा कार्यक्रम आम्ही स्वर - मंचतर्फे केला.

    याच वेळी एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन माझ्या नकळत सुरू झाले होते. माझ्या नातलगांनी, मित्रमंडळींनी, पत्नी प्रियांका आणि मुलींनी माझ्या पन्नासाव्या वाढदिवसाचा मोठा कार्यक्रम करायचे ठरवले होते माझे मित्र हेमंत रणदिवे यांनी माझा आवडता सेरेमोनियल हॉल बुक केला होता. कार्यक्रमानंतर भोजनाची व्यवस्था केली होती. आमच्या स्वर - मंच अॅकॅडमीच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी गाण्याचा कार्यक्रम बसवला होता. मला याची कोणतीही कल्पना नव्हती. 'वाढदिवसाच्या दिवशी कुठेही कार्यक्रम घेऊ नका हं बाबा!' एवढेच शर्वरी आणि केतकी मला म्हणाल्या होत्या. माझी आईदेखील त्यांनाच सामील होती. १४ ऑक्टोबर २०१२ रोजी सकाळी देवदर्शनाला जाऊ या म्हणून मला या मंडळींनी सरळ हॉलवर नेले. तिथे माझी वादक कलाकार मंडळी आणि गाण्याच्या कार्यक्रमाची तयारी पाहून मी काय ते समजलो. हे एक मात्र छान केले. माझा पन्नासावा वाढदिवस गाण्याशिवाय कसा होणार? आणि माझ्या विद्यार्थ्यांनी खरोखरच अतिशय प्रेमाने गाण्याचा छोटा कार्यक्रम सादर केला. माझ्या दोन्ही मुली शर्वरी आणि केतकी या कार्यक्रमात गायल्या. गाण्यावरील प्रेमाचा प्रवाह पुढच्या पिढीपर्यंत पोहोचला होता. मला तरी अजून काय हवे होते? मला पन्नास दिव्यांनी ओवाळण्यात आले. माझ्या सर्व नातेवाईकांनी आणि मित्रांनी अभिष्टचिंतन केले. गाण्यासाठी मला सांगण्यात आले. कोणतीही पूर्वतयारी न करता स्टेजवर होणारा हा माझा पहिलाच कार्यक्रम होता. तसेच कोणतीही मेहनत न घेता आयोजित होणाराही हा माझा पहिलाच कार्यक्रम होता. या सर्व जिवलगांनी एक अलोट समाधान मला दिले. छोट्या केतकीने 'हॅप्पी बर्थडे बाबा' असे स्वतः रंगवलेले ग्रिटींग कार्ड मला दिले. आत्तापर्यंत मला मिळालेली ही वाढदिवसाची सर्वात मोठी गिफ्ट होती.

    -अनिरुद्ध जोशी

  • माकड,माणूस आणि संवेदनशीलता!

    नुकतीच एक अस्वस्थ करणारी बातमी मी वाचली. प्रसंग असा घडला. मोठ्या शहरातील एका कचराकुंडीजवळ एक वृद्ध माणूस निपचित पडला होता. काही लोकांनी त्याची विचारपूस करीत त्याला मदतीची तयारी दाखवली.परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या माणसाने लोकांच्या दयेस स्पष्ट नकार दिला.