(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • एक समाधानी योगदान

    सकाळची वेळ, अचानक चौघेजण माझ्या घरी आले. त्यांचे चेहरे परिचीत होते. त्यानी पुष्पगुच्छ व पेढ्यांचा पुडा आणला होता. " सर आज आम्ही चौघेही रुग्णालयामधून निवृत्त झालो. आमची नोकरी केवळ तुमच्यामुळेच होती. तुमचा आमच्या जीवनामधील सहभाग आम्ही केंव्हाही विसरु शकत नाही. " त्यानी ती भेट देत वाकून नमस्कार केला. मी भारावून गेलो. गहीवरलो. माझे डोळे पाणावले.

    सहजगत्या घडलेले, सकारात्मक दृष्टीकोणातून केलेले एखादे काम, मानसामध्ये ऋणानुबंधाची भावना निर्माण करु शकतात. हे प्रथमच जाणले होते. माणस कांहीही करत नसतात. ईश्वर त्यांच्याकडून करुन घेतो, ह्याची मला त्या क्षणाला जाणीव झाली. छोटीशी कामे आपण करतो. परंतु जेंव्हा त्याची व्याप्ती महान होत जाते, त्यालाच नैसर्गिक योजना म्हणतात. सर्वांच्या चेहरय़ाकडे बघून मला तो ४० वर्षापुर्वीचा काळ आठवला.

    एक प्रसंग १९७० च्या सुमारास घडला होता.

    आपल्या प्रलंबीत मागण्या धसास लावण्यासाठी महाराष्ट्र त्रितीय-चतूर्थ कर्मचारय़ानी संप पुकारला. जवळ जवळ ११ दिवस तो संप चालला. एकजुटीचे त्यात दर्शन घडले. बरय़ांच मागण्या मान्य झाल्या. त्या काळांत मी ठाण्याच्या मनोरुग्णालयांत उप प्रमुख (RMO) म्हणून कार्यारत होतो. माझे वरीष्ठ वैद्यकीय अधिक्षक होते. मध्यरात्रीला संप सुरु झाला. संपाची नोटीस आमच्या कार्यालयाला देखील प्राप्त झाली होती.

    मनोरुग्णालयाचा भव्य परिसर, ५० हून जास्त वार्डस, त्यावेळी रुग्णसंख्या जवळ जवळ २००० होती. कर्मचारी संख्या ७०० च्या वर होती. सर्व व्यवस्थेचा भार फक्त १० आधिकारी व्यक्तीवरच होता.

    सर्व बाबींची जसे रुग्णांचे जेवण खाण, औषधी ह्या आम्ही कांही कॉंट्र्याक्टर्स नेमुन तातडीने करुन घेतले. परंतु रुग्ण व त्यांतही मनोरुग्ण, म्हणून मणूष्यबळ ही प्राथमिक गरज होती. पोलिस खात्याने आम्हास २५ पोलिस कॉन्सटेबलस व एक इन्स्पेक्टर मदत म्हणून देऊ केले होते. हे सारे बिन अनुभवी तर होतेच, परंतु त्यांचा संबंध मनोरुग्णाशी प्रत्यक्ष येणार असल्यामुळे सर्वजण प्रचंड दबावाखाली वाटले. चांगलेच घाबरलेले होते. इन्स्पेक्टर तर म्हणाले " आम्हाला चोरट्याना, गुंडांना वठनीवर आणण्यास सांगा. आम्ही सर्व ताकतीने करुं. पण हे मनोरुग्ण आमच्यासाठी भिन्न, अनिश्चीत असल्यामुळे एक प्रकारची भिती व शंका वाटते. तरी आम्ही तुमच्या मार्गदर्शनाप्रमाणे करुत. "

    रुग्णसंख्या, आणि कामाचा व्याप बघतां मणूष्यबळ अत्यंत कमी पडू लागले. एखादी दुर्घटना वेगळाच Turning Point बनु शकेल. ही भिती उत्पन्न झाली. शासनानी आम्हास ज्या गोष्टींची तातडीने गरज लागेल ते करुन घेण्याचे आदेश दिले होते. वरीष्ठांचा सतत संपर्क चालू होता.

    सर्वात महत्वाची नी तातडीची गरज होती ती मनुष्य बळाची. आम्ही वरीष्ठांशी संपर्क साधला. व त्यांना कमीतकमी १५० लोकांना मदतीसाठी तात्पूरते ( हंगामी ) घेण्याची परवानगी घेतली. हाती वेळ थोडा. मी स्वतः लगेच आनंद नगर, समतानगर, भिमनगर, वर्तक नगर, लोकमान्य नगर ह्या त्या काळातल्या कामगार वस्त्यामध्ये गेलो.

    मनोरुग्णालयासाठी मदत करणारय़ा व्यक्तींची रोजंदारीने गरज असल्याचे कळविले. बघता बघता बातमी सर्वत्र पसरली आणि कामगार स्वयंसेवकाची रांगच लागली. आम्ही त्यावेळी बहूतेकाना मदतीसाठी घेतले. ग्रुप ग्रुप करुन वेग वेगळ्या वॉर्डसाठी नेमले.

    ठराविक चाकोरीबद्ध व रुग्णांची शारीरिक काळजी घेण्याची जबाबदारी त्याना दिली. सतत मार्गदर्शन करीत गेलो. आधिक्षक स्वतः वरीष्ठांशी व सरकारशी संपासंबंधीत सल्लामसलत व Up-Dated Information and getting guidance ह्यात व्यस्त होते. उप प्रमुख ह्या नात्याने मी व माझे सर्व सहकारी यांनी रुग्णालय, रुग्ण आणि सर्व स्थानीक कामे सांभाळली. अतिशय धावपळीत परंतु सर्व शिस्तशीर तो संपाचा काळ गेला.

    संप संपला. बरय़ाच मागण्या मान्य झाल्या. त्याच वेळी माझ्या हे लक्षांत आले की संपकाळांत आम्हास जवळ जवळ १२५ बाहेरच्या तरुण कामगारांनी खूप मदत केली होती. एकदम नविन व तथाकथीत मनोरुग्णाच्या अपरिचीत भयानक वातावरणांत हे सर्व लोक आपले जीवन घोक्यांत घालून रात्रंदिवस मनोरुग्णासाठी कष्ट करीत होते. रात्र रात्र जागून काढल्या. जे नियमीत कामगार रुग्णसेवा करीत होते, त्यापेक्षाही तसूभर जास्त सेवा ही नविन मंडळी उत्साहाने करीत असल्याची जाणीव मला झाली होती.

    त्या वेळी हे काम मजवरच वरिष्ठाकडून सोपविण्यात आले होते. त्यांत संपस्थितीचा सर्व आढावा रिपोर्ट तयार करणे व तो त्वरित संबंधीत अधिकारय़ाना वा सरकारला मिळेल हे बघत होतो. मी स्वतः त्या वेळची संप परिस्थिती, तत्कालीन व्यवस्थापना आणि विषेशकरुन हंगामी आणलेल्या सर्व कामगार संबंधीची अमुल्य मदत कार्य यांचे वर्णन सुद्धा होते. ह्याच वेळी एक महत्वाची नोंद व टिपणी केली गेली. ह्या सर्व हंगामी मदत करणारय़ा कामगाराना त्यांचे इनाम म्हणून शासनांत समावून घ्यावे. मी माझ्या आढावा रिपोर्टच्या प्रति वरिष्ठा बरोबर मंत्रालयांत स्थानिक आमदारामार्फत पाठपुरावा केला.

    सर्व हंगामी कामगारांचे नशिब चांगले होते. सरकारने स्पेशल नोटीफिकेशन काढले. मनोरुग्णालयांत संपकाळांत मदत करणारय़ा कामगारांना शासकिय नोकरीमध्ये समावून घेण्याचा निर्णय घेण्यांत आला. तसा आदेश आमच्या रुग्णालयास प्राप्त झाला. ज्या कामगारांनी त्या काळांत मदत केली, त्यांची त्वरित वैद्यकीय तपासणी व पाठविलेला नमुना फॉर्म भरुन सादर करण्याचे सांगण्यात आले होते. कामगारांची तपासणी, छाननी. व निवड ही कामे मजवरच सोपवली गेली. आम्ही दोन दिवसांतच सर्व सोपस्कार पुर्ण केले व १०१ हंगामी कामगारांचा अहवाल संबंधीतांकडे पाठविला. थोड्याच दिवसांत सर्वांच्या नेमणूकांचे शासनाचे पत्रक मिळाले.

    मी एक अत्यंत साधा व दुय्यम दर्जाचा ( त्या वेळी ) वैद्यकीय आधिकारी, परंतु केवळ निर्माण झालेल्या आपत्तीजनक परिस्थितीमध्ये एकाग्रतेने लक्ष देऊन, एक वेगळीच वातावरण निर्मीती करुं शकलो. कर्मचारय़ांचा संप, मनोरुग्णालयातील सेवा विस्कळीत होणे, प्रचंड संख्येनी असलेले मनोरुग्ण, मणुष्य बळाची आपत्तीजनक गरज, निरनिराळ्या कामगार वस्त्यामधून स्वतःजाऊन बोलावून आणलेले कामगार, त्याच्याकडून घेतलेली सेवा,

    आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे त्या कामगारांचा शासकीय सेवेत कायम समावेश होण्यासाठी स्थानिक आमदारामार्फत यशस्वी प्रयत्न हे मी माझ्या जीवन प्रवाहांत केंव्हाच विसरणार नाही.

    हीच ती मनोरुग्णालयामधली चार कामगार वर्ग मंडळी, तो दिवस केंव्हाच विसरु शकत नव्हती, ज्याना मी जाऊन बोलावून कामासाठी नेले होते. त्यांचे आणि अशाच इतर १०१ जणांचे जीवन त्या रुग्णालयाच्या वातावरणात रुजले, फुलले, आणि फळले होते. एक निमित्य वा ईश्वरी हस्तक म्हणा मी फक्त बिया घेतल्या व योग्य जमिनीत पेरल्या. शेवटी झाडे आपल्याच पद्धतीने वाढतात व फोफावतात. त्या १०१ जणांचे रोपण हेच माझे समाधानी योगदान नव्हे कां ?

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      May 9, 2016


  • कावळे (कथा) – भाग 1

    उपनगरातील भर वस्तीत, आजूबाजूला नवीन नवीन भव्य काँक्रिटच्या इमारतींच्या गराड्यात हा आमचा एकमेव बंगला, वासंती व्हिला’. येणाऱ्या जाणाऱ्यांच्या डोळ्यात भरल्याशिवाय रहात नाही. एखादं मरायला टेकलेलं जनावर, कधी मरतंय याची वाट पाहत, आजूबाजूच्या परिसरात, कावळे वाट पाहत बसतात तसे ‘बिल्डर’ नावाची आधुनिक कावळे जमात या बंगल्यावर डोळा ठेवून आहे. अर्थात मी चांगला खमक्या आहे आणि जोपर्यंत मला ‘वासंती’ची साथ आहे तो पर्यंत तरी मी या कावळ्यांना अजिबात भीक घालणार नाही, घालतही नाही.

      July 14, 2022


  • तिकडचे अन् इकडचे

    काही गोष्टींना कसा योगच यावा लागतो, तेव्हा त्या घडतात. जसे मुलीचे लग्न. योग आला की चटकन् dजमते नाही तर चपला झिजवून झिजवून वधुपिता कसा रडकुंडीला येत असतो. आमच्या कुंडलीत पण परदेशगमनाचा योग लिहिलेला असावा म्हणूनच मुलगा अन् सून हाँगकाँगला गेल्यावर आम्ही उभयता कॅथे पॅसिफिकच्या विमानाने एका संध्याकाळी हाँगकाँगला येऊन पोहोचलो.
    बेटसमूहांचा बनलेला हाँगकाँग हा आता चीनच्या ताब्यात आला आहे; पण ब्रिटिशांच्या वेळेस असलेला हाँगकाँग आता चीनने तसाच ठेवलेला आहे. तेथील स्वच्छता कशी वाखाणण्यासारखी आहे. ती तर आम्हाला लहान मुलांपासूनसुद्धा दिसली. येथील मुले च्युईंगगमचा राहिलेला भाग व्यवस्थित वरच्या आवरणात गुंडाळून डस्टबीनमध्ये फेकताना आढळली. येथे सिगारेटझोनमध्येच लोक सिगारेट ओढतात व थोटके डस्टबीनमध्ये टकतात. पान खाणे नसल्याने पिंक टाकणे हा भाग येथे दिसत नव्हता. काम व्यवस्थित करणे हे सगळ्यांच्या कसे रक्तात भिनलेले आढळले. सकाळी झाडझूड करणाऱया स्त्रिया न बोलता आपले काम व्यवस्थित करताना आढळल्या. आम्ही एका मोठ्या मॉलमध्ये एका मजुराला दिवसभर कठडे साफ करताना पाहिले. ते कठडे कसे स्वच्छ चकचकीत दिसत होते. झाडे व्यवस्थित लावलेली दिसत होती. त्यांच्या पालापाचोळ्याची विल्हेवाट दररोज लावली जात होती. मी तर रेल्वेस्थानक, बसस्थानक व मॉलमधील टॉयलेट्स कशी स्वच्छ व दुर्गंधविरहित पाहिली. जनता रहदारीच्या नियमांचा व्यवस्थित आदर करताना पाहिली. पोलीस वॉकीटॉकी घेऊन फक्त सर्व व्यवस्थित चालले आहेत की नाही, हे पाहायचे. `येथे असे केले की इतका दंड होईल' असे बोर्डपण ठिकठिकाणी होते; पण दंड भरताना आम्हाला कोणीच दिसला नाही. व्यायामाची आवड मात्र येथील सर्व स्तरांतील लोकांना असलेली दिसली. `ताई ची' हा व्यायामाचा प्रकार सकाळी 6 ते 8 पर्यंत सर्व लोक करतात. काही रेकॉर्डप्लेअरवर व्यवस्थित व्यायाम करतात, तर काही तलवारी घेऊन व्यायाम करतात. डबलबार, सिंगलबारचा व्यायामपण करणारे दिसलेत. आम्ही एका ठिकाणी तर एका वृद्धाला डबलबारचा व्यायाम करताना पाहिले. ज्यांना हे जमत नाही ते चालण्याचा किंवा धावण्याचा व्यायाम करीत होते. सकाळी चालणारे कसे जोरजोरात हात हलवीत रस्त्यावर चालताना दिसत होते. एकदा तर रात्री 9 वाजता एक युवक समुद्रकिनाऱयाच्या कडेने धावताना दिसला. आम्ही मुलाला विचारले तेव्हा त्याचे उत्तर होते, ``येथे व्यायामाला काळ-वेळ नाही. ज्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तो करतो.''
    म्हणूनच आम्हाला येथे कोणीही पोट सुटलेली व्यक्ती आढळली नाही. सर्व कसे सडसडीत अन् तरुणच दिसायचे. चेहऱयावरून वयाचा अंदाज येत नव्हता. म्हणून मला सुचले-
    या चपट्या चिनी लोकांच्या देशात
    ताई ची हे करतात दररोज लोक
    म्हातारा मग कोणी दिसत नाही
    सर्वच कसे तरुण दिसतात हे लोक
    स्वच्छता तर येथे इतकी की माशापण दिसत नव्हत्या. मी एका मटणाच्या दुकानात टांगलेल्या डुकरावर एकही माशी पाहिली नाही. आम्ही हाँगकाँग पाहून कसे मग आश्चर्यचकितच झालो.
    यथावकाश आम्ही भारतात परतलो अन् आमचे मन कसे प्रत्येक गोष्टीची तुलना करीत राहायचे. वाटायचे, तिकडची स्वच्छता आपल्याकडे केव्हा येईल? मग आम्ही अमरावतीला येऊन पोहोचलो. हळूहळू मन मग पुन्हा येथील गोष्टींना सरावले. कोणी जाताना पानाची पिचकारी मारली, की आम्ही मान बाजूला वळवायचो. मटणाच्या दुकानात कापलेल्या बोकडावर असंख्य माशा बसलेल्या दिसत असूनसुद्धा मांस विकत घेणारे पाहायचो. सकाळी रस्ते झाडताना स्त्रिया काम मध्येच सोडून गप्पा मारताना पाहू लागलो. नो पार्किंगमध्ये तर एकदा पोलिसांची गाडीपण उभी असलेली पाहिली. मुलांना स्वच्छतेचे धडे देण्याऐवजी रस्त्याच्या कडेला प्रातर्विधीला बसवणाऱया स्त्रिया पाहिल्या. वाटले जाऊ द्या, पण काही तरी सुधारणा अजूनही दिसेल अन् मग दिसले- येथे लोक आता व्यायामकडे वळलेले आढळले. सकाळी किंवा संध्याकाळी लोक नियमितपणे फिरताना दिसतात. चांगले वाटले आम्हाला.
    सकाळी एका सलवार-कमीझमधील स्त्रीने रस्त्यात धावताना थांबून आम्हाला `हाय' केले. मग आठवले- अरे, ही तर देशपांड्यांची नेहमी साडीत दिसणारी मंदा. पुढे भेटले रामभाऊ जे दररोज नेहमी सूटबुटात असायचे. आता शॉर्ट पँट- जर्सी व लिबर्टीच्या जोड्यात. वारुअण्णा मात्र मलमलचा सदरा व धोतरामध्येच हिंडत होते. नानकराय सिंधी जोरजोरात हात हलवीत रस्त्याने फिरताना आम्ही पाहिला. शेजारच्या म्हाताऱया सिंधुताईही हिंडताना दिसल्या. ही सर्व मंडळी मग मालटेकडीच्या माथ्याकडे सकाळी सकाळी चालली होती. असेच पुष्कळसे लोकपण त्यांच्याबरोबर चढाव चढून व्यायाम करताना दिसले. आम्हाला खूप बरे वाटले म्हणून आम्ही खालीच एका झाडाखाली बसलो. थोड्या वेळाने व्यायाम करणारी मंडळी मालटेकडीवरून खाली उतरली. ते सर्व आता खाली बाजूला उभ्या असणाऱया हातगाड्यांकडे वळले. सर्व जण मग सामोसा, मिसळ, चहा घेत बसून श्रमपरिहार करीत होते. रामभाऊ सिगारेट फुंकत मंदाबरोबर गप्पा मारीत होते, तर मंदाताई मिसळ खात होत्या. सिंधुताईंनी गरमागरम सामोसे बांधून घेतले होते.
    असा प्रकार आम्ही तिकडे कुठेच पाहिला नव्हता; म्हणून आम्ही दोघे एकमेकांकडे पाहून हसलो. मी मग हसत हसत म्हणालो,
    चलता है चलने दो
    जो होना है वह होने दो
    अब तो हमे सिर्फ खाना है
    हम अब बहुत थक गये है
    एकंदरीत तिकडचे तिकडे अन् इकडचे इकडे हेच खरे!

    रमेश इंगोलीकर, अमरावती

    -- किशोर कुलकर्णी

      May 17, 2006


  • अभंग

    आवडीने भाव हरि-नाम घेसी ।
    तुझी चिंता त्यासी सर्व आहे ।।

    नको खेळ करु कोणत्या गोष्टीचा ।
    पति तो लक्ष्मीचा जाणतसे ।
    संकळ जीवांचा करितो सांभाळ ।।
    तुज मोकलील ऐसे नाही ।।

    जैसी स्थिती आहे तैशा परि राहे ।
    कौतुक तू पाहे संचिताचे ।।

    एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा ।
    हरिकृपे त्याचा नाश झाला ।।

      June 11, 2026


  • बूमरॅंग

    काही वर्षांनी दिपक इतका आळशी झाला की, त्याचे सहीपासूनचे सर्व व्यवहार संतोषच सांभाळू लागला. संतोषला काही वेळा, एक विचार सतावत रहायचा की उद्या दिपकनं आपल्याशी भांडून हाकलून दिलं तर आपली अवस्था अतिशय वाईट होईल.. त्यासाठी एकदा त्यानं दिपकला विनंती केली की, माझ्या नावावर ठेवायला काही पैसे देतोस का? त्यावर दिपक म्हणाला अरे, सर्व पैसे तुझ्याच खात्यावर असताना अजून तुला काय हवं? संतोष हे ऐकून, गप्प रहायचा..

      June 19, 2022


  • अनोळखी

    काम करायच असेल तर या आठवड्यात सुरु कर, नाही तर दुसरा माणूस बघतो! ‘नक्की करतो म्हणाला’ आणि आगाऊ रक्कम घेऊन पसार झाला. दहा दिवस पत्ता नाही. त्यानंतर आला. कुठे गळत होतं तिथे बाहेरच्या बाजूने प्लॅस्टर काढून गेला. जखमेवरची पट्टी काढून डॉक्टरने जेवायला निघून जावं तसा.

      May 28, 2022


  • क्रांतिसूर्य स्वातंत्र्यवीर सावरकर कारातीर्थ

    रत्नागिरीकर भाग्यवान, कारण स्वातंत्र्यदेवतेचा साक्षात अवतार या भूमीत राहून गेला . ज्याच्या कर्तृत्वाला , त्यागाला , विजिगीषू वृत्तीला देशभक्तीला , दूरदृष्टीला , विज्ञानवादी दृष्टिकोनाला , साहित्याच्या सर्व प्रांतात निष्ठेने दिलेल्या योगदानाला , जिद्दीला, साहसाला आणि अतुलनीय अशा त्यागमूर्तीच्या अविस्मरणीय कर्तृत्वाला प्रतिमा प्रतीकं आणि शब्दात साकारणं म्हणजे गगनाला गवसणी घालण्याएवढं अवघड काम !

    आपण सूर्याच्या दाहकतेला स्पर्श करू शकत नाही, पण क्रांतिसूर्याच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या

    कारातीर्थाचे

    दर्शन घेऊन मनोमन कृतज्ञता व्यक्त करू शकतो ना ?

    २६ फेब्रुवारी ही क्रांतिसूर्य विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी !

    आपण सर्वांनी रत्नागिरीच्या तुरुंगात निर्माण झालेल्या कारातीर्थाला जायला हवं . दर्शन घ्यायला हवं . मनोबल जागवायला हवं . वाढवायला हवं .

    सावरकर अभिवादन यात्रा आणि सावरकर विचार यांची एक चळवळ सुरू व्हायला हवी.
    आपलं हे कर्तव्यच आहे, आपण आपल्या कुटुंबियांसह दर्शन घ्या.
    स्मार्टफोन मध्ये गुंतलेल्या आपल्या तरुण पिढीला सांगा…
    रत्नागिरी बाहेर असलेल्या सर्वाना, येणाऱ्या पर्यटकांना, पाहुण्यांना, महाराष्ट्रातील सर्वाना सांगा…

    रत्नागिरीत कारातीर्थ आहे,त्याचं दर्शन घ्या, तिथे असलेल्या बेड्या, साखळदंड यांना कृतज्ञतेने स्पर्श करून स्वातंत्र्यवीर सावरकर यांना विनम्रतेने अभिवादन करा.

      January 20, 2026


  • शिकण्याचं वय!

    ही गोष्ट आहे भगवान रजनीश यांची. ओशो यांची. मानवाला प्रेम आणि शांती यांचा संदेश देणार्‍या आध्यात्मिक गुरूंची. खरंतर
    त्यांचं विपुल साहित्य जगात सर्वत्र उपलब्ध आहे. त्यांच्या कॅसेट आणि व्हिडिओ, सीडीच्या माध्यमातून त्यांचं चालणं, बोलणं
    पाहता, ऐकता येतं. तरीही त्यांची ही गोष्ट पुन्हा एकदा सांगाविशी वाटतेय.
    ओशो एकदा समुद्र प्रवासाला निघाले होते. प्रवास मोठा होता आणि काही दिवस जहाजावरच राहायचे होते. वाचन, संवाद आणि
    डेकवरची भ्रमंती हा त्यांचा छंद किवा त्यावेळी वेळ घालविण्याचं साधन. डेकवरनं फिरत असताना अनेक देशांचे, विविध
    वयोगटांतील आणि भाषेची माणसं भेटायची. काहींशी बोलणं व्हायचं तर काही केवळ स्मितहास्यानंच संवाद साधायचे. डेकवरच
    एका बाजूला एक वृद्ध गृहस्थ एका टेबलाशी बसलेला असायचा. काहीवेळा त्याचं वाचन सुरू असायचं, तर काही वेळा तो लिहीत
    असायचा. त्याचं लिहिणं म्हणजे एका पुस्तकात पाहायचं अन् लिहायचं असं होतं. समाधी लागावी अशी त्याची ती स्थिती
    असायची. जवळपास कोणी आहे, नाही, आवाज येत आहेत या कशाचंही भान नसायचं त्याला. भगवान रजनीश तेव्हा एवढे
    सर्वदूर ख्यातकीर्त झालेले नव्हते. त्या वृद्धाशी बोलावं असं त्यांना वाटे; पण त्याची समाधी पाहून ते पुढे जात. एके दिवशी मात्र
    त्या वृद्धाशी संवाद साधायचाच असं त्यांनी ठरविलं. ते त्या वृद्धाकडे पाहातच आपली शतपावली करीत होते. त्याला त्रास होणार
    नाही, अशा अंतरावर थांबून त्याच्याकडे पाहात होते. अखेरीस एका क्षणी त्यानं मान वर केली अन् रजनीश म्हणाले, ‘‘माफ

    करा, पण मी इथं तुमच्यासमोर बसू शकतो का?’’ त्यानं मानेनंच होकार भरला. रजनीश बसले. आता संवाद

    साधायचा होता.

    भगवान

    म्हणाले, ‘‘मी काही दिवस झाले तुमच्याशी बोलू इच्छितोय. तुम्ही हे नेमकं काय करातय?’’ तो वृद्ध म्हणाला, ‘‘मी

    चिनी भाषा शिकतोय.’’ चिनी भाषा शिकायला खूपच अवघड हे रजनीश जाणून होते. ते म्हणाले, ‘‘तुम्हाला लिहिता येते?’’ तो
    वृद्ध म्हणाला, ‘‘ नाही, अजून नाही; पण आता मला कोणी बोललं तर ती कळते. काही शब्द मी बोलूही शकतोय; पण लिहिणं,
    शिकायला वेळ लागेल अन् भाषेवर प्रभूत्व मिळवायला त्याहूनही अधिक काळ लागेल.’’ ‘‘किती दिवस झालेत तुम्ही ही भाषा
    शिकायला लागून?’’ रजनीशांनी प्रश्न केला. ‘‘तीन वर्षे झालीत. आणखी वर्ष-दोन वर्षांत लिहायला शिकेन. मग आणखी दोन
    वर्षांत त्या भाषेतलं उत्तम साहित्य वाचीन. मग मला खर्‍या अर्थाने चिनी भाषा अवगत होईल, असं वाटतं.’’ रजनीशांनी त्या
    वृद्धाकडे पाहिलं... पंचाहत्तरी तर नक्कीच पार केलेली असावी त्यानं अन् तो आणखी पाचेक वर्षांचं भाषा शिकण्याचं नियोजन
    करीत होता.
    रजनीशांना राहावलं नाही. त्यांनी विचारलं, ‘‘माफ करा; पण तुमचं वय काय असेल?’’ तो वृद्ध म्हणाला, ‘‘ऐंशी!’’ भगवान
    आश्चर्यचकित झाले व म्हणाले,‘‘भाषा अवगत व्हायला आणखी पाच वर्षे लागणार. म्हणजे, जेव्हा तुम्ही या भाषेवर प्रभूत्व
    मिळवाल तेव्हा तुमचं वय पंच्याऐशी असेल.’’ तो वृद्ध म्हणाला, ‘‘हो, खरंय ते,’’ भगवान म्हणाले, ‘‘इतकी वर्षे शिकल्यानंतर
    त्या शिक्षणाचा वापर किती वर्षे करू शकाल असं तुम्हाला वाटतं?’’ आता तो वृद्ध सावरून बसला, म्हणाला, ‘‘बरोबर आहे तुमचा
    प्रश्न. मी किती वर्षे त्याचा वापर करू शकेन? तुम्ही विद्वान दिसता. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. माझा जन्म झाला तेव्हा मला
    कोणीही सांगितलं नव्हतं, की मी ऐंशी वर्षे जगणार आहे. आजही मला कोणी ठामपणे असं सांगत नाहीये, की मी पाचच वर्षे
    जगणार आहे. मी किती जगेन हे तुम्ही सांगा. मग मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईन.’’ भगवान रजनीश म्हणाले, ‘‘मी तुम्हाला
    पाहात होतो. तुमच्याबद्दल खूप उत्सुकताही होती; पण एक वृद्ध माणूस म्हणून मी तुमच्याकडे पाहात होतो. आता मला कळलं,
    की तुम्ही वृद्ध नाही आहात. तुम्ही मॅच्युअर्ड यंग आहात!’’
    शिकण्याला वय नसतं आणि तारुण्याला वयाची तमा नसते, याची शिकवण ओशोंच्या या अनुभवावरून सहजी येते. स्वतः
    ओशोंनी हा अनुभव याच आशयासह लिहून ठेवलेला आहे. या विश्वामध्ये माणूस हा विद्यार्थी आहे अन् आयुष्य ही त्याची शाळा.
    अनुभव हे शिक्षण आणि अनुभवातून शिकत जाणं हेच उत्तीर्ण होणं अन्यथा एकाच इयत्तेत ठाण मांडून बसलेले अनेक आपण
    पाहातोच की! एका अनुभवानंतर त्याच त्या चुका करीत नशिबाला दोष देणारे आपण पाहतोच की! आयुष्याच्या शाळेत सतत
    नवनवीन धडे गिरविण्याची तुमची उर्मी कायम राहो आणि तुमचं वर्णनही कोणीतरी ‘मॅच्युअर्ड यंग’ अशा शब्दात करो, हीच
    सदिच्छा!

    -- किशोर कुलकर्णी

      February 15, 2006


  • अरे संसार संसार

    आपले आयुष्य , संसार सुरु झाला की ह्या पायवाटा नि रस्ते पार एकमेकात अडकतात आणि गुंततात आणि तो गुंता इतका वाढतो की तो कोर्टाच्या दारात नेऊन ठेवतो तर कधी आत्महत्या किंवा आणखी काहीव्यसने .

      June 11, 2021


  • महंमद रफी – अष्टपैलू गायकी

    रफींच्या गायनशैलीचा विचार करता काही ठाम मते मांडता येतील. त्यांचे नाव बहुतेकवेळा तयार स्वरी, सुरेल पण काहीशा नाटकी गायनशैलीशी निगडित झाले. अर्थात, यासाठी त्यांचे काही रचनाकार देखील तितकेच जबाबदार आहेत, असे म्हणावे लागेल.

      August 18, 2018