नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
आद्य वाल्मिकी म्हणून ज्यांचा गौरव केला जातो असे महान कवि, गीतकार, पटकथाकार, अभिनेते गजानन दिगंबर माडगूळकर यांचा जन्म १ ऑक्टोबर १९१९ चा. त्यांची जन्मशताब्दी आज संपन्न होते आहे. त्यांनी बालगंधर्वांविषयी लिहिलेल्या ओळी (असा बालगंधर्व आतां न होणे) सुप्रसिद्ध आहेत. त्याच धर्तीवर मी गदिमां विषयी स्वरचित कांही ओळी खाली देत आहे.
वेळेच्या चक्राचा विचार करता कळते, की वेळ ही तीन भागांत वाटली गेली आहे. भविष्य भूत आणि वर्तमान ह्या संकल्पनात. भविष्य हा येणारा काळ. तो अनिश्चीत असतो. म्हणून असत्यात जमा होतो. भूतकाळ हा गेलेला, आता हाती न लागणारा. म्हणून अनिश्चीत होय. त्यालाही असत्य समजले गेले. वर्तमान काळ फक्त निश्चीत, अस्तित्वाची जाणीव देणारा, म्हणून सत्य समजला जातो.
वर्तमान काळाला वेळेत मोजता येते कां? वर्ष, महीना, आठवडा, दिवस, तास, मिनीटे, सेकंद, वा सुक्ष्म असे मायक्रो सेकंद यांत. नाही. कोणत्याही वेळेच्या परिमाणांत नाही. भविष्य येतो, वर्तमानाच्या सीमारेषा छलांग मारीत भूत काळांत जातो. फक्त वर्तमान काळाला सत्य समजले, परंतु त्याला वेळ नसते. त्य़ाचे म्हणजे वर्तमानाचे अस्तित्व असते. परंतु वेळेच्या बंधनात नाही. ज्याला म्हणतात एक सत्य- वेळ रहीत अस्तित्व. It is called Satya ( सत्य ) , The Timeless Reality. दुसऱ्या शब्दांत That Presence is Satya ( सत्य ) – Darshana ( दर्शन ). वेळेच्या बंधनात नसलेल्या काळाचे अस्तित्व.
जर वर्तमान काळ सत्य असून देखील वेळ रहीत होतो, तर त्याच तत्वाने भविष्य काळ, भूतकाळ आणि वर्तमान काळाचे अस्तित्व वेळेच्या बंधनात रहात नसते. दुसऱ्या शब्दांत अस्तित्वाला वेळेच्या मर्यादा नसतात. अस्तित्व हे वेळ रहीत असते. सदैव असते. काल होते, आज आहे, आणि उद्याही असेल. सदा सर्व वेळी, वेळ बंधन रहीत. वर्तमान म्हणजे अस्तित्वाच्या बाबतीत वेळेची संकल्पना फोल ठरते. काल (Past) आज (Present) आणि उद्या ( Future ) ह्या आस्तित्वाच्या कल्पनेनुसार वेळ ही विचारसरणी चुक ठरते. म्हणजे अस्तित्वाच्या विश्लेषणामध्ये वेळ नसते. There is no such thing as time म्हटले आहे.
परंतु वेळेची संकल्पना देह मनाचा विचार करता असते. कारण भूत, भविष्य, आणि वर्तमान काळ देहमनासाठी असतो. म्हणजे त्याना वेळेचे बंधन असते. आम्ही जर असूत तरच वेळेचा (Time) आणि जागेचा (Space )प्रश्न असतो. परंतु त्या अस्तित्वाला काळाचे, वेळेचे वा जागेचे बंधन नसते. जेव्हां मीची ओळख देह मन बुद्धी अहंकार इत्यादीनी केली जाते, तेव्हां माझे वेळ (Time ), जागा (Space)मध्ये अस्तित्व असते. परंतु जेव्हां जीवाला Reality consciousness सत्य जाणीव म्हणून बोलले जाते. तेव्हां ते वेळ (Time) व जागा (Space) ह्याच्या मर्यादेबाहेर जाते. ते Timeless and Space less असते. अर्थात नेहमी व सर्वत्र असते.
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

खरं पहाल तर भुयारी रेल्वे हा एकच मार्ग आहे. काही कोटीत ती वीस-पंचवीस वर्षापूर्वी तयार झाली असती. आता हजारो कोटी लागतील. त्यावेळी का झाली नाही? उत्तर नाही. गेटवेपासून उरणपर्यंत पूल का बांधला नाही? उत्तर नाही. या शहराच्या कोणत्याच प्रश्नाला उत्तर नाही.
ओ’ हेन्रीच्या The Skylight Room’ या इंग्रजी कथेचे मुक्त रूपांतर
आज १२ जानेवारी २०१८. स्वामी विवेकानंदांची १५५ वी जयंती. १२ जानेवारी २०१२ ला त्यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष सुरू झाले. त्यादिवशी एका कार्यक्रमांत मी वक्ता म्हणून त्यांच्या जीवनावर दीड तास बोललो. ४० मिनिटे बोलायचे होते पण माझे बोलणे पूर्ण होईना.
आश्विन वद्य त्रयोदशीचा दिवस ‘धनतेरस’ या नावाने वाखाणला जातो. तेरस याचा अर्थ तेरा! म्हणून त्रयोदशीला बोली भाषेत तेरस म्हणू लागले.
धनतेरस ह्या दिवसाला बायकांची दिवाळी असेही म्हणतात. कारण या दिवशी प्रभातकाली घरातील सर्व स्त्रिया व मुली अभ्यंगस्नान करतात. धनतेरस या सणामागे प्राचीन काळची एक कथा जडलेली आहे.) प्राचीन काळी यमुना नदीच्या काठी हरीतपूर नावाची एक नगरी होती. तेथे हंस नावाचा एक राजा राज्य करीत होता. तो मोठा शूर व प्रजाहितदक्ष होता.
हळदीला आर्केस्ट्रा ठेवलेला, पहाटे साडे तीन वाजेपर्यंत आर्केस्ट्रा चालू होता. साडे अकरा बारा वाजेपर्यंत घरातली लहान पोरं आणि स्त्रिया नाचून नाचून दमले आणि एका मागोमाग एक कमी कमी होत गेले.
एक राजा होता. आपल्या राज्यातील जनतेबाबत त्याला अतिशय काळजी होती. त्यामुळे जनतेच्या हितासाठी त्याचे सदैव प्रयत्न चालू असायचे. शिवाय हा राजा शब्दाला जागणारा होता. त्याच्या तोंडून कोणाला शब्द दिला गेला तर तो आपला शब्द खरा करून दाखविल्याशिवाय मुळीच राहायचा नाही. त्याचा प्रधानही अतिशय हुशार होता. त्यामुळे राजाचा राज्य कारभार सुरळीत चालू होता. एकदा राज्यात मोठा दुष्काळ पडला. त्यावर उपाययोजना करण्यासाठी म्हणून राजाने राजधानीतील सर्व प्रमुख नागरिकांची एक बैठक बोलावली. बैठक सुरू होताच राजाने सुरुवातीलाच सांगितले की, तुम्ही सर्व माझ्या भावासारखे आहात. आपल्या राज्यावर दुष्काळाचे संकट कोसळले आहे. त्याहून मार्ग काढण्यासाठी तुम्हाला जे उपाय सुचतील ते तुम्ही सांगू शकता. त्या बैठकीला नगरातील एक लबाड सावकारही उपस्थित होता. त्याने राजाचे भाषण लक्षपूर्वक ऐकले होते. राजा शब्दाला जागणारा आहे, हेही त्याला माहीत होते. त्याचा फायदा घेण्याचे त्याने या वेळी ठरविले. त्यामुळे त्याची पाळी येताच तो सावकार म्हणाला. राजेसाहेब तुम्ही आताच आम्हा सर्वाना भावासारखे मानले आहे. त्यामुळे मी आता तुमचा भाऊ झालो आहे. त्यामुळे तुमच्या संपत्तीत माझाही वाटा आहे. त्यामुळे तो वाटा मला आत्ता तुम्ही द्यावा. सावकाराची मागणी ऐकून बैठकीतील सारेचजण अचंबित झाले. आता राजा कोणता निर्णय घेणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले. तेवढ्यात बैठकीला उपस्थित असलेले प्रधान म्हणाले की, आपले राजेसाहेब शब्दाला जागणारे आहेत. त्यामुळे ते आपल्या संपत्तीचा वाटा सावकाराला देतीलच, परंतु ' भाऊ' म्हणून सावकाराचेही काही कर्तव्य आहे. राज्यावर दुष्काळाचे संकट आले आहे, त्यामुळे ते निवारण्यासाठी सावकार आधी आपली सारी संपत्ती राजाला दान करतील, अशी आशा आहे. बैठकीतील लोकांनी टाळ्या वाजवून प्रधानांच्या वक्तव्याला संमती दिली. लबाड सावकार मात्र चरफडत राहिला. राजाची अर्धी संपत्ती मिळविण्याच्या हव्यासापोटी त्याला स्वतःची संपत्ती गमावण्याची पाळी आली होती बैठकीनंतर सर्व गेल्यानंतर राजाने आपल्या हुशार प्रधानाला शाबासकी दिली.
कालची रात्र प्रचंड अस्वस्थतेत गेलेली .
मन सुन्न आणि मेंदू बधीर अवस्थेत गेलेला .
डिलीट केल्यानंतरसुद्धा अजूनही
व्हिडिओतले ते दृश्य डोळ्यांसमोर सारखं उभं राहतंय .
भयभीत करणारं .
हृदयाचे ठोके थांबवणारं .
नजरेत अंगार निर्माण करणारं.
पृथ्वीतलावर जीव सृष्टी निर्माण झाल्यापासून प्रत्येक गोष्टीमध्ये पदोपदी भेदभाव दिसून येतो. मानवात तर तो अतिशय मोठ्या प्रमाणात दिसतोच. परंतु मुक्या प्राण्यांमध्ये सुध्दा दिसतो.
Copyright © 2025 | Marathisrushti