नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
जीवनाच्या एखाद्या प्रसंगी वेळ ही तिचे महत्व अतिशय कौशल्याने आपल्या मनावर बिंबवते. हा क्षण चुकला, हा क्षण मिळाला असता तर असे झाले असते. हा वाक्प्रचार त्याच मुळे झालेला वाटतो. केंव्हा केंव्हा तर तुमच्या संपूर्ण आयुष्याचे मोल ठरविण्याचे कार्य तो एक क्षणच करतो.
विकीमध्ये गेलं की, दोन पाठमोरे काॅम्प्युटर ऑपरेटर एकामागे एक बसलेले दिसतात. त्यातील पहिल्याकडे मी पेनड्राईव देतो. तो ‘स्माईल’ देऊन माझी फाईल ओपन करतो. डिझाईन मधील मजकूर वाचतो. कुठे शुद्धलेखन चुकलं असेल तर नजरेस आणून देतो. प्रिंट सोडतो. आत जाऊन प्रिंट आणून देतो. वेळ असेल तर त्याच्या कलेक्शनमधील, काही फोटो पेनड्राईव्हमध्ये लोड करुन देतो. हे सर्व आपुलकीने करणाऱ्या माझ्या मित्राचं नाव आहे. सावंत ‘विकी’!
टीव्हीवर एकामागून एक चॅनलची सुरू असलेली ढकलगाडी एकदम मुन्नाभाई एम बी बी एस वर येऊन थांबली .. त्यात “जादू की झप्पी” चा प्रसंग सूरु होता . यानी त्या शाळेच्या पुस्तकातून नजर वर करत टीव्हीकडे बघितलं आणि गालातल्या गालात थोडा हसला . बायकोनी हेरलं ते .

माझी ToDo लिहायची सवय फार पूर्वीपासूनची. मी आणि माझी पत्नी राणी, आमच्यामध्ये बाकी गुण समान नसले तरी हा गुण मात्र अगदीच सारखां. अगदी लहान सहान कामेही आम्ही ToDo मध्ये लिहून ठेवतो. घरी घरची ToDo , आणि ऑफिसमध्ये ऑफिसची ToDo. मोठा हुद्दा, मोठा पगार, जास्त कामे, मोठी ToDo. माझ्या ह्या सवयीचा थोडाफार चांगला/वाईट परीणाम माझ्या ऑफिसमधील सहकार्यांवर सुध्दा झालाचं. आणि तेही ToDo लिहू लागले.
कधी कधी तरं हि ToDo फारचं वाढत जाते. मग कधीतरी शनिवारी किंवा रविवारी काही कामे झालीत कि थोडी कमी होऊन बुधवारी परत येरे माझ्या मागल्या. ज्या दिवशी हि ToDo संपेल त्या दिवशी सत्यनारायणाची पूजा घालीन, म्हणतो ! हो पण पूजेची कामे आलीतच कि ToDo मध्यें.
या दोन-तीन महिन्यानंतर मी गाण्याचे काम पुन्हा सुरू केले. विवेक देशपांडे यांच्या ‘निष्पाप’ या मराठी चित्रपटासाठी विश्वास पाटणकर यांच्या संगीत दिग्दर्शनामध्ये मृदुला दाढे-जोशी बरोबर एक द्वंद्वगीत मी रेकॉर्ड केले. याचवेळी विश्वास पाटणकर यांचा मुलगा मिथिलेश पाटणकर याने कवी ग्रेस यांच्या गाण्याला त्याने बांधलेली अतिशय सुंदर चाल ऐकवली. मिथिलेश त्यावेळी शाळेत होता. सातवी-आठवीत असेल. पण उत्तम संगीतकाराचे गुण वडिलांकडून जन्मजातच त्याने घेतले होते
एखादा पाच किलो वजन घेवून काही अंतर चालतो. त्याचे हात दुखू लागतात. त्याला दम लागतो. थकवा वाटू लागतो. कारण तो त्या त्या अवयवावर तान देत असतो.आणि ती अवयवे तसे दर्शवितात.मात्र मेंदूमध्ये प्रचंड वैचारीक क्षमता असते. त्यामुळे तुमच्या मेंदूला क्षिणता आली हे लगेच होत नसते. मात्र क्षिण झालेला मेंदू ( Fatigued Brain) त्याचे परिणाम इतरत्र पसरवून इतर अवयवावर परिणाम करतो. त्यालाच ' मानसिक तणाव ' म्हणता येईल.
आजकालचे वैद्यकिय शास्त्र तर असे म्हणते की जवळ जवळ सर्वच रोगाचे मूळ हे मानसिक तणावातून उत्पन्न होते. ज्या वेळी त्याच्या म्हणजे उत्पन्न झालेल्या विचार लहरी जशा जशा त्या त्या अवयवावर आघात करतात, ते ते अवयव त्या त्या रोगांचा प्रादुर्भाव झालेला दाखवतात. मग ह्रदय विकार, रक्तदाब डायबेटीस, किडनीचे विकार, डोळ्या, कानाचे विकार वा आतड्यांचे विकार असोत, सर्वांचा केंद्रबिंदू शेवटी वैचारीक जडन-घडनापर्यंत जावून पोहचतो. अर्थात मेंदूचे आपले विकार ह्यातून सूटलेले नाहीत. म्हणून मानसिक तणावाला फार महत्व असते.
मन हे शरीराच्या निरनीरीळ्या अवयांवर कशाप्रकारे परिणाम करते व त्या अवयवाला व्याधीगृस्त बनविते हे आपण आता बघणार आहोत.
भरकटणारे आणि अशांत विचारांचे वादळ मेंदूला त्याच्या क्षमतेपेक्षा अधिक काम करण्यास भाग पाडते. मेंदू थकून जातो. क्षिणता भासते. Fatigue Sense येतो. बेचैनी अवस्था वाढते. आपण त्याला कस् कस् वाटते असे म्हणतो. कुणी त्याला कंटाळा आला म्हणतात. कुणाला ताप आला वाटते. पण ताप मोजता ताप Normal असतो. दिवस कसा सुना सुना निरुच्छाही वाटतो. हे सारे मनाचे मेंदूवर होणारे आघांत. कोणतेही देहकार्य चालते ते उर्जा शक्तिवर. मेंदूवर पडत असलेला मनाचा वाढता तणाव हा देखील मेंदूसाठी जादा उर्जाशक्तीची मागणी करतो. उर्जेचा स्रोत हवा, पाणी, व अन्न ह्या नैसर्गिक घटक पदार्थामध्ये असतो. हे सारे बाहेरुन मिळणारे पदार्थ निरनीराळ्या अवयवामार्फत रक्तात जमा होतात. रक्ताच्या माध्यमातून शरीराला त्याचा पुरवठा होत असतो. मागणी त्याप्रमाणे पुरवठा हे तत्व शरीराला देखील लागू पडते. मेंदूच्या वाढत्या उर्जा मागणीमुळे ह्रदय, फुफूस, आतडी, किडणी, ह्या सर्व अवयवावर ताण पडू लागतो. अर्थात कालांतरानंतर त्या त्या प्रकारचे परिणाम व्यक्त होऊ लागतात. रक्त दाब, डायबेटीस, डोळ्याचे विकार, किडणीचा त्रास, अशी अनेक व्याधी मानसिक तणावामुळे उत्पन्न होतात. वैद्यकिय शास्त्र तर सांगते की जवळ जवळ सर्वच रोगाचे मुळ हे मानसिक तणावांत असते. तणावामुळे अवयव अशक्त बनत जातात. बाहेरुन होणारे आजार हे देखील अशा पिढागृस्त अवयवावरच आघांत करतात. सर्वांचे मुळ असते मानसिक तणाव काही दिवसापूर्वी फिरण्यास गेलो असताना बस स्टँड जवळून जात होतो. माझे एक मित्र एकनाथराव ह्यांची भेट झाली. ते आपली छोटी ब्रिफकेस कुठेतरी गावाला जाण्याच्या गडबडीमध्ये होते.
'' काय गडबडीत आहात? ''
''हो मी जरा नाशिकला जावून येतो. संध्याकाळीच परत येईन. एका यात्रेसाठी देव दर्शनाला जावून येतो ''
बस स्टँडवर प्रवाश्यांची प्रचंड गर्दी होती. अनेक बसेसची ये-जा चालू होती. मी तसा रीकामाच होतो.त्यांना साथ देत त्यांची गाडी येई पर्यंत गप्पा मारीत उभा होतो. गाडी आली, स्टँडवर लागली. सर्व प्रवासी गर्दी करुन गाडीमध्ये शिरण्याचा प्रयत्न करु लागली. तुफान गर्दी. सर्वांची धावपळ जागा पकडण्यासाठी व दारामधून आत शिरण्यासाठी. माझे मित्र एकनाथराव देखील धावून त्या गर्दीत सामील झाले. लोक एकमेकावर तुटून पडले होते. आत शिरण्याची सर्वांची एकच गर्दी. एकनाथराव दारापर्यंत गेले, दारात कन्डक्टर (वाहक) होता. धक्का बुक्कीला तोंड देत ते तिथ पर्यंत गेले. तेथूनच ते ओरडले,
'' कन्डक्टर माझे रिझरव्हेशन आहे. ११ नंबरची माझी जागा आहे. मला आत येवू द्या. ''
मी सर्व गडबड, प्रवाश्यांची गर्दी धावपळ बघत होतो. एकनाथरावांचे मी देखील ऐकले. मी लगेच पूढे गेलो व त्यांचा हात पकडून मागे येण्याची सूचना केली.
ते '' का? '' म्हणून म्हणाले. परंतू मी त्यांना त्या प्रचंड गर्दीतून बाहेर काढले. '' अहो येवढी प्रचंड गर्दी, गोंधळ आहे, तुम्ही इजा करुन बसाल. तुमच्या जवळ रिझरव्हेशन आहे ना? मग तुम्हीपण त्या गर्दीत का जात आहात. ''
बघा हा मानवी स्वभावाचा एक नमुना . एकनाथरावांचे रिझरव्हेशन आहे. त्यांना बसण्यासाठी जागा निश्चीतच दिली जाणार. परंतु कित्येकजण धावपळ करीत, गडबड करीत आपल्या ठरलेल्या जागेपर्यंत जाणार, सिटवर बसणार किंवा सामान पिशवी ठेवणार, मगच त्याना समाधान वाटते, शांतता वाटते. एकदा जागा मिळवली की बस ठिक झाले, ही त्यांची धारणा जागा आरक्षीत केलेली असताना हे महत्वाचे. इतर प्रसंगी असे असू शकेल. मानसीक तणावाखाली राहणारी ही माणस एखादी गोष्ट मिळवणे, मिळणे त्यासाठीचे प्रयत्न समजने योग्य. परंतू ती गोष्ट जर तुम्हाला निश्चीतच मिळत असेल तर मग धडपड कशासाठी एक दुसरे उदाहरण देतो, माझा मित्र डॉक्टर सदानंद लिमये. आम्ही १२ वीत म्हणजे Premedical च्या वेळी तो संपूर्ण राज्यात प्रथम आला होता. कौतुक, बक्षीसे झाली. कॉलेजसाठीच्या प्रवेश पत्रीका भरल्या. सर्वांत प्रथम येणारा म्हणजे वैद्यकीय विद्यालयात जागा मिळणार, ह्यात थोडी देखील शंका नव्हती. ते त्याने केले परंतू त्याच बरोबर साधा B.SC ह्या विषयाचा फॉम भरुन एका सायन्स कॉलेज मध्ये देखील फॉम भरला. आपली प्रवेशाची निश्चीती माहीत असून देखील अशाच पध्दती प्रमाणे अनेक विद्यार्थी निरनिराळ्या शाखामध्ये प्रवेश घेवून ठेवतात. प्रसंगी फी भरुन देखील. विशेष गंमत म्हणजे त्या वेळच्या पध्दतीनुसार जे १० विद्यार्थी प्रथम क्रमांकात उत्तीर्ण होत असत, त्यांना काही वैद्यकीय वा इंजिनीयरींग कॉलेज शुभेच्छा देवून त्या हूशार विद्यार्थांनी त्यांच्या कॉलेज मध्ये प्रवेश घ्यावा हे कळवीले जात असे. सदानंद यालापण हे भाग्य लाभले. म्हणजे इतकी निश्चिती असून देखील त्याने साध्या सायन्स मार्गासाठीदेखील अर्ज भरला होता.
संशय,भिती, अनिश्चीतता हे भावनीक गुणधर्म मानसिक तणाव निर्माण करतात. जे स्वभावाने प्रत्येक गोष्टीत सांशक असतात त्यांना आत्मविश्वास कमी वाटतो. अशाच स्वभावाच माणसे मानसिक तणावाचे बळी पडतात.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
मार्केटला जाण्यासाठी मी घराबाहेर पडलो, खाली रस्त्यावर आलो आणि रिक्षाही पकडली. सहजच माझं लक्ष रिक्षा चालकाकडे गेलं. आणि मी चपापलोच!
आमच्याच कॉलनीत राहणारे परब रिक्षा चालवत होते!
"साहेब, नमस्कार," परब आरशातून माझ्याकडे पहात उद्गारले.
"नमस्कार, परब हे काय नवीन? " मी विचारलं.
"हो, हल्लीच हा एक नवीन उद्योग सुरु केला आहे."
"चांगलं आहे," परबांच्या आवाजातल्या मजबूरीच्या सूराला दूर सारण्यासाठी मी म्हणालो.
रिक्षातून उतरत असताना परबांनी त्यांचं रिक्षा पुराण मला सविस्तर ऐकवलं. आपण रिक्षा का चालवतो याचं परबांनी दिलेलं स्पष्टीकरण ऐकून मी हबकूनच गेलो.
"तुम्हाला माहितच आहे साहेब मी रिटायर होऊन घरीच असतो. सकाळच्या वेळी आमच्या घरात नुसती धांदल उडालेली असते. मुलाला आणि सुनेला कामावर जायचं असतं, नातवडांना शाळेत जायचं असतं, बायको किचनमध्ये कामात गर्क असते. या सगळ्या गडबडीत मीच एकटा घरात निरुद्योगी असतो. त्यात आमची वनरुम किचन. सगळे घराबाहेर पडण्याच्या धांदलीत असताना मी तिथे लोळत पडणं म्हणजे इतरांना अडचण. थोडक्यात सकाळच्या वेळी आपल्यामुळे घरच्यांना अडचण भासते हे माझ्या ध्यानात आलं तेव्हाच मी काहीतरी उद्योग करण्याचं ठरवलं.
परबांचं रिक्षापुराण रंगात आलं होतं. मीही कान देऊन ऐकू लागलो. परब आपली कथा विस्तारने पुढे सांगू लागले.
"सकाळच्या वेळी घरातून बाहेर पडण्यासाठी मी सरळ रिक्षा चालविण्याचं नक्की केलं. आता घरातले उठण्याआधी सकाळी सहालाच मी घराबाहेर पडतो. सकाळी सहा ते दुपारी अकराबारापर्यंत रिक्षा चालवतो. चार पैसे हातात येतात. दुपारी घरी जाऊन जेवतो आणि ताणून देतो. आपण कुठे आणि कधी इतरांना नको आहोत हे जाणून घेतलं आणि त्याप्रमाणे तिथून दूर राहिलं की आपल्याही डोक्याला ताप नसतो आणि इतरांच्याही."
शेवटच्या वाक्याला खदखदून हसत परब रिक्षा घेऊन निघून गेले. मी अवाक् होऊन परबांचं तत्वज्ञान जिरवू लागलो. आपण कुठे आणि कधी इतरांना नको आहोत हे जाणून घेतलं की आपल्या डोक्याला ताप होत नाही आणि इतरांच्याही ! साध्या भोळ्या परबांनी सहजीवनाचं सार अगदी मार्मिक शब्दात मांडलं होतं. आयुष्यात अनेक वाद निर्माण होतात ते आपल्या अनाठायी वास्तव्यामुळे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीत नाक खुपसण्याची आपल्याला सवयच जडलेली असते. अनेकांना फुकटचे सल्ले देण्यात आपण बाकबगार असतो. पण ते सल्ले दुसऱ्यांना हवे आहेत का, आपण सर्व विषयांवर मत व्यक्त करणं गरजेचं आहे का आणि मुख्य म्हणजे आपण सर्व ठिकाणी उपस्थित राहणंही आवश्यक आहे का याचा विचार करणं खरोखरच गरजेचं असतं. दुसऱ्यांच्या कामात आपल्यामुळे व्यत्यय येत असेल, दुसऱ्यांना आपली अडचण भासत असेल तर तिथून शहाणपणानं वेळीच दूर जाणं उत्तम हे परबांचं तत्वज्ञान मला मनोमन पटलं.
सामाजिक कार्यात वावरतानाही अशी नको असलेली अनेक मंडळी आपल्याला भेटतात. ही मंडळी एखाद्या मिटिंगला अथवा सभेला आली की डोकेदुखी आली असेच भाव अनेकांच्या चेहऱ्यावर उमटतात. स्वतःच्या अक्कलहुशारीने समस्या उभ्या करुन इतरांना हैराण करणे हा मंडळींचा स्थायिभाव. एकदा एका संस्थेत एका महिलेने सर्वांनाच असं भंडावून सोडलं होतं. दरवेळी संस्थेच्या मिटिंगला हजर राहून नाना प्रकारचे प्रश्न विचारुन ही महिला सर्वांना गोत्यात आणण्याचा उपद्व्याप करी. सर्व काही मलाच समजतं आणि तुम्ही सर्व मुर्ख आहात अशा पवित्र्यानेच ही महिला सभेत वावरे.
गंमत म्हणजे त्या सभेचे अध्यक्ष त्या महिलेचा सर्व उच्छाद शांतपणे सहन करीत. अध्यक्ष या नात्याने त्यांनी त्या महिलेला कधीच झापण्याचा प्रयत्न केला नाही की दरडावण्याचा. शेवटी भांडून भांडून स्वतःच ती महिला रागाने सभात्याग करुन निघून जाई. एकदा मी त्या महिलेचा त्रास तुम्ही सहन तरी कसा करता असा प्रश्न त्या अध्यक्षांना केला. त्या प्रश्नाला अध्यक्षांनी दिलेलं उत्तर मासलेवाईक होतं. शांत चेहऱ्यावरची सुरकुतीही न हलवता अध्यक्ष उद्गारले-
'मी मनातल्या मनात त्या बाईच्या नवऱ्याचं स्मरण करतो आणि शांत राहतो."
"नवऱ्याचं स्मरण? ते कशासाठी? " मी आश्चर्याने अध्यक्षांना विचारलं.
'मी मनात विचार करतो, तो बिचारा नवरा त्या बाईला आयुष्यभर सहन करतो आहे, तर आपण तासदोनतास तिचा धुडगुस सहन करायला काय हरकत आहे? "
अध्यक्षांच्या त्या उत्तराने मला अनेक गोष्टींचा खुलासा झाला. स्वतःच्या उपस्थितीने इतरांसमोर अडचणी उभ्या करणाऱ्या मंडळींविषयी इतरांच्या मनात कशाप्रकारचे भाव उमटतात याचा प्रत्यय अध्यक्षमहोदयांनी आपल्या उत्तरातून घडविला होता. आपण कुठे नको आहोत ते समजलं नाही की लोक आपली काय किंमत करतात याचं सुंदर विश्लेषण अध्यक्षांनी केलं होतं.
प्राचीन काळी वानप्रस्थाश्रम असे. इहकर्तव्य बजावून मंडळी वानप्रस्थाला जात म्हणजेच संसारातून निवृत्त होत. सर्व कारभार नव्या पिढीच्या हाती सोपवून निवृत्त होणं या संकल्पनेचा आजही गांभिर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. आज माणसाचं आयुष्यमान वाढलं आहे. ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत माणसं ठणठणीत असतात आणि अनेक कामांत सक्रीयाही राहू शकतात.
गंमत म्हणजे सर्व जगात आपल्या देशातच युवकांची संख्याही टक्केवारीने सर्वाधिक आहे.
दुसऱ्या कुठल्याही देशापेक्षा आपल्या देशात युवा पिढीची संख्या अधिक आहे. म्हणजेच आयुष्यमान वाढल्याने आधीच्या पिढीची मंडळीही सुखनैव नांदत आहेत आणि कारभार हाती घेण्यासाठी युवा पिढीही मोठया संख्येने पुढे सरसावते आहे.
या विचित्र सामाजिक समस्येवर उपाय म्हणजे आधीच्या पिढीने स्वेच्छानिवृत्ती स्वीकारुन पुढच्या पिढीच्या हाती कारभार सोपवणं. प्रत्यक्ष वानप्रस्थात जाणं कालबाह्य झालं असलं तरी संसारात राहूनच निवृत्तीची पथ्ये पाळणं. वयस्कांच्या तब्येतीच्या दृष्टीनेही हे बाजूला होणं लाभदायक असतं. आजकाल बहुतेक आजार उद्भवतात ते मानसिक ताणांमुळे. रोगजंतूंमुळे उद्भवणारे बहुतेक आजार आता अॅन्टीबायोटिक्स औषधांमुळे कह्यात आले आहेत. मात्र मनातल्या किंतूंमुळे उद्भवणाऱ्या आजारांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. दुसऱ्याने आपला सल्ला ऐकला नाही की आपलं ब्लडप्रेशर वाढतं आणि त्रास आपल्यालाच होतो. थोडक्यात परबांच्या तत्वज्ञानानुसार आपण कधी आणि कुठे इतरांना नको आहोत हे जाणून घेतलं की आपल्या डोक्याला ताप होत नाही आणि इतरांच्याही. इतरांच्या डोक्याला होणाऱ्या तापाचा विषय बाजूला ठेवला तरी आपल्या डोक्याला ताप होऊ नये म्हणून परबांचं तत्वज्ञान वागणूकीत रुजवणं केव्हाही उत्तम.
-सुनील रेगे

दिवाळीच्या दिवसात, सं.शांतिब्रह्म, सं. घन अमृताचा, सं. ऐश्वर्यवती, यासारख्या माझ्या संगीत नाटकांचे, आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून झालेले प्रक्षेपण, केवळ रत्नागिरी केंद्रमुळेच शक्य झाले. आणि माझ्या आयुष्यातील यशाचा परमोच्च बिंदूसुद्धा आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रमुळेच प्राप्त झाला.
इतक्यात घड्याळाचा टोल वाजतो आणि त्यामुळे आदित्य दचकतो. काही क्षणातच पुन्हा त्याला, त्याच्या आरामखुर्ची हलण्याचा आवाज येतो. इतक्यात थंडीतही आदित्यच्या कानामागून घाम ओघळू लागतो. आदित्य हळूहळू आरामखुर्चीच्या दिशेने निघतो आणि समोर जे काही बघतो, ते बघून त्याची पाचावर धारण बसते.
सहा वर्षांचा एक छोटा मुलगा त्याच्या चार वर्षांच्या बहिणीसोबत मार्केटमध्ये गेलेला असतो. ते दोघे बाजार बघत चाललेले असतात. थोड्यावेळाने भावाच्या लक्षात येते की आपत्री बहीण आपल्याबरोबर नाही. तो शोधाशोध करु लागतो. काही अंतर चालल्यावर एका दुकानासमोर त्याची बहीण उभी असलेली त्याला दिसले.
Copyright © 2025 | Marathisrushti