नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
माझी स्वतःची अशी काही वैशिष्ट्यपूर्ण लेखन शैली नाही. जर का काही साधर्म्य आढळले तर वाचकांनी माफ करावे. साधर्म्य सापडण्याचे एकच कारण की त्यांची प्रवासवर्णने ही मनात इतकी रुजली आहे कि ते सौंदर्य अनुभवताना त्यांच्या लेखना पलीकडे दुसरा विचार सुचला नाही.
आमच्याकडे कुणी पहिल्यांदा आलं की, आम्ही त्याला ‘चंद्रविलास’ मध्ये घेऊन जायचो. त्यावेळी झोरेचे वडील गल्ल्यावर बसलेले असायचे. त्यावेळचे ‘चंद्रविलास’ जुन्या काळातील हाॅटेलचा एक उत्कृष्ट नमुना होते.
मी सकाळी फिरायला जातो, तिथे वाटेत एक नाका लागतो. मी फिरून परतत असतांना तिथे रोजंदारीवर काम करणारे अनेक स्त्री-पुरूष बसलेले असतात. ते गटागटाने बसतात. त्यांचा कलकलाट चालू असतो. रस्ता अडवून मात्र बसत नाहीत. त्या दिवशी त्यांना कुठे काम करायला जायचय हे त्यांना ठाऊक नसतं. पण मनाशी आशा बाळगून ते मजूर तिथे बसलेले असतात.
टळटळीत दुपारी तेनालीरामने एका व्यक्तीला त्याच्या डोक्यावर सूर्यापासून आडोसा करताना पाहून उत्सुकतेने विचारले, “मित्रा तू हे काय करतो आहेस?”
आधुनिक जपानी संस्कृतीवर निश्चितच ‘हिरोशिमा-नागासाकी’चा परिणाम झाला असणारच, आणि तो काव्यात उमटलेला असणारच. त्यामुळे, हल्लीच्या जपानी काव्यात मृत्यूचा उल्लेख येणें अटळ आहे. जपानीत मृत्यूकाव्याला ‘जिसेई’ ( Jisei ) म्हणतात, व अशा काव्याच्या बर्याच anthologies जपानीत आहेत.

गोव्यावरून आल्यावरच विजयचे आयुष्य खऱ्या अर्थाने निरस बेचव आणि निरुत्साही होऊ लागले कारण त्यावेळी विजयच्या जन्मकुंडली प्रमाणे विजयच्या जन्मपत्रिकेत तेंव्हा शनीची महादशा सुरू होती आणि त्याच काळात विजयची शनीची अंतर्दशाही सुरू झाली.
सत्तरीच्या पुढे गेलेल्या वयांत संगणकावर ब्लॉग काढणे, लिखाण करणे, त्यासाठी वाचन करणे, हे सारे सर्व साधारण अपेक्षित नसले तरी ते गैर वाटत नव्हते. येथे कोणतीही गोष्ट, वा यश मिळवण्याची धडपड नव्हती, अपेक्षा नव्हती. आगदी फळाची इच्छा न बाळगता केले जाणारे काम. ह्य़ात मला मिळणार होता फक्त एक आनंद, समाधान आणि व्यस्त राहण्याची कला वा सवय.
आज भारतात सगळीकडेच जी बेशिस्त माजली आहे त्यावर गोष्टीतून केलेलं खुसखुशीत भाष्य….
The Focus च्या जानेवारी 2022 अंकात प्रकाशित झालेला राजू तुलालवार यांचा लेख.
“माझ्या एकट्यासाठी आपल्या गावात शाळा सुरु होणार आहे “., रावसाहेब -मालकांनी स्वत: मला सांगितलाय “, ही गोष्ट भेटेल त्याला चंदर सांगत होता.
Copyright © 2025 | Marathisrushti