नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
१५ मे १९८३ साली कु. राजलक्ष्मी भगवान नाईक ही सौ. राजलक्ष्मी नितीन देशपांडे बनून माझ्या आयुष्यात आली. म्हणून आम्हां उभयतांसाठी हे संमेलन आणि व्यासपीठ जीवनाचा एक अविभाज्य घटक बनून राहिले आहे. त्यानंतर इस्लामपूरला असताना आम्ही नियमित या संमेलनात जात असू.

सराईत गुन्हेगारानाही टेलिफोन ही एक पर्वणीच आहे. प्रत्यक्ष न भेटता गुन्हेगारी करता येते. लोकाना धमकावता येते. खंडणी वसूल करता येते. पोलिसांकडे नसेल इतकी अत्याधुनिक टेलिफोन यंत्रणा या गुन्हेगारांकडे आहे. त्यावर कॉन्फरन्स सेवेपासून रिमोट कंट्रोलपर्यंत सर्वच सोय आहे.
विजया मेहेतांच्या विद्यापीठातील हा आज्ञाधारक विद्यार्थी ! त्यांच्याबरोबर तो “हमीदाबाईची कोठी ” मध्ये दिसला. नंतर पाहिलं बालगंधर्वच्या “पुरुष ” मध्ये- रीमा बरोबर ! याच्या यशाची कमान सतत चढती. सिनेमातही अमिताभ (कोहराम), राजकुमार (तिरंगा) वगैरे तोडीसतोड दिसला. अगदी अलीकडच्या “काला” मध्ये दक्षिण दैवत -रजनीकांत बरोबर कोठेही कमी नाही. स्वतःची अटीट्युड, स्वतःच्या अटी ! मोकळाढाकळा, मध्यंतरी VJTI मध्ये तरुण पिढीशी निवांत गप्पा मारणारा, at ease – पायजमा /झब्बा या मराठी पोषाखाची लाज न बाळगणारा.
२००० सालापासून डिजीटल तंत्रज्ञान आले. इंटरनेटमुळे पाहिजे तो संदर्भ सेकंदात मिळू लागला. जगातील कोणत्याही चित्रकाराची माहिती, चित्रं सहज उपलब्ध होऊ लागली, डाऊनलोड करता येऊ लागली. परिणामी जोशी बुवांचा व्यवसाय कालबाह्य झाला.
माझे वडील पूना हॉस्पिटलच्या आय सी यू त असतानाची, त्यांची शेवटची रात्र मी बाहेर जागवली तेव्हा ” तोच पिता साक्षात मानावा, जन्म देतो तो निमित्त केवळ ” असं मी का पुटपुटत होतो, माहीत नाही ! कदाचित वडील माझी समजूत घालत असतील त्यांच्या या आवडत्या ओळींमधून !
माझं देशपांडेंकडे काही काम होतं. मी देशपांडेंना त्यांच्या मोबाईलवर फोन केला. देशपांडेंनी फोन घेतला. मी माझं नाव सांगितलं व त्यांना बोलण्यासाठी वेळ आहे का ते विचारलं. "आय एम इन अ मिटिंग, आय विल कॉल यू लेटर" देशपांडे दबक्या आवाजात उद्गारले. मी फोन बंद केला. देशपांडे मिटिंग आटोपल्यावर फोन करतील या समजूतीवर मी देशपांडेंच्या फोनची प्रतीक्षा करु लागलो. देशपांडेंचा फोन आलाच नाही. देशपांडेंकडे माझं काम असल्याने त्यांचा फोन येतो की नाही याबाबत माझी चुळबूळ सुरुच हो.....ध्ये एकदोनदा मी मिस्ड कॉल मध्ये देशपांडेंचा फोन आला आहे का हे तपासून बघितलं. देशपांडेंचा फोन आला नव्हता. मी इनबॉक्समध्ये जाऊन त्यांच्याकडून काही मेसेज आला आहे का ते बघितलं. देशपांडेंकडून काहीही मेसेज आला नव्हता. देशपांडे आज कामात असतील, उद्या बघू असा विचार करुन मी देशपांडेंना पुन्हा फोन केला नाही.
दुसऱ्या दिवशी मात्र देशपांडेंच्या ऑफिसची वेळ होताच मी सकाळीच फोन केला. युवर कॉल इज बिअिंग ट्रान्सफर्ड मला फोनवर आवाज आला. फोन कुणा बाईनं घेतला. "मला देशपांडेंशी बोलायचंय' मी त्या बाईला सांगितलं. "साहेब मिटिंगमध्ये आहेत. तुमचा फोननंबर देऊन ठेवा," बाई किनऱ्या आवाजात उत्तरली. खरंतर माझा फोननंबर देशपांडेंकडे होता. परंतु मी विषय वाढवला नाही. शांतपणे मी बाईला माझा फोन नंबर सांगितला, माझं नाव सांगितलं. बाईने फोन नंबर पुन्हा रिपिट केला. मी फोन बद केला. देशपांडेंना आपल्या कामात स्वारस्य आहे की नाही? माझ्या मनात शंका उभी राहिली. काल त्यांनी नंतर फोन करतो म्हणून मला टाळलं होतं, आज तर ते स्वतः फोनवरदेखील आले नाहीत. आता यानंतर पुन्हा देशपांडेंचा फोन आल्याखेरीज त्यांना फोन करायचा नाही हे मी मनाशी ठरवून टाकलं.
देशपांडेंचा नंतर मला कधीच फोन आला नाही. त्या माणसाने आपला साधा फोनदेखील घेतला नाही याची रुखरुख मनाला लागून राहिली.
त्यानंतर बराच काळ लोटला. मी देशपांडेंचं फोन प्रकरण विसरुनही गेलो. एक दिवस अचानक माझा मोबाईल वाजला. कोणाचाही फोन वाजला की मी फोन कोणाचा आहे ते डिस्प्लेवर लगेचच बघतो. सर्व परिचितांची नावे मोबाईलमध्ये सेव्ह केलेली आहेत. अपरिचिताचा फोन असला की फोनवर नंबर येतो. परिचिताचा फोन असला की त्यांचं नाव फोनवर दिसतं. फोनवर देशपांडेंचं नाव होतं. काही महिन्यांपूर्वी घडलेला सारा प्रकार मला क्षणात आठवला. त्यावेळी माझं काम असताना देशपांडेंनी मला टाळलं होतं. आज त्यांचं काहीतरी काम निघालं असावं. ते काय काम आहे हे जाणून घेण्यातही मला स्वारस्य वाटत नव्हतं. मी फोन घेतला आणि दबक्या स्वरात उत्तरलो- "आय एम इन अ मिटिंग, आय विल कॉल यू लेटर." त्यानंतर मी देशपांडेंना कधीच फोन केला नाही. फिटंफाट झाली.
मागे देशपांडेंनी मला टाळलं होतं. आज मी त्यांना कटवलं. त्यांचं माझ्याकडे काय काम आहे हे जाणून घेण्यातही मला स्वारस्य उरलं नव्हतं. जशास तसे उत्तर देता आलं याचं मल समाधान वाटलं. मी खुशीत येऊन मोबाईलमधला रेडिओ ऑन केला. हातानं ठेका धरत मी गाणी ऐकू लागलो.
अलेक्झांडर ग्रॅहम बेलने फोनचा शोध लावला तो माणसामाणसातला सुसंवाद वाढविण्यासाठी. त्याचा तो हेतू शंभर टक्के साध्य झाला आहे. फोनच्या सुविधेमुळे जगाच्या पाठीवर आज कुणीही कुणाशीही थेट संपर्कात राहू शकतो. परस्परांची हालहवाल पुसणं, परस्परांना महत्त्वाचे निरोप देणं, प्रसंगी संभाव्य धोक्याची सूचना देणं अशा अनेक बाबतीत फोनची सुविधा उपयुक्त ठरते. परदेशी राहणाऱ्या पाल्यांच्या पालकांना फोन हा मोठाच आधार भासतो. प्रत्यक्ष भेट होत नसली तरी रोजच्या रोज फोनवर खुशाली जाणून घेता येते. रिलायन्स कंपनीने मागे आपल्या फोनची जाहिरात करताना 'करलो दुनिया मुठ्ठीमे' अशी स्लोगन वापरली होती. मोबाईल फोनचं अचूक वर्णन करणारी स्लोगन असं या जाहिरातीचं कौतुक झालं होतं. मोबाईल फोनमुळे खरोखरच सर्व दुनिया एका हाताच्या मुठीत सामावली गेली.
मात्र असं असूनही फोनमुळे अनेक संबंध ताणले जातात व कधीकधी संपुष्टातही येतात हे देखील तितकंच खरं. वर उल्लेखिलेला देशपांडेचा किस्सा याच सदरात मोडणारा. तो मला फोन करत नाही, मी कशाला त्याला फोन करु हा संवाद आपण अनेकदा ऐकतो. अशावेळी फोनमुळे परस्परांतील संबंध सुदृढ राहतात की बिघडतात असा प्रश्न पडतो. शुभेच्छांच्या बाबतीही फोनमुळे नाराजी ओढविण्याचेच प्रकार बरेचदा घडतात. त्याने मला फोन न करता नुसतं एसएमएस वर कटवलं ही नाराजी मनात घर करुन राहते. तर कुणी साधा एसएमएसही पाठवला नाही याचं शल्य जिव्हारी लागतं. याबाबतीत स्वतः पुढाकार घेताना अहंकार आडवा येतो. थोडक्यात फोनला सुसंवाद साधणारं साधन म्हणायचं की अहंकाराला खतपाणी घालणारं साधन या प्रश्नाचं उत्तर देणं आता कठीण आहे.
भारतामध्ये गेल्या दोनतीन दशकात टेलिकम्युनिकेशन सेक्टरने अक्षरश: गरुडझेप घेतली. स्व. राजीव गांधी हे पंतप्रधान असताना श्री. सॅम पित्रोडा यांच्या मार्गदर्शनाखाली टेलिकम्युनिकेशनचं म्हणजेच दूरसंचार सेवेचं जाळं सर्वदूर पसरलं. अगदी खेडयापाडयातही टेलिफोनचे बूथ पोहोचले व अक्षरांची साधी तोंडओळख नसलेली माणसंही फोनवरचे इंग्रजी आकडे आत्मविश्वासाने फिरवू लागली. त्यानंतर काही वर्षांतच मोबाईलचं युग अवतरलं. सुरुवातीला मोबाईल म्हणजे अतिश्रीमंतांना आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन घडविण्यास सहाय्य करणारं साधन असाच लौकिक सर्वत्र पसरला. याला कारणंही अनेक होती. मोबाईल सेटची किंमत तेव्हा पन्नास हजार रुपयांच्या घरात होती व प्रतिकॉल चार्ज असे रुपये सतरा ! नंतर मात्र मोबाईलची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना आपण केवढी मोठी घोडचूक करतो आहोत हे ध्यानात आलं. भारतासारख्या कोटीकोटींच्या घरात लोकसंख्या असणाऱ्या देशात केवळ मोजक्या लोकांसाठी ही सुविधा उपलब्ध करुन देणं म्हणजे मोठया मार्केटिंग अपॉर्म्युनिटिज पासून वंचित राहणं हे शहाणपण या कंपन्यांना उमगलं आणि त्यानंतर मोबाईलचे भाव धडाधड कोसळले. अगदी हजार दोन हजारांना मोबाईल उपलब्ध होऊ लागले व प्रतिकॉल दर आला फक्त पन्नास पैशांवर! या सनसनाटी बदलानंतर भारतात प्रत्येकाच्या हाती मोबाईल दिसू लागला. रस्त्यातून चालताना, गाडीतून प्रवास करताना माणसं सर्रास मोबाईल वापरु लागली. हातातलं पेन, खिशातला कंगवा यासारखाच मोबाईल हा सर्वांच्या दैनंदिन जीवनातला अविभाज्य घटक बनला.
अहंकाराला खतपाणी घालणारं साधन याच्या जोडीलाच मग डोकेदुखी वाढविणारं साधन असाही मोबाईलला ठपका लागला. सार्वजनिक ठिकाणी मोठमोठयाने फोनवर बोलणं, मोठ्या आवाजात मोबाईलवरची गाणी ऐकणं या प्रकारांमुळे मोबाईलची लोकप्रियता कलंकित झाली. अर्थात याला आपणच जबाबदार आहोत. हाती आलेल्या वस्तूचा सदुपयोग करायचा की दुरुपयोग हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं. हे ठरविण्याची पात्रता अंगी नसली की दुरुपयोगांचं पारडं जड होतं. कुठलीही वस्तू चांगलीही असते आणि वाईटही. ती आपण कशाप्रकारे हाताळतो यावर सारं अवलंबून असतं. फोनमुळे जगाच्या कोपऱ्यात कुठेतरी एकटंच जीवन जगणाऱ्याला आम्ही तुझ्या सोबतच आहोत हा मोलाचा संदेशही देता येतो आणि कधी कुणाला 'आय एम इन अ मिटिंग' म्हणून कटवताही येतं. यातला कोणता पर्याय निवडायचा हे ज्याचं त्याने ठरवायचं!
-सुनील रेगे
दाखल झालेले होते. माझी थोरली बहीण आणि मी असे आम्ही दोघं
मुलं. आई-वडील खूश होते. दुष्काळी भागातील शेती सोडून
बसले.
त्या वेळी शिर्डी एवढी विस्तारली नव्हती अन् गर्दीचा तर प्रश्नच नव्हता. घरी जावं का? गेलो तर घरी काय सांगावं की
-- किशोर कुलकर्णी
फार वर्षापूर्वी इराकमध्ये घडलेली ही घटना आहे. बगदादजवळील एका छोट्या गावी एकमहिला व तिचा लहान मुलगा राहत होते. ती महिला मोलमजुरी करून आपल्या मुलाचे संगोपन करीत होती. आपल्या मुलाने शिकून मोठे व्हावे हीच तिची प्रामाणिक इच्छा होती. परंतु त्या छोट्या गावात तो मुलगा किती शिकणार? म्हणून तिने त्याला बगदादला शिक्षणासाठी पाठविण्याचे ठरविले.खरे तर त्या मुलाला आईला एकटे सोडून जाण्याची इच्छा नव्हती. मात्र आईच्या इच्छेला मान देऊन तो बगदादला एका सौदागराच्या काफिल्याबरोबर निघाला. जाताना त्याच्या आईने त्याला अडीअडचणीला लागेल म्हणून एक दिनार दिला होता. तसेच कोणतेही संकट आले तरी घाबरू नकोस व खोटे बोल नकोस, असा उपदेशही केला होता. त्या सौदागराचा काफिला जात असताना वाटेत लुटारूंनी त्या काफिल्यावर हल्ला केला. जवळचे असेल ते सर्व द्या नाहीतर प्राणाला मुकाल असे त्या लुटारूंच्या टोळी प्रमुखाने सर्वांना सांगितले व सर्वांची लूट घेत तो लुटारुंचा सरदार त्या मुलाजवळ आला. त्याने त्या मुलाला तुझ्याजवळ काय आहे असे विचारले. त्यावर त्या मुलाने आपल्या फाटक्या सदराच्या खिशातून एक दिनार काढला व त्याला दिला. तो सरदार त्याकडे तुच्छतेने पाहत म्हणाला, ' एकच दिनार?' तो मुलगा त्याला म्हणाला, ' माझ्याजवळ एवढा एकच दिनार होता. आणि तो मी तुला दिला आहे. ' त्या मुलाच्या निर्भयतेचे त्या सरदाराला कौतुक वाटले. त्याने त्याला विचारले, की तू कोठे जात आहेस? मुलगा म्हणाला, बगदादला मी शिक्षणासाठी जात आहे. त्यावर सरदार त्याला म्हणाला, ' तू आमच्याबरोबर चल. मी तुझे सारे शिक्षण करीन. ' त्या मुलाने लगेच, 'मला तुमचे - शिक्षण नको कारण मला चोर-लुटारू व्हायचे नाही, ' असे निर्भयतेने सांगितले. त्या मुलाची ती सत्य व निर्भय वाणी पाहून तो लुटारूचा सरदार ओशाळला व त्याचक्षणी त्याने लुटलेली सर्व संपत्ती ज्याची त्याला परत करून तो तेधून निघून गेला. हाच मुलगा म्हणजे मौलाना कादिर खिलानी जो पुढे इराकचा धर्मगुरु बनला.
अकबर आणि बिरबल यांच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. अकबर बादशहा असूनही बिरबलची आणि त्याची खूप चांगली मैत्री होती. अनेकदा बिरबलबरोबरच्या सहवासात आपण बादशहा आहोत हे अकबर विसरून जात असे.
पृथ्वीतलावर जीव सृष्टी निर्माण झाल्यापासून प्रत्येक गोष्टीमध्ये पदोपदी भेदभाव दिसून येतो. मानवात तर तो अतिशय मोठ्या प्रमाणात दिसतोच. परंतु मुक्या प्राण्यांमध्ये सुध्दा दिसतो.
Copyright © 2025 | Marathisrushti