नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
विधात्याने ही सृष्टी , हे जग खूप सुंदर बनविले आहे. मानवाला संस्कारक्षम विवेकबुद्धी दिली आहे .सर्वांगसुंदर दृष्टी दिली आहे हे निर्मळ सत्य आहे.
गाडी त्या सुप्रसिद्ध हायफाय वृद्धाश्रमाजवळ थांबली.त्यातून साठ पासष्टीचा माणूस त्याची पत्नी त्याचा मुलगा सून उतरले.तिथले वातावरण पाहून त्याला खूप बरे वाटले.ऑफिसमध्ये गेला तो कोण आणि का आला ते संगितले.
वेदांग शिरोडकर अन्य कोणत्याही सुशिक्षित, सुसंपन्न, सुसंस्कारित मराठी मुंबईकराप्रमाणे एक खेळकर, आत्मविश्वासू, मनमिळावू, शहरी, सभ्य, शिष्टाचार माहीत असलेला, स्वच्छ, परिपक्वता आलेला, सामान्य ज्ञान नि वाचन असलेला, इत्यादि, इत्यादि प्राणी होता. अशा अनेक परिमाणांत आम्हा दोघांत अत्यंत शार्प काँट्रास्ट होता.
महाराष्ट्राची मायबोली मराठी असली, तरी प्रत्येक जिल्ह्यागणिक ती बदलत जाते. जसे भाषेचे आहे, तसेच खाण्याचे. काही मैलांनी खाद्यसंस्कृतीतही थोडा बदल जालेला दिसतो. माई देशपांडे यांनी या पुस्तकात मराठवाड्याचा खाद्यखजिना मोकळा केला आहे.
डायरी तशी साधीच होती. पण जाडजूड होती. खादीच्या कापडाचं कव्हर होतं. वरवर सुस्थितीत असावी असं वाटत होतं. पण उघडल्यावर मात्र डायरीची पानं विस्कटल्यासारखी दिसत होती. डायरी चाळताना आणखी एक गोष्ट लक्षात आली. सुरुवातीच्या पानांवरचं अक्षर चांगलं होतं. काहीसं मोडी लिपीच्या वळणावर गेलेलं आणि शेवटी शेवट मात्र अक्षरात बदल होत गेलेला दिसत होता.
दोन दिवसांनी आम्ही जमलो. सगळ्याजणी माझी योजना ऐकण्यास अगदी आतूर झाल्या होत्या. त्यांची उत्सुकता अगदी शिगेलाच पोहचली होती म्हणाना.
मी फार न ताणता सुरुवात केली. “आपल्यापैकी बऱ्याचजणी नाट्यविभागात जातात. तिथेच या सर्व प्रकाराचे मूळ आहे अशी माझी पक्की खात्री आहे. आता फक्त आपला संशय पक्का करायचा की झाले. त्यासाठी मी एक युक्ती करायची ठरवली आहे. वासंती, तू आर्ट स्कूलमधे कॅलीग्राफी शिकतेस. तू एक काम करायचं. अरूच्या हस्ताक्षरासारखे हस्ताक्षर काढून एक चार ओळीचं पत्र तयार करायचं. त्यासाठी जाडा भरडा ड्रॉइंग पेपर वापर.
मानवी शरीर शास्त्रानुसार एक निरुपयोगी असा अवयव … किंवा “निरुपद्रवी” म्हणू हवं तर …. कारण त्याचं निसर्ग नियमानुसार शरीरात असणं कदाचित आवश्यक असेल पण त्याचं शरीरातल्या दैनंदिन कारभारात एरवी काहीच योगदान नसतं . ते शांतपणे आपल्या पोटात स्वतःच्या डोळ्यावर “आतडं” पांघरून निपचित पडलेलं असतं . पण कुठल्याही कारणास्तव त्याच्या नैसर्गिक अवस्थेत काही बदल, काही बिघाड झाला , त्याचा नैसर्गिक आकार वाढला की मग मात्र तो आपल्याला त्रास देऊ लागतो .

अशीच होरपळ झाली तर शहराची शिस्त किती दिवस टिकेल? साठणारा संताप मग रेल्वेच्या मालमत्तेपुरता सिमित राहणार नाही. त्या संतापाचा वणवा इतका वाढेल, की त्यात काहीच शिल्लक राहणार नाही. रेल्वेची मालमत्ता नष्ट करण्यामुळे प्रवाशांचेच अधिक हाल होतात, हे शहाणपण पुढारी मंडळी शिकवू शकतात
एक राजा हौसेने दोन गरुड आणतो. त्याला त्या गरुडांची आकाशातली भव्य भरारी पहायची असते. एका गरुडाला हातावर घेऊन तो आकाशाकडे उडवतो. क्षणार्धात तो गरुड आकाशात झेप घेतो. राजा अगदी हरखून जातो. दुसऱ्या गरुडालाही तसेच झेप घेण्यासाठी तो हातावर घेतो. मात्र हा गरुड न उड़ता झाडाच्या एका फांदीवर जाऊन बसतो. राजा हर तऱ्हेचे प्रयत्न करतो. गरुड काही केल्या उडत नाही.
अजूनही पुढे येणाऱ्या पिढ्यानपिढ्या टाटांच्या ‘मोती’ साबणाशिवाय भारतीय नागरिकाला दिवाळी साजरी झाल्यासारखी वाटणारच नाही.. हीच तर खरी ‘स्वदेशी’ची जादू आहे!!!
Copyright © 2025 | Marathisrushti