(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • एक परीस स्पर्श (भाग – २३)

    आज विजयचा पाय प्रचंड दुखत होता. त्यात मरणाच्या थंडीमुळे अधिकच त्रास होत होता. पायात थोडी सुजही होती. शरीरातील सर्व सांध्यात थोड्या थोड्या वेदना जाणवत होत्या. कशामुळे काय दुखतंय तेच कळत नव्हतं. त्यामुळे विजय लांब पाय करून खुर्चीत बसला होता.

  • मंजिरी असनारे-केळकर

    लहानपणी सांगलीला वडिलांच्या (प्रा. आनंद असनारे) शिस्तीमुळे रियाझाला बालसुलभ अळंटळं करणारी (वय वर्षे ७-८) मंजिरी, त्यानंतर ९३-९४ साली तत्कालीन लक्ष्मी क्रीडा मंदिरात तब्येतीने प्रातःकालीन रागांची मैफिल करणारी मंजिरी आणि आज आत्मविश्वासपूर्वक राग -संगीत सादर करणाऱ्या सौ मंजिरी असनारे -केळकर यांचा प्रवास मी जवळून पाहिला आहे.

  • गावाकडची अमेरिका – अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे चित्रण

    सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण भागात गेली १२ वर्षे वास्तव्याला असलेल्या डॉ. संजीव चौबळ यांनी केलेले अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण. अमेरिकेतील मोठमोठ्या शहरांमध्ये रहाणार्‍या बहुतांश मराठी लोकांनीही ग्रामीण अमेरिकेचा हा पैलू अनुभवलेला नाही. भारतात राहून अमेरिकेची झगझगीत आणि भव्यदिव्य कल्पनाचित्रे रेखाटणार्‍या मंडळींना हे पुस्तक वाचून वास्तवाचे नक्कीच भान येईल.

  • शिवी; एक अत्यावश्यक मानसिक गरज..

    नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 
    आमच्या मुंबईसारख्या शहरात आमचा शिव्यांशी नित्य संबंधं येतो. येवढा की आता त्याचं काहीच वाटेनासं झालंय. इथे गर्दीच येवढी की येता जाता धक्का लागतोच. तो मुद्दामहून दिलेला धक्का नाही हे देणाऱ्याला आणि लागणाऱ्यालाही माबिक असतं. तरी चार दोन शिव्या दिल्या-घेतल्या जातातच. एकमेकाची आय-माय साग्रसंगीत उद्धारली जाते..पण त्यात त्या धक्का देणाऱ्या-घेणाऱ्याविषयी राग नसतो तर त्या 'व्यवस्थे'ला दिलेल्या शिव्या असतात..

    आमच्या मुंबईसारख्या शहरात आमचा शिव्यांशी नित्य संबंधं येतो. येवढा की आता त्याचं काहीच वाटेनासं झालंय. इथे गर्दीच येवढी की येता जाता धक्का लागतोच. तो मुद्दामहून दिलेला धक्का नाही हे देणाऱ्याला आणि लागणाऱ्यालाही माबिक असतं. तरी चार दोन शिव्या दिल्या-घेतल्या जातातच. एकमेकाची आय-माय साग्रसंगीत उद्धारली जाते..पण त्यात त्या धक्का देणाऱ्या-घेणाऱ्याविषयी राग नसतो तर त्या ‘व्यवस्थे’ला दिलेल्या शिव्या असतात..

  • पूर्वाश्रमीची महत्वाची माणसे

    “काल “ची असा शब्द वापरण्याऐवजी या शब्दसमूहात “पूर्वाश्रमीची” असा शब्द वापरलाय, बहुधा “महत्वाची” असावीत म्हणून ! महत्व लोप पावल्याने/ निरुपयोगी असल्याने हळूहळू गृहीत धरली जाणारी, काळाच्या ओघात विसरली जाणारी, एका कोपऱ्यात ढकलली गेलेली माणसे यांच्या संदर्भात नुकतेच काही वाचनात आले.

  • राधाकाकीचा वाडा

    बाभनाची राधा काकी मंजे गावातील एक गुढ व्यक्तीमत्वाची बाई ! गावाच्या मंधोमंध बुरुजाखाली तिचा जुन्या काळातला ढवळ्या मातीनं बांधलेला टोलेजंग वाडा व्हता !!!

  • संगीत-समारोह

    माझ्या वडिलांचे क्लबमधील मित्र चंद्रशेखर टिळक हे माझ्या गाण्याचे चाहते होते. त्यांनी 'रसधारा' हा गाजलेल्या मराठी गाण्यांचा कार्यक्रम सुरू केला. या कार्यक्रमात गाण्यासाठी त्यांनी मला बोलावले. चंद्रशेखरजींशी अनेक वर्षे आमचे घरगुती संबंध होते. मी लगेचच होकार दिला. ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये पहिला कार्यक्रम झाला आणि त्याचबरोबर अनेक कार्यक्रम आम्ही केले. अनघा पेंडसे, प्रल्हाद अडफळकर, संध्या खांबेटे आणि माझी विद्यार्थिनी श्वेता पुराणिक हे गायक कलाकार आमच्याबरोबर होते.

    कै. पं. राम मराठे हे ठाणे शहराचे भूषण. लोकप्रिय खासदार माननीय प्रकाश परांजपे हेसुद्धा संगीतप्रेमी. त्यांच्याच प्रयत्नांमुळे ठाणे महानगरपालिकेतर्फे पं. राम मराठे स्मृती समारोहाचे आयोजन काही वर्षांपूर्वी सुरू झाले. माफक तिकीट दरात सतत तीन दिवस होणारा हा समारोह लवकरच लोकप्रिय झाला. बदलापूरमध्ये एका सुगम संगीत स्पर्धे चे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून मला आमंत्रित करण्यात आले. माझ्याबरोबर दुसरे परीक्षक होते पं. राम मराठे यांचे मोठे चिरंजीव पं. संजय मराठे. स्पर्धेनंतर लगेचच बक्षीस समारंभ झाला. समारंभाचे अध्यक्ष होते खासदार प्रकाशजी परांजपे, प्रकाशजींनी आम्हा दोन्ही परीक्षकांना गाण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही दोघांनीही गाणी सादर केली. प्रकाशजी एकदम खूष झाले. त्यांच्याच गाडीतून परतताना आमच्या गप्पा सुरू झाल्या.

    “अनिरुद्ध, तुझा गझलचा कार्यक्रम पं. राम मराठे संगीत समारोहात झाला पाहिजे,” प्रकाशजी म्हणाले.

    “माझ्यासाठी ती अत्यंत आनंदाची बाब असेल. पण ते शक्य होईल असे वाटत नाही," मी उतरलो.

    “असे तुला का वाटते?" प्रकाशजींनी विचारले.

    'कारण या समारोहात फक्त शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम आयोजित केले जातात.”

    यावर प्रकाशजी उसळून म्हणाले, “आम्हाला संगीतातले हे बारकावे समजत नाहीत आणि रामभाऊ तर संगीत नाटकात काम करायचे. मराठी चित्रपटातदेखील त्यांची गाणी आहेत. माझा तर तुम्हाला आग्रह राहील की या समारोहात एक तरी सुगम संगीताचा कार्यक्रम असायला हवा.

    मी माझे म्हणणे मांडले. त्यावर प्रकाशजी उत्तरले, “तर मग या संगीत समारोहातील सुगम संगीताच्या कार्यक्रमाची सुरुवात तुझ्या गझलच्या कार्यक्रमानेच करू या. मी तसे या कार्यक्रमाचे आयोजक श्रीकृष्ण दळवी यांना सांगतो. तू त्यांना भेट." संगीततज्ज्ञ श्रीकृष्ण दळवी यांची भेट मी घेतली. त्यांनीही कार्यक्रम आयोजित करण्यास होकार दिला. १९ नोव्हेंबर २००२ रोजी गडकरी रंगायतनमध्ये पं. राम मराठे संगीत समारोहात मी हिंदी-ऊर्दू गझलचा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाला रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. या वर्षीपासून या समारोहात सुगम संगीताच्या कार्यक्रमांचे आयोजन सुरू झाले.

    शेवटी रागदारी संगीत काय, सुगम संगीत काय किंवा पाश्चात्त्य संगीत काय! रसिकांचे मन जिंकेल तेच खरे संगीत. रसिकांच्या मनात प्रवेश करण्यासाठी गायकांनी निवडलेल्या ह्या वेगवेगळ्या वाटा आहेत इतकेच. ठाणे शहरापुरता हा विचार मी पोहोचवला. लवकरच हा विचार व्यापक स्वरूपात पोहोचवण्याची संधी मला मिळाली. महाराष्ट्र टाईम्समध्ये 'माझा धर्म' या लेख मालिकेत मी लेख लिहिला. माणसांची वर्गवारी करताना त्यांचा धर्म पाहण्यापेक्षा त्यांचा गुणधर्म पहावा असा विचार मी या लेखात मांडला. विस्ताराने सांगायचे तर संगीतावर प्रेम करणारे संगीतप्रेमी, तसेच विज्ञानप्रेमी, नाटकप्रेमी, सिनेमाप्रेमी, क्रिकेटप्रेमी ही माणसांची वर्गवारी गुणधर्माप्रमाणे झाली. संगीताच्याच बाबतीत बोलायचे झाले तर या क्षेत्रात वेगवेगळ्या धर्माचे लोक वर्षानुवर्षे आनंदाने एकत्र काम करतांना आपण पाहतो आहोत. गुणधर्माप्रमाणे माणसांची वर्गवारी केल्यास आपण संपूर्ण जग फार लवकर एकत्र आणू शकू असा मला विश्वास वाटतो. सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे, गायिका पद्मजा फेणाणी, शहनाईवादक शैलेश भागवत यांच्यासह अनेक वाचकांनी हा लेख आवडल्याचे मला प्रत्यक्ष भेटून, फोन करून आणि पत्र लिहून कळवले.

    - अनिरुद्ध जोशी

  • प्रेरणा कसदार कवितांची

    मला पहिल्यापासूनच कलेची आवड होती. विशेषतः, चित्रपट, चित्रकला आणि कविता याबद्दल मला विशेष आकर्षण वाटायचं. वयाच्या बाराव्या, तेराव्या वर्षांपासून कविता सुचायला लागल्या. तेव्हा मी आचार्य अत्रेंचे मी कसा झालो? ‘ हे पुस्तक वाचले.

  • साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग ३३)

    मी मूळचा सातारकर असल्यामुळे साहित्य, कला, संस्कृतीचे बीजांकुर माझ्यात या सातारच्या पंचक्रोशीतच घडले. थोडेसे कळायला लागल्यापासूनच आमच्या घरात जी मोठी विचारवंत माणसं येत असत रहात असत त्यामुळे आणि तसेच समोरच प्रख्यात वकील कै. मनोहरपंत (काका) भागवत वकील रहात होते. त्यांच्याकडे, राजकीय, सामाजिक, साहित्य, अशा क्षेत्रातील अनेक मान्यवर सातत्याने येत असत. आमच्या कुटुंबाचे व त्यांचे अगदी घरचेच संबंध होते.

  • प्रेमाच्या वाटेवर – भाग १

    प्रतिभाने स्वतःला सावरले आणि ती विजयच्या बिछाण्याच्या दिशेने चोर पावले टाकू लागली. पावलागणिक तिच्या हृदयाची धडधड वाढत होती.