(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • एक सवारी डांग बागलाणची

    नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील डांग बागलाणचे महत्व

  • आणि अचानक त्या वळणावर (रोमांचक भयकथा) – भाग १०

    ती दोन बाकडी पार केली आणि तिची नजर रस्त्याच्या कडेला गेली…… चंद्राच्या प्रकाशात काहीतरी चकाकत होतं….. ती आणखी थोडी पुढे गेली आणि तिला तिथं एक मोटार सायकल पडलेली दिसली…. रोहन अजून मागेच रेंगाळत चालत होता. तिने मागे वळून रोहनला आवाज दिला …

  • क्रांतिसूर्य स्वातंत्र्यवीर सावरकर कारातीर्थ

    रत्नागिरीकर भाग्यवान, कारण स्वातंत्र्यदेवतेचा साक्षात अवतार या भूमीत राहून गेला . ज्याच्या कर्तृत्वाला , त्यागाला , विजिगीषू वृत्तीला देशभक्तीला , दूरदृष्टीला , विज्ञानवादी दृष्टिकोनाला , साहित्याच्या सर्व प्रांतात निष्ठेने दिलेल्या योगदानाला , जिद्दीला, साहसाला आणि अतुलनीय अशा त्यागमूर्तीच्या अविस्मरणीय कर्तृत्वाला प्रतिमा प्रतीकं आणि शब्दात साकारणं म्हणजे गगनाला गवसणी घालण्याएवढं अवघड काम !

    आपण सूर्याच्या दाहकतेला स्पर्श करू शकत नाही, पण क्रांतिसूर्याच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या

    कारातीर्थाचे

    दर्शन घेऊन मनोमन कृतज्ञता व्यक्त करू शकतो ना ?

    २६ फेब्रुवारी ही क्रांतिसूर्य विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी !

    आपण सर्वांनी रत्नागिरीच्या तुरुंगात निर्माण झालेल्या कारातीर्थाला जायला हवं . दर्शन घ्यायला हवं . मनोबल जागवायला हवं . वाढवायला हवं .

    सावरकर अभिवादन यात्रा आणि सावरकर विचार यांची एक चळवळ सुरू व्हायला हवी.
    आपलं हे कर्तव्यच आहे, आपण आपल्या कुटुंबियांसह दर्शन घ्या.
    स्मार्टफोन मध्ये गुंतलेल्या आपल्या तरुण पिढीला सांगा…
    रत्नागिरी बाहेर असलेल्या सर्वाना, येणाऱ्या पर्यटकांना, पाहुण्यांना, महाराष्ट्रातील सर्वाना सांगा…

    रत्नागिरीत कारातीर्थ आहे,त्याचं दर्शन घ्या, तिथे असलेल्या बेड्या, साखळदंड यांना कृतज्ञतेने स्पर्श करून स्वातंत्र्यवीर सावरकर यांना विनम्रतेने अभिवादन करा.

  • क्लॅपरबाॅय

    १९७१ मध्ये ‘मेरे अपने’चं शुटींग चालू असताना, दिग्दर्शकानं कॅमेरा, साऊंड व क्लॅपची ऑर्डर दिली.. मात्र क्लॅप देणाराच जागेवर नव्हता, तो कॅन्टीनमध्ये मैत्रीणीबरोबर गप्पा मारत बसला होता.. गुलजारजी जाम भडकले, त्यांनी त्या क्लॅपरबाॅयला हाकलून दिले.. व त्या जागेवर चंद्रशेखर नार्वेकर उर्फ एन. चंद्राची नेमणूक झाली.. याच एन. चंद्राने, त्यानंतर ‘परिचय’ पासून ‘आंधी’ पर्यंतचे गुलजार यांच्या सर्व चित्रपटांसाठी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले.. एका सशक्त दिग्दर्शकाच्या परिसस्पर्शाने एन. चंद्रा नावाचा मराठी, यशस्वी निर्माता-दिग्दर्शक घडला..

  • कुजबुज

    लॉकडाऊन मुळे नोकरी गेली होती. मुलं शिक्षणाच्या वयातील. साठवलेले किती दिवस पुरणार. त्यामुळे त्या दोघांनी ठरवले की आपल्या ओळखीच्या लोकांना घरगुती डबे पाठवू या. एक दोन करता करता बरेच जण तयार झाले. आता पैसाही बऱ्यापैकी मिळू लागला हे पाहून त्यांनी घरासमोरची मोकळी जागा भाड्याने घेऊन मेस सुरू केली. हे कौतुकास्पद होते पण कुजबुज. नोकरी दुसरी शोधायची. हे बर दिसतं का? इति नातेवाईक.
    मावशीबाईचा नवरा गेला. घरात चार तोंड भरायची. दु:ख करत बसून कसे चालेल. म्हणून कामाला आल्या. कुजबुज. काय बाई आजकाल कोणाला कशाचेही काही वाटत नाही. नवरा आजारी होता तेव्हाही ही बाई अशीच हिंडायची फिरायची. दिवस असे कलियुग आहे ना. घरी बसून नवऱ्याची सेवा करायची तर औषध दवाखाना हे सगळे काय फुकटात नसते हे माहित असूनही...
    मुलीचा घटस्फोट झाला. कारण काय हे ज्याचे त्यालाच ठाऊक. पण कुजबुज. आजकालच्या मुली. काम नको. सासुसासरे नको. चैन करायला पाहिजे. अशाने संसार होत नसतो. खूप झिजावे लागते. त्या पोरीला एक अक्कल नाही पण आईवडिलांनी तरी तिला चार गोष्टी समजावून सांगितले पाहिजे होते. आता नवऱ्याने टाकून दिलेली. हिचे पुढे कसे होणार हो. नोकरी म्हणजे सर्वस्व नसते. हे सगळे आईबापाला समजते. काही तरी तसेच कारण असेल म्हणूनच ते मुलीच्या पाठीशी उभे असतात...
    एखाद्या मुलाला पार्टीत पोलीसांनी पकडलेले असते. तेंव्हाही दोषी आईबाबाच. मुलगी पळून गेली. सासुसासरे वेगळे राहतात. मूल होऊ शकत नाही. लाच प्रकरणात नवऱ्याला अटक झाली. बायको दोषी. असे कितीतरी प्रकार आहेत आणि दरवेळी सहानुभूती. मदत. मानसिक धैर्य देणे..हे महत्वाचे असते. ते सोडून फक्त कुजबुज....
    मला सगळ्यात जास्त वाईट वाटते ते म्हणजे एखाद्या बाईवर बलात्कार झाला असेल तर तो विषय जाहीरपणे चर्चिला जातो. आरोप प्रत्यारोप करताना आपण काय बोलतो. याचेही भान नसते. पिडीत कोणत्या परिस्थितीत आहे. तिच्या मनात काय विचार चालले आहेत. ती प्रत्येक क्षण कशी झिजत आहे याची कल्पना नसते. एखाद्या चोर घर लुटून नेतो. एखादा वैयक्तिक स्वार्थासाठी खून करतो. एखादा वासनाविकृती मुळे जबरदस्तीने वैयक्तिक वासना भागवतो. या सगळ्यात जबरदस्तीच असते. पण पैसा परत मिळवता येईल. गेलेला माणूस याचे दु:खही हळूहळू विसरले जाते. मात्र स्त्रीच्या अस्तित्वाची अस्मिता परत कधीच येत नाही. लोकांच्या नजरा आणि कुजबुज याचा विचार करत राहिले तर जगणे मुश्किल होईल. हा आघात कायम स्वरूपी काळजाला जखमी करणारा आहे...
    प्रत्येकांच्या घरात काही ना काहीतरी चांगले वाईट अनुभव असतात. म्हणून कुजबुज करणे कितपत योग्य आहे. आणि कोणतीही कुजबुज करण्याआधी सारासार विचार करून बोलावे. उचलली जीभ लावली टाळ्याला. आणि फुकटात आहे म्हणून का?
    -- सौ कुमुद ढवळेकर.
  • गणेशछाया

    संध्याकाळी गणेश त्या पत्यावर पोहोचला. त्यानं त्या टुमदार बंगल्याच्या दारावरची बेल वाजवली. सकाळच्या त्याच मुलीने दरवाजा उघडला व वडिलांना तिने ‘दादा, आलाय..’ असं सांगितलं.

  • गिरीश कर्नाड !

    पुण्याच्या प्रभात चित्रपट गृहात (आताचे किबे थिएटर) मी पत्नीसह “उंबरठा ” पाहायला गेलो होतो ,प्रामुख्याने स्मिता पाटीलसाठी ! जब्बारचा चित्रपट, संगीत हृदयनाथांचे आणि एका स्त्रीवादी कथानकाचा वृत्तपत्रांनी गाजावाजा केला म्हणून! तिकिटांच्या रांगेत असताना आधीच्या शोमधील “सुन्या सुन्या मैफिलीत ” कानांवर पडत होते. इतक्या सुंदर गाण्याबाबत वर्तमानपत्रात काहीसा विरोधी सूर कां अशा विचारात मी पडलो.

  • ग्रँड कॅनीयन ऑफ महाराष्ट्र

    सकाळी सात च्या सुमारासच त्या परिसरात गेल्याने धुक्याची अंधुकशी चादर पसरली होती. मध्येच एखाद्या वाडीतील दोन चार घरातून बाहेर पडणारा धूर धुक्यात मिसळताना दिसत होता. अधून मधून येणाऱ्या पावसाच्या लहान लहान सरींनी पळसाच्या पानांवर पावसाचे टपोरे थेंब खाली पडायच्या अवस्थेत खोळंबल्यासारखे दिसत होते.

  • कल्पनाची ‘आयडिया!’

    कल्पनाचं वर्षापूर्वीच लग्न झालं होतं. किशोरनं तिला पाहताक्षणीच पसंत केलं होतं. किशोरचे आई-बाबा दोन वर्षे त्याच्यासाठी मुली पहात होते. प्रत्येकवेळी काहीना काही कारणाने लग्न काही ठरत नव्हतं. किशोर चांगल्या कंपनीत नोकरीला होता. त्याला शिकलेली आणि गृहकृत्यदक्ष अशी पत्नी हवी होती. त्याच्या आईचा तो लाडका असल्याने आईने त्याच्याच पसंतीला महत्त्व देण्याचे ठरविले होते. किशोरचे बाबा मात्र दोघांच्या समाधानातच स्वतःचा आनंद मानणारे होते. कल्पनाला किशोरने पसंत केले. रितीरिवाजानुसार लग्नकार्य पार पडले. चौघे आनंदाने राहू लागले. वर्षातील सणवार परंपरेनुसार पार पडले. काही दिवसांनी नव्याची नवलाई संपुष्टात आली आणि घरातील वातावरण पहिल्यासारखं राहिलं नाही. कामापुरतंच एकमेकांशी बोलणं होऊ लागलं. कल्पना हुशार होती. तिनं एका रविवारी किराणा दुकानातून एक छोटं रिकामं खोकं आणलं. त्यावर रंगीत कागद चिकटवून ते पॅकबंद केलं. त्याच्या वरच्या बाजूला एक काॅईन बाॅक्ससारखी दोन इंचाची चीर पाडून ठेवली.

  • आव्हान चिनी ड्रॅगनचे – पुस्तक परिचय

    चीनचे आव्हान दिवसेंदिवस अधिक गंभीर होत आहे. या आव्हानाचे सर्वंकष स्वरूप स्पष्ट करणारे तसेच या संदर्भात वस्तुस्थिती उलगडणारे तसेच देश व सहकार म्हणून आपण भोगती भूमिका घेऊन कशी पावले उचलायला हवी, यांचे सोपे मार्गदर्शन करणारे मराठीतील एकमेव महत्वपूर्ण पुस्तक.