नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
जीवनाच्या दैनंदिनीत अनेक घटना घडतात. त्याकडे बघण्याचा द्रीष्टीकोन, त्याला सामोरे जाताना भिन्न असतो. त्यामध्ये दडला असतो, लपला असतो, एक बंदिस्त त्रिकोण. ज्यात असतो स्वार्थ, प्रासंगिक भावना, आणि परिस्थिती बद्दलचे अज्ञान. ह्याची जाणीव तिव्रतेने होती. जेंव्हा आपले अन्दाज चुकतात. विशेषकरुन जे इतर अपरिचिताना अनपेक्षित हानिकारक ठरतात त्या वेळीच.
भारतीय स्त्रीला सौभाग्याच्या या लेण्याची पूर्वापार परंपरा आहे. शेकडो वर्षांपासून स्त्री कपाळावर लाल रंगाचा कुंकवाचा टिळा लावत आलेली आहे. खेडेगावात कुंकू लावण्याच्या पद्धतीवरुन त्या स्त्रीच्या नवऱ्याचा व्यवसाय कळत असे. राजा रवीवर्माच्या अनेक देवी, अप्सरा, ऋषिकन्यांच्या चित्रांतून आपण त्यांच्या कपाळावर लाल रंगाची खूण पाहिलेली आहे.

आज विजय एका कारखान्यात त्या कारखान्याच्या मालकाला भेटायला गेला होता. त्या मालकाने हा कारखाना नव्यानेच सुरु केला होता. त्या कारखान्याचा मालक उत्तरभारतीय होता. त्याची बायको गर्भारपणात वारली त्यामुळे त्याला बरेच दिवस गावी थांबायला लागल्यामुळे त्याच्या मालकाने त्याला नोकरीवरून काढून टाकले. त्यामुळे त्याने दुसरीकडे नोकरी करण्यापेक्षा नोकरी सोडल्यामुळे आलेल्या पैशातून दोन लेथ मशीन विकत घेऊन छोटासा कारखाना सुरु केला. तो कामाच्या शोधात असतानाच एकदा विजय आणि त्याची भेट झाली होती. विजयला एकाच भेटीत माणसे ओळखता येतात त्यामुळे विजयने त्याचा मोबाईल नंबर घेऊन ठेवला होता. विजयचा पाय बऱ्यापैकी बरा झल्यावर विजयने त्याला एक जॉब करायला दिला होता पण नंतर विजय गावी गेल्यामुळे आणि तो कारखान्याचा मालक आजारी पडल्यामुळे तो जॉब लटकला. त्यासंदर्भात विजय त्याच्या कारखान्यावर त्याला जाता -येता भेटायला चार – पाच वेळा गेला, प्रत्येक वेळी विजयने त्याला कामाच्या बाबतीत काही सूचना आणि काही उपाय सुचविले त्यामुळे विजय त्याच्या कारखान्यात पाय ठेवण्यापूर्वी तोट्यात चालणार त्याचा कारखाना नफ्यात चालू लागला. आज जेंव्हा विजय त्याच्या कारखान्यात गेला तेव्हा त्याला पैशाची चिंता होती. एक पार्टी त्याला पैसे द्यायला येणार होती.
खुसरो रैन सुहाग की जागी पी के संग,
तन मेरो मन पिऊ को दोउ भए इक रंग.
लैला मजनूच्या प्रेमाच्या गोष्टी ऐकल्या होत्या. मजनूच्या पाठीवर पडणार्या कोड्यांचे व्रण लैलाच्या पाठीवर उमटायचे. कारण शरीराने अलग-अलग असले तरी त्यांचे ह्रदय एक होते. लैला मजनूच प्रेम हे खरं प्रेम होत. आजच्या तरुण पीढ़ीच्या प्रेमाच्या कल्पना काय?
तो स्मार्ट - ती सुन्दर, त्याला ती आवडली आणि तिलाही तो आवडला. त्यानी एकत्र सिनेमा पाहिला, एकमेकांच्या गळ्यात हात घालून फिरले आणि बहरलेल्या यौवनाचा आनंद घेतला. त्याना वाटले ते प्रेमात पडले. त्यानी प्रेम विवाह केला. एकत्र एकाच घरात राहण सुरु झाल. एकमेकांच्या आवडी-निवडी वादाचे विषय होऊ लागले. शुल्लक गोष्टींवरून भांडणे सुरु झाले. दोघांचाही अहंकार मोठा होता. परिणाम -
"देहाचा आकर्षणाने दोघ जवळ आले
प्रेमा अभावी ते शीघ्र डायवोर्सि झाले"
'ती' - मी प्रेमात आंधळी झाली होती, 'तो' -मी मूर्ख होतो म्हणून हिच्या प्रेमात पडलो. पडनारच! कारण याना प्रेमाचा अर्थ कळलेला नव्हता.
काहींची प्रेमाची गाड़ी विवाहा पर्यंत ही पोहचत नाही. कारण देहाचे आकर्षण क्षणभंगुर असते व ते संपल्यावर प्रेम ही संपते. तो किंवा ती कोणी तरी एक प्रेमभंगाला कारणीभूत ठरतो. आपण वर्तमानपत्रांत रोज वाचतो प्रेमभंग झाल्याने कोणी आत्महत्या करतो तर कोणी खून सुद्धा. कारण यानाही प्रेमाचा अर्थ कळलेला नसतो.
काही आपापला स्वार्थ सिद्ध करण्यासाठी प्रेमाचा देखावा करतात. मी ही डॉक्टर -ती ही डॉक्टर, आपण एकत्र आलो तर चैनित आयुष्य जाईल. किंवा दोघही नौकरी करणारे - स्वार्थ मनात ठेउन प्रेम करतात. याला काय म्हणायच -
प्रेमाचा देखावा आज फायद्याचा सौदा आहे,
विवाह सुध्दा आज देह भोगण्याचा करार आहे.
स्वार्थापोटी केलेल प्रेम भंग पावणारच. मग घटस्फोट हा होणारच यात आश्चर्य नाही. कारण यानाही प्रेमाचा अर्थ कळलेला नाही.
मग प्रेम म्हणजे काय?
आपल्या सोंदार्याचा अभिमान बाळगून पर्वतराज हिमालयाची कन्या पार्वती कामदेवाच्या मदतीने शंकराचे प्रेम जिंकायला निघाली. परिणाम काय झाला - शंकराने आपले तीसरे नेत्र उघडले व कामदेव भस्म झाला. पार्वतीला आपली चूक कळली. तिने तपस्येचा मार्ग धरला. आपला अहंकार, अभिमान इत्यादि तपस्येच्या अग्नित भस्म केले. अखेर शंकर प्रसन्न झाले. पार्वतीलाही प्रेमाचा अर्थ कळला. आपण पहातोच, वसंतात बहरलेल्या कच्च्या कैरीला ही ग्रीष्माच्या उन्हात तपावे लागते, मगच रसाळ-मधुर असा आम्बा आपल्याला खायला मिळतो. आपल्या मनातिल विकाराना अग्नित भस्म केल्या शिवाय प्रेमाचा अर्थ कळणे अशक्य म्हणूनच एका उर्दू शायरने प्रेमाबद्धल म्हंटले आहे "इक आग का दरिया है तैर के जाना है" आणि आगीचा दरिया पार करण्यासाठी डोळे उघडे असायला पाहिजे. आंधळ्या माणसाचे हे काम नव्हे.
एकदा शेजारच्या एका आजीला विचारले -तुम्ही कधी प्रेम केले आहे का? प्रेमाचा अर्थ काय? आजी म्हणाली प्रेमाच तर सोडा त्या काळी लग्नाआधी मुलाला मुलगी दाखविण्याची पद्धत ही नव्हती. बायको म्हणजे - आईच्या मदतीला घरकामासाठी आणलेली हक्काची बाई. ती आपल्याला देह सुख ही देते व घराला वारस ही. त्या काळी बायकाना कष्ट हे करावे लगायचेच. कधी -कधी मार ही खायला मिळायचा. आपले माहेरचे अस्तित्व विसरून नवर्या साठीच आपल आयुष्य आहे हे मनात ठरवून सासरी संसार सुरु केला. काही वर्षात चित्र बदलले. एका दुसर्याची सवय लागली. त्यांच्या मनात जिव्हाळा निर्माण झाला. माझ्यासाठी त्यानी आपला स्वभाव ही बदलला. माझ्या आवडी -निवडीकड़े ते जातीने लक्ष देऊ लागले. मला काय हवे त्याना न सांगताच समजू लागले होते. आज एका दुसर्याच्या मनात काय आहे हे न बोलताच आम्ही समजू शकतो. आता ही त्यांच्या मनात काय विचार चालला आहे, हे मी सांगू शकते. त्यागाशिवाय प्रेम सम्पादित करता येत नाही हेच खरं. संसाराचे चटके बसल्या शिवाय प्रेमाचा अर्थ कळने अशक्यच. आजीचे बोलणे मला पटले. आजीने खरोखरच तपस्या केली होती म्हणून तिला प्रेमाचा अर्थ कळला होता. असे प्रेम पाहूनच अमीर खुसरो ने म्हंटले आहे-
खुसरो रैन सुहाग की जागी पी के संग,
तन मेरो मन पिऊ को दोउ भए इक रंग.
शरीराने अलग-अलग असले तरी प्रेम रंगात भिजुन दोघांचे ह्रदय एक झाले होते. कारण प्रेमात द्वैत नाही. सूफी संतांच्या मते लौकिक प्रेम ही अलौकिक प्रेमाची पायरी आहे. कारण ज्याच्या हृदयात प्रेम आहे तोच ईश्वराला प्राप्त करू शकतो.
याचा अर्थ लग्ना आधी प्रेम नाही केले पाहिजे असा नाही. प्रेम अवश्य करा, पण आपण प्रेमात पड़त आहो असे वाटत असेल तर आपले डोळे उघडा - स्वत:लाच प्रश्न विचारा- हे देहाचे आकर्षण तर नाही ना? यात आपला स्वार्थ तर नाही ना? कुठल्याही परिस्थितीत आपण त्याचा/ तिचा साथ देऊ शकतो का? त्याच्या/ तिच्या साठी आपण आपल्या सर्वस्वाचा अर्थात आपला अहंकार, अभिमान इत्यादींचा त्याग करू शकतो का? याचे उत्तर होय असेल तरच पुढे पाऊल उचला. अन्यथा प्रेमात पड़नारच. खर्या प्रेमाच्या प्राप्ति साठी तपस्या ही करावीच लागते. दोघाना शरीराने आणि मनानी एक व्हावे लागते. तेंव्हाच प्रेमाची प्राप्ति होते, म्हणूनच कवीरदासानी म्हंटले आहे -
जब मै था तब हरि नाही, जब हरि है मैं नाही,
प्रेम गली अति सांकरी, ज्यामे दो न समाई.
*******
(प्रेम करण्या पूर्वी किंवा प्रेमात पडलेल्यानी, हा लेख अवश्य वाचावा. आपली प्रतिक्रिया अवश्य कळवा).
आज आमची बोटे मोबाईलच्या स्क्रीनवर ठोकून ठोकून बोथट झाली आणि कदाचित बुद्धीही!
एक राजा असतो. तो अतिशय दानशूर असतो. एक दिवस त्याच्याकडे एक फकीर येतो. त्याच्या हांतात एक छोटेसे भिक्षापात्र असते. फकीर राजाला म्हणतो “मी खूप दूरुन आलो आहे. हे राजन, तू मला भिक्षा दिलीस तर मला समाधान वाटेल. मी तुझ्या दानशूरपणाबद्दल खूप ऐकले आहे.”
संघर्ष! कुणाला चुकला आहे मुंगी पासून माणसापर्यंत सर्वांना आहे. अगदी लहान शाळकरी मुलांना देखील करावा लागतो. याचा अंदाज शिक्षकांना, पालकांना खरोखर आहे का?

माझे गुरुवर्य प्राचार्य कै. बलवंत देशमुख , तसेच प्राचार्य द.ता. भोसले सरांनीही पाहिली होती . ती वही कालांतराने एसएनडीटी कॉलेज डोंबीवली च्या रिटायर्ड प्राध्यापिका कै . मालती देसाई यांनी पाहिली. हे मी यापूर्वीच्या भागामध्ये उदघृत केले आहेत .
एके दिनीं मी निघून जाईन निरोप घेवून ह्या जगताचा
प्रवास माझा अनंतात तो कसा असेल त्या वेळेचा
आकाशाच्या छाये खालती विदेही स्थितींत फिरत राहीन
'तू' आणि 'मी' च्या विरहीत मी गत कर्माचे करिन मापन
बाल्यातील चुका उमगल्या तरूणपणाच्या उंबरठ्यावरी
सळसळणारे यौवन रक्त वृधावस्तेतील खंत ठरी
पूनर्जन्म तो घेण्याकरितां गर्भाची मी निवड करीन
गत जन्मींच्या चुका टाळूनी आदर्शमय ते जीवन जगेन
शंकेची परि पाल चुकचुके राहील का स्मृति गत जन्माची
नसतां पूनरपि चक्र फिरेल विस्मृति होतां गत कर्माची...५
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
खूप खूप वर्षे झाली. एका रानात एक हत्ती रहात होता. त्याचा एक मित्र होता. तो होता ससा. एके दिवशी हत्ती सशाला म्हणाला,‘आपण एक जमिनीचा तुकडा विकत घेऊया आणि त्या जमिनीत आपण एक सुंदर बाग तयार करुया.’
Copyright © 2025 | Marathisrushti