नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
एक होता धोबी. गावाचे कपडे धुवायचा. मजेत रहायचा. धोब्याकडे एक गाढव होतं. गाढव मात्र मरतुकडं आणि म्हातारं होतं. सकाळ झाली की मालक मळलेल्या कपड्यांचा गठ्ठा गाढवाच्या पाठीवर टाकायचा. नदीवर जायचा.
सकाळी धुतलेले कपडे घेऊन घरी यायचा. रात्र होण्यापूर्वी मालक गाढवाची सुट्टी करायचा. एके दिवशी संध्याकाळी गाढव फिरायला निघालं. काम संपलं होतं. पाठीवर कपड्यांचं ओझं नव्हतं, आणि मालकाची किटकिटही नव्हती. अशा गाढवाला भेटला एक कोल्हा. दोघेही एकटे होते. कामातून मोकळे होते. त्यामुळे दोघांची चटकन बनली दोस्ती. मग दोघेही मित्र भोजनाच्या शोधात एकत्र फिरू लागले.
October 22, 2025
लॉक डाउन मुळे प्रकाशन व्यवसायावर आणि प्रकाशित पुस्तका, काव्य संग्रह, कथासंग्रह वर चांगलाच परिणाम होणार आहे आणि झाला पण आहे. काहिं मासिकां च्या आवृत्या ज्या वर्षोपासुन नियमित निघायच्या त्यात खंड पडला. पण जे वेब मासिक निघत होते त्यांच्यावर असर झाला नाही.
June 10, 2020
या सर्व प्रकारच्या तयारीनंतर कार्यक्रम करण्यासाठी मी अगदी अधीर या झालो होतो. पण भाऊंनी एक वेगळीच कल्पना माझ्यासमोर मांडली. त्यांचे म्हणणे होते की माझा स्वतःचा कार्यक्रम आयोजित करण्याअगोदर मी वेगळ्या कलाकारांचा कार्यक्रम आयोजित करावा आणि केवळ आयोजनाचा अनुभव घ्यावा. कार्यक्रम आयोजनाची जबाबदारी किती मोठी असते, याची मला थोडी देखील कल्पना नव्हती. कार्यक्रम आयोजित करण्यासाठी स्वतःच्या बॅनरचीही आवश्यकता होती. अनेक महिने परिश्रम करून १९८६ साली स्वर-मंच या कंपनीची स्थापना झाली. यात माझ्याबरोबर काम करण्यासाठी विवेक दातारसारखे अनेक मित्र मदतीला आले आणि माझे मित्र संगीतकार आणि सुप्रसिद्ध सतारवादक श्री. शशांक कट्टी (संगीतकार शांक-नीलपैकी एक) यांच्या सतारवादनाचा कार्यक्रम आम्ही गडकरी रंगायतनच्या भव्य सभागृहात आयोजित केला. कार्यक्रमाची तारीख, थिएटर मिळवण्यापासून, विविध सरकारी परवाने, पोलीस परवाने मिळवून तिकिटे छापण्यापासून ती विकण्यापर्यंत सगळी कामे करता करता एक गोष्ट लक्षात आली की कोणताही कार्यक्रम आयोजित करणे खूपच कठीण काम आहे. मला गायक म्हणून लोकांसमोर यायचे असेल तर सुरुवातीला मला नाव नसल्यामुळे कोणताही मोठा आयोजक माझा कार्यक्रम लावणार नाही आणि त्यात गैर काहीच नाही. म्हणजे आता मला दोन जबाबदाऱ्या घ्याव्या लागतील. एक म्हणजे माझा कार्यक्रम आयोजित करणे आणि दोन म्हणजे तो संपूर्ण कार्यक्रम कलाकार म्हणून स्टेजवर सादर करणे. एकूण कार्यक्रम या शब्दाची व्याप्ती मला नीट समजली आणि हे सगळे भाऊंनी मला कामातूनच समजावून दिले. भाऊंनी आणि आईने स्थापन केलेल्या 'निशिगंध प्रकाशन'तर्फे त्यांनी पं. कुमार गंधर्व, पं. जितेंद्र अभिषेकी आणि पद्मभूषण किशोरी आमोणकरांपासून माणिक वर्मांपर्यंत अनेक कलाकारांचे कार्यक्रम निशिगंध प्रकाशन संगीत महोत्सवात आयोजित केले होते. भाऊंची शिकविण्याची पद्धत अत्यंत कडक, पण अतिशय परिणामकारक होती. काहीही शिकविताना वडील म्हणून ते कोणतीही सवलत मला देत नसत. मुलगा म्हणून मला काही बाबतीत तरी सवलतीची अपेक्षा असे. कोणत्याही खर्चाच्या बाबतीत पैशांचा हिशोब शेवटच्या रुपयापर्यंत काटेकोरपणे द्यावा लागत असे. मग अनेक वेळा आमचे वादविवाद होत. शिस्तीच्या बाबतीत माझे दोन्ही गुरूही खूपच कडक होते. त्या तरुण वयात ही शिस्त मला त्रासदायक वाटत होती. पण मी शिकत राहिलो आणि त्या शिस्तीचा आणि शिकण्याचा प्रचंड फायदा मला आज होत आहे. या कडक शिस्तीबरोबरच माझे वडील आणि दोन्ही गुरु प्रेमळही होते. त्या वयात शिस्तीचा त्रास झाला, पण त्यांचे प्रेम आज मला जाणवते.
त्या काळात ऑल इंडिया रेडिओसाठी मी अनेक गाणी गायली होती. रेडिओच्या संगीत विभागाचे प्रमुख म्हणून संगीतकार यशवंत देव आणि संगीतकार प्रभाकर पंडित तेव्हा काम पहात होते. माझी गाणी ऐकून एक दिवस संगीतकार प्रभाकर पंडितांनी मला बोलावले आणि माझे माहेर पंढरी ह्या म्युझिकल फीचरमध्ये गाण्याची संधी दिली. ज्येष्ठ गायक वसंत आजगावकरही या फीचरमध्ये गायले. या फीचरमुळे संगीतकार प्रभाकर पंडितांशी चांगली ओळख झाली. त्यांचा मुलगा उत्कृष्ट तबलावादक आणि संगीतकार केदार पंडित याच्याशी मैत्री झाली. अनेक बाबतीत मला संगीतकार प्रभाकर पंडितांचे मार्गदर्शन लाभले. त्यावेळी म्युझिक कॅसेट व्यवसाय जोरात होता. मराठी भाषेतील अभंगांमध्ये यात सर्वाधिक लोकप्रिय नाव होते श्री. अजित कडकडे. त्यांच्या अनेक कॅसेटचे संगीतकार होते प्रभाकर पंडित. प्रभाकरजींनी रेडिओबरोबरच अनेक प्रायव्हेट कॅसेटसूसाठी गाण्याची संधी मला दिली. त्यामुळेच अजित कडकडे, रवींद्र साठे, उत्तरा केळकर, रंजना पेठे-जोगळेकर यांच्यासारख्या आघाडीच्या गायकांबरोबर माझी गाणी बाजारात आली.
- अनिरुद्ध जोशी
July 6, 2022
घेउनी सोबत ‘गीता’???
March 15, 2012
दोन मैत्रिणी असतात. बऱ्याच दिवसानंतर दोघींची गाठभेट होते. एक मैत्रिण अगदी उत्साहाने भरलेली असते आणि दुसरी कोमेजलेली. दोघी खूप वेळ गप्पा मारतात. उदास मैत्रिणीला कळत नसते की दुसरीच्याही आयुष्यात खूप अडचणी असून ती एवढी आनंदी कशी !
August 16, 2024
आज आषाढी एकादशी! त्यानिमित्ताने मागील काही जुन्या नाटकांचा अभ्यास करते वेळेस अचानक समोर 'संगीत संत कान्होपात्रा' नामक नाटक उभं ठाकलं. जास्तीचा अभ्यास करताना हे नाटक केवढं जुनं आहे हे लक्षात आलं.
१९३१ च्या काळात हे नाटक रंगभूमीवर आलं असं वाचनातून निदर्शनास आलं. १९ नोव्हेंबर १९३१ रोजी या नाटकाचा प्रथम प्रयोग झाला. या नाटकाला संगीत मा. कृष्णराव व विनायकबुवा पटवर्धन यांचं लाभलं.
नाटकात संत कान्होपात्रा यांच्या जीवनावर आधारित घडलेल्या काही ठळक प्रसंगांना नाट्य लेखक ना. वि. कुलकर्णी यांनी अधोरेखित केलं आहे.
असं म्हणतात की संत कान्होपात्रा या मंगळवेढ्याच्या श्यामा नामक गणिकेची मुलगी पण पूर्वकर्मानुसार व संचित पूर्वपुण्यानुसार लहानपणापासूनच भक्तीरसात न्हाऊन निघालेल्या. त्यांची भक्ती इतकी थोर होती की प्रत्यक्षात परब्रम्ह विठू माऊलीला त्यांची तळमळ पहावली नाही आणि खरोखरच त्याने त्यांचा अंत न पहाता त्यांना हृदयात स्थान दिलं.
सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या संत कान्होपात्रा यांचे वास्तव्य पंढरपूर जवळ असलेल्या मंगळवेढ्यात होते. त्या अत्यंत रूपवान होत्या आणि म्हणूनच कर्नाटकातील बेदर बादशहाने त्यांना पळवून आणण्यासाठी त्याच्या सेवकाला धाडलं. कान्होपात्रा नेमाप्रमाणे एका विठ्ठल मंदिरात वीणा आणि चिपळ्या घेऊन भक्तीत तल्लीन झालेल्या असताना तो सेवक त्या घरी जाण्यासाठी बाहेर पडतील त्यावेळेस त्यांना पळवता येईल या दृष्टीने बाहेर उभा राहतो. बराच काळ बाहेर तात्कळल्यानंतर तो आत प्रवेश करतो आणि कान्होपात्रा यांच्या ध्यानात ती गोष्ट येते आणि त्या गर्भगृहात जाऊन पांडुरंगाच्या चरणांना घट्ट मिठी मारून त्याच्यापासून बचाव करण्याची भाक भाकू लागतात आणि इथेच त्या प्राण सोडतात.
संत कान्होपात्रा नाटकातील गाणी:
१)अगा वैकुंठीच्या राया
२)अवघाचि संसार सुखाचा
३)अशी नटे ही चारुता
४)जोहार मायबाप जोहार
५)दीन पतित अन्यायी
६)देवा धरिले चरण
७)धाव घाली विठू आता
८)नुरले मानस उदास
९)पति तो का नावडे
१०)पतित तू पावना
११)शर लागला तुझा गे
यातील 'अगा वैकुंठीच्या राया' या अभंगात त्यांची आर्तता अधिक दिसून येते. वैकुंठीच्या राया तुझ्या चरणाशी मला अखंड थारा दे, सखया विठ्ठला मला या भवनदीतून पार कर, नारायणा मला भक्तीचं दान देऊन माझ्या नरदेहाला गती दे, वासुदेवाच्या नंदना, रखुमाई वल्लभा आता तू मलाही पदरात घे साधारणतः असा भाव संत कान्होपात्रा यांचा त्यावेळी असावा असं मला वाटतं.
याच अभंगाची व्हिडीओ लिंक खाली देत आहे.
(किर्ती शिलेदारांच्या आवाजात)
https://www.youtube.com/watch?v=7qtZbvCNDxc
(पं. राम मराठे यांच्या स्वरात)
https://www.youtube.com/watch?v=azhXqtzIrFw
-- आदित्य दि. संभूस.
(अभिनेता, दिग्दर्शक, लेखक)
व्हिडीओ सौजन्य: मुकुंद मराठे व दीप्ती भोगले यांचे यूट्यूब चॅनेल.
२०/०७/२०२१.
July 20, 2021
उमा काकू घरातील कामे भरभरा उरकून हळदीकुंकूवाला जायची तयारी करु लागल्या. पंत निवृत्त पेन्शन वर घर चालते. मुलींची लग्न झाली आहेत. मुले आपापल्या नोकरीत संसारात. चैत्र महिन्यात उमा काकू ना फारच भाव मिळतो. आणि गावातल्या प्रत्येक घरी जायचे म्हणजे लवकरच निघायला हवं. पिशवी घेऊन जाताना म्हणाल्या जाऊन येते. पंत पण फिरायला बाहेर पडले. पूर्वीचा काळ जिथे संध्याकाळी घरासमोर सडा रांगोळी तिथे जात. दोन्ही हातांनी ओटी भरली जायची. त्यामुळे भरपूर हरबरे कैरीच्या फोडी मिळाल्या पिशवी भरली जड झाली. आणि दिवेलागणीच्या वेळी धापा टाकत घरी आल्यावर हातातील पिशवी ओसरवर ठेवून हुश्श करत पदराने तोंड पुसत पुसत म्हणाल्या दमले बाई. तोच पंत म्हणाले. अरे व्वा बरेच हरबरे आलेले दिसतात. त्यामुळे तुम्ही आज रात्री कैरीच्या फोडी घालुन मस्त पैकी उसळ करा. तशा उमाकाकू कडाडून म्हणाल्या. तर तर तुम्हाला काय होतय सांगायला माझ्या पायाचे तुडे पडले हिंडून हिंडून. म्हणे उसळ कर. तसे पंत हसत हसत म्हणाले की मी आहे म्हणून तुला हरबरे मिळालेत की. आणि आता तर काकूंना जास्तच राग आला. पण तिन्ही सांजेला वाद नकोत म्हणून स्वयंपाक घरात गेल्या..
पंतांचा रोख होता तो असा. ते आहेत म्हणून त्यांना ओटी मिळाली.कारण सवाष्ण असलेल्या बायकांना हळदीकुंकूवाला बोलावले जाते. ओटी भरली जाते. तर उमाकाकूंचे म्हणणे होते की त्या बाहेर खूप घरी गेल्या दमल्या म्हणून ओटीत एवढे आले. दोघेही आपापल्या जागी बरोबर आहेत. पण मी आहे म्हणून तुम्ही आहात असे देव कधी म्हणतो का? माणूस मी माझे माझ्या मुळे अशी बढाई मारतो. पण कधी हा विचार करायला हवा की तो आहे म्हणून जग आहे..
धन्यवाद
–सौ. कुमुद ढवळेकर.
September 6, 2022
आजचे त्यांचे ‘लक्ष्य’ होते ‘चार्मी!’ ‘चार्मी’ म्हणजे भुजंगरावांची लेटेस्ट गर्ल फ्रेंड! सुंदर, तरुण, स्मार्ट, मॉडर्न! (बाकी वर्णन तुमच्या कल्पना शक्तीवर सोडतो.)
December 30, 2020
दोन वर्षांनी मला मशीदबंदरला एका सहकारी बँकेत नोकरी लागली. पहिल्याच दिवशी उशीर नको म्हणून मी अर्धापाऊण तास आधीच गेलो तेव्हा वॉचमन बँकेचं दार उघडत होता. मला पाहून तो म्हणाला, “साहेब! बँक उघडायला अजून वेळ आहे, काय नवीन खातंबितं खोलायचंय का?”
“नाही मी इथं नोकरीसाठी आलोय. आजपासून हजर व्हायचं आहे.” “असं का मग बसा आत, थोड्या वेळाने गोरेसाहेब येतील त्यांना भेटा. ते आले म्हणजे मी सांगतो तुम्हाला.” असे म्हणून त्याने दरवाजा उघडला आणि मी आत जाऊ बसलो.
June 24, 2022
समीक्षकाच्या नाकावरची माशी हलली नाही म्हणजे कविता चांगली….
April 5, 2012
Copyright © 2025 | Marathisrushti