नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
शांतता हा ईश्वरी गुणधर्म आहे. ईश्वरी देण आहे. जसे चैत्यन्य तशीच शांतता. ही मुळ शक्ती समजली जाते. प्रथम निर्माण झाली ती शांतता. नंतर आला तो आवाज (Sound). ह्याचा अर्थ आवाजाच्या निर्मीतीआधी शांतता होती. आवाजाच्या वा ध्वनीच्या नष्ट होण्यानंतर असेल ती पून्हा शांतता. दोन आवाजामधली विश्रांती भरुन काढते ती शांतता. आवाज ऐकण्यासाठी देखील हवी असते शांतता. शांत असाल तरच आवाज ऐकू शकाल. ध्यान धारणा ह्या प्रक्रियेमध्ये शांततेला अनन्यसाधारण महत्व असते. शांतता म्हणजे केवळ वातावरणातील शांतता नव्हे. ती लागते मनाच्या स्थरावर देखील. शांतता म्हणजे केवळ आवाज नसणे, हे अभिप्रेत नाही. त्या वातावरणात देखील खऱ्या शांततेचा मागोवा घ्यावा लागतो. शोध घ्यावा लागतो. तीलाच खरी मनाची शांतता म्हणता येईल. अर्थात " एक सत्य" " शांत मन " हेच ईश्वरी तत्व असेल. त्यालाच म्हणता येईल कr " स्वला " जाणणे. तेच असेल परिपूर्ण.
शांतता सदैव तुमच्या सभोवती अंतरबाह्य अंगाने असते. तीची साथ तुमच्या अस्तित्वामधून निर्माण होत असते. तीला फक्त जाणावे लागते. आवाज कमी करणे वा नष्ट करणे ह्याच क्रिया तुमच्या सान्नीध्यात असलेल्या शांततेला शांततेच्या अस्तीत्वाची जाणीव करुन देतात. ध्यान धरणा करणाऱ्याना हे अनुभवते की एक विचार उत्पन्न झाला, तो छलांग मारुन येतो व त्याच झेपेने जातो. त्याच्या येण्या व जाण्यामधली वेळ अर्थात Stop gap किंवा एक विचार जाऊन दुसरा विचार उत्पन्न होतो. त्या दोन्ही विचारांमधली वेळ ही अत्यंत महत्वाची असते. भले ती फारच क्षणीक मोजमाप करण्याच्या प्रक्रियेमध्ये अत्यंत कठीण असेल. परंतु त्या " मध्यंतराचे " वा दोन विचारामधले " विश्रांती स्थान " जीवन तत्वासाठी सर्वोच्य असे समजले गेले आहे. हीच " खरी शांततेची " वेळ. हीच खरी "स्व ला" जाणण्याची वेळ. हीच खरी ईश्वरी अस्तित्वाला समजण्याची वेळ. श्वासाची क्रिया ही नैसर्गिक असते. ती जशी नित्य, तशीच Involuntary असते. तुमच्या इच्छेची मात्रा तेथे लागु पडत नसते. ती एक स्वयंस्फूर्त सततची क्रिया निसर्गाने योजलेली आहे. जीवंत असे पर्यंत शरीराच्या कोणत्याही अवस्थेत ती अविरत चालू असते. म्हणूनच तीला जीवंतपणाचे लक्षण समजले गेले आहे. हां तुमच्या इच्छाशक्ती नुसार तुम्ही त्याच्या प्रक्रियेमध्ये क्षणीक तात्पुरता बदल करु शकता. ही क्षमता तुम्हाला दिलेली आहे. जसे श्वास दिर्घ करणे, लांबवणे, आखूड करणे, वा कांही क्षणासाठी थांबवणे. कांही वेगळ्या परिस्थितीमध्ये " प्राणायाम " अर्थात श्वासाच्या व्यायामाने, ह्याच तत्वाने बुद्धीच्या वैचारीक चक्राला प्रयत्न्याने वेगळेपणा निर्माण करता येतो. एक विचार उत्पन्न होतो, पसरतो, आणि लय पावतो. लगेच त्याच्यामागे दुसरा वेगळाच विचार उत्पन्न होतो. ही सततची क्रिया नैसर्गिक Involuntary बुद्धीमनाच्या जीवंतपणाचे लक्षण समजले जाते. विचार भरकटणारे व एक समान नसतात. एखाद्या विषयावर चिंतन करणे, हा भाग वेगळा. तो Voluntary ह्या सदरांत मोडतो. परंतु विविध विचार उत्पत्ती ही नित्याची व नैसर्गिक असते. दोन भिन्न विचारामध्यें क्षणीक विश्रांतीची वेळ टिपली जाते. हीच निर्विचार वा मनाच्या शांततेची वेळ.
तुम्ही योगीक प्रयत्न्याने, संकल्पना चिंतन शक्तीने, भावनीक स्थिरतेने, दिर्घ करु शकतात. कांही क्षणाचे, सेकंदाचे वा मिनीटाचे रुपांतर थोड्याश्या वाढीव वेळेमध्ये करु शकतात.
खऱ्या शांततेचा अनुभव केवळ त्याच क्षणी तुम्हास मिळू शकतो. ह्यालाच म्हणतात ' परम आनंदाचा क्षण ' (Ecstasy of Joy) ह्याचे वर्णन करणे केवळ अशक्य असेल. तो फक्त एक जीवंत सर्वोच्य अनुभव समजता येईल. गरज असते ती प्रयत्न्याची. ह्याचे कुणीही मार्गदर्शन करु शकत नाही. अध्यात्मिक बैठकी विषयी मात्र अनुभवसंपन्न आनंद मिळवायचा असतो. तो प्रत्येकाला स्वतःचें प्रयत्न करुन केवळ दोन विचारामधला शांततेचा काळ प्रयत्न्याने वाढवून. येणाऱ्या वा ऊत्पन्न होणाऱ्या विचाराला थोडेसे थोपवून. जो विचार आलेला आहे त्याला नाहीसा करण्याचा प्रयत्न करुन. ह्यात जबरदस्त ईच्छा शक्तीचा भाग असतो. अंतरमनाची शांतता प्रस्थापीत करणे ह्यालाच म्हणतात.
शांतता निर्माण करता येत नाही. जी सदैव असते, तीलाच फक्त अनुभवता येते. मनाला शिकवून मनाची ठेवण करुन आवाजा विरहीत अथवा आवाजाच्या सान्निध्यांत देखील खऱ्या शांततेचा अनुभव घेता येतो. खऱ्या योगाचे हेच लक्षण असेल.
विचारांची ऊत्पत्ती व लय ह्याप्रक्रियेची सतत जाणीव Awareness असावी. मात्र लक्ष्य केंद्रित विचारावर Thoughts वर न ठेवता त्याच्या प्रक्रियेच्या जाणीवेवर Awareness वर असण्याचा संकल्प असावा. हेच तुम्हास खऱ्या शांततेची जाणीव देत राहील. ह्यातच मनाला जे विचार विचलीत करीत असतात, त्यावर मात करणे, शक्य होते. विचारावर लक्ष्य असण्यापेक्षा लक्ष्य असणाऱ्या जाणीवेवर अर्थात स्व वर केंद्रित होणे, ह्यामध्ये डूबून जाणे, खऱ्या शांततेशी एकरुप होण्यासारखे असेल.
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
कार्यक्रमांसाठी मी थोड्या वेगळ्या वाटेने जायचे ठरवले आणि तशी संधीही मला लवकरच मिळाली. सरकारतर्फे एक निवेदन टाईम्स ऑफ इंडियामध्ये आले होते. हे निवेदन मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि डिपार्टमेंट ऑफ कल्चरतर्फे छापले होते. नॅशनल इंटिग्रेशन थ्रू म्युझिक अॅन्ड डान्स या विभागात समता, बंधुता, राष्ट्रीय एकात्मता अशी शिकवण देणारे संगीत व नृत्याचे प्रोजेक्टस् मागवले होते. त्यांचे कार्यक्रम छोट्या शहरातून व गावातून सरकारतर्फे केले जाणार होते.
मुलींच्या शाळेत मातृदिनाची लगबग चालली होती. मुली, शिक्षिका सगळेच उत्साही होते. सगळ्यांनी मिळून शाळा स्वच्छ केली. जिकडे तिकडे आरास केली. आजचा दिवस आईला वंदना देण्याचा होता. सगळ्यांची उत्सुकता ही होती की मुख्याध्यापिका कोणाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलाविणार.
या भूकंपाची महत्ता रिश्टर मापक्रमानुसार ७.५ होती. या धक्क्यामुळे कोयना धरणाला कोणताही गंभीर धोका पोहचला नाही. फक्त धरणाच्या भिंतीवरचा निरीक्षण मनोरा पडला व कोयनानगरमधील कच्च्या बांधणीच्या सर्व इमारती पडल्या.
एक राजा होता. तो खूपच पराक्रमी होता. जेवढा पराक्रमी तेवढाच प्रजाहितदक्ष. प्रजेच्या फायद्यासाठी त्याचे सारखे प्रयत्न चालू असायचे. त्यामुळे प्रजाही राजावर खूश होती. असा राजा जन्मोजन्मी मिळो अशीच प्रार्थना प्रजा करीत होती. राजा पराक्रमी असल्यामुळे त्याने अनेक राजांना आपले मांडलिक बनवले होते. त्या मांडलिक राजांकडून राजाला वेळोवेळी धन व संपत्तीचा पुरवठा होत असे. त्यामुळे राजाचा खजिना नेहमीच भरलेला असे. राजाची आर्थिक बाजू भरभराटीला असल्यामुळे राज्यात सुबत्ता होती. दुष्काळातही प्रजेचे फारसे हाल होत नसत. राजाच्या राज्यात एकूणच सर्वत्र आबादीआबाद होते. राजाला याच गोष्टीचा फार अभिमान होता. या अभिमानाचे रूपांतर हळूहळू अहंकारात व नंतर गर्वात झाले. पुढे पुढे हा गर्व राजाच्या आचरणातही दिसू लागला. एकदा राजधानीत एक मोठे साधूमहाराज कोठून तरी आले. साधूमहाराज अतिशय निरिच्छ वृत्तीचे होते.दर्शनासाठी वा भेटायला आलेल्या लोकांकडून ते काहीही घेत नव्हते.
राजधानीत त्यांची प्रसिद्धी वाहू लागली व त्यांचे दर्शन घेण्यासाठी लोकांची रांगही वाढू लागली. या साधूमहाराजांची महती राजाच्याही कानावर गेली. त्यामुळे एकदा राजाही त्या साधूला भेटायला गेला व म्हणाला, 'तुम्ही मागाल ते मी द्यायला तयार आहे; मात्र तुम्ही ते स्वीकारले पाहिजे. माझा सारा खजिना, सारे राजवैभव इतकेच काय माझे शरीरही तुम्हाला द्यायला तयार आहे. यापैकी तुम्ही काहीही स्वीकारू शकता ?' त्यावर साधूमहाराज राजाला म्हणाले, ' राज्याचा खजिना तर
प्रजेच्या मालकीचा आहे. त्याचा तू केवळ राखणदार आहेस. तुझ्या शरीरावर तुझ्या पत्नीचा तसेच तुझ्या मुलाबाळांचा हक्क आहे. ' साधूच्या या उत्तरामुळे राजा गोंधळला व म्हणाला, ' 'मग माझी स्वतःची अशी कोणती भेटवस्तू तुम्हाला देऊ हे तुम्हीच मला सांगा. ' त्यावर साधूमहाराज राजाला म्हणाले, ' 'तुझ्या मनातील अहंकार हा सर्वस्वी तुझाच आहे. त्याचे दान तू मला करू शकतोस. '' साधुमहाराजांच्या या
उत्तराचे मर्म राजाला समजले व त्याने अहंकार सोडून देण्याचा निश्चय केला.
वर्तमानात जगा , भूतकाळ संपला , भविष्यकाळ कुणी पाहिलाय? हे कितीही खरं असलं तरी , वर्तमान काळ हा भविष्याची चाहूल घेऊनच येतो, म्हणूनच वर्तमानात जगत असताना भविष्याची तरतूद करणं आपल्या हातात आहे. मग तो पैसा असो किंवा माणसं. हे केवळ ज्येष्ठ पिढीने नव्हे तर प्रत्येकाने लक्षात ठेवण्याची गरज आहे. आपल्या सर्वांना जमला पाहिजे तो समतोल. विचारांचा, भावनांचा, धारणांचा आणि कृतींचा..
ज्याला पुढे काय घडणार आहे (विचारमंथनाच्या तर्कबुद्धीच्या आधारावर, ज्योतिषाच्या आधारवर नव्हे ) हे समजते त्याला द्रष्टा म्हटले जाते. सावरकरसुद्धा असेच द्रष्टे होते. तीस चाळीस वर्षानंतर काय घडू शकेल हे सावरकर अचूक सांगू शकत होते.
गोव्यात गावागावात जेवढी म्हणून देवस्थाने आहेत, तेवढाच नाट्यमंडळांचाही आकडा आहे. गोव्यातील नाट्यपरंपरा कधीपासून सुरू झाली, याला अनेकांचे दुमत आहे. परंतु "अहिल्योध्दार" नाटकाच्या मूळप्रतीवरून एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभीच गोमंतकीय रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली असावी असे अनेक जाणकारांचे मत.
गोव्याचे संतकवी म्हणून ओळखल्या जाणार्या कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकर लिखित "अहिल्योध्दार" या नाटकाच्या प्रतीवरून आणि त्यांंच्या इतर लिखाणावरून जाणकारांनी कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकर यांचा आद्यनाटककार म्हणून उल्लेख केला आहे.
गोव्याचे अष्टपैलू व्यक्तीमत्व साहित्यिक, नाटककार, नट, गायक, लेखक विष्णू सुर्या वाघ हे गोव्यातील डोंगरी गावातले. याच डोंगरी गावात कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकर होऊन गेले. 2012च्या निवडणूकीत विष्णू वाघ विधासभेवर निवडून आले, तेव्हा गोमंतकीय कलाकारांनी, कलाकारांचा आवाज विधानसभेत पोचला अशा प्रतिक्रीया व्यक्त करून वाघांचे कौतुक केले. त्याच काळात तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी त्यांना कला अकादमीचे अध्यक्षपद प्रदान केले होते. वाघ कला अकादमीत आल्यावर अनेक नवे उपक्रम, नवकल्पना, स्पर्धांतील बक्षीसांच्या रक्कमेत वाढ अशा गोष्टी घडत गेल्या. यातील मुख्य गोष्ट म्हणजे वाघांनी गोमंत रंगभूमी दिनाची घोषणा केली. तीही बांदकरांच्या जन्मदिनी. तेव्हापासून गोव्यात रंगभूमी दिन जुलै महिन्यात साजरा केला जातो. त्यानिमित्ताने ज्येष्ठ नाट्यकलाकारांचा सन्मान केला जातो. हा एकप्रकारे बांदकरांच्या कार्याचा गौरव म्हणावा लागेल.
उपलब्ध माहितीनुसार बांदकरांचा जन्म 1844 साली झाला. डोंगरीत राममंदिरात होणार्या रामनवमीला ते स्वत: लिहून नाटके सादर करायचे. हे नाटक म्हणजे संगितिकेच्या स्वरूपातील नाट्य. ते स्वत: मंदिरातील पुरोहित असल्याने स्थानिक तरूण त्यांच्या शब्दाला मान देत. त्यांना घेऊनच ते नाटकं सादर करायचे. कीर्तनी बाजातील ही मराठी नाटके तेव्हा प्रेक्षकांना फार आवडायची. त्यांची ख्याती दूरवर पसरली होती. गोव्यातीलच नव्हे शेजारील राज्यांमधूनही त्यांची नाटके पाहायला लोक यायचे. बांदकरांनी विपूल प्रमाणात लेखन केले आहे. त्याचा दाखलाही मिळतो. कीर्तने, श्लोक, अभंग हे तर आहेच. शिवाय काही नाटकांचा संदर्भही आढळतो. त्यांनी लिहिलेल्या नाटकांमध्ये "लोपामुद्रा संवाद", "नटसुभद्रा विलास", "शुक रंभा संवाद", "अहिल्योध्दार" या नाटकांचा समावेश आहे. परंतु या नाटकांच्या प्रती कुठे गेल्या याचा ठाव लागत नाही. केवळ "अहिल्योध्दार" या नाटकाची मूळ प्रत त्यांचे पणतू सिताराम बांदकर यांच्याकडे आहे. गोमंतकीय नाट्यपरंपरा सांगताना अण्णासाहेब किर्लोसकरांचाही बांकरांच्या माहितीत उल्लेख झाला आहे.
गोमंतकीय विश्वकोषात बांदकरांच्या साहित्याविषयी थोडक्यात माहिती मिळते. अण्णासाहेब किर्लोसकर त्याकाळात मिठाच्या व्यवसायानिमित्त गोव्यात असताना त्यांना बांदकरांच्या "शुक रंभा संवाद" नाटकाचा प्रयोग पाहाण्याचा योग आला. किर्लोसकरांना त्यांना तो फार आवडला. त्यांनी बांदकरांना आपल्या सोबत मुंबईला येण्याचे आमंत्रण दिले. परंतु बांदकरांनी आमंत्रण स्वीकारले नाही. आणि वर हेही सांगितले की आपण श्रीराम भक्त असून, केवळ भग्वदभक्तीच्या मार्गाने श्रध्दाळू भक्तांना सुजाण करण्याचे काम करतो. ही केवळ आपली रामभक्ती असल्याचे त्यांनी किर्लोसकरांना सांगितले. हीच प्रेरणा घेऊन, बांदकर महाराजांच्या आशिर्वादाने पुढे किर्लोसकरांनी मुंबईत "संगीत शाकुंतल" नाटकाची निर्मिती केली असल्याची महिती विश्वकोषात सापडते. अशा काही गोष्टी त्यांच्या संदर्भातील आढळतात. आणि म्हणूनच "अहिल्योद्धार" ही नाट्यकृती गोमंत रंगभूमीचा पाया असे संबोधले जाते.
तसं पाहिल्यास गोव्यात कितितरी देवस्थाने आहेत, जिथे उत्सवी रंगभूमीची चळवळ आजतागायत चालू आहे. म्हापसा शहरातील श्री महारूद्र प्रासादिक नाट्य मंडळ हे 1843 सालचे जेव्हा महारूद्र देवस्थान सुरू झाल तेव्हाचे. या नाट्यमंडळाची परंपरा म्हणजे रामनवमी ते हनुमानजयंतीपर्यंत उत्सव चालतो. या मंडळाच्या नाट्यपरंपरेचा उल्लेख आढळतो तो गौळणकाला सादर करण्यापासून. सुरूवातीला पाच दिवस उत्सव झाल्यावर शेवटच्या दिवशी गौळणकाला व्हायचा. स्थानिक बालकलाकार या गौळणकाल्यात सहभागी व्हायचे. पुढे याच उत्सवातून दर्जेदार, अभिजात अशी नाटके सादर होऊ लागली. महाराष्ट्रात मराठी रंगभूमी गाजवलेले रघुवीर सावकार, गोपीनाथ सावकार, वसंत सावकार हे याच नाट्यमंडळाचे कलाकार. सावकारांच्या "नाट्यबोधेच्छू नाट्य समाज" या संथेची मुहूर्तमेढ म्हापशाच्या महारूद्र देवस्थानातच रोवली गेली. गोव्यात अशा कितीतरी नाट्यसंस्था आहेत ज्यांची सुरूवात गौळणकाला, दशावतारी नाटके यापासून झाली आहे.
तर अशी ही गोमंतकीय नाट्यपरंपरा गोव्याच्या मातीत रुजलेली. बांदकरांनी त्याला समाजमान्यता दिली. रामभक्तीच्या माध्यमातून उदयास आलेली ही नाट्यपरंपरा. आजही गोव्याच्या कानाकोपर्यात उत्सवी रंगभूमीची सेवा होते आहे. विष्णू वाघांनी कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरांच्या जयंतीदिनी गोमंत रंगभूमी दिन साजरा करण्याची घोषणा केली. परंतु त्याही आधी 2004 साली गोव्यातील एक ज्येष्ठ नाटककार विजयकुमार नाईक़ यांनी "अहिल्योध्दार" नाटकाची पुन:रचना करून ते नाटक ठिकठिकाणी सादर केले. शंभर वर्षांच्या कालावधीनंतर बांदकरांच्या नाटकाला तसेच्या तसे रंगभूमीवर आणण्याचे धाडस विजयकुमार नाईक यांनी केले. विजयकुमार सांगतात, गोव्यातील गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष कै.शशिकांत नार्वेकर यांनी त्यांना अहिल्योध्दार नाटकाच्या मूळ प्रतीची झेरॉक्स प्रत दिली होती, जी जीर्ण झाली होती. त्यातून काहीच साध्य करण्यासारखे नव्हते. पुढे त्यांनी बांदकरांचे पणतू सिताकांत बांदकर यांची भेट घेऊन मूळ प्रत मिळवली व काम झाल्यावर ती त्यांच्या स्वाधीन परत केली. खरं तर या प्रतीत पुसटसे शब्द होते. तेव्हाची लिहिण्याची पध्दही वेगळी होती. परंतु विजयकुमार नाईक़ यांनी त्यांच्या संस्थेचे कलाकार मंदार जोग यांना घेऊन ती प्रत तशीच्या तशी लिहून काढली. आणि गोव्यातील आघाडीचे संगीतकार अजय नाईक यांनी नाट्यपदांना संगीत दिले. जसे बांदकर नाटक सादर करायचे, त्याच पध्दतीने विजयकुमार नाईक यांनी अहिल्योध्दारची निर्मिती केली. या नाटकाचे गोव्यात आणि गोव्याबाहेर मिळून चाळीसच्या वर प्रयोग झालेत. पहिला प्रयोग फोंड्याच्या राजीव कला मंदिरात 5 डिसेंबर 2004 साली झाला. गोव्याच्या सर्वच्या सर्व तालुक्यांमध्ये हे नाटक सादर करून विजयकुमार नाईक यांनी गोमंतकीय नाट्यकलेचा पाया कसा होता याची साक्ष दिली. त्यानंतर सोलापूर येथील नाट्य आराधना, चाळीसगावमधील रंगगंध संस्था, दादर माटुंगा येथील कल्चरल सेंटर, नेहरू सेंटरच्या संगीत नाटक फेस्टीव्हलमध्ये हे नाटक सादर करण्यात आले. हे नाटक विजयकुमार नाईक यांनी प्रकाशितही केले होते. तसेच अजय नाईक यांनी संगीतबध्द केलेली सीडीही आहे. यंदाच्या गोमंत रंगभूमीदिनी या सीडीचे आनावरण करण्यात आले.
विष्णू वाघांनी गोमंत रंगभूमीदिन सुरू करून बांदकरांच्या कार्याचा गौरव केला. आता कला अकादमीचे विद्यमान अध्यक्ष आणि गोवा राज्याचे कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे अकादमीचे उपक्रम पुढे नेत आहेत. यंदाच्या कार्यक्रमात त्यांनी कला अकादमीतर्फे "अहिल्योध्दार" नाटकाच्या सीडीसाठी पुढाकार घेतला. ते स्वत: एक उत्तम नाट्यकलाकार, लोककलाकार असल्याने, कलाकारांचा आवाज त्यांच्यापर्यंत पोचतो, असे गोव्यातील कलाकार मानतात. ते स्वत:ला विष्णू वाघांचे शिष्य मानतात आणि तसे आहेही. वाघांमुळेच आपण रंगभूमीवर आलो आणि पुढे राजकारणातही असे ते प्रांजळपणे सांगतात. विष्णू वाघांनी आपल्या "शिवगोमंतक" या नाटकात त्यांना शिवाजीची भूमिका दिली होती, असे ते आवर्जुन सांगतात.
-- कालिका बापट,
पणजी, गोवा
नुकत्याच झालेल्या गोमंतक रंगभूमी दिनाला ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते प्रमुख पाहुण्या होत्या. त्यांच्या हस्ते कलाकारांचा गौरव आणि "अहिल्योध्दार" सीडीचे अनावरण करण्यात आले.

अहिल्योध्दार नाटकातील प्रसंग
१७ जुलै ही रोम या देशाला संविधान लागू होण्याची तारीख आहे. तसेच १ जून २०१० ला कंपाला (युगांडा) मध्ये रोमच्या संविधानाबद्दल चर्चा करण्यासाठी संमेलन आयोजित करण्यात आले. तेथील विधान सभेत अनेक पक्षांद्वारे १७ जुलै ही आंतरराष्ट्रीय न्याय दिवसाच्या रूपात साजरा करण्यासंबंधी निर्णय घेण्यात आला.
आम्हीच माघार घेतली पाहिजे बरोबर आहे घर त्यांच राज्यही त्यांचेच आम्ही आश्रीत तेंव्हा बोलायचे नाही गप्प गुमान बंद करा आणि बसा शांत. आता नानांची पण काही चूक नाही. आर्थिक परिस्थिती मुळे सिनेमा नाटक सहली काहीही जमले नाही व्यवसाय. कामाचा व्याप मुलांच्या शिक्षणासाठी व लग्नासाठी पैसा व वेळ गेला. आत्ता कुठे सगळे स्थिरस्थावर झाले आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti