नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
” शब्दांचा हा खेळ मांडला ” असं मागणं मांडणाऱ्या महानोरांनी ” तुझा शब्द दे आकाशाचा ” असं ईश्वराला विनवलं आहे. देशभक्तीपर गाण्यांमध्ये, पोवाड्यांमध्ये ऊर्जा असते ती जीवनाला ध्येय देणारी, दिशा दाखविणारी ! अशा शब्दांचे ऋण मानताना, माझ्या आवडत्या दोन ओळी –
सध्याच्या काळातील इंग्रजी काव्यामधलें हें वर्णन पहा – ( संदर्भ – वेब्)
रावणाने कपटाने सीतेला पळवून नेल्यानंतर रामाला फार दु:ख झाले. त्याने सगळीकडे सीतेचा शोध सुरू केला. परंतु सीतेचा शोध लागेना. शोध करीत करीत राम-लक्ष्मण किश्किंधा नगरीपर्यंत येऊन पोहोचले. तेथे ‘वाली’ या नावाचा वानर राज्य करीत होता. त्याने आपला धाकटा भाऊ ‘सुग्रीव’ याच्यावर फार अन्याय केला होता. रामाने सुग्रीवावरील अन्याय दूर करण्याकरिता वालीला ठार मारले आणि सुग्रीवाला राज्यावर बसविले. या उपकाराची फेड म्हणून सुग्रीवाने रामाला मदत करण्याचे कबूल केले. त्याने आपले आणि इतर वानर राजांचे सारे सैन्य गोळा केले. लाखो वानर वीर गोळा झाले.
तर रोजा घरात पुरती रुळली होती. निगडीहून पुण्यात आणि पुण्यातील या घरातून त्या घरात ती आमच्यासोबत होती. स्कूटरवर बसायला घाबरणारी रोजा कारमध्ये ऐटीत बसे. आता घराला अंगण होते, मोठे फाटक होते, छोटा बगिचा होता, तिला बांधून ठेवणे मला आवडायचे
नाही; पण आता तिला मोकळे
सोडण्यासारखे वातावरणही होते. ती घराच्या मागे जाऊन प्रातर्विधी उरकीत असे. काहींच्या प्रवेशावर नाराजी, तर काहींबद्दल आनंद व्यक्त करीत असे. अशात ती मोठ्या फाटकाच्या फटीतून बाहेर पळायला लागली होती. कोणी मारेल, स्कूटरचा धक्का लागेल, कोणी घाबरेल म्हणून आम्ही काळजी घेत असू; पण ती वेळ मिळताच पळायची. नंतर स्वतहून परत यायची. दार उघडण्यासाठी आवाज द्यायची. रागावून तिला घरात घ्यायचो तेव्हा तिचा चेहराही अपराधी वाटायचा. अखेरीस एके दिवशी नेमके काय झाले असावे याची जाणीव झाली मला. पोरीने तोंडाला काळे फासले होते आमच्या. कुठे तरी जाऊन ती व्यभिचार करीत होती अन् आम्हाला पत्ताच नव्हता. हिचा संताप सुरू झाला. पोटच्या मुलीपेक्षा तिला जपले तिने हे असे करावे हे तिला मान्य होणे कठीण होते. शिवाय या अनौरस पिल्लाचे करायचे काय हा प्रश्न होताच? आता आमचे घर पुन्हा तिघांचे झाले. आम्ही तिच्या पिलांविषयी बोलू लागलो. काय करायचे? गर्भपाताचा विषय डॉक्टरांनी फेटाळला. तिला धोका होता. बाळंतपण होणे आवश्यक होते; पण तो उत्साह नव्हता, आनंद नव्हता, कौतुक नव्हते, होती ती अपरिहार्यता. मनात चीड, संताप अन् तिरस्कारही. काय वाट्टेल ते झाले तरी पिल्ले नकोत. फेकून देऊ, हा विचार वाढू लागला. पक्का होऊ लागला. कोण करणार हे काम? मी का पराग? अखेरीस परागने हे काम करावे असे ठरविले. अखेर तो दिवस आला. कोणाच्याही नशिबी येऊ नये असे दुर्लक्षित बाळंतपण तिच्या नशिबी आले. डॉक्टर नाही की औषध नाही. रोजाने चार पिलांना जन्म दिला. त्यापैकी एक जन्मतच गेले. उरले तीन, त
यांनाही लांब कुठेतरी टाकून द्यायचे होते. आम्ही तिघेही एकमेकांना बजावत होतो. आता दयामाया नको. तिने पाप केलेय, ते आपल्याला नको. तीनही पिलांना मी पाहिले. पिलासारखी पिले. डोळे मिटलेले आता कायमचे मिटणार. त्यांना कावळे खातील की घार नेईल? कोण नेईल त्यांना? कितीवेळ जिवंत राहतील? पण त्यांनी का मरावे? त्यात त्यांचा काय देष? असे प्रश्न बहुधा तिघांपुढेही होते अन् म्हणूनच आम्ही एकमेकाला आपल्या निर्धाराची आठवण करून देत होतो. बागकामाला लागणारी पाटी आणली. त्यात रद्दी पेपर ठेवले. त्यात तिघांना ठेवले. अगदीच निर्दयी होता येत नाही म्हणून एक फडके टाकले. आता रोजाचे लक्ष नाही असे पाहून परागने ती पाटी टाकून द्यायची होती. इकडे रोजा निश्चिंत होती. परागने विचारले, बाबा
-- किशोर कुलकर्णी
अशा वेळी कोणाला कोरोनाची लागण झाली तर काय होईल ह्या भीतीने प्रत्येकजण हादरला आहे. जहाजावर कोणी नवीन माणूस येऊ नये असे सुद्धा प्रत्येकाला वाटत आहे. नवीन येणार असतील तर सगळ्यांनाच एकदम जाऊ द्या असेही काहीजणांना वाटते आहे. परंतु हे शक्य नाही कारण प्रत्येक जण हेल्पलेस आहे.
मला किती कळतं, मला किती माहिती याचा गवगवा करणारा आजकाल समाजाला प्रबोधन करू पहातो, तो खरंच त्या केपेबल आहे का? याची खात्री आपण कधीच करत नाही.
काल माझ्या भाचीचा फोन आला, मामाजी आप दादा बन गये हो, भैया को लाडकी हुई है. इस ख़ुशी में एक कविता हो जाये. खंर म्हणाल तर मी कवी नाही. मराठी भाषेचे शिक्षण ही नाही. छंद, अलंकार कशाशी खातात हे ही माहित नाही. पण हृदयातील भावना शब्दांत उतरविण्याचा प्रयत्न करतो. त्या चिमुकल्या चिमणीच्या जन्माच्या वेळी आजी आणि पणजी सुद्धा तिच्या जवळ होते. त्यांना काय वाटत असेल, त्यांच्या मनातील मला जाणवलेल्या भावना शब्दांत उतरविण्याचा प्रयत्न केला आहे:

अयोध्या नगरीचा अवघा आसमंत रंगीत दीप आणि दीपमालांनी प्रकाशमान झाला होता. आकाशातील द्वितीयेचा चंद्र आज जरा जास्तच तेजस्वी जाणवत होता. शरयूच्या तीरावरून येणाऱ्या सुखद गारव्यामुळं वातावरण प्रसन्न वाटत होतं. सर्वत्र उभारलेल्या राहुट्यातून , मंदिरांच्या प्रांगणातून , शरयू नदीच्या किनाऱ्यावरून केवळ आणि केवळ राम धून ऐकू येत होती.
आपल्या दिनचर्येतल्या अनेक गोष्टींमध्ये सोशल मीडियाचा समावेश झाला आणि अल्पावधीतच त्यानी आपल्या बऱ्याचश्या वेळेवर ताबा मिळवला. कधी टाईमपाससाठी तर कधी कामासाठी म्हणून chatting करणं ही एक गरज होऊ लागली आणि आपला संबंध आला तो chatting चा अविभाज्य घटक असलेल्या ..“स्माईली” या प्रकाराशी.
सकाळी उठल की लोक देवाच्या पाया पडतात आणि मी व्हॉटस्ॲपवर कुणाचा संदेश आला, ग्रुप वर काय चाललय, फेसबुकवर किती जणांनी माझ्या फोटोला लाईक दिले, काय आणि किती कंमेट आल्या हे बघतो. रात्री मोबाईल कितीही वेळ वाया घालवीन पण दिवसभर काम करुन थकलेली आई बोलली बाळा पाय दुखतायत दाबतोस का तर मला झोप येते. आईने छोट काम सांगितल की मला कंटाळा येतो. मला माझ्या अपयशाच खर कारण कळल होत. माझ कंटाळा करण, माझा आळशीपणा, माझ फेसबुक, व्हॉटस्ॲप, युटुब्यच व्यसन, आयुष्यतल्या वेळेचा अपमान, अतिहुशारी, अर्थ नसलेली बडबड. खरच मी आता स्वतःच्या नजरेत एका झटक्यात पडालो, माझी गरजच नाही कशाला जन्माला आलो हाच प्रश्न पडला. खरच घरात बसून असलेल्या मला खरतर घरातून बाहेर हकलल पाहिजे. तर आई बाबांच निस्वार्थ प्रेम मिळतय. कर्जाच्या बोझाखाली वाकलेले आणि लवकरच नोकरीपासून निवृत्त होणारे बाबा कधीच काय बोलले नाही. नको आपला भार आई वडलांना मरुया आपण हाच विचार डोक्यात फिरु लागला.
Copyright © 2025 | Marathisrushti